( नाशिक : समाचार एजन्सी )
पदवीधर निवडणुकीत आमदार तांबे यांनी एबी फॉर्म असूनही अर्ज न भरल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याची खंत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तांबे यांच्याबद्दल लोकांचे मत चांगले असताना त्यांच्या कृतीमुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेही अडचणीत सापडल्याचे ते म्हणाले. ओबीसी आरक्षण राजकीय मुद्दा नसल्याचे भुजबळनी सांगितले.ते म्हणाले की, तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली. राजकारणात यापूर्वी अनेकदा फोडाफोडी झाल्या. मात्र, घराची दारे-खिडक्या उघड्या आहे की बंद असल्यास फूट होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
तसेच पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसमधील गटबाजी उघड्यावर आली असली, तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार, असेही भुजबळांनी स्पष्ट शिंदगटाच्या नेमणुकाबेकायदेशीर शिवसेना कोणाची या प्रश्नावरून तर्क वितरक सांगणे नाशिक न्यायालय व निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या लढाईवर बोलताना भुजबळांनी, आम्हीही निकालाची प्रतीक्षा करत आहोत. शिंदे गटाने केलेल्या नेमणुका या बेकायदेशीर असून, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अनेक बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.
देवळाली गावात दोन गटात झालेल्या दोन तिनं
दिवसांपूर्वी राजकीय वादातून गोळाबार प्रकरणी • भुजबळांना विचारले असता, राजकीय पक्षांनी इथपर्यंत जाऊ नये. मी पालकमंत्री असताना असे घडले तेव्हा अनेक जण ओरडत होते. मात्र, ते आता बोलत नसून पोलिसांनी कुणाच्याही दबावाला दडपणाला बळी न पडता कारवाई करावी, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली. मुंबईतील विकासकामे
आघाडीचीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई । दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पंतप्रधान येतात ते चांगले आहे. मात्र, विकासकामे ही जनतेच्या । पैशांमधून होत असतात. मुंबईतील उद्घाटन झालेली कामे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआमध्ये मंत्री = असताना सुरू झाल्याची टीकाही त्यांनी केली. खा. संजय राऊत यांचा काश्मीर दौरा व तेथे शिवसेनेने निवडणूक लढण्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे भुजबळ सांगितले.
No comments:
Post a Comment