राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, July 17, 2024

संगमनेर :- सखोल चौकशीसाठी उपोषणाचा तिसरा दिवस


- संगमनेर - मुज्जफर  शेख - / वार्ता - 
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाप्तेखोर व खंडणीखोर पोलीस कर्मचारी यांच्या सखोल चौकशीसाठी उपोषणाचा तिसरा दिवस मात्र आत्तापर्यंत वरिष्ठांची चुप्पी भूमिका
प्रतिनिधी संगमनेर शहरात कारवाईच्या नावाखाली दिनांक 23 /6 /2024 रोजी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचारी सचिन आडबल मोबाईल नंबर 79 99 17 30 48 रणजीत जाधव मोबाईल नंबर 93 56 82 31 40 व इतर दोन कर्मचारी यांनी आपल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून तसेच गृह खात्याची प्रतिमा मलिन करून आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव घेऊन दोन गुटखा विक्रेते यांच्याकडून दोन लाख पचवीस हजार रुपयाची खंडणी वसूल केली म्हणून यांची माहिती मिळताच संगमनेर शहरातील आरटीआय कार्यकर्ता अकील पठाण यांनी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे त्या चार पोलीस कर्मचारी यांचे सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध खंडणी व जबर चोरीचे गुन्हे दाखल व्हावेत म्हणून लेखी तक्रार केली असून त्यांच्याकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी संगमनेर यांना उपोषणाची नोटीस देऊन दिनांक 15/ 7 /2024 रोजी पासून अकील पटाण यांनी उपोषण सुरू केले असून उपोषणाचा आज तिसरा दिवस असून जोपर्यंत त्या चारही खंडणीखोर पोलीस कर्मचारी अहमदनगर यांच्याविरुद्ध सखोल चौकशी करून खंडणी व जबर चोरीचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू राहणार असल्याचे पठाण यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


करबला युद्ध : मानव - कल्याणासाठीच परीवारासह ७२ वीरांनी पत्करले हौतात्म्य


 संपूर्ण जगात विविध कारणांसाठी अनेक युद्ध झालेत. लाखों कोटींच्यावर माणसे मारले गेलेत , त्यामध्ये अनेक आपल्या देशांसाठी -राष्ट्रांसाठी -धर्मांसाठी हौतात्म्य पत्करलेत .पण असेच एक मानवी कल्याणासाठीच संपूर्ण परीवारासह म्हणजे अगदी सहा महिण्यांच्या निरागस बाळाला ही हौतात्म्य पत्करावे लागलेला रणसंग्राम म्हणजेच " करबला" च्यां रणसंग्रामांच्या आठवणी आपसूकच " मोहर्रम "च्या दहा तारखेला यालाच अर्थात म्हणतात "यौम- ए - आशुरा " ला कितीही कठोरमनाच्या माणसाला भावना जाग्या होतातच.
प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी अल्लाहाच्या धर्म प्रसार-पचार करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहुन हाल- अपेष्टा काढून छळछावणीत- उपाशीपोटी- राहुन अगदी प्रामाणिकपणे सहनशीलतेचे अंत बघूनही त्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत मध्य आशिया- युरोप-अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थितपणे परिवर्तन घडवून आणले.जगातील प्रत्येक मानव कल्याणासाठी , त्यांच्या रक्षणार्थात जगात ठिकठिकाणच्या जुलमी राजवट राजेशाही, हुकूमशही, बादशही , परीवार वादी जुलमी राजव्यवस्था संपूर्णतः लोकशाही पद्धतीने आपल्या आचरणाने संपुष्टात आणुन ती लोकशाही व्यवस्था कशी असावी व कशा पद्धतीने चालवावी हे समस्त जगाला यांचे प्रात्यक्षिके" रोल मॉडेल " च पवित्र कुरआन- हादीस नुसार स्वतः" पवित्र मदीना शहरात " याची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी जगप्रसिध्द आशा "मदीना करार " रूपी स्वरूपात करून जगाला दाखवून दिली.
  पैगंबर येथेच न थांबता आपल्या अनुयायींना (-सहाबां) नां आपल्या हयातीतच माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण जगात शासन व्यवस्था कशा पद्धतीने चालवावी व निर्माण ही करावयास हवेत याचे प्रत्यक्षदर्शि प्रशिक्षण खास विश्वासू मित्रां (सहाबा) ना दिलेत .
           "खलिफा " म्हणून मुख्य प्रधान - (प्रशासकीय प्रमुख) खलिफा इस्लामी व्यवस्थेमध्ये प्रशासकीय प्रमुख असतो.त्याची निवड " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून केली जाते .
 अर्थात तज्ञ-जाणकार लोकांचे सल्लागार मंडळ स्थापून त्यामधे सर्व संमतीने खलिफाची निवड केली जाते. व कारभार ही मजलिस ए सुरांच्या सल्ल्याने च चालत असतो .असो.
प्रेषित मुहम्मद पैगंबरांनी स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत. 
त्यातील खास प्रमुख गोष्ट म्हणजे त्या मध्ये किती ही छोट्या व गरीब सदस्यांनाही सल्ला देण्याचा आधिकार होता. यालाच खरोखरच लोकशाही पद्धती म्हणतात.असो.
                                    प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या महापरिनिर्वाणानंतर इस्लामी राजवट कोणी चालवायची यासाठी मजलिस ए सुरांच्या सल्ल्याने सर्वात अनुभवी वयोवृद्ध व्यक्ती म्हणून पुण्यवान ( राशिदीन) , (१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. यांना खलिफा करण्यात आले. त्यांनी दिड वर्ष खिराफत केली.
त्यानंतर दुसरे खलिफा २) ह.उमर फारुख रजि.यांनी ११ वर्ष खिलाफत केली.
तिसरे खलिफा म्हणून (३) ह. उस्मान गनी रजि. यांनी दहा वर्षे. चौथे खलिफा म्हणून (४) आली बिन आबु तालीब रजि. यांनी जवळपास पांच वर्षे खिलाफत केली.
या वेगवेगळ्या घराण्यातील कर्तव्यदक्ष साथीदारांची क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्या सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ ( बैत) दिली .
      या चारही खलिफांनी खूप चांगली-आदर्श इस्लामी राज व्यवस्था मध्य आशिया- युरोप- अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली.
   त्या चार ही खलिफांच्या राज व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात . अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही राज नीती आजरामर आहे . 
राष्ट्रपीता महात्मा गांधीजी व विविध देशातील तज्ञांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरज ही व्यक्त केली आहे ,असो.
चौथे खलिफा हज.अली बिन अबु तालीब रजि. यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार (मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. (रजि) यांचे ज्येष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून काही काळासाठी घोषित करण्यात आले. मात्र तीव्र स्वरूपाच्या विरोध, मतभेदांमुळे व निष्पाप जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने हजरत इमाम हसन बिन हज.अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला. काही काळानंतर विरोधकांनी ह. हसन रजि. यांना त्यांच्या विरोधाकांनी राजकीय शडयंत्र करून त्यांच्या अन्नात विष घालून त्यांची हत्या करण्यात आली. 
              याच प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांच्यां शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून मसजिस- ए- शुरा (कायदेमंडळा) ला डावलून स्वतः चीच मनमानी करून प्रेषित मुहम्मद स्व. यांचेच पुर्वीचे एक सहकारी आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून घोषित केले.त्यांनी इस्लामच्या तत्त्वप्रणाली नुसार राज्य न करता राजेशाही- बादशहा- हुकूमशाहा पध्दतीनुसार राज्य कारभार सुरू केला व राजेशाही राहणीमानात वागणूक व एक मोठा राजप्रासाद (महाला) ची बांधणी करुन राज्य कारभार करण्यात आला. 
हे इस्लामी संस्कृतीच्या तत्वप्रणालीच्या राज्य व्यवस्थेच्या बिलकूल विपरीत होते. हे इस्लामला कदापी ही मान्य नव्हते.इस्लाम फक्त साधं सरळ सोप्या पद्धतीने राहणीमानात व साध्या घरात राहुन राज्य कारभार करण्याची पद्धतीला सर्वोच्च प्राधान्य देतो . परंतु आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी अतिरेक पणाचा कळस गाठला व स्वतः च्या आपात्र मुलगा यजिद याची आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. वीस वर्षे राजेशाही राज्य कारभार करुन राजधानी मदीना वरुन कुफा (इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आली. आपल्या मृत्यू पश्चयात आपात्र मुलगा यजिद 'यांस राजा करण्यात आले. यजिदच्या राजरोहणास- क्रुर शासन पध्दती होती .. लोकांनी जागोजागी त्याचा वेळोवेळी तीव्र विरोध होत होता. नागरिकांना प्रेषित मुहम्मद स्व. यांचे अवडते नातू हजरत हुसैन रजि. यांना खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते , त्यासाठी नागरिक वारंवार पत्र व्यवहार मागणी याचना करून बारा हजारापेक्षा (१२०००) ही जास्त पत्रे लिहिली जाउन सर्वतोपरी मदत सहकार्य करण्याची ग्वाही देत होते . सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान बंधू च्या परीवारासह मदीना वरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून सर्व कुफा वासीयांना जो ह. इमाम हुसैन ला साथ-थारा देईल त्या सर्व साथ देणाऱ्यास मृत्यू दंड दिले जाईल आशी धमकी दिली.या धमकी ला नागरिक घाबरून आपले मत बदलली.
बादशहा यजिदने कुफाशहरातील आपल्या मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला बादशहा - राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे. 
ह.माम हुसैन यांच्या प्रवासा दरम्यान फुरात नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिदने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांच्या काफील्याला घेराव करून यजिदला बादशहा करण्यास सर्व आटी-शर्ती जुलूमशाहीने मान्य करण्यास हुकूम दिला. परंतु जालीम, अत्याचारी, कपटी यजिदला संमर्थन देण्यास ह.इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला.. या नकारानंतर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट अव्हान केल्यानंतर ह. ईमान हुसैन नी रक्त, जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत. तीन प्रस्ताव मांडले परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्या वर क्रुर पणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरातनदीच्या तीरावर असुन हुसैन च्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात बिना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून, सहा वर्षाच्या बाळ अली असगर यांच्या वर त्रिकोणी बाण मारुन हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारले. या युध्दात सर्व पुरुष शहीद (हौतात्म्य) झाले.
               हा दिवस १० मुहररम हिजरी ६१ ( 10 ऑक्टोबर ६८०) या दिवशी ७२ हुतात्म्यांनी फक्त लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी शहीद (हौतात्म्य) पत्करलेत.
करबला रणसंग्राम चा जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलिदान देण्यास तयार राहिले पाहिजे,
म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद इस्लाम जिंदा होता है.... "


=================================
-----------------------------------------------

*लेखक: डॉ. सलीम सिकंदर शेख* ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर +91 9271640014,
===============
संकलन: समता न्यूज सर्व्हिसेस,💐✅🇮🇳...श्रीरामपूर  +91 +91 9561174111
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
===============================

Monday, July 15, 2024

संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषणास सुरवात


- मुज्जफर - शेख - / संगमनेर - वार्ता -
अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेतील ते चार खंडणीखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय संगमनेर यांच्या समोर उपोषण 
प्रतिनिधी संगमनेर संगमनेर शहरात मागील काही दिवसापूर्वी अहमदनगर गुन्हे शाखेतील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे कायद्याचे धाक दाखवून तसेच कठोर कारवाई करण्याची भीती दाखवून शहरातील दोन किरकोळ गुटखा विक्रेत्यांकडून सव्वा दोन लाख रुपये रक्कम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून वसूल करून शहरातून निघून गेले तसेच व गुटखा विक्रेत्यांना आपल्या गाडीत बसवून गंभीर मारहाण देखील केली होती तसेच एका गुटखा विक्रेता कडे तब्बल सात लाख रुपये खंडणी मागितली होती परंतु तडजोड करून दीड लाख रुपये खंडणी वसूल करण्यात ते यशस्वी देखील झाले तसेच 75 हजार रुपये एका गुटखा विक्रेत्यांकडून देखील घेतले या दोघांसोबत झालेल्या अन्याय न्याय मिळवून देण्यासाठी शहरातून एक आरटीआय कार्यकर्ता यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज पासून उपोषण सुरू केले आहे आता वरिष्ठ याची दखल घेता का तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करता का हे आता बघणे महत्त्वाचे ठरेल


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Sunday, July 14, 2024

पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर उपोषण

- मुज्जफर शेख - संगमनेर - / वार्ता -
संगमनेर शहरातून २ लाख २५ हजार रुपयाची खंडणी वसूल करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर कार्यालयातील त्या चार पोलीस कर्मचारी यांना गजाळ करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर उपोषण
प्रतिनिधी संगमनेर पोलीस अधीक्षक दिन शहर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे अधिपत्याखाली कार्याधर ला स्कोर पोलीस कर्मचारी सचिन अर्बल मोबाईल नंबर 79 99 17 30 47 रणजीत जाधव मोबाईल नंबर 93 56 82 31 40 व इतर दोन पोलीस कर्मचारी यांनी दिनांक 23 6 2024 रविवार रोजी रात्रीच्या वेळेस संगमनेर शहरात येऊन दोन गुटखा विक्रेत्यांकडून त्यांना कारवाईचा धाक दाखवून दोन लाख 25 हजार रुपयाची खंडणी वसूल केलेली आहे म्हणून यालाच स्कोर व खंडणीखोर त्या चार पोलीस कर्मचारी विरुद्ध चौकशी करून दाखल व्हावेत म्हणून पोलीस निरीक्षक संगमनेर यांना संगमेश शहरातील एक आरटीआय कार्यकर्त्यांनी नियमानुसार लेखी तक्रार करून ही कोणती कारवाई न झाल्याने व त्या चारही खंडणीखोर पोलीस कर्मचारी यांना पोलीस निरीक्षक संगमनेर यांनी पाठीशी घातले म्हणून दिनांक 15 सात 2024 रोजी पासून पोलीस उपाधीक्षक संगमनेर कार्यालयासमोर संगमनेर शहरातील एक आरटीआय कार्यकर्ता उपोषण करणार असून त्याबाबतचे उपोषणाची नोटीस त्यांनी पोलीस उपाधीक्षक संगमनेर तहसीलदार संगमनेर पोलीस अधीक्षक संगमनेर शहर यांना दिली असून त्या चारही पोलीस कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून खंडणी तसेच जबर चोरीचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे आरटीआय कार्यकर्ता यांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले...


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Saturday, July 13, 2024

सुलताना चांदबीबी यांच्या शहीद दिना निमित्त मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळातर्फे अभिवादन


शत्रु पक्षाकडून 'सुलताना' ही लकब मिळविणारी चांदबिबी ही जगातील एकमेव उदाहरण- इंजि. अभिजीत वाघ

- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता 
दिनांक १३ जुलै २०२४ सुलताना चांद बीबी यांचा आज ४२४ वा शहीद दिवस,
यानिमित्त अहमदनगर शहरातील मखदूम सोसायटी आणी इतिहास प्रेमी मंडळातर्फ अभिवादन करण्यात आले,यावेळी अभिवादन करताना इंजि. अभिजीत वाघ म्हणाले की, मुर्तजा निजाम यांच्यानंतर अहमदनगर निजामशाहीवर मोगल दक्षिणेतून हल्ले होऊ लागले. तेव्हा अहमदनगर वाचविण्यासाठी चांदबिबी यांनी अहमदनगर येथे परतण्याचा निर्णय घेतला. अकबर पुत्र मुराद याने अहमदनगर किल्ल्यावर हल्ला केला. पण अनेक दिवस लढवून किल्ला ताब्यात येत नव्हता. शेवटी किल्ल्याची एक भिंत दारू गोळ्याने उडवली, परंतु सकाळी उठून पाहतो चांद बीबी आणी तिच्या सैन्याने ती रात्रीतून पुन्हा उभी केली. तिचे शौर्य पाहून राजपुत्र मुराद यानी तिला "सुलताना" हा लकब दिला आणी तो वरहाड प्रांताकडे निघून गेला. 
नंतर त्याचा भाऊ राजपुत्र दानीयाल याने किल्ल्याला वेढा दिला. अनेक महिने तो वेढा चालू होता. शेवटी त्याने एका सरदारला फितूर केले. त्यांनी दगाबाजीने सुलताना चांदबिबीवर तिच्या महालात हल्ला केला. त्यात ती व तिच्या सत्तर अंगरक्षक मैत्रिणी या शहीद झाल्या. त्यांचे प्रेत ही त्या राहत असलेल्या महाला जवळील मछली बावडी येथे सापडले. त्यात एका रत्नजडित सॅंडल वरून सुलताना चांद बीबी यांचे प्रेत ओळखले गेले.
त्या सॅंडलच्या रत्नांची किंमत त्याकाळी तीन लक्ष होती. असे समकालीन इतिहासकारांनी नोंद केली. ते सॅंडल राजपुत्र दानियाल याने पुढे आग्रा येथे पाठवले असे सांगितले. 
अहमदनगर निजामशाहीची राणी सुलताना चांद बीबी यांच्या ४२४ व्या शहीद दिनानिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने त्यांच्या कबरीवर फुलं अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद,उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, आर्कि. फिरोज शेख, तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलील, आय बी शहा, इस्माईल शेख, फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
चांदबीबीच्या कबरीचा शोध लावून प्रथमच त्यांना अभिवादन केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले तथा असाच अहमदनगरचा इतिहास शोधून ते समाजापुढे आणण्याचे त्यांना आवाहनही केले. 
पुढे बोलताना अभिजीत इंजि. श्री. वाघ म्हणाले की, युद्ध संपले की शत्रुत्व संपते. राजपुत्र दानियाल यांनी सुलताना चांदबीबी हीची कबर शाही कब्रस्तान बागरोजा येथे बांधण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अहमद निजामशहा यांच्या कबरीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात जी कबर आहे ती सुलताना चांद बीबी हिची आहे. अनेक वर्ष इतिहासप्रेमी मंडळ यांनी त्यावर संशोधन केले आहे. तसेच तिच्या अंगरक्षक सहेली यांचे पण कबरी बागरोजेच्या पश्चिम दरवाजा समोरील जागेत जो "गंजे शहीदा" आहे तिथे आहे. 
पुढे काही वर्षानंतर मीर अबु तुराब मशदी याने चांदबिबीच्या अस्थी इराण येथे नेल्या व तेथे चांदबीबी ची कबर मशद इमाम रजा यांच्या दर्गा परिसरात आहे यासंबंधीचे "शोध चांदबीबीच्या कबरीचा" हे पुस्तक लवकरच इतिहास प्रेमी मंडळ प्रसिद्ध करणार आहे. 
कार्यक्रमाचच्या यशस्वीतेसाठी मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले. 


=================================
*वृत्त विशेष सहयोग*
 ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
*सहयोगी*✍️✅🇮🇳...
============
 स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================