राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 30, 2023

*ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांचा कौल**आपल्याच बाजूने लागेल -अविनाश आदिक*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*बी.आर.चेडे - शिरसगांव*
येत्या ५ नोव्हेंबरला शिरसगांव ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे,त्यामध्ये मतदारांचा कौल आपल्या समाज सेवा मंडळाला मिळणारच आहे.सत्ताधारी पदाधिकारी यांनी काय केले त्याचा लेखाजोखा आपल्याकडे आहे.गावकऱ्यांनी आपल्याला संधी दिली तर व्यासपीठाकडे पाहीले तर सर्वांच्या लक्षात येईल की येथे महत्वाचे मान्यवर आहेत. आपला पक्ष सरकारमध्ये असल्याने आवश्यक सहकार्य मिळेल.स्थानिक आम्ही सर्व आहोत.नवीन चेहरे दिल्याने ते चांगल्या उमेदीने काम करतील. श्रीरामपूर शहराजवळ हे गाव आहे.श्रीरामपूरच्या बाबत पुढील काळाबाबत आपल्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर शिरसगावकराना महत्वाची भूमिका बजवावी लागेल.या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने आग्रह करतो की प्रत्येकाने ही निवडणूक माझी आहे हे समजून काम केल्यास निवडणुकीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन समाज सेवा मंडळाच्या ग्रा.प.निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी अविनाश आदिक यांनी केले.
याप्रसंगी आपल्या प्रास्तविकात समाज सेवा मंडळ गटप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले की, शिरसगांव हे सातत्याने श्रीरामपूर शहराशी संपर्क असलेले शहरालगतचे गाव आहे. त्याचा विकास करणे हे स्थानिक नागरिकांचे काम आहे.या गावात स्व.गोविंदराव आदिक,अविनाश आदिक,अनुराधा आदिक,.डॉ वंदनाताई मुरकुटे,ज्ञानेश्वर (माउली) मुरकुटे हे या गावचे मतदार आहेत.या गावचा विकास होणे गरजेचे आहे, परंतु गेल्या दहावर्षात तसे झाले नाही. साईनाथ गवारे,सोपानराव गवारे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला पण गावच्या दोन्ही गटांनी ते मान्य केले नाही.गावच्या विकासासाठी बरीच मोठी मंडळी सोबत आहेत.त्यांचे माध्यमातून सर्व सहकार्य विकासासाठी मिळणार आहे.त्यामुळे गावचा कायापालट होऊ शकतो.स्व.जी. के.पाटील यांचे गावासाठी मोठे योगदान आहे.सरपंच पदासाठी सौ.जयश्री प्रदीप अभंग ह्या उमेदवार आहेत.त्या यापूर्वीही सदस्यपदी निवडणून आलेल्या आहेत. त्यासाठी वनिता विजय गायकवाड यांनी मोठ्या मनाने सरपंचपदाची उमेदवारी मागे घेतली.दहा वर्षे त्यांना सत्ता दिली आता आम्हाला द्यावी.यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,माजी सभापती डॉ वंदनाताई मुरकुटे,ज्ञानेश्वर मुरकुटे,राजाभाऊ कापसे, बापूसाहेब पटारे,विधिज्ञ मुकुंद गवारे,सोपानराव गवारे,प्रदीप अभंग, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, बाळासाहेब गवारे,आदींनी आपले मनोगत मांडले व उमेदवारांना मतदान करा.निश्चित विजय आपलाच होईल परिवर्तन होईल अशी ग्वाही दिली.व सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सर्व मान्यवर व उमेदवार यांनी नारळ फोडून प्रचार शुभारंभ केला. यावेळी सतीश गवारे,सुभाष यादव,प्रदीप अभंग,इसाक पठाण,मुकुंद गवारे,सोपानराव गवारे,साईनाथ गवारे,आदी सर्व मान्यवर उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:* ✍️✅🇮🇳 समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment