राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, July 29, 2024

महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


वृक्षारोपण - हा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा स्तूत्य उपक्रम - शेख

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रं.१ खबडी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर प्रकाश भालेराव, डि पॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फ्रॅंको,पास्टर विजय खाजेकर पास्टर अण्णासाहेब अमोलिक, एडवोकेट मंगला दुशिंग, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रवींद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, विशाल पंडित,प्रल्हाद अमोलिक,लेविन भोसले आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
             या प्रसंगी शौकतभाई शेख म्हणाले की, आजमितीस वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची नितांत गरज आहे, कोरोना काळात आपल्याला जो कटु प्रसंगाचा सामना करावा लागला तो प्रामुख्याने ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे, तथा वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे काम करतात तसेच वृक्षांमुळे पाऊसही अधिक प्रमाणात पडतो,पावसामुळे सर्वत्र सुजलाम सुफलाम होते. याकरीता वृक्ष लागवड आणी वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे समजून प्रत्येकाने वृक्ष लागवडी कामी पुढे येत वृक्ष संवर्धन ही मोठी चळवळ निर्माण झाली पाहिजे पाहिजे असे ते म्हणाले.तसेच यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
               
पुढे बोलताना श्री.शेख म्हणाले की, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्यावतीने आज होत असलेला वृक्षरोपणाचा कार्यक्रम खुपच स्तूतीजन्य आहे,कारण आपली जी काही आजची धन - संपदा प्रोपर्टीज आहे ती उद्या कदाचित नसणार मात्र आम्ही लावलेली झाडे (वृक्ष) ही आम्ही गेल्यानंतरही आमच्या येणाऱ्या भावी पिढीस खुपच फायद्याची तथा फलदायी ठरणार असल्याने आम्ही आज आहोत, उद्या राहू न राहू मात्र वृक्ष संवर्धनाच्या निमित्ताने येणाऱ्या भावी पिढीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं सोडून जावू असेही ते म्हणाले.

यावेळी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, संतोष दिवे, प्रमोद शिंदे,अंतोन दुशिंग, खंडागळे गुरुजी, प्रतिमा पंडित,जोसेफ खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले होते.शेवटी दिपक कदम यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
आपला - शौकतभाई शेख ✍️✅🇮🇳...
समता फाऊंडेशन, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Wednesday, July 24, 2024

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठात कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये
९० कवींनी सादर केल्या कविता
=================================

उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
 संकल्पनेचे अनेकांनी केले कौतुक
=================================

- उद्धव फंगाळ - मेहकर -/ समाचार 
सातारा - येथील येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचा वर्धापन दिन उत्सव निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळ व छत्रपती शिवाजी कॉलेजचा भाषा विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील माझं कवितांचं गाव जकातवाडी हा समुह या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने‘ उदघोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा’ या संकल्पनेवर आधारित कवी संमेलन शनिवार दिनांक २० जुलै २०२४ रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील बॅरिस्टर पी.जी. पाटील सभागृहात नुकतेच संपन्न झाले. प्रारंभी उद्घाटन समारंभात माझा कवितांचं गाव जकातवाडी या समूहाचे अध्यक्ष प्रल्हाद पार्टे म्हणाले की ‘ ही कर्मवीरांची भूमी आहे. आपण आपली कवितेची विचारधारा सर्वत्र पोचवली पाहिजे.आपल्या कविता जनमानसात जायला हव्यात. महाविद्यालयाने समाजाकडे पोचायला हवे. आपण केवळ आनंदासाठी कविता करत नाही. हिंसा नको,कर्मकांड नको, माणसातील माणुसकी मला पाहिजे हा ध्यास आपण घेतलेला आहे. आपल्या कविता जनमानसात पोचायला पाहिजेत. कविता पोचली तर कवी पोचणार आहे. शिवाजी कॉलेजमधून प्रेरणा घेऊन कवितेचं गाव आपण पुढे न्यायचे आहे .असे ते म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे ,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापिठाचे मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिल वावरे तसेच आंतरविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.रघुनाथ साळुंखे, प्रा. डॉ.सुभाष वाघमारे ,प्रा. डॉ. सविता मेनकुदळे, प्रा.डॉ. रोशनआरा शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
            शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.भरत जाधव म्हणाले,‘ मी ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. कर्मवीरांची दृष्टी खूप महत्वाची होती. आपण खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत आहोत का,हा प्रश्न आहे. जुन्या नव्याचां संगम या कवी संमेलनात होत आहे. प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी अनेक कार्यक्रम घेत प्रोत्साहन दिले आहे. कुलकर्णी मदम मला सर्वत्र कार्यक्रमात दिसतात. नखावर लावायची शाई तेवढीच आमची लोकशाही हे फ.मु.शिंदे यांनी सांगितले आहे. समाजामध्ये विध्वंस घडतो तेंव्हा साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून हा विध्वंस थांबवला पाहिजे. समोरच्या माणसाच्या ह्दयात कविता पोचली पाहिजे . कवितेचे प्रकार समजून घेतले पाहिजे, या पुढच्या काळात कविता कशी लिहायची याची कार्यशाळा आपण घेणार आहोत. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाची संशोधन पत्रिका जगभरात पोचत आहे. साहित्यिक फक्त बोलत नाहीत तर ते करून दाखवतात. तुमच्या प्रत्येक शब्दाला कर्तुत्वाचे मोल यावे असेही ते म्हणाले.             
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे म्हणाले की, मला सतत तुमच्या सोबत रहावे वाटे. कवी कल्पनेच्या सहाय्याने नवनव्या गोष्टी सुचवत असतो. हे कवी संमेलन सातारा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता बार्शी, धाराशिव येथून कवी आले आहेत. कवी समाजात विधायक दिशा देत असतात. उद्घोष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय अतिशय समर्पक असून सदर काळात या चिंतनाची गरज आहे. शिक्षण व्यवस्थेची आणि समाजाची नाळ तुटत चाललीय ती जोडायचे काम छत्रपती शिवाजी कॉलेज करीत आहे. २७ ला आम्ही माजी विद्यार्थी मेळावा घेत आहोत .तसेच ८ व ९ ऑगस्टला माजी सैनिक मेळावा ठेवून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. उद्योजक मेळावा घेत आहोत. प्रत्येक गावात आम्ही वृक्षारोपण घेत आहोत. डोळेगाव ला आम्ही ५०० - ५५० झाडे लावली आहेत. मला कवितेचे गाव जकातवाडी समुहाचे कौतुक करावे वाटते .कवितेच्या प्रसारासाठी ते मोठे योगदान देत आहेत. तसेच दिवाळी नंतर अनेक कवीना बोलवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
                  या उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. माझं कवितेचं गाव जकातवाडी या संस्थेच्या वतीने ई - बुक प्रकाशित करण्यात आले. ई - बुकचे संपादन सुषमा आलेकरी यांनी केले. तर प्रा.डॉ.कांचन नलवडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. विद्या नावडकर यांनी केले. पाटण, कराड, फलटण, खंडाळा, कराड, सातारा इत्यादी विविध तालुक्यातील कवी उपस्थित होते. यात महिला कवींचा मोठा सहभाग होता. कवी संमेलनाचे निवेदन,कवी किशोर धरपडे ,वसुंधरा निकम, क्रांती पाटील ,गणेश शेंडे ,इत्यादींनी केले. महाविद्यालयातील कवी विद्यार्थी व प्राध्यापक यांनीही कवी संमेलनात सहभाग घेतला. रिमझिम पावसात सामाजिक कवितेतील विविध भावनांनी वातावरण जोशपूर्ण होत उत्साही राहिले.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +91 9561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




आपलं कार्य प्रेरणादायी आहे आपली वैचारिक भूमिका स्पष्ट आहे याचा आम्हाला अभिमान वाटला..सर आपली बातमी प्रकाशित करावीं अशी अपेक्षा


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता -
पुन्हा एकदा विविध मागण्यासाठी सरपंच करणार ९ आॅगस्ट ला मुंबईत आंदोलन** मुंबई प्रतिनिधी राजकीय पक्षाशी हित संबंध नसले सरपंच संघटना राज्यभर कार्यरत आहे राज्यातील सरपंच उपसरपंच सदस्यांच्या विविध मागण्यासाठी मुंबई आझाद मैदान मोर्चा धरणे आंदोलन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्याच्या प्रलंबित मागण्या आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्काळ सोडाव्यात या मागण्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी घेऊन मागण्या सोडविण्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करावी अधिवेशना दरम्यान विधानभवनात झालेल्या बैठकीत दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवार दि ९ आॅगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील अँड प्रविण कडाळे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे 
   राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचविण्यासाठी सरपंच उपसरपंच अहोरात्र मेहनत करून आम जनतेला दिलासा देण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो अशा या सरपंच उपसरपंच याच्या मानधन सरसकट पंधरा हजार उपसरपंच सात हजाराची वाढ करावी , सरपंच पदाच्या कार्यकाळात पंधरा लाखाचे विमा संरक्षण देण्यात यावे, सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त मासिक बैठक आयोजित करण्यात यावी ,सरपंचावर हल्ला करणाऱ्याना विशेष संरक्षण कायदा लागूकरावा राज्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच यांचे थकीत मानधन तत्काळ वर्ग करावे माजी सरपंच यांना पेन्शन सुरू करावी अनेक दिवसांपासून सरकारकडे पाठपुरावा करून मागण्यासाठी अनेक आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. परंतू सरकारने दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव मुंबईच्या आझाद मैदानावरती अधिवेशना दरम्यान आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्याघोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता सरपंचांच्या आंदोलनाची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत सरपंचाच्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे मंत्री महाजन यांनी सरपंचांच्या शिष्टमंडळाला सांगत लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर सरपंच सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात जाऊन भेट घेतली सरपंचाच्या मागण्या सोडविण्याबाबत त्यांना साकडे घातले परतू अबलबजावणी होत नाही सरपंच उपसरपंच यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा सरपंच सेवा संघाचे सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे आदर्श सरपंच अशोक ओहळ विजय पाटील अविनाश पवार नंदकुमार कदम अरूण खरमाटे डॉ तान्हाजी पाटील सौ पुजा जाधव जानु गायकर लता खोत संजय काळे बाबाजी गुळवे निलेश पावसे सोमनाथ नाडे रोहित पवार अमोलशेवाळे रविंद्र पवार यांनी राज्य सरकारला दिला आहे


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================





Monday, July 22, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघ काँग्रेसने निवडणूक लकरावी या साठी प्रदेश समितीकडे आग्रह.


- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहमदनगर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंघाने नुकतीच मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील उत्तरेतील संगमनेर, राहाता, श्रीरामपूर यासह नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावेत, यासाठी प्रदेश समितीकडे आग्रह धरण्यात आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेश काँग्रेस समितीने आतापासून काँग्रेसला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के. सी. वेणूगोपाल, राष्ट्रिय महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रांताध्यक्ष आ. नाना पाटोले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. वर्षाताई गायकवाड, अविनाश पांडे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ यांच्यासह नेते उपस्थित होते.

बैठकीत जिल्ह्याचा आढावा जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी तर नगर शहराचा आढावा महानगर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सादर केला. तसेच नगर लोकसभा निवडणुकीतील अनुभव व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने नगर शहरासह जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती प्रदेश काँग्रेस समितीला देण्यात आली. यावेळी सात मतदारसंघावर दावा करण्यात आला. यातील संगमनेर, श्रीरामपूर याठिकाणी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय राहाता, नगर शहर, श्रीगोंदा, कोपरगाव आणि अकोला हे मतदारसंघ काँग्रेसने लढवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नगर दक्षिण जिल्ह्यात विधानसभेची एकही जागा लढली नव्हती. आता राज्यात महाविकास आघाडी असून शिवसेनेने श्रीगोंद्यावर दावा केला आहे. नगरमध्ये काँग्रेसची तयारी सुरू आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगर शहराची जागा ही काँग्रेसलाच मिळाली पाहिजे.

राष्ट्रवादीने त्यासाठी लोकसभेला काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली पाहिजे, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नगर जिल्ह्यात काँग्रेस बळकट आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या विजयात माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि मतदारांचा महत्त्वाचा वाटा आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा खासदारकीला एकही उमेदवार नसला तरी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना खासदार करण्यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. ज्येष्ठ नेते आ. थोरात यांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो. त्यामुळे नगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे असल्याचे वाघ आणि काळे यांनी यावेळी स्पष्ट केले

कॉंग्रेसचा मुख्यमंत्री :-

बैठकीत माजी मंत्री आ. थोरात म्हणाले, 
महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकर्‍यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर मविआ 180 जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Friday, July 19, 2024

डाकविभागाच्या सेवांचा जनसामान्यांनी लाभ घ्यावा - जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर


अहमदनगर जि.मा.का.वृतसेवा: 
 गेल्या १७० वर्षापासुन पत्र व तार या माध्यमातुन जनतेपर्यंत संदेश पोहोचत डाकविभागाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. आधिुनकतेच्या युगामध्ये बदल स्वीकारत डाकविभागाने आपले स्वरुप बदलले असुन डाकविभागाच्या विविध सेवांचा जनसामान्यांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर यांनी केले.
येथील राधाबाई काळे महाविद्यालयात डाकविभाग व सावित्री-मैत्रैयी फोरमच्या यांच्या संयुक्त विद्यमाने डाक चौपाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री ठाकुर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भुपेंद्र निकाळजे, भारतीय पोस्ट बँकेचे व्यवस्थापक अमोल भुमकर, वरिष्ठ पोस्टमास्तर श्रीमती ए.डी. फुलकर, विभागीय डाकविकास अधिकारी (डाकजीवन विमा) दीपक नागापुरे, कार्यालयीन सहायक, तानाजी सुर्यवंशी, पोस्टमन नितीन खेडकर, सावित्री-मैत्रैयी फोरमच्या अध्यक्षा डॉ. लक्ष्मी काथवटे, डाक सहायक सुखदेव पालवे, डाकसेवक अजय सोनावळे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. ठाकुर म्हणाले की, सामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या डाक विभागामार्फत सर्व सेवा सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. आजघडीला सर्वांना आवश्यक असलेल्या आधारअपडेट, शासनाच्या योजनांसाठी आवश्यक असलेले बँक खाते यासारख्या अनेक बाबी विभामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भारतीय पोस्ट बँकेच्या माध्यमातुन जनतेला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आयुष्यामध्ये बचतीला अनन्यसाधारण महत्व असुन अधिक व्याजदर देणाऱ्या अनेक योजना पोस्ट खात्यामार्फत राबविण्यात येतात. या योजनांची माहिती करुन घेत विद्यार्थ्यांनी पोस्ट बँकेत खाते उघडुन विद्यार्थी दशेमध्ये बचतीच्या सवयीचा अंगिकार करण्याचे आवाहनही श्री. ठाकुर यांनी यावेळी केले.
अमोल भुमकर म्हणाले की, स्पर्धेच्या व आधुनिकतेच्या युगात बदल स्वीकारत डाकविभाग सक्षमपणे सामान्यांना सेवा देत आहे. २०१८ मध्ये सुरु झालेल्या भारतीय पोस्ट बँकेत जिल्ह्यातील साडेचार लक्ष नागरिकांनी आपले खाते सुरु केले आहे. अत्यंत कमी वेळेमध्ये या पोस्ट बँकेमध्ये खाते उघडणे शक्य असुन कुठलेही कागदपत्र न देता केवळ आधार क्रमांकावर खाते सुरु करता येते. या बँकेमध्ये ऑनलाईन पेमेंट, एटीएम यासारख्या सुविधांचा खातेधारकांना लाभ देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
विभागीय डाकविकास अधिकारी दीपक नागापुरे यांनी डाक विभागाच्या विविध योजना, बचतखाते, आवर्ती खाते, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, पब्लीक प्रॉव्हीडंड फंड, डाकजीवन विमा, इंडियन पोस्ट ऑफीस पेमेंटमार्फत उघडल्या जाणाऱ्या अपघाती विमा पॉलीसी, शासनाच्या विविध योजनांचे अनुदान जमा होणाऱ्या आयपीपीबी खाते याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
यावेळी उपप्राचार्य डॉ. भुपेंद्र निकाळजे, दीपक नागापुरे, सुखदेव पालवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. प्रज्ञा वाघ यांनी केले तर आभार प्रा. शितल झेंडे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार रमेश जेठे ✍️✅🇮🇳... (सर) अहमदनगर 
*सहयोगी:*
-----------------------------------------------
=================================
*संकलन:*💐✅🇮🇳...
 समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +91 9561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Thursday, July 18, 2024

विशालगड हिंसाचार आणी शिळफाटा महिला अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे - विविध सामाजिक संघटनांची मागणी

संगमनेरमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन

- संगमनेर - प्रतिनिधी - / वार्ता -
कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली झालेला हिंसाचार तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परीसरात एका मंदिरात महिलेवर अत्याचार करुन करण्यात आलेल्या तीच्या निर्घूण हत्या प्रकरणी आरोपींना कठोर शासन व्हावे याकरीता संगमनेरमधे विविध सामाजिक संस्था संघटना एकवटल्या असून
यातील आरोपींना कठोरातील कठोर शासन होणेकामी पोलिस व महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.
 सदर निवेदनात असे म्हंटले आहे की, आम्ही संविधान प्रेमी तथा या भारताचे नागरिक तसेच ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार सामाजिक संस्थेच्या माध्यमातून व मुस्लिम समाजसह इतरही धर्मीय आपणास नम्रपणे निवेदन सादर करतो की, दिनांक १४/०७/२०२४ रोजी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली काही समाजकंटकांच्या जमावाने त्याच ठिकाणाहून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील असलेल्या गजापुर गावातील स्थानिक नागरिकांच्या घरावर तलवारी, काठ्या,कोयते, असली घातक शस्त्र घेऊन विशिष्ट समाजातील लोकांच्या घराची मोडतोड केली व वाहनांची जाळपोळ देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांची देखील विटंबना केली गेली या हिंसाचारात महिला व लहान मुले, वयोवृद्ध महिला व पुरुष या हल्ल्यातून बचावलेले नाहीत, त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आलेली आहे,
तसेच बंदोबस्तासाठी सज्ज असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील तलवारीने वार करून जखमी करण्यात आलेले आहे, सदरचा कायदा हातात घेऊन नागरिक वस्तीवर हंल्ले करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या या गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांचा समस्त मानव जाहीर निषेध करत आहोत, तसेच या सर्व समाजकंटकांवर कुठल्याही नेता, पुढाऱ्याचा पदाचा मुलाहिजा न ठेवता शक्य तितक्या लवकर योग्य चौकशी करुन अशा समाजकंटकांवर कठोरात कठोर कारवाई करावी, यासोबतच या हिंसाचारात ज्या कुणाचे आर्थिक व संसारोपयोगी वस्तूंची नासधूस नुकसान झाली आहे त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळून देत सदर ठिकाणची पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण करावी, सदर निवेदनात पुढे असेही नमुद करण्यात आले आहे की, आम्ही किंवा आमचे निवेदन हे कुठल्याही अतिक्रमणाचे किंवा अतिक्रमण धारकांचे समर्थन करत नाही. गडकिल्ल्यांच्या नावाखाली गैरकृत्य करणाऱ्या तथा दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे, 
तसेच ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात गणेश मंदिरामधे आसरा घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर मंदिरातील पुजारी व त्याच्या साथीदारांनी तीच्यावर अत्याचार करत केलेली हत्या अश्या समाजविघातक आरोपींना कठोर शासन व्हावे, अश्या आशयाचे निवेदन संगमनेर शहर व तालुक्यातील विविध समाज बांधव तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार,एकता सेवाभावी सामाजिक संस्थेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपविभागीय प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
 या प्रसंगी माजी नगरसेवक डॉ दानिश खान,सामाजिक कार्यकर्ते राजूभाई इनामदार, एकता सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आसिफभाई शेख, सामाजिक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मुजाहिद पठाण,तौसीफ अली मणियार, हाफिज हमजा, मुस्लिम समाजातर्फे मुफ्ती सालीम साहब,ह. सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष अन्सार सय्यद,वंचित बहुजन आघाडीचे माजी शहराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिजभाई ओहरा,अंजुम शेख, नूर शेख, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकारच्या महिला पदाधिकारी जिल्हा अध्यक्षा बानोबी शेख, तालुका अध्यक्षा सविता भालेराव, शहर अध्यक्षा आरती सोनवणे, जिल्हा अध्यक्ष पत्रकार शौकत पठाण, महासचिव जमीर शेख,आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार शौकत पठाण - संगमनेर
-----------------------------------------------
=================================

गुरूद्वारा प्रबंधक कमेटी डोमेगांव ४२ वी महान पैदल यात्रा...


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
सतकार योग साध संगत जी, फत्तेह प्रवान करनी जी
साधसंगतजी के सहयोग से हर साल की तरह इस साल भी " महान पेदल यात्रा" गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा, श्रीरामपूर से रविवार, ता.२१/७/२०२४ के दिन सुबह ४:३० बजे गुरूबाणी किर्तन करते हुए गुरुद्वारा बिरदबाबा डोमगांव, कमालपूर के लिए रवाना होगी। गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर तथा डोमेगांव की ओरसे बेनती की जाती है कि इस ४२ वी महान "पैदल यात्रा" में ज्यादा से ज्यादा गिनती में हाजिर होकर पैदल यात्रा की शान बढाएँ तथा गुरूघर की खुशीयाँ प्राप्त करते हुए अपना अनमोल जनम सफल करें।
नोट :-

१) सभी साध संगत सुबह ४:०० बजे गुरुद्वारा साहेब पहुँच जाए। गुरुद्वारे में जपजी साहेबजी, आनंदसाहेबजी के पाठ उपरंत अरदास के बाद कडाह प्रसाद की देग बरतेगी, तथा "पैदल यात्रा" आरंभ होगी ।

गुरुद्वारा बिस्दबाबा डोमेगांव में ४२ वी पेदल यात्रा' की खुशीमें
धार्मिक दिवान
की खुशीमें गुरुद्वारा साहेब की नई इमारत
में निचे लिखे हुए प्रोग्राम के मुताबीक दिवान सजनगें ।
प्रोग्राम (रविवार, ता.२१/७/२०२४)
किरतन दिवान ग्यानी अनोखसिंग मस्कीन व भाई मनप्रितसिंगजी (हजुरी जथ्था गुरुद्वारासाहिब, श्रीरामपूर)
सुबह ११:३० से दोपहर १२:३० बजे अरदास, दिवान की समाप्ती, गुरूमहाराज के सुखासन दोपहर १२:३० से १:३० बजे
साध संगत के सहयोग से गुरु का लंगर अतुट वरतेगा ! संत बाबा हरनामसिंगजी लंगर साहेब नांदेडवाले इनके आशिर्वाद से तथा समुह संगत के सहयोगसे गुरुद्वारासाहिब की लंगर हॉल पुर्ण निर्माण की सेवा आरंभ होनेवाली है। संगत से बेनती की आप तन, मन, धनसे पुरा सहयोग दे। संत बाबा नरेंद्रसिंगजी, बलविंदरसिंगजी, गुरूद्वारा लंगरसाहिब, हजुरसाहिब, बाबा रणजितसिंगजी
मनमाडवाले इनका पूरा सहयोग प्राप्त है। सभी संगत बढचढकर अपनी माया सफल करे। कॅश के रूपमे या बैंक अंकौंट या निचे दिए नंबर के अकौंटमें माया जमा करवाये।
हर महिने दी पुरनमासी अंते मसाया विशेष दिवान सवेरेनू ७ तो ८ बजे तक लगदे हन उपरांत गुरुदे लंगर अतुट वरताये जांदेअन् लाभ लेनदी कीरपा करो जी ।
२) रास्ते में चायपानी तथा नाश्ते के लिए पैदल यात्रा का स्वागत होगा ।
३) जिन सज्जनोंको पैदल यात्रा के रस्तेमें सेवा करनी है वे अपने नाम निचे दिये गये मोबाईल नंबर पर लिखवादे।

=================================
-----------------------------------------------
Reg. Trust A.nagar No. A1352 Dt. 15/3/2015
गुरुद्वारा बिरदबाबा देवस्थान ट्रस्ट, कमालपूर
Account No. 915020052482202
AAXIS BANK
IFS Code: UTIB0001370
SHRIRAMPUR BRANCH
• साध संगत के आसरे...🌹🥀🌺🌸🌷❤️✅🇮🇳
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, डोमेगांव
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर
मो. 9822059646, 7020308707, 9850181315, 9890188181,8806490555, 9028900117, 9028838878, 9422339034 (पुणे) पुछताछ : स. हरभजनसिंगजी, हेडग्रंथी गुरूद्वारा बिरदबाबा, डोमेगांव (कमालपूर), मो. 8888446876
बंटी थापर, श्रीरामपूर/९८२२३५२९९४
-----------------------------------------------
================================