चिखली - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील भोरसा भोरशी येथे दि २३ जूनच्या रात्री अचानक ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतजमिनिंचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सर्वत्र शेतजमीनी पेरणीसाठी पूर्णपणे तयार झालेल्या असतांना अचानक भोरसा भोरशी, पाटोदा,
पेनसावंगी,नायगांव शेतशिवारात मुसळधार पाऊस पडून शेतातील बंधारे,नाले, वळणं, विहरी, शेतरस्ते,बांध फुटून शेतजमिनी पूर्णपणे खरडून गेल्या असून पेरणी योग्य तयार करून ठेवलेल्या शेतीतील माती पूर्णपणे वाहून गेल्याने शेतात फक्त दगड धोंडेच उरले असल्याने परत शेत जमिनी तयार करणे त्वरित तरी शक्य नसल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी मागणी रयत पक्षाचे प्रवक्ते प्रशांत ढोरे - पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
No comments:
Post a Comment