- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत सालाबादप्रमाणे मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा तसेच शैक्षणिक अध्ययना बरोबर व्यावसायिक,अध्यात्मिक, साहित्यिक ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेच्या माध्यमातून सतत वर्षभ विविध उपक्रम राबविण्यात येतात,आनंद बाजाराचे आयोजन यामुळे विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने काही विद्यार्थी घरगुती भाजीपाला तसेच शालेय साहित्य, मिठाई, कपडे, चप्पल, बूट अशा विविध स्वरूपात विक्री करण्यासाठी स्टॉल लावतात. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय वृद्धी तसेच बौद्धिक विकास याचा लाभ होण्यास मदत होते यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी प्रमुख पाहुण्या मनीषाताई आगाशे व पूजाताई नगरकर तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे नैसर्गिक शेती तज्ञ साबदे काका व किशोर अण्णा थोरात यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले व स्वतःच्या शेतामध्ये पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवला तसेच या कार्यक्रमाला बॉबी बकाल, देवाभाई चौधरी, भरत भाटिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार, मंजुषा कसार,ज्ञानेश्वरी तुंगार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आनंद बाजारचे सूत्रसंचालन सारिका कोते व रेखा पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment