एकता पत्रकार संघाच्यावतीने नेवासा फाटा येथे पत्रकार दिन व पुरस्कार वितरण समारंभ थाटात संपन्न
- नेवासा - प्रतिनिधी -/ वार्ता -
पत्रकारितेला आता काळानुरुप प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मोठे आव्हान असून हल्लीच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात समाजातील घडामोडींची क्षणार्धात बित्तंबात्तमी देत सामाजिक जागृता निर्माण करण्याचे काम पत्रकार करत असून पुर्वीच्या काळात खेडे गावात सकाळी वृत्तपत्र घरी येऊ पर्यंत जिल्ह्यातील घडामोडी सर्वसामान्य जनतेला समजत नव्हत्या आता माञ पत्रकारितेत मोठे बदल होवून जलदगतीने सामाजिक घडामोडींचे आकलन पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते त्यामुळे पत्रकारांनी या सर्व स्पर्धेच्या युगात वास्तवतावादी पञकारिता करुन राजकारण आणि समाजकारणात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा असे आवाहन नेवासा तालुक्याचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी सोमवार (दि.६) रोजी झालेल्या नेवासा फाटा येथील ञिमुर्ती शैक्षणिक संकुलात आयोजित नेवासा तालुका एकता पञकार संघाच्या पञकार दिन व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, मुकिंदपूरचे माजी सरपंच दादा निपुंगे, नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, समर्पन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील भदगले, कृषी शास्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, गणेशराव लंघे, भाजपाचे नेते अंकुशराव काळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे, एकता पञकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
नेवासा तालुका एकता पञकार संघाच्यावतीने आयोजित पञकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेञात उत्तुंग भरारी घेत शिक्षणाची जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी दालने उभी करुन ज्ञानार्जन करणाऱ्या ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तर पञकारिता क्षेञात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भेंडा येथील पत्रकार कारभारी गरड, घोडेगांव येथील पत्रकार दिलीप शिंदे तर बालाजी देडगांव येथील पत्रकार बन्सी एडके यांना दर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील बोलतांना पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत जनतेने मला निवडून दिल्यानंतर आता अनेकांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपण केवळ निवडणुकी पुरतेच राजकारण करुन स्व. वकिलराव अण्णा लंघे यांच्या जुन्या पिढीचे संस्कार जपत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलतांना त्यांनी दिली. तालुक्यातील सर्वच पञकार आमचे मिञ असून पञकारांनीही मला सदैव नेहमीच साथ दिलेली असून आता विकास कामे करण्यासाठी पञकारांनी मार्गदर्शकाची भूमिका बजाविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी पञकारांना केले.
यावेळी बोलतांना श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज यांनी आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी धक्क्यावर धक्के घेत विधानसभा निवडणूकीत विजयी मिळविलेला आहे,
ते पहीले क्लिनर होवून मग ड्रायव्हर झाल्यामुळे त्यांना कामाचा मोठा अनुभव असून त्याचा फायदा विकास कामाबाबत समाज घटकाला नक्कीच होणार असल्याचे गौरोद्गार यावेळी बोलतांना महंत सुनिलगिरी महाराज यांनी काढले.
याप्रसंगी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी म्हणाले की, हल्लीच्या युगात खुन (हत्या) यापेक्षा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असल्याने मोठा चिंतेचा विषय ठरत असल्याचे सांगत वास्तवात याचे स्पष्टिकरण आणि अनेक कारणे विषद करुन प्रबोधन केले. तर पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पञकार राजेंद्र वाघमारे, संदिप गाडेकर, चंद्रकांत दरंदले, अशोक पेहरकर, विनायक दरंदले, इकबाल शेख, युनुस पठाण, मकरंद देशपांडे, नामदेव शिंदे, गणेश बेल्हेकर, अभिषेक गाडेकर, सौरभ मुनोत, सचिन कुरुंद, सुधाकर होंडे, बाळासाहेब पंडीत, राहूल कोळसे, विकास बोर्डे, विलास धनवटे, सोमनाथ कचरे, देविदास कचरे, मोहन शेगर, अशोक भुसारी, राहूल चिंधे, संतोष सोनवणे, विठ्ठल उदावंत यांच्यासह तालुक्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, सामाजिक कार्यकर्ते महेश कांडके, शहर कॉंगेसचे अध्यक्ष अंजूम पटेल यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेञातील मान्यायवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार दादासाहेब निकम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदिप गाडेकर, राजेंद्र वाघमारे, अशोकराव पेहरकर, चंद्रकात दरंदले, सतिष उदावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार संदिप गाडेकर - नेवासा
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment