विविध धरणांनी व नद्यांनी संपन्न असलेल्या नाशिक शहर परिसरावर पाऊस लांबल्याने पाणी कपातीचे संकट येण्याची चित्र दिसून येत आहेत. नवीन धरण बांधण्यापेक्षा असलेल्या धरणाची क्षमता वाढवण्याचा संकल्प 'क्रेडाई नाशिक मेट्रो'ने सोडला होता. सामाजिक दायित्वातून हाती घेतलेल्या उपक्रमाद्वारे भविष्यातील पाण्याचा संभाव्य तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न 'क्रेडाई नाशिक मेट्रो'ने केला आहे.
बांधकाम व्यवसायाला गती देताना त्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे हे देखील आपलेच कर्तव्य असल्याची भावना क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी मांडली. त्याला सर्वच बांधकाम व्यवसायीकांनी होकार दिल्याने कामाला प्रारंभ करण्यात आला.पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची असली तरी त्यांच्या हाताला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे कृणाल पाटील यांनी सांगितले. पहिल्या दोन दिवसात 47 हायवा ट्रक, 25 ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांनी गाळ शेतात दिला आहे. गाळ काढण्याच्या कामात सातत्य ठेवत त्या कामाची गती वाढवत 20 ते 27 जून दरम्यानच्या काळात 1,100 ट्रक फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात यश मिळाले आहे. जोरदार पाऊस सुरू होई पर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा क्रेडाईचा संकल्प आहे. धरणक्षमता जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून दरमाणसी लागणारे पाणी गृहीत धरता 4 जणांच्या कुटुंबाला दिवसाला 200 लिटर पाण्याची गरज पडू शकते. 8 कुटुंबांच्या गृहनिर्माण प्रकल्पात त्या प्रमाणात 1,600 लिटर पाणी लागणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रती प्रकल्प 2 ट्रक गाळ काढणे गरजेचे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प साकारले जात असल्याने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत 1,100 ट्रक गाळ काढून क्रेडाईने आपल्या प्रकल्पातील नागरिकांची गरज भागवण्याच्या उद्देशाने जलसाठ्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे
धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता १ टीएमसी एवढी आहे. मात्र गेल्या काही वर्षात पाण्यासोबत धरणात वाढत गेलेल्या गाळामुळे धरणाची क्षमता 6.5 एवढी राहिली आहे. त्यामुळे 2.5 टीएमसी पाणी गाळामुळे कमी साठवण केले जाते. ते परिपूर्ण करण्यासाठी धरणात साठलेला गाळ काढणे महत्वाचे झाले आहे. शेती उत्पादनासाठी सुपीक असलेला धरणातून निघालेला गाळ नितीन पाटील (32 ट्रक), सचिन पाटील (69 ट्रक), विठ्ठल थेट (259ट्रक), संपत थेटे (182 ट्रक), रघुनाथ फडोळ (335 पीन पाटील (131 तक) संदिप थेटे (90 तक) यांनीधरणसाठ्यात वाढ करण्यासाठी एक टीएमसी पाणी वाढवण्याकरता 13 लाख ट्रक गाळ काढावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 32 लाख ट्रक गाळ काढल्यास धरण पूर्णक्षमतेने भरुन जाईल. त्यावेळी पाणीकपात करण्याची गरज राहणार नाही. यादृष्टीने क्रेडाईने पहिले पाऊल उचलले आहे.क्रेडाईने हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून हाती घेतला आहे. नवीन धरण बांधण्यापेक्षा पावसाच्या पाण्याच्या साठवणीतून धरणाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. क्रेडाईने आतापर्यंत 1,100 ट्रक गाळ काढला आहे. मुसळधार पाऊस येऊन कामात व्यत्यय येत नाही तोपर्यंत काम सुरू ठेवण्याचा मनोदय आहे. सर्वसामान्यांनी पुढे येऊन खारीचा वाटा उचलावा.
अध्येक्ष
कुणाल पाटील
क्रेडाई नाशिक मेट्रो.
.
No comments:
Post a Comment