राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, March 26, 2025

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 26 वां, गुरुवार दिनांक 27-03-2025..

रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 26 वां, गुरुवार दिनांक 27-03-2025..
!! " लैलतुल कद्र -जुमाआ -तुल- विदाह " च्या एका - लम्हा - क्षणा -क्षणाची सुवर्ण संधी साधा.. "!!.
आज पवित्र रमजान मधील 26 वा रोजा ची लैलतुल कद्र ची 27 वी रात्रं, पुन्हा जुमाआ ची पवित्र रात्रं अर्थात योगा योग..
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, "(1) निश्चितच आम्ही पवित्र कुरआन ला शब ए कद्र च्या रात्रीत अवतरीत केलेले आहेत, (2), तुम्हाला ( शब ए कद्र ) कद्र ची रात्रं म्हणजेच काय? हें काय माहित आहे??(3)हजार महिन्याहुनही ( महिन्यांपेक्षा ही )अधिक उत्तम अशी रात्रं म्हणजेच कद्र ची रात्रं. (4)या रात्रीत देवदूत ( फारिस्ते )आणि खास देवदूत ( जिब्राईल अलै.)आपल्या अल्लाह ची आदेशानुसार प्रत्येक चांगल्या सुखाच्या गोष्टी घेऊन पृथ्वीवर अवतरतात., (5) आणि ही संपूर्ण रात्रं बरकतीची आणि शांती ची आहेत.( उष काळा पर्यंत ).(पारा 30 वा, सुरह 97,अल - कद्र आ. नं. 1 ते 05).
हजरत इब्न अब्बास रजि. सांगतात कीं , आम्हाला पैगंबर मुहम्मद स्व. नी सांगितले कीं, लैलतुल कद्र च्या पवित्र रात्रीं रमजान महिन्यात शेवटच्या विभागात (अशहरा )मध्ये विषम( ताक )संख्येत 21,23,25,27,29, पाच रात्रीं येतात, ( हदिस बुखारी 2020).
यामध्ये कोणती रात्रं जास्तच महत्वाची आहेत यामध्ये विविध 
मुफ्ति व विशेष अभ्यास करणाऱ्या मध्ये मत्मात्तांतर दिसून येते. याचं गुपीत फक्त्त अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व. यांनाच माहित, तरीही विशेष रात्रं ही 26 व्या रोजाची येणारी रात्रं ही अंदाजे महत्वाची मानली गेली, 
पूर्वीच्या काळात लोकं 500- 1000 वर्ष जगत होती, त्यांमुळे त्यांनी ठेवढे पुण्यांची कर्म केलेलं , व प्रेषितांच्या काळात सहाव्या शतकात लोकांचं आयुर्मान हें 60-ते 80-90 वर्षांच्या आसपास म्हणून प्रेषित यांना काही मित्र सहकारी यांनी प्रश्न उपस्थित केला कीं, हें अल्लाह च्या रसूल ( पैगंबर ) त्याकाळातील लोकांच्या बरोबर पुण्य कामावणे आज च्या दृष्टीने अशक्य आहेत आजच वय त्याकाळापेक्षा कमी आहेत.. तर., अल्लाहचा संदेश वरील सुरह अल कद्र च्या स्वरूपात आला. कीं कद्र ची एक रात्रीचे महत्व रोजच्या रात्रीं पेक्षा जास्तच अर्थात एक हजार महिन्याच्या रात्रीं पेक्षा ही जास्तच असणार आहेत ( सुरह 97, अल - कद्र आ. नं., 03)..त्या रात्रीचे महत्व जाणाल तर तुम्हीं स्तबध आश्यर्य चिकीत व्हाल. तुम्हाला भान राहणार नाहीत.
काही अभ्यासक, तज्ञ मंडळीनीं आप आपल्या कुवतीनुसार अंदाजे आकडेमोड दिलीत, एक हजार (1000) महिन्याच्या दिवसानुसार त्या रात्रीं, एक (1)सेकंद = 23 तास , एक मिनिट (1 मिनिट ) = 58 दिवस, एक (1) तास = 8-9 वर्ष यांची आकडेमोड करून बेरीज केली तर 83 त्रेयांशी वर्ष्याची इबादत - बंदगी - प्रार्थना होते.. अशा आपल्याला 20-25 वर्ष्याच्याप्रत्येक वर्षाची एक तरी लैलतुल कद्र ची पवित्र रात्रं भेटली तर त्याकाळातील हजार वर्ष्याच्या प्रार्थना पेक्षा ही कितीतरी जास्तच होईल. प्रत्येक सेकंद मिनिटाचं पुण्य एवढ्या प्रमाणात भेटत असेल तर यां सुवर्ण संधीचा फायदा इमाने इतबारे इबादत प्रार्थना करून उचलणं अत्यन्त गरजेचं.मग एक एक सेकंड, मिनिट, तास का? वाया घालवायचं.
प्रेषित मुहम्मद स्व.यां रात्रींचं महत्व सांगतात कीं, " अल्लाह -परमेश्वर - परमात्मा -गॉड यां रात्रीं मध्यरात्रीं सातव्या आकाशात येऊन पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्र, मानवानां आव्हान करतात कीं, " #कोण आहेत जो माझ्याकडे दयेची याचना करेन त्यावर मी ती दया देईल, #:कोण आहे कीं, माझ्याकडे करुणेची भीक मागेल मी त्याला त्या करुणेची भीक देईल,:# कोण आहे जो आपल्या केलेल्या लहान मोठया पापांची क्षमा माफी मागेल कीं मी त्याला क्षमा माफी देईल, # कोण आहे जो माझ्या कडे त्याच्या मनातील मनोकामना साठी माझ्या कडे येईल कीं मी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, "
पुन्हा पुन्हा अल्लाह मनाव जातीला आव्हान करतात कीं " कोण आहेत जो एका अशा अल्लाहला कर्ज देईल ".. हें कर्ज कशाला तर, समाजातील गरीब -पीडित,-अनाथ -लाचार- विधवा- अत्याचारीत - दिन दुबळे - उपाशी पोटी झोपलेल्या साठी, त्यांची भूक मिटवण्यासाठी, त्यांचं पालनपोषण करण्यासाठी, त्यांच्या बरीकातील बारीक, छोटया छोटया गरजा पुरवण्यासाठी.
तर यां मध्ये लैलतुल कद्र बराबरंच जुमाआ ची ही रात्रं आहेत व दिवस ही पवित्र जुमाआ आहेत.. त्या दिवस एक क्षण असा असतो कीं अल्लाह आपलं कोणतं ही दुआ पूर्ण कबूल करतात.. त्याचा डबल डबल फायदा आहेत तर त्याचा ही लाभ उठवला पाहिजे..
(मित्रांनो लेख आवडल्यास मित्रांना, नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना ही फायदा होईल.. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

लेखक :- डॉक्टर. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014.👍👌
🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

Tuesday, March 25, 2025

पत्रकार निखिल बावणे यांनी साजरा केला न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस

पत्रकार निखिल बावणे यांनी साजरा केला न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस

- तुषार खासबागे - वरुड जि.अमरावती -/ वार्ता 
पत्रकारीता क्षेत्रामध्ये अल्प कालावधीत सर्वांना सुपरिचित झालेले युवा पत्रकार निखिल अनिल बावणे (सह संपादक दैनिक वरुड केसरी) यांनी न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला.
अत्यंत सामान्य कुंटूबा मध्ये जन्म घेउन शिक्षणा सोबतच सोशल मिडीया मध्ये काम करित असतांनी कुठलही प्रशिक्षण न घेता ग्राफिक्स डिझाईन बनवण्याची कला अवगत करून आपल्या परिवारा साठी शिक्षणा सोबतच जोड व्यवसाय म्हणून काम करत असतांनी दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्राच्या माध्यमातुन सोशल मिडींया सोबतच प्रिन्ट मिडीया मध्ये सुद्धा अल्प कालावधी मध्ये आपली ओळख निर्माण करण्याचे धाडस श्री निखिल बावणे यांनी केले व आज ते सहसंपादक म्हणून दैनिक वरुड केसरी या वृत्त पत्रा मध्ये काम करित आहेत, आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे लहान मुलांन सोबत मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचा मानस केल व या छोटेखानी कार्यकमाला शाळेच्या प्राचार्य कोमल पांडव यांच्या मदतीने लहान मुलांन सोबत आपला आनंदाचा क्षण साजरा करण्याचा आनंद मिळऊन दिला. या वेळी प्रामुख्याने धिरज खोडस्कर सचिन परिहार तुषार खासबागे संपादक प्रविण सावरकर व शाळेच्या प्राचार्य कोमल पांडव व शिक्षक वृंध प्रामुख्याने उपस्थित होत्या या वेळी केक कापुन .मुलांना चॅकलेट वाटप करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


रमजान मुबारक 2025,रोजा नं. 25 वा, बुधवार दिनांक 26-03-2025


रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 25 वा, बुधवार दिनांक 26-03-2025

   इस्लाम,:- !!! जिहाद :- मानवी कल्यानासाठीच!!.
         "जिहादी-जिहाद " हा शब्द एकविसाव्या शतकातील सर्वात चांगला असूनही बदनाम केलागेलेला शब्द, ज्याचा कायम चुकीचा अर्थ लावला जातोय, म्हणजे "इस्लामच्या शत्रू विरोधात युद्ध "म्हणजे फक्त्त हिंसा आणि जुलूम, जिहाद हा सर्वाधिक विवादीत आणि संवेदनशील शब्द जगातील पक्षपाती मीडिया असा एकही दिवस सोडत नाहीं कीं इस्लाम वर टीका करण्यासाठी सोडत नाहीं.   
  परंतु, पवित्र कुरआन व प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या दृष्टीने जिहाद चा सरळ अर्थ "प्रयत्न "किंवा संघर्ष अथवा " मी प्रयत्न करेन, मी आपल्या परीने पुरेपूर प्रयत्नशील राहीन ".
   जिहाद हा एक अरबी शब्द आहेत, जो "जहद "धातूपासून तयार झाला आहेत ज्याचा अर्थ" संघर्ष "असा होतोय, जिहाद ची व्याख्या ही कीं" एखादे उदिस्ट साध्य करण्याकरिता शक्यतो सर्व प्रयत्न करणं, "याचा अर्थ" वापर अनेक परिस्थितीशी व पद्धतीशी तोंड देणे असा ही होतोय." उदा.हा संघर्ष बौद्धिक, अध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, किंबहुना भौतिक स्वरूपात ही असू शकतो. साधारत: उर्दु भाषेत नेहमी" जेद्दोजहद "शब्द नेहमी वापरला जातो, ज्याचा अर्थ" संघर्ष 'असा होतो. 
राष्ट्रपिता महात्मा गांधी जी आफ्रिकेतून भारतात भारतीय स्वातंत्र संग्रामात ब्रिटिश सत्ता विरोधात भाग घेण्यासाठी आले त्यावेळेस जिहाद विषय ऐतिहासिक उदगार काढले कीं, " मी भारतात जिहाद करण्यासाठी जात आहेत ", म्हणजेच "अहिंसा" नावाने शांतीपूर्ण संघर्षाला अरबी भाषेत जिहाद म्ह्टले गेले आहेत. 
             पैगंबर, प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " सर्वात महान व व्यापक जिहाद म्हणजेच आपल्या स्वतः च्या विरोधात जिहाद होय. अर्थात आपला अहंकार, लालसा, मोह, कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा - आकांशा, तसेच आपल्या मनातील वाईट विचार - आचार, आपल्या आंतरिक वाईट इच्छा, अपल्याला लागलेल्या वाईट सवयी त्या विरोधात, तसेच समाजातील वाईट गोष्टी, समाजातील दुस्टप्रवृत्ती विरोधात, सर्व प्रकारचे अत्याचार छळ जुलूम जबरदस्ती, अतिरेक, या सर्व विरोधात जिहाद करून समाजात नेकी, सदाचारी न्याय आणि शांती प्रस्थापित करणं म्हणजेच जिहाद करणं. इस्लाम हा शांततां प्रिय आहेत म्हणून जिहाद करून तिला शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं ".
                     बैरूत देशातील एक संशोधक युसूफ विश यांनी म्हटले कीं," सर्वाना व्यापक जिहाद म्हणजे आपल्या स्वतःच्या पशवी प्रवृत्तीविरोधात लढणे बाह्य जगाशी जिहाद पेक्षा आपल्या आंतरिक पाशवी प्रवृत्ती वर विजय मिळवणे , आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणं.
                              प्रेषित मुहम्मद स्व. हें हुंनैन युद्धातुन परत येताना घोषणा केली " आम्ही छोटया जिहाद ( प्रयत्न, प्रतिरोध, सुधारणे साठी संघर्ष ) करून येत आहोत आणि "महान "जिहाद कडे जात आहोत,"
त्यावर एका मित्र- सहकारीनें प्रश्न विचारलला, " हें पैगंबर साहब, हा महान जिहाद कोणता?? "
त्यावर, पैगंबर प्रेषित यांनी उत्तर दिले, " हें आपल्या स्वतः शी, " अहंकाराशी " लढणे होय, ".
                                     जिहाद म्हणजेच (1)सत्याचा असत्य विरोधात लढा, (2)दृष्टी प्रवृत्तीच्या विरोधात चांगल्या प्रवृत्ती चा लढा (3)दुष्कार्मा विरोधात सत्कार्माचा लढा (4)अन्याया विरोधात न्यायाचा लढा, (5)जुलूम करणाऱ्या विरोधात लढा, (6) कोणावर अत्याचार झालेला असेल तर अत्याचार करणाऱ्या विरोधात लढा. (7) कोणत्याही देशातील जुलूम करणाऱ्या सत्ता विरोधात लढा . म्हणजे जिहाद.(8)एखाद्या स्त्री वर अत्याचार झाला असेल त्या अत्याचार करणाऱ्या विरोधात लढा उभारणे त्या स्त्री ची इज्जतिची, अब्रू ची रक्षण कारण म्हणजे जिहाद. मग ती कोणत्याही पंथाची, कोणत्याही जाती ची समाजाची कीं असेना.
                              
                        अल्लाहच्या मार्गातील जिहाद काय? तर मनावतेवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, अशांती विरुद्ध आपल्या मृत्युची ही पर्वा न करता निस्वार्थी पण संघर्ष करणं, सत्य- समता - शांती बहाल करणं, न्याय व्यवस्था व्यवस्थित करणं, मानवाला अन्याय, अत्याचारा पासून मुक्ती देवून स्वातंत्र्य समता बंधू भाव जोपासणे मानवते वर आधारित आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणं अर्थात निस्वार्थ मानवी सेवा करून आपल्या पालन पोषण करणाऱ्या अल्लाह ला खूष करणं हाच सर्वात मोठा जिहाद आहेत. यालाच सर्वात मोठी उपासना संबोधित करतात.संपूर्णसृष्ठी चा पालनहार हा एकच आहेत म्हणून संपूर्ण मनाव जात सर्व एक समान आहेत,निर्माण करत्याने प्रत्येक मनुष्याला धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहेत, पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं," धर्माच्या बाबतीत कोणतीही बळजबरी जबरदस्ती नाहीं "म्हणून जिहाद हें कोणत्याही एका विशिष्ट्य धर्मा विरोधात किंवा एखाद्या विशिष्ट राष्ट्रा विरोधात नाहीं किंवा इस्लाम धर्म प्रसारा साठी केलेला संघर्ष ही बिल्कुल नाहीं तर जिहाद हा कोणत्याही अन्यायग्रस्त, वाईट, अतिरेकी प्रवृत्ती, मग अन्याय हा कुणावर कोणत्याही जाती वर होवो ती मग मुस्लिम असला तरी ही त्याविरोधात "आवाज -एल्गार - विद्रोह करणं आहेत.. 
म्हणून अल्लाह सर्व जगातील अनुरेणू जीव जंतू वर प्रेम करतात व प्रत्येकांची त्यांना काळजी आहेत म्हणून जिथे जिथे मानवी मूल्य ची गळचेपी होईल तिथे तिथे आपल्या आपल्या परीने आवाज उठवून -जिहाद- विद्रोह करून बिमोड करणं होय. 
प्रेषित मुहम्म स्व, सांगतात कीं, तुमच्या पैकी कोणी कोणावर अन्याय - वाईट कृत्य होताना पाहाल तर, आपल्या स्वतः च्या हाताने रोखा, जर तुम्हीं तर आपल्या वणीने आवाज उठवून रोखा, अगर त्याचीही रोख ण्याची तुमची कुवत, हिम्मत नसेल तर कमीत कमी त्या त्या कृत्याला मनामध्ये वाईट समजा.. परुंतु हा श्रद्धे चा सर्वात खालचा दर्जा आहेत."
                        तुम्ही कोणत्याही वाईट प्रवृत्ती- गोष्टीला -वाईट कृती ला फक्त्त प्रेक्षक म्हणून पाहू नका, ते प्रेक्षक म्हणून पाहणं म्हणजे त्या वाईट कृत्याला मूक संमतीच देणं होय. म्हणून उद्याच्या भविष्यातील गंभीर समस्याला तोंड देण्या पेक्षा आजच विरोध करा. कारण कालांतराने त्याचे वाईटच परिणाम होतील.म्हणून जिहाद ही इस्लाम मधील एक उपासना पद्धती आहेत. 
           पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " लढण्याची परवानगी त्या लोकांना दिली जात आहे, ज्यांच्यावर (शत्रू पक्षाकडून ) आक्रमण होत आहेत, (परवानगी देण्याचे )कारण कीं त्यांच्या वर अत्याचार झालेला आहेत,आणि अल्लाह, त्यांची मदत करण्यासाठी पूर्णपणे समर्थ आहे " सुरह नं. 22, अल - हाज, आ. नं -39).
                           अल्लाह ला जगात संपूर्ण शांतता प्रस्थापीत करायची परुंतु ती ही शांततेच्याच मार्गाने.. आणि जिहाद चा ही अतिरेक नको.
पुन्हा अल्लाह पवित्र कुरआन मध्ये सांगतात कीं, " अल्लाह च्या मार्गात अतिरेक, अन्याय करणाऱ्या शी लढा जें तुमच्या विरोधात लढत आहेत परंतु त्याचा ही अतिरेक करू नका, अल्लाह अतिरेक करणार्यांना पसंत करीत नाहीं ". (सुरह नं. 02, सुरह बकराह आ. नं. 190).अल्लाह ला मर्यादाचे उल्लंघन करणारे पसंत नाही..
सर्व सामान्य लोकांच्या मना मध्ये सोसिअल मीडिया, प्रिंट मीडिया, व्हाट्सअप बघून जिहाद हा फक्त्त मुस्लिम हें फक्त्त रक्तपात, खून खराबा, सतत लढाया, मुंडके उडवणं, कत्तली करणे, मारामाऱ्या, बॉम्ब स्फोट, जाळपोळ, घातपात, अतिरेकी कारवाया येवढ च फक्त्त चित्र दिसतं... किंवा टोळी युद्ध, काही माथेफ़ुरू लोकांनी समाजाला वेठीस धरून केलेला रक्तपात, आत्मघाती हमले हल्ले, सगळे कडे मजवलेला आतंकवाद हें सर्व इस्लाम मध्ये निषेध निषेध आहेत.. इस्लाम व जिहाद चा या अशा अमानुष कृत्याचा काहीच जवळजवळचा ही संबंध नाहीं.
                                       यावर अल्लाह पवित्र कुरआन मध्ये सांगतात कीं," पृथ्वीवर ( जमिनीवर ), उपवद्रव माजविन्यासाठी,# जर एखादया माणसाने जो निष्पाप व्यक्तीचा खून ( हत्या )करेल : तर : समजा : संपूर्ण मानवजातीची ती हत्या केल्या सारखे ठरेलं,# आणि # जर जो कोणी एका ही मानवाच्या मानवाच्या प्राणाचे रक्षण करील त्याने अखिल मानवजातीच्या प्रणाचे रक्षण केल्या सारखे श्रेय लाभेल.. "( सुरह नं 05, सुरह अल - मायदा आ. नं 32 वी ).
                 या जगात प्रत्येक मानवाचं सर्वात जास्त मूल्य व मौल्यवान आहेत.. प्रत्येक मानवाची कोणत्याही परिस्थितीत रक्षण झालेच पाहिजे हें इस्लाम शिकवते.
मानवतेच्या शत्रू असलेल्या उपद्रवी, अत्याचारीत लोकांविरोधात कधी कधी टोकाची भूमिकाही द्यावी लागते म्हणून त्यांच्या बरोबर संघर्ष ही होतो परुंतु या आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये ही इस्लाम नें नैतिक तेचे आदर्श उदाहरण दिले आहेत, नैटिकता जोपसण्याचे आचारसंहिता देखील दिली आहेत, या ठिकाणी इस्लाम चे पहिले खलिफा हजरत अबूबक्र सिद्धीक रजि.सांगतात कीं आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व.नी सक्तीने आदेश दिले कीं," युद्ध झालेत तर, युद्धात स्त्री यांची हत्या करू नका त्यांच्या अब्रू ची रक्षण करा, महिला, वृद्ध, बालके, आजारी, यांची हत्या करू नका, त्यांना त्रास देवू नका, जाळपोळ करू नका, फळ झाडांना कापू नका, कोणताही विनाश करू नका मध माश्याणा अगीच्या हवाली करू नका, कोणत्याही धर्म स्थळाचा अवमान करू नका, अराजक्ता, आतंक माजवू नका, वास्त्याणा उध्वस्त करू नका, जेवढी कमीत कमी हानी होईल याची सतत काळजी द्यावी, सदाचरण, सदावर्तन करा, परोपकाराची भावना ठेवा, अल्लाह परोपकार व सदाचरणी, न्याय करणार्यांना पसंत करतात. "
ज्या जिहाद मध्ये स्रियाच्या अब्रू ची , स्त्री यावर होणाऱ्या अत्याचार, स्त्री विरुद्ध होणाऱ्या विविध छळा, त्रास कारणाऱ्या विरोधात जो समाज जिहाद करतोय, ज्या समाजात स्त्री बद्दल वारंवार आदेश आलेले आहेत कीं स्त्री यांचं रक्षण करा, ज्या प्रेषित पैगंबर मुहम्मद स्व. यांनी स्त्री यांना वाचविण्यासाठी, स्रियाच्या न्याय हक्का साठी, विधवा महिला बरोबर लग्नाला प्रोत्साहन दिले व ते स्वतः ही विधवा व तालाक दिलेल्या महिला बरोबर स्वतः विवाह करून संपूर्ण जगाला दाखवून दिले कीं विधवा स्त्री या बरोबर लग्न करून तिला पुन्हा एकदा जीवन जगण्याची संधी द्या. पुन्हा आपल्या शेवटच्या स्वास पर्यंत जो पैगंबर महिला हक्कासाठी काळजी होती अशा चांगल्या पैगंबराचे संस्कार असलेला कशाला लव्ह जिहाद च्या फांदयात पडेल.. लव्ह जिहाद हा इस्लाम व जिहाद चा एकदम विरोधाभास आहेत.. इस्लामला फसवून धर्मांतर करणे मुळीच मान्य नाहीत हें जिहाद च्या बिलकुल विरोधी भूमिका आहेत.. राजकीय पक्ष याचा गैरसमज करून मन दूषित करून फायदा उचलून राहिलं..
पुन्हा सध्या गाजत असलेला वोट जिहाद.. तों असाच राजकीय फायदा उचलण्यासाठी असो.. पुन्हा कधी यावर.
युद्धधाच्या आणीबाणी च्या परिस्थिती त जो नैतिकतेच उदाहरणं देतं आहेत असा इस्लाम मग अतिरेक कसा करेल..
जिहाद सारख्या महान मानवी कल्याणा साठीच्या उद्देश असलेल्या ततत्वत दयानाचे व उपासना पद्धतीचे जगात इस्लाम विरोधातील आप प्रवावृत्तीनें विदरूपीकरण करून लोकांची दिशा भूल करून, वास्तविक पणे मनाव जातीला शोषण मुक्ती देवून जगात सत्य- शांती - समानता - एकता अखंडतां व न्यायावर आधारित समाजनिर्मान करणे हें जिहाद चे प्रमुख ध्येय असल्यामुळे ती एक प्रकारे सर्वश्रेष्ठ मनाव कल्याण ची सेवाच.
 (मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना व नातेवाईकांना जरूर पाठवा.. त्यांना ही फायदा होईल.. प्रतिक्रिया जरूर कळवा )


((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

आपला मित्र :- डॉक्टर. सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल. मिल्लतनगर.
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
मोबाईल नं. 9271640014.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷.

((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷




.

Monday, March 24, 2025

रमजान मुबारक 2025रोजा : नं. 24 वां, मंगळवार दिनांक 25-03-2025


रमजान मुबारक 2025
रोजा : नं. 24 वां, मंगळवार दिनांक 25-03-2025

    #!!" सृष्टी - युनिव्हर्स चा पालणकर्ता ; -अल्लाह - परमेश्वर - गॉड - परमात्मा .?? "!#


                        (1)" एकम ब्रह्म द्वितीय नास्ते नेह नां नास्ते किंचन "( ब्रह्ममा सूत्र ).
अर्थात:- परमेश्वर एक आहे, दुसरा नाही, बिलकुल नाहीं, कण मात्र देखील नाहीं ".
                            (2)," नां तस्या प्रतिमा अस्ति "(याजूर्वेद 32:3).
अर्थात:- उसकी कोई छवी नहीं, अर्थात : उसका कोई चित्र या मूर्ती नाहीं.
                               (3),"एक ओंकार सत नाम करतां पुरख निर्भ अ ओ निर्वाईर अकाल अजूनी सैभण गुरु परसाद " गुरुवानी ".
अर्थात:- परमेश्वर एक है, उसका नाम सत्य है, वह सृजन कर्ता है, अमर है, भय रहित है, उसको किसीने जन्म नहीं दिया, गुरु कीं कृपा से उसकी प्राप्ती होती है..
                                 (4), कुल- हु -वल्लाहु आहद,!अल्लाह -हुस -समद! लम- यलिद :, व-लम -युवलद :, व-ल्लम या-कुल्लाहु :, कुफू - अन - अहंद " पवित्र कुर आन ( सुरह नं. 112, सुरह - इखलास, आ. नं. 01-ते 04).
अर्थात :- ( पैगंबर! हें लोकं अल्लाह विषयी विचारतात ) तर, तुम्हीं त्यांना सांगा, " अल्लाह ( परमेश्वर )एकच आहे(1), तों आत्म निर्भर ( व स्वयंपूर्ण ) आहे (2), ना तों कोणाला ( अपत्य रूपी ) जन्म देतो, ना तों कोणापासून जन्माला आलेला आहे. (असा आहे अल्लाह )(3) आणि त्याच्या सारखा दुसरा कोणीच नाही.. (4).( सुरह नं. 112,सुरह - अल -ईखलास ).
                           (5) पवित्र दिव्य कुरआन नुसार , " ज्याने मला आईच्या पोटात जन्म दिला आहे ; तो , ही मला सरळ मार्ग दाखवतो ; तोच मला अन्न-पाणी देतो ; आणि आजारी पडलो तर तोच मला बरा करतो ; तोच मला एकदिवस मृत्यू देईल आणि मग पुन्हा तोच मला कयामतच्या दिवशी जिवंत करणार आहेत ,; आणि ज्यांच्यापासून मी फार आशा बाळगतो की ; तोच( अल्लाह )च कयामत ( मरणानंतरही आपण या जन्मी केलेल्या बऱ्यावाईट कर्माचं चांगले वाईट फळ)च्या मोबदल्याच्या दिवशी माझी चुक माफ करील ," (पवित्र कुराण ,पारा नं.१९ ,सुरहा नं.२६ , सुरह अल-अशुराह आ.नं.७८,७९,८०,८१,८२).,
                         (6)" तोच सृष्टीचा निर्माता ,रब (पालनकर्ता) आहे , तोच एक मात्र कृपावंत ,आणि दयावंत आहे ." ( पारा नं.१ सुरह नं.१ अल -फातिहा आ.नं.१,२),
                          (7)" तोच चिरंतरजीवी असून ,तमाम सृष्टीचा भार त्या एकट्या नेच सांभाळलेला आहे , पृथ्वी व आकाशाचा स्वामी (रब) तोच आहे " ( सु..नं.२ आ.नं.२५९ ).,
                           (8) " समस्त सृष्टीचा स्वामी ( रब) पालनपोषण करणारा तोच आहे ; प्रतिष्ठा (प्राप्त करणारा ) मिळवून देणारा ही तोच (रब) आहे ; पुन्हा, ( चुकीच्या गोष्टी केल्या तर) अपमानित सुध्दा करणारा ही तोच आहे " ( सु.नं.३ आ.नं.२६-२७) . , 
                        (9) " आकाशातील चंद्र- सुर्य -तारे सर्व काही ब्रामहांड -युनिव्हर्स फक्त त्याचेच आहे ; तोच जीवन व मृत्यू देणारा आहे "( सु. नं.१०, आ.नं.५५-५६).,
                        (10)" सृष्टीच्या प्रत्येक वस्तूला- आणु रेणूंनां तिचे स्वरूप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा फक्त तोच आहे ". (सु.नं.२०,आ.नं.५०) ., 
                         (11)" मागी ल व पुढील सर्व अनंत काळ -समई- दाहींही दिशेने तोच आहे , चिरंजीवी व चिरस्थानी तोच आहे ." ( सु. नं. २० आ.नं.११०-१११).,
                           (12)" तोच सर्व कणा कणांना सर्वत्र सर्वोत्तम उपजिविका देणारा आहै ." ( सु. नं. २२ आ.नं.५८ व ६६). ,
                           (13)" तोच असण्याला नष्ट करतो , सत्याला खरे करून दाखवतो , लोकांची निराशा झाल्यानंतर ही पाउस पाडतो " ( सु.नं..४२ आ.नं.२४ व ३१).
                           (14)" तोच, वाली व दाता आहे , तोच मृतांना जिवंत करणारा (कयामतच्या दिवशी) आहेत ." (सु. नं.४२ आ.नं.९).,
                             (15)" कोणीही त्याचा पुत्र नाही व तो कोणाचाही पुत्र नाही व तो निर्विवाद निर्विकारच आहे , व त्याच्या सर्व ब्रांमहांडात - युनिव्हर्स मधे फक्त त्याचीच बादशही आहे व कोणी ही त्याचा भागिदार नाही ." ( सु. नं.१७ आ.नं.१११)., 
                           (16) " तोच फक्त व फक्त क्षमा करणारा ही आहे व कठोरातील कठोर शिक्षा देणारा ही तोच आहे ." ( सु. नं.१३ आ.नं.६). , 
पवित्र कुरआन मध्ये असंख्य वेळा असें आयात- स्लोक आलेले आहेत पण काहीच ठराविक येथे दिले आहेत, असो.
जेंव्हा जेसूस यांना सर्वात मुख्य वचना बद्दल विचारलं तर, ते म्हणाले, " The most important one "
                    "द मोस्ट इम्पॉर्टन्ट वन "
        " हम्हारा परमेश्वर एक है " (मार्क 12:29)
          अरबी चा शब्द "अल्लाह ""अल "तथा " ईलाही " पासून बनला है "अल्लाह " ज्याचा इंग्रजी अर्थ " The GOD " गोड " है,
कोणी गोड, तर भगवान-ईश्वर- परमेश्वर- परमात्मा तर कोणी आपल्या बोली भाषे प्रमाणे आपल्या पालनकर्त्याला वेगवेगळ्या नाम विशेषणाने बोलवतात.,.. नांव वेगवेगळ्या पद्धतीने घेतलं जातं.. असो.
                  जर समस्त युनिव्हर्स - सृष्टी- ब्रह्मांड वर बारीक लक्ष दिले तर , निश्चितच आश्चर्यचकित झालंय शिवाय होतं नसते , सृष्टीतील प्रत्येक कण न कण , चंद्र सुर्य ,तारे ,प्रत्येक घटना आपल्याला आश्चर्यचकीत , चमत्कारिक, अदभुत करुन सोडतात . सृष्टीच्या निर्मितीचा व सृष्टी चा सुनियोजित आराखडा ,रचना , पद्धती, त्यांची प्रत्येक वेळेस ची अचुकता , प्रत्येक मायक्रो सेकंद सुद्धा आप-आपल्या वेळी , त्यामधे मिली सेकंदाचा ही फरक नसतो एवढी अचुकता , चंद्र सुर्य तारे पृथ्वी यांच्या मधे एक मिली सेंकदाचाही फरक न होता आपल्या वेळेनुसार रूतूचक्र फिरत आहेत .येवढं अदभुत चमत्कार आज प्रगत विज्ञानाच्या युगात सुद्धा आपण आश्चर्यचकीत होऊन पहात असतो. एवढ्या जगात , एवढ्या मोठ्या जगातील प्रत्येक जीवजंतूंना , जनसंख्येला वेळेवर तीन वेळा पोटात अन्न पुरवतो व पोटभर देतो , समुद्रात जवळपास १८००० आठरा हाजार पेक्षाही अधिक जीवजंतू आहे ( पवित्र कुरआन नुसार), त्यामधे एकटा व्हेल मासा कितीतरी टन एका वेळेस खातो, उदाहरणासाठी फक्त एकजीव घेतला तरी . पृथ्वी च्या पोटात असे हजारोंच्या कोटींनी जिवजंतु जिवंत युनिव्हर्स मधे जींवन जगत आहेत . त्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा - वेगवेगळे नखरे, सवयी, हे सर्व बघून माणूस हैरान - आश्चर्यकारक -आश्यर्य चकित होतं, फार अदभुत होतं, पण सृष्टीच्या प्रत्येक हो प्रत्येक जिवजंतु , प्राणी मात्र , प्रत्येक आणु रेणू ,ची सृष्टी च्या निर्मात्याने अगदी साचेबद्ध रचना बनवली आहे. प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध -साचेबद्ध , काम करीत आहे. प्रत्येकाला आप -आपलं स्वातंत्र्य अस्तित्व टिकवून ज्याची त्याची विशिष्ट ओळख देऊन जन्माला घातलं आहे. सृष्टीत प्रत्येक जीव जंतूत अगदी नर्जीव गोष्टीत सुद्धा चराचरात चैतन्य भरलेले पाहायला मिळते , प्रत्येक जिवाला एक आपलं वैयक्तिक पातळीवर सुद्धा एक वैशिष्ट्य बाहल केलेलं आहे . 
सृष्टीच्या प्रत्येक जीवजंतू जन्मापासून मृत्यूपर्यंत एक साचेबद्ध नियमितपणे नियमबद्ध जीवन जगत आहे.
हें कोणीतरी चालवतंय हे लक्षात घेतलं तर .कोणी तरी अदृश्य शक्ती चालवतंय.. हें आपण जाणतोय, कळतंय.. सर्व कळतंय.

       युनिव्हर्स - गॅलेक्सी मधे ज्याला आईच्या गर्भातून जन्म घेतले असेल आशा प्रत्येक बाळाला ( कोणी काहीही त्यांना नांवं देवो ) तो जन्माला येण्याआधी त्याची दुधाची सोय करुन ठेवतो . एवढी प्रत्येक जीवाची काळजी.. प्रत्येक जण अगदी स्पेसिअल.. हो एकदम स्पेसिअलच..जसं जगातील प्रत्येक आई वडिलांना, जिवजंतू च्या ही जन्म देणाऱ्या गटारीतील ही जन्म देणाऱ्या जिवंच्या जन्म देणाऱ्या त्याच्या माते ( आई ) ला आपलं मुलं, बाळ स्पेसिअल वाटतं अगदीच तसे अल्लाह ला प्रत्येक जीव जंतू हा स्पेसिअल वाटतं.
   त्या आणुरेणूंना, जीव जंतू ना, बाळाला कण कणाने मोठं करत करत समाजाच्या प्रत्येक घटकांकडून काही तरी शिकायला देतो.आईवडील एक माध्यम म्हणून बनवलेले .
जमीनीतुन एक दाणा पेरणी केल्यानंतर त्या दाण्याचे रूपांतर असंख्य संख्येने धान्यात करून प्रत्येक दाण्यांची विल्हेवाट लाउन , प्रत्येक दाण्यां दाण्यांला त्याच्या भुकेच्या वेळेनुसार ज्या दाण्यांवर त्या प्रत्येक खाण्याऱ्यांचं अदृश्य नांव लिहीलेले असतात, प्रत्येक कण कण त्या खाणाऱ्या च्या पोटात घालतो .किती अद्भुत आहे ना ? विचार केला तर आश्चर्य करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.. फक्त आश्चर्यच ....
म्हणून पवित्र कुरआन मध्ये (पारा) अध्याय नं. 25 मध्ये,
         ## वारंवार एक वाक्य सतत अल्लाह सांगतात कीं, "तों, तुम, आपने रब कीं, कोण कोणशी न्यामत को झूठलाओनंगे??".( पारा 25, सुरह नं., 55, सुरह अर - रहमान आ. नं 13 अश्या 31 वेळा )
          ## अर्थात:- " तेंव्हा, हें जिन्न ( फारिश्ते ) व मानवांनो, तेंव्हा, तुम्हीं, आपल्या पालनकर्त्याच्या कोण कोणत्या देणग्यांना नाकारणार??
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार तो मोठा होऊन ५०,६०,७०,८०-१०० जगून जग सोडून जातात, हा सृष्टीच्या नियम आहेत, प्रत्येक कणा - कणाला मरण येणं हे सत्य आहे ( कुल्यु नफसून जायकतुल मौत ), मरणं हे अंतिम सत्य, मृत्युनंतर तो कयामतच्या दिवशी प्रत्येक जीव जंतूला जीवंत सुद्धा करणार आहे , या जगात केलेल्या चांगल्या- वाईट कामांचं हिशोब घेण्यासाठी.. हे सुध्दा अंतिम सत्य च आहे ...हे जीवन चक्र आहे.
           हे सर्व फक्त अदृश्य अल्लाहा च चालवत असतो. .!!.तोच हा अल्लाह आहे, निर्विकार, 
                          अल्लाहा बद्दल काही ही व्याख्या केली तरी ती पुर्ण होउच नाहीत..आपल्या शब्दापलीकडे -अंदाजापलीकडेचच....
                     # पवित्र कुरआन पारा न. १५ मधे ,सुरह कहफ , अयत नंबर १०९ ,"हे पैगंबर (स्व. सल्लम. सांगा की,जर सात ही समुद्र हे माझ्या पालनकर्ता च्यां गोष्टी लिहिण्यासाठी शाई( इंक -लिहीण्याची) बनवले तर , ती साता समुद्रांचीं ही शाई संपेल ; परंतु , पालनकर्ता च्यां गोष्टी संपणार नाही ; इतकेच नव्हे , तर पुन्हा तितकीच शाई पुन्हा आम्ही आणली तरी देखिल ती पुरेशी ठरणार नाही ," #
       🌷"" तुम्हीं आपल्या पालन कर्त्या च्या कोण कोणत्या देणग्यांना नाकारणार??".🌷.

( मित्रांनो लेख आवडला तर नक्कीच आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना पाठवा आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा)

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

आपला मित्र, डॉक्टर. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014.
        ‌‌ @#@₹@₹@₹@₹@#@#@
🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Sunday, March 23, 2025

भरत कुंकुलोळ यांचीचेअरमनपदी फेरनिवड


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित शा. ज.पाटणी विद्यालयाच्या चेअरमनपदी भरत बुधमल कुंकुलोळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.
      भरत कुंकुलोळ अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत आहेत. नगरपरिषदेचे नगरसेवक, भाग्योद्यय पतसंस्था संचालक, राजाराम तरुण मंडळ, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बुद्धिबळ असोशियन आदी विविध ठिकाणी पदाधिकारी म्हणून ते कार्य करत आहेत.त्यांची निवड त्यांच्या कार्याची पावतीच आहे.
             श्रीरामपूर शहर जडणघडणीत त्यांचे परिवाराचा मोठा वाटा आहे.
           त्याच्या या निवडी बद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, सोमय्या हायस्कूल चेअरमन संजय छलारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


=================================-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कलमा,नमाज, जकात, रोजा हज हे इस्लाम धर्माचे पाच मूलस्तंभ

कलमा,नमाज, जकात, रोजा हज हे इस्लाम धर्माचे पाच मूलस्तंभ 


तर आदर्श माणूस,आदर्श कुटुंब व आदर्श समाज निर्मिती हा रोजाचा मूळ उद्देश – डॉ. रफिक सय्यद

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रोजा म्हणजे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडणे नव्हे, रोजा डोळ्यांचा, जीब्हेचा, कानांचा, हातापायांचा सुद्धा आहे.आदर्श माणूस,आदर्श कुटुंब व आदर्श समाज निर्मिती हाच रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजेदार माणसाचे बोलणे, ऐकणे, पहाणे,वागणे आणि देवाण- घेवाण आदर्शवत असली पाहिजे. इंद्रियावर ताबा असायला हवा अन्यथा रोजा ठेवून जो खोटे बोलतो, खोटे वागणे सोडत नाही त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाह ला काडी मात्र गरज नसल्याचे व हेच प्रेषितांना अपेक्षित असल्याचे डॉ. रफिक सय्यद यांनी रोजा इफ्तार कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील जामा मस्जिद याठिकाणी हिंदू - मुस्लिम यांच्या संयुक्तिक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते.
इस्लाम व रोजा याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.संभाजी बोरुडे उपस्थित होते .


कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज हे इस्लामचे मूळ स्तंभ असल्याचे सांगून डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले की, रमजान या पवित्र महिन्यात रोजे अदा केले जातात. सूर्य उगवण्याच्या दीड तास अगोदर पासून रोजाची सुरुवात होऊन सूर्यास्तानंतर इफ्तार ने याची सांगता होते. दरम्यानच्या काळात परमेश्वराचे नामस्मरण, इबादत (प्रार्थना) केली जाते. केवळ उपाशी रहाणे म्हणजे रोजा नव्हे. तर रोजेदारावर अनेक बंधने असतात. त्यांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक असते तरच रोजा पूर्ण होतो. रोजा असताना रोजेदाराने आपले डोळे, कान, हात, पाय, जीव्हा आदींवर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाईट बोलणे, वाईट ऐकणे, हाताने, पायाने कोणाला त्रास देणे असे प्रकार घडल्यास त्याला रोजा म्हणता येणार नाही. आपल्यापासून इतरांना त्रास होईल असे कृत्य आपल्याकडून होता कामा नये याचीही पुरेपूर काळजी घ्यावी लागते. पवित्र ग्रंथ कुराणचा दाखला देत त्यांनी म्हटले आहे की, जीवनाचे सार्थक करा ज्यांच्यात वाद आहेत ते मिटवा. भावा - भावात असलेले मतभेद मिटवा. त्यांना जोडण्याचे काम करा .घोटाळे बेइमानी करू नका, परोपकार करा, चांगले कर्म करा ते तुमच्या बरोबर येणार आहेत.या शिकवणी नुसार पालन केले तर तुमच्या रोजाचे व जीवनाचे सार्थक होईल व या पवित्र महिन्यात आचरणात आणलेल्या प्रत्येक चांगल्या सवयीचे तुम्ही आदी व्हाल. ज्यामुळे तुम्हास कायम चांगले वागण्याची सवय लागेल. डॉक्टर नाही होता आले, इंजिनिअर नाही होता आले, वकील नाही होता आले तरी चालेल किमान चांगले माणूस झालात तरी खूप असे सांगून त्यांनी मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगितला.
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.
बोरुडे यांनी आज प्रथम वेळेस या पवित्र ठिकाणी आल्याचा आनंद तर झाला आहेच, मुस्लिम समाजाच्या लोकांनी सर्व समाजातील लोकांना एकत्रित बोलावून प्रेषितांना अपेक्षित असा जीवन जगण्याचा मार्ग दाखवून या अमृततुल्य ‘डोस ‘ बरोबरच इतक्या प्रेमाने जवळ बसवून स्वतः घेत असलेल्या रोजाचा प्रसाद अर्थात आपल्या घासातील घास आम्हालाही दिला हा भाई चारा पाहून आपण भारावून गेलो आहोत. असे सांगत बोरुडे म्हणाले बाहेर ज्याप्रमाणे मुस्लिमांबद्दल गैरसमज पसरवून हे वाईट आहेत असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इथे आल्यानंतर वेगळीच पवित्रता आणि बंधुभाव व प्रेम पहायला मिळाले याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगून हे कार्यक्रम वारंवार व्हावेत त्यामुळे आपा-पसातील प्रेम आणखी वृध्दींगत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली .यावेळी अनेक हिंदू बांधवांनी पवित्र रमजान व रोजा निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व इफ्तार कार्यक्रमाची सांगता झाली.मुस्लिम बांधवांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे व प्रेमाने दिलेल्या इफ्तार पार्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 22 वां, रविवार दिनांक 23-03-2025


रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 22 वां, रविवार दिनांक 23-03-2025
"प्रत्येक समाजात चांगले मूल्यवर्धन संस्कार रुजणे गरजेचे आहेत.." प्रेषित( पैगंबर) मुहम्मद स्व.
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " आज तुम्ही जगात तो सर्वोत्तम जणसमुदाय आहेत कीं, ज्याला अखिल मनावजातीच्या कल्याण साठी अस्तित्वात घडवून पुढे आणण्यात आणले गेले आहेत..!, तुम्हीं सदाचाराचा ( चांगल्या संस्कार )आदेश देता व दुराचार करण्यापासून प्रतिबंध करतात :, अल्लाह वर श्रद्धा ठेवतात., ( पारा नं 04, सुरह नं. 03,आ. नं. 110).
आजच्या परिस्थितीत, कोणताही देश असो कोणताही समाज धर्म असो त्यामध्ये चांगले विचाराचे, चुकीच्या विचाराचे, दोन्हीही विचाराचे लोकं असतात, तसेच प्रत्येक समाजात पाप - पुण्य, बरे - वाईट, चांगलं - वाईट, सत्य - असत्य, या सगळ्या प्रवृत्ती चे लोकं असतात,त्यामध्ये समाजासमाजात फूट पडणारे द्वेष फैलावणारे, नफरत फैलावणारे, समाजात जाणूनबुजून खोट्या बातम्या-गोष्टी - किस्से - मनघडत -काहीतरी चुकिच्या कहाण्या किस्से चे लिखाण करून,समाजात दुही पसरून त्या दुहीचा समाज मनावर चुकीचा संदेश जावून एकमेकांच्या मनामध्ये द्वेष कलह मत्सर निर्माण होऊन कालांतराने एकमेकात मन दूषित होऊन भांडण निर्माण होतं.. हें फक्त्त आपल्या किरकोळ फायदा करण्यासाठी असतात.. काही लोकांची ती विकृती असते , एक म्हणं आहेत कीं, "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ".
आजची परिस्थिती मध्ये प्रत्येक प्रकारच्या मीडिया मध्ये तो मग प्रिंट मीडिया असो, सोसिअल मीडिया असो, प्रत्येक ठिकाणी मुलांना मनावर विपरीत परिणाम होतील असं वातावरण निर्माण केलं जातं, मुलं उग्र होऊन काहीतरी चुकीचं करावेत म्हणून वेळोवेळी त्यांच्या मस्तकात काहीतरी खोटे खोटे किस्से घालून त्यांच्या कोवळ्या मनावर चुकीचं बिबवण्याचं सतत प्रयत्न होतं आहेत या मुळे सध्या व कालांतराने मुलं विधातक कृत्य कारण्या साठी प्रोत्साहन मिळेल व मुलं चुकीच्या मार्गाने जाण्याचं प्रमाण वाढेल, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होईल, म्हणून, समाजात असत्य, द्वेष, मत्सर गुन्हेगारी प्रवृत्ती, या सर्वाना आज रोखलं नाहीं तर उदयाची, भविष्यात जगातील परिस्थिती फार भयानक होईल, अराजक्ततां माजेल, अंधा दूंधी माजेल, कोणीच कोणाचं ऐकणार नाहीं, कोणीच कोणाच ऐकणार नाहीं ती एकन्याच्या परिस्थितीत राहणारच नाहीं, फार विदारक चित्र निर्माण होईल होतील.त्यामुळे शुल्लक कारणांसाठी काही विधातक शक्ती त्यांचा दंगली, जाळपोळ करण्यासाठी वापर करतील. हें कोणालाही कोणत्याही परिस्थिती फायद्याचे ठरणारे नाहीं म्हणजेच नाहीं..
 अगर ये सर्व आटोक्यात आणायचं असेल तर, जितकं जास्त लवकरात लवकर त्या कोवळ्या मनावर चांगल्या संस्कार घडवण्याची गरजेचं आहेत. त्यासाठी आई वडीलाना च पुढे येऊन चांगलं संस्कार स्वतः ही जोपासून आपल्या मुलांना संस्कार देण्याची गरज आहेत. त्याच बरोबर प्रत्येक शाळेत मूल्य संस्कार देण्याची गरज तर आहेच आहेत. सुशिक्षित मुलांना चांगल्या नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती नरमान होणार नाहीं याची दक्षता घेतली पाहिजे, सोसिअल मीडिया व प्रिंट मीडिया, TV चॅनेल वर चांगल्या सिरीयल ची गरज आहेत, कोणत्याही नेगेटिव्ह बातम्या न टाकता समाजासमाजात एकता एकोपा सामानतात शांतता कसा वृद्धिंगत होईल यासाठी सतत प्रयत्न कारण गरजेचं आहेत, 
इस्लामी संस्कृती धारणे मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत कीं, ज्याप्रमाणे मुलांच्या मातापित्याना आपल्या मुलांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी वर जाब विचारण्याचा हक्क आहेत किंवा विचारपूस करू शकतात अगदीच तसाच हक्क मुलांना सुद्धा आहेत कीं आपल्या जन्म दात्या आई वडील काही चुकिचे करीत असतील तर त्यावर त्यांना जाब विचारण्याचा व त्या चुकीच्या गोष्टी रोखण्या चा.
त्याच प्रमाणे पती आपल्या पत्नीला, व पत्नी आपल्या पतीला दुष कृत्य रोखण्याचा हक्क आहेत.
म्हणून कायम सतत चांगल्या प्रवृत्ती,चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर, चांगल्या विचारांच्या मित्रा बरोबर राहून चांगले मूल्यवर्धक संस्कार सदाचारी सदवर्तन करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले पाहिजे,मानवी हक्क मूल्यांची पायमल्ली होणार नाहीं याची काळजी घेतली पाहिजे.
 म्हणून पैगंबर मुहम्मद स्व. सततसांगत होते कीं, सत्य स्थापण करण्यासाठी सत्कार्म सदा वर्तन साठी सत्याचा आदेश देण व दुराचार, दुष्कार्म, दूराचार रोखन्यासाठी वयक्तिक तर सतत प्रयत्न करणे तर गरजेचे आहेत पण सार्वजनिक पातळीवर करणे ही गरजेचं आहेत...
म्हणून पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, " रसूल, पैगंबर ( मुहम्मद स्व. ), जिस बात का आदेश दै, उस बात पर अंमल करो....!. और.. जिस बात से मना ( रोखे )करें, उस से दूर रहे " ( सुरह अल - हशर आ. नं. 7).
या मध्ये फायदा हा सर्वांचा आहेत.फक्त्त एकट्या साठी किंवा एका समाजा पुरता मर्यादित न राहता सर्वांगीण फायदया चा विचार होणं व करणं फार गरजेचं आहेत.. कारण ती आग फक्त्त एका घरा पूर्ती मर्यादित राहत नसते कधी ना त्याची झळ आपल्या घरावरती ही येते लागते.. हें विसरून कधीच चालणार नाहीत म्हणून.
         जगप्रसिद्ध चित्रपट कवी शायर, राहत इंदोरी साहेब म्हणतात कीं," लगेंगी आग तों आयेंगे घर कई जद में...!
   यहाँ पर सिर्फ हमारा मकाम थोडा है..!!"
(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. त्यांना ही फायदा होईल.. प्रतिक्रिया आवश्य कळवा )

(((*))))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^><^><^>

आपला मित्र डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
(((*))))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^><^><^>

Saturday, March 22, 2025

विद्यानिकेतन स्टेट बोर्डमध्ये फूड फेस्टिवल उत्साहात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पाककला या विषयाच्या अध्ययन-अध्यापना च्या दृष्टीने विद्यार्थ्यांना भारतीय खाद्य संस्कृतीची परिपूर्ण ओळख व्हावी,या हेतूने फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिवलमध्ये इ.पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय प्रत्येक राज्यातील खाद्य पदार्थ वर्ग शिक्षकांसोबत तयार करून विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पदार्थ बनविणे व त्यांची विक्री करणे हे व्यवहार चातुर्य जाणून घेतले.पालक व विद्यार्थी यांनी स्वादिष्ट व रुचकर पदार्थ खरेदी करून त्यांचा मनमुराद आस्वाद घेतला.
        शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या या खाद्य संस्कृती उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसंगी विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.  
         यावेळी फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थी व वर्गशिक्षक यांनी चना चाट, कप केक, इडली, मेदु वडा, चटणी, भाजी, चोको बॉम्ब,आप्पे, वडापाव, भेळ, सँडविच, चॉकलेट्, नूडल्स, चायनीज भेळ, दाबेली, मसाला पापड, कटलेट्स, पाणीपुरी, पावभाजी, मंचुरियन सूप, सोयाबीन चिली, मोमोज, रगडा, शेवपुरी, फ्राईड राईस, गुलाबजाम इ.खाद्यपदार्थ तर कोकम, लिंबू सरबत, लस्सी, मठ्ठा,रूह अफझा इ.शीतपेये व आईस्क्रीम विक्रीसाठी ठेवले होते.
यावेळी संगणकीय खेळ व गेम् झोन फेस्टिवलचे खास आकर्षण ठरले. फूड फेस्टिवल यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.
         यावेळी खाद्य संस्कृती या उपक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, अमेरिकास्थित रोहित शिंदे, सौंदर्यवती रश्मी शिंदे,प्रा.डॉ. शंकरराव गागरे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 21 वां, शनिवार दिनांक 22-03-2025


! "लैलतुल कद्र - एहतेकाफ मानवी मुल्यं वृद्धिंगत करण्यासाठी "!
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " (1),आम्ही या ( पवित्र कुरआन ) ला कद्र च्या पवित्र रात्रीतच अवतारीत केलं आहेत, (1),
         (2) तुम्हाला काय माहित, कीं, त्या कद्र च्या रात्रीचे महत्व काय आहेत??(2), 
         (3) ती( एक )कद्र ची रात्र हजार महिन्यांन पेक्षा काही अधिक उत्तम आहेत.,(3),
          (4), त्या रात्री असंख्य स्वर्ग इशदूत व ( प्रमुख स्वर्ग दूतां पैकी एक असलेले जिब्राईल अलै.) हे स्वर्ग दूत आपल्या पालनकर्त्याच्या आदेशानुसार प्रत्येक गोष्टीबाबतीतले आदेश घेऊन पृथ्वी तलावर उतरतात,(4),
          (5) ते पहाट होयीपर्यंत ती संपूर्ण रात्रं शांतता व सुरक्षिततेची रात्रं आहेत... ( पवित्र कुरआन, पारा 30 वां, सुरह नं. 97, अल - कद्र आ. नं. 01 ते 05.संपूर्ण ).(5).
आज 21वां रोजा वीस रोजे पूर्ण होऊन शेवटच्या विभागाला( अशराह )अर्थातच "जहान्नम ( नरका)तील अग्नी पासून स्वरक्षण " म्हणून, त्यासाठीच कळत- नकळ केलेल्या चुकीच्या कामाची- कार्याची- चुकांची माफी मागून निष्कलंक होण्यासाठी रात्रंदिवस अल्लाह च्या दरबारात सतत माफी मागने.
 सध्याच्या 21 रोजा ते 30 या दहा दिवसातील " विषम " ताक" "संख्या असलेल्या रात्री ना लैलतुल कद्र च्या" ताक "रात्री म्हणून संबोधित कारतात. लैल म्हणजेच पवित्र -शुभ -शुभ रात्री. या एका रात्री मध्ये आपण जेवढ्या प्रार्थना दुवा, नमाज कुरआन किंवा जें काही काही शुभ कामे करू त्या प्रत्येक शुभ कामाचे " किम्मत ही एक हजार महिन्यांच्या रात्री पेक्षा ही जास्त किमतीचे पुण्य, साबब.. मिळणार आहेत किंवा तुम्हीं तेवढी प्रार्थना नमाज इत्यादी अदा केल्या सारखं होईल.. म्हणून जगात श्रद्धांवान बंधू याच रात्रीचे वर्षे भर आतुरतेने वाट बघत असतात.
रमजान महिन्यात शेवटच्या विभागात अशराह मध्ये विसाव्या रोज्याच्या रात्री पासून लैलतल कद्र ची 21 वी विषम "ताक "रात्रं चालू होत असते त्यामध्ये संपूर्ण दहा दिवस 24 तास जगातील प्रत्येक मस्जिद मध्ये आप आपल्या मोहल्ला, गाव, गल्ली, शहरातील जबाबदार प्रमुख लोकं काही श्रद्धांवान बंधूना आग्रहाचे निमंत्रण देवून कोणाला दहा दिवसासाठी तर कुणाला आपल्या फुरसत च्या वेळे नुसार मस्जिदच्या एका कोपऱ्यात बसवून अल्लाहशी नतमस्तक होऊन 24 तास नामस्मरण करण्यासाठी विनंती करतात त्याला "एहतेकाफ " म्हणतात. जेवढ्या जास्त संख्येणे भाविक बसतील तेवढे चांगले असते.. संपूर्ण गाव मोहल्ला, गल्ली न बसू शकत नाहीं,तर ज्यांना नामस्मरण करण्यासाठी वेळ असेल अशा श्रद्धांवान बंधू ना बसून सर्वान तर्फे त्यांना सर्व जगाच्या शांततेसाठी- सुखरूप आरोग्य लाभावे, -सुख -समृद्धी लाभावी, या साठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केली जाते.
  वीस दिवसात आपण काहीच केले नाहीं आपण अपल्या रोजच्या संसरातच्याच फेऱ्यात अडकून पडलो होतो, म्हणून येणाऱ्या दहा दिवस बाकी आहेत संधी अजूनही आहेत म्हणून बाहेरील जगाचा राहाडा विसरून अल्लाह शी एकरूप होऊन, देहभान विसरून,अल्लाह च्या नामस्मरनात तल्लीन होऊन विलीन होणं. अगदी धायमोकलून रडून डोळ्यात पाणी आणून आपण कोणाला अजानतेपणी काही बोललो असेल, एखाद्याला वेडे वाकडे बोललो असेल, कुणाचे मन दुखावले असेल, अप शब्द बोलले असेल कळत- नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असेल, किंवा स्वतः मध्ये अहंकार शिरला असेल, काही कधी कधी लयी गर्व झालेला असेल तर त्वरित अल्लाह जवळ लवकरच माफी मागा.. माफ करणारा फक्त्त व फक्त्त अल्लाह च आहेत.. 
अहंकारा मुळे आयुष्यात खूप काही गडबडी होतात.. सगळे काही संपून जातोय.. नांव गाव इज्जत पैसा प्रॉपर्टी संपत्ती. काहीच शिल्लक राहत नाहीं म्हणून..
      प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " ज्या व्यक्तीच्या मानत तिळमात्र देखील अहंकार, मी, गर्व आहेत, असेल, तर, अशा व्यक्ती स्वर्गात कधी जाणार नाहीं ".
पुन्हा, प्रेषित मुहम्मद स्व. म्हणतात कीं, " अल्लाह हें सुंदर आहेत अल्लाह ला सौंदर्य आवडते. अहंकार हा सत्याला नाकारतो आणि दुसऱ्याला तुच्छ समजतो, " ( हदीस इब्न मसउद, मुस्लिम शरीफ ).
म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये, आपल्या मध्ये आलेला " मी "अहंकार आपल्या उन्नती साठी बाधा ठरतो, आयुष्याच्या प्रगतीला अडचणीत आनीत असतो, आपल्या आयुष्यात जागोजागी गडबड करीत असतो म्हाणून अहंकाराला संपूर्ण पने घालवण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ काढून एका जागी शांत बसून अल्लाह शी समर्पण समरप्रीत निर्वीकार होऊन एकरूप होऊन दुवा प्रार्थना जरूर करावी आपल्या अंतर्गत अंतर्मणातील दडलेल्या प्रत्येक पापाची, दुषकृत्या व केलेल्या चुकांची लिन होऊनमनमोकळे जस खास मित्रां बरोबर जशा सगळ्या मनातील गोष्टी बिनंधास्त बोलतोय बिनधास्त सांगतोय अगदीच त्याच प्रमाणे आरे -कारे च्या स्वरूपात अल्लाह जवळ व्यक्त होऊन माफी मागणं -रित्या करणे -व्यक्त होणं, रडून अगदीच धाय मोकळून रडू रडून वारंवार मागणं.. अल्लाह ला राजी करणे हेच महत्वाचं असतं...
शास्र -सायंटिस्ट सांगतात कीं जेव्हा आपण आपल्या अंतर मनातील सर्व विसरून हात वर करूनतन मनाने जोर जोराने बोलत असतो त्याला सेल्फ सममोहंन - स्वतःच स्वतः ला सममोहित करीत असतो, अर्थात आपल्या मनातील चुकीचं विचार गोष्टी= नेगेटिव्ह एनर्जी,),(- ve)गोष्टी घालवून (पॉसिटीव्ह) सकारात्मक एनर्जी विचारामध्ये परवार्तीत ( ट्रांसफर ) होत असतात. मन मोकळे होऊन मनुष्य ताजातावन होत असतो. एका प्रकारे नवीनच ऊर्जा प्राप्त झाल्या सारखं होऊन मनुष्य मोकळा होतो.. मोकळं झालं सारखं होतं मनातील अपराधी पानाची भावना एकदा ची कमी होते.अशा मुळे नकारत्मक विचाराचे सकारात्मक विचारात परिवर्तन होतं आणि हेच साध्य करायचं असतं आणि हेच साध्य होतं.
यातूनच आपल्यातील लोकं कल्यानासाठी मानवी मूल्य वृद्धगत जरूर होतील,
म्हणून या दहा दिवसाच्या लैलतल कद्र च्या रात्रीचा जरूर फायदा उचला..
(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

लेखक डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
, मोबाईल नं. 9271640014👍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Friday, March 21, 2025

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शहरातील नेवासा - संगमनेर रोडचे काम अखेर सुरू


शिवसेनेच्या ढोल बजाओ आंदोलनास यश; शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने संबंधित कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील नेवासा-संगमनेर रोडचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या मार्गावरून रोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी प्रवास करतात. परंतु रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतुकीला अडथळा येत होता, अपघातांचे प्रमाण वाढले होते आणि स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर नागरी सुविधा विकास निधी अंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी प्रशासक किरण सावंत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप तसेच अभियंता गवळी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्यात आला.
नेवासा-संगमनेर रोड विकसित झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल यामुळे वाहतुकीला गती मिळेल, व्यापार-उदीम सुलभ होईल आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
हा रस्ता केवळ एका भौतिक सुविधेचा विकास नसून, संपूर्ण परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. भविष्यातही असेच विकासकामे वेगाने व्हावीत अशी जनतेची अपेक्षा आहे.

याप्रसंगी तालुकाप्रमुख लखन भगत, शहरप्रमुख संजय छल्लारे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, ज्येष्ठ नेते अशोक (मामा) थोरे, भगवान उपाध्ये, संजय साळवे, तेजस बोरावके, युवासेना तालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहरप्रमुख सिद्धांत छल्लारे, श्री.कल्याणकर, बापू बुधेकर, शरद गवारे, संजय परदेशी, सुहास परदेशी, विशाल पापडीवाल, रोहित नाईक, प्रमोद गायकवाड, अकील पठाण, विशाल दुपाटी, दत्त करडे, अजय छल्लारे, सुनील फुलारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

हारीस तौफिक तांबोळी चा पहिला रोजा


अ,नगर - अल करम सोसायटीचे तौफिक अब्बास तांबोली यांचे चिरंजीव हारीस तांबोली याने रमजान चा पहिला रोजा पुर्ण केला. 
हारीस तांबोली हा सात वर्षांचा असुन हा गंजबाजार येथील प्रसिद्ध पान व्यापारी जावेद तांबोळी यांचा पुतण्या आहे. तो मुकुंदनगर येथे माॅडर्न चिल्ड्रन अकॅडमी मध्ये पहिलीत शिकत आहे. त्याने एवढया कडक उन्हात उपवास पुर्ण केल्याबद्दल त्याचे अलकरम सोसायटी व मख़दुम सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Thursday, March 20, 2025

रमजान मुबारक 2025, रोजा नं. 20 वां, शुक्रवार दिनांक 21-03-2025,

!!! "जो सर्वभौम शक्तीशाली असूनही बदल्याची भावना जोपासत नाहीं तोच खरा समर्थशाली " प्रेषित मुहम्मद स्व.....!!!

आज 20 रमजान, इस्लामी इतिहासातील सर्वात अतुलनीय अभूतपूर्व व आठवणीच्या हिंदोळ्यावरील...
म्हणजेच मदिना विजय... सार्वजनिक माफी चा दिवस.
.

हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म इसवी 570 मध्ये कुरेश काबील्यात झाला, सरासरी 1250 मैल लांब व 750 मैल रुंद असा सुमारे 10 लाख चौ. मैल अर्थातच 30 लाख चौ. किलोमीटर क्षेत्रफळाचा भुभाग त्यामध्ये 90% भाग हा वाळवंटाचा, भरातसारखीच तिन्ही बाजूने समुद्री किनारा, याच भागात एका पट्ट्यात सुपीक पट्टा अन याच पट्ट्यात पवित्र मक्का व मदिना ही शहरे, वाळवंटी भागामुळे येथील जीवन मान भटकंती चे होते, मेंढपाळ, व्यापार, लूटमार, हें येथील प्रमुख व्यवसाय, त्यातच येथे थोडयाशा गोष्टीं मधून रक्त रणजित संघर्ष, संपूर्ण पने अराजक्त परिस्थिती, चोरी डकैती, लूटमार, खून खराबी येथील रोजचाच, दारू, झुगार चुकीच्या रितिरिवाज , परंपरा चालीरिती वेगवेगळ्या, मुली स्त्री या फक्त्त भोगवीलासासाठी नाच गाणं, वेश्या व्यवसाय, जन्म झालेल्या मुलींना त्या जन्म दात्या मुलीचा बाप स्वतः त्या जिवंत मुलींना पुरीत होते एवढ्या अराजक्त परिस्थिती.. अशा परिस्थिती मध्ये अल्लाह नें 570 मध्ये हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म झाला, ते जसे जसे वाढत होते तसे तसेच अल्लाह ( परमेश्वर ) त्यांना विकसित करीत होते.. त्यांना वयाच्या चाळीसव्या (40) वर्षी.. पैगंबर -प्रेषित अर्थात अल्लाह चा संदेश जगात सर्व विश्वासाठी सर्व जाती धर्मासाठी सांगणारा (रहेंमतलील आलमीन )
म्हणून एका गार नावाच्या गुहेत जाहीर केलं.. तसें प्रेषित मुहम्मद स्व.लहानपणापासूनच पुरोगामी परिवर्तन वादी मताचेच होते, पैगंबर =(संदेशवाहक ) झाल्या नंतर त्यांच्या कामाने जास्त स्वरूपात परिवर्तन ला वेग आला, त्यांनी एकेश्वर वादाची अर्थात जगात एकच अल्लाह, ( परमेश्वर ) आहेत व अंतिम संदेश वाहक हें मुहम्मद स्व. आहेत म्हणून सर्व अरबी लोकांना संदेश देण्यासाठी सतत दिवस रात्री मेहनत घेत होते.. ही पुरोगामी परिवर्तन ची नांदी चाहूल होती यामुळे जुन्या सर्व प्रथा,रितरिवाज, परंपरा, पुरोहित वादी प्रथा बंद होऊन नवीन पुरोगामी पद्धत येऊन मानवी कल्याण होण्याची सुरुवात प्रेषित मुहम्मद स्व यांनी सुरुवात केली होती त्यामध्ये बरेच समविचारी मित्रांनी नवीन इस्लाम धर्म ही स्वीकारले होते व काही नवीन धर्म स्वीकारित होते.. ही परिवर्तनाची सुरुवात फार चांगल्या रीतीने पुढे पुढे जातं होती, कोणतेही परिवर्तन हें लवकर कधीच होत नसते ती हळू हळू निरंतर होणारी असतं व त्या मध्ये अगदीच टोकाचा विरोध होणं सहजकीच असते, सहजासहजी कोणतं परिवर्तन होत नसते म्हणून तेथील तथाकठीत सरमजामशाही वादी मंडळी नें अतोनात विरोधाला सुरुवात केली, जागोजागी छळ, त्रास देत होते, मध्ये तीन वर्षे सर्व अरबी सरंमजाम शाही वादयानी तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या व त्यांना त्यांना मानणाऱ्या मित्र च्या परिवाराला तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्काराणे खूप त्रास दिला गेला, त्या सर्वांनी अल्लाह च्या पुरोगामी परिवर्तन वादी धर्मा साठी अतोनात छळ 11 वर्षे सहन केलेत परुंतु त्रासाची सीमा ही जीवावर यण्याची वेळ आली प्रेषिताना जीवे मारण्याचा कट कारस्थान करण्यात आले शेवटी अल्लाह चा आदेशानुसार दिनांक 16 जुलै 622 रोजी मक्का सोडून मदिना येथे स्थलांनस्तर करण्यात आले.
मदिना व आसपासच्या हजारो किलोमीटर च्या परिसरात व जवळच असलेल्या आफ्रिकन देशा पर्यंत इस्लाम चा मानवता वादी प्रसार प्रचार जोरात होत होता व चालूच होता हें पुरोगामी परिवर्तन वादी पैगंबर व त्यांच्या सहकार्य यांच्या आचार विचार व जीवन शैली बघून हजारोच्या संख्येनें रोज च लोंढेचे लोंढे येऊन इस्लाम धर्म स्वीकारात होते. व इस्लाम स्वीकारलेल्या बंधूनची प्रगती व उन्नती उत्साह बघून तेथील त्या बंधूना ही मक्का वासिय त्रास देत होते, मधल्या काळात किरकोळ कारणावरून लढाया, रक्त रंजित खुनी संघर्ष हा सतत चालूच होता व काही प्रसिद्ध लढाया हीप्रसिद्ध झाल्या आहेत, हें फार अति प्रमाणात चाललं व झालं होतं. म्हणून याला कुठेतरी शांतता आली पाहिजे व आळा घातला पाहिजे, म्हणून यावर तोडगा म्हणजे परस्पर समझोता - तह - करण्याचा प्रयत्न झाला आणि तो " हुदैबिया " या गावात करण्यात आला, तो समझोता -तह "- सुलाह हुदैबिया " म्हणून जगतात प्रसिद्ध आहेत.
सुलाह -हुदैबिया तह समझोता ची मर्यादा 10 दहा वर्षाची ठेवण्यात आली होती, दोन्हीही बाजूच्या बऱ्याच अटी शर्ती ना मान्यता देण्यात आली होती, विरोधी मक्कावासिय गटांनें जास्त प्रमाणात जाचक अटी घातल्या होत्या, येवढ्या जाचक अटी असूनही प्रेषित मुहम्मद स्व यांनी शांततेसाठी - खून खराबा - अजून जास्त रक्त सांडू नाहीं म्हणून आपल्या सहकार्य यांच्या विरोधात ही मान्य केला. ( अटी शर्ती मोठया आहेत असो ).
थोडयाच दिवसात म्हणजे दोन अडीच वर्षांमध्येच मक्कावासियांनी शांतता करार समझोता उल्लंघन तोडण्याची सुरुवात केली. वारंवार या कराराचे उललंघन होत होते, न राहवून कुठ पर्यंत त्रास सहन करायचे म्हणून शेवटी पैगंबर प्रेषित मुहम्मद स्व. नी आपल्या दहा हजार योद्धा सहाबाना घेऊन मक्का कूच करण्याचा आदेश 23-डिसेंबर 629 व 10 रमजान o8 हिजरी.ला देवून दहा दिवसात कोणतीही खबर बात गुप्त ठेवता आपल्या ताफया सह 2 जानेवारी 630 रोजी हिजरी तारीख " 20 रमजान 08,"सकाळी सकाळी मक्का शहरात पोहचले हें बघून मक्कातील प्रत्येक नागरिक हें अचानक झालेलं चित्र बघून अक्षरशा भांबवला सैरा -वैरा पळत सुटला, कोणाला काही कळत होत नव्हतं, कारण हें मक्कावासियांना माहित होते, कीं,आपल्या पूर्वज आपल्या घरातील लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व च्या अनुयायीना, मित्रांना किती अतोनात त्रास दिला छळ केला खुनी व रक्त रंजित संघर्ष केला याच जणींवेतून व आपण केलेल्या पापाची जाणीव असल्यामुळे जीव मुठीत घेऊन जीव वाचवीत होते लहान मोठे अगदीच धस्तावलेलं होते कारण इलाज काहीच नव्हता कारण आपण केलेल्या कृत्याना या जगात तरी माफी नाही व मिळणारच नव्हती व माफिच्या लायक ही नव्हतं.. 
कारण आज बदल्याचा दिवस होता, अतोनात यातना त्रास छळ ज्यांनी केला त्या सर्वाना शिक्षा करण्याचा दिवस होता.. बदला..
 परुंतु झाले उलटे च, हो सहाबा (सहकारी)च्या विचार करण्यापाली कडे झाले.. होते..
एका युद्धात प्रेषित पैगंबर यांच्या आवडते चुलते हजरत हमजा रजि. जें प्रेषित यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तन मन धन नें सहकार्य मदत करायचे त्या आवडत्या चुलते हजरत हमजा यांना युद्धात वीर गती नंतर मक्का सरदार अबू सुफियान ची पत्नी हिंदा नें हमजा रजि. चे काळीज काढून खाल्लं होतं व कानं कापून आपल्या गळ्यात माळ घातली होती. अशा कौर्य करणाऱ्याना माफी मिळणे तर अश्यक्यच होतं..
परुंतु झाले अगदीच उलटं पैगंबर यांनी सर्व मक्का वासियांना एका झटक्यात माफी देवून टाकलं -माफी -माफी -माफी..
ज्या चुलती हिंदा हिने आपल्या चुलते अबू हमजा रजि. यांचे काळीज खाल्लं व कानाचा गळ्यात हार घातला होता अशा क्रूर कामाजारणाऱ्या ला ही सरसकट माफी दिली.. मक्का विजय च्या दिवशी हिंदा आपली ओळख पटू नयेत म्हणून आपलं तोंड झाकून क्षमा दानात आली होती परंतु पैगंबर मुहम्मद यांनी तिला ओळखत आपल्या चुलत्याची आठवण काढून रडत रडत म्हणाले आज " हिंदा " आज तुलाही माफी माफी.
मक्के च्या काबागृहा जवळच घोषणा केली कीं " आज कोणावरही सूड उगवला जाणार नाहीं... कोणाची ही हत्या करण्यात येणार नाहीं..
कोणाचाही बदला घेण्यात येणार नाहीं.. जें आप आपल्या घरात लपून बसलेले आहेत त्यांना ही माफी देण्यात आली आहेत..
यावर अगोदर कुणाला ही विश्वास बसला नाहीं व बसत ही नव्हता कारण त्यांनी केलेल्या क्रूर कृत्याची शिक्षा ही फाशी कच होतं होती,...परुंतु झाले उलटंच...अपक्षे वेगळं...
आजच्या घडीला प्रेषित पैगंबर मुहम्मद स्व. यांच्या कडे लष्करी ताकत, सर्वभौम सत्ता - अफाट साम्राज्य - संपत्ती - सगळ्या गोष्टीनी युक्त होते त्यांना कोणीही रोखू शकत नव्हतं..
येवढ असूनही बदला घेण्याच्या बदल्यात आपल्या दुश्मनाना एवढे मोठ- मोठ्ठाले पपी कृत्याच्या बदल्यात माफ केलं... ती पण सार्वजनिक माफी...
तो दिवस होता 20 वां रमजान रोजा.. आणि 08 हिजरी.
इसवी सन होतं 2 जानेवारी 630... 
आज ही 20 वां रोजा हिजरी 1446 वार शुक्रवार.. ईद चा दिवस.
पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात कीं, " जो: सर्व शक्ती शाली असूनही : बदल्याची भावना ठेवत नाहीं.. तोच खरा.. शक्तिशाली श्रद्धांवान ( बंधू ).. त्यालाच अल्लाह पसंद करतात.. अल्लाह ला माफ करणारे पसंद ( प्रिय ) आहेत..

(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोदवां..)

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*))) (((*)) (((*))) (((*))) (((*))) (((*))) (((*)))

लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल.. मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल 9271640014...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*))) (((*)) (((*))) (((*))) (((*))) (((*))) (((*)))

राहाता शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करा,अन्यथा याविरोधात रि.पा.इं.चे उग्र आंदोलन - जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे


राहाता शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करा,अन्यथा याविरोधात रि.पा.इं.चे उग्र आंदोलन - जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे

अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता,-
सध्या राहाता शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असून यामुळे गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे,या सर्वच अवैध व्यवसायावर राहाता पोलिसांनी वेळीच योग्य कारवाई करावी अन्यथा रि.पा.इं. च्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा रि.पा.इं. चे जिल्हाध्यक्ष प्रदिप उर्फ पप्पू भाऊ बनसोडे यांनी दिला आहे.
        प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासुन राहाता शहर व परिसरात प्रचंड प्रमाणात अवैध धंदे वाढले असुन यावर कुणाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. या अवैध धंद्यातून येणाऱ्या अमाप पैश्यामुळे गुन्हेगारी निर्माण होत असुन, तिचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा त्रास अनेक सुज्ञ नागरीक, महिला भगीनी आणि शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना होतो आहे. मात्र या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे कोणी धजावत नाहीत. या अवैध धंद्यावर राहाता पोलीसांनी कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, गुन्हेगारी, नशाखोरी यामुळे शिर्डी शहरात खुनाच्या घटनाही घडल्या आहेत, त्या पार्श्वभुमीवर शिर्डी शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर असुन अवैध धंदे व गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.
परंतू राहाता शहर व परिसरात या उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. मटका, जुगार, दारु, बिंगो तसेच बेकायदेशीर वाळू उपसा या सारख्या अवैध व सर्व सामान्य युवकांचे कुटूंब उध्वस्त करणारे अवैध व्यवसाय राजरोसपणे चालु आहेत. यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. हे व्यवसाय कुणाच्या आशिर्वादाने चालतात याचा शोध घेवून त्यांच्या विरोधात देखील उचित कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अशा अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीस पाठबळ मिळत असुन युवकवर्ग गुन्हेगारीकडे वळत आहेत व यातुन गोरगरीबांचे संसार आणी प्रपंच उध्दवस्त होत आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे राहाता शहर व परिसरामध्ये अशांतता निर्माण होत आहे, त्यामुळे शिर्डी शहरात अवैध धंदे व गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी उचललेल्या पावलांच्या धर्तीवर राहाता शहरात व परिसरात सुरू असलेल्या सर्वच अवैध धंद्यांविरोधात राहाता पोलीसांनी धडक मोहिम उभारुन कठोर कारवाई करावी, त्यामुळे नागरीकांचे जीवन अधिक सुरक्षित होईल. या संदर्भात रि.पा.इं. चे पदाधिकारी म्हणून काही सुज्ञ नागरीकांनी, महिला भगीनींनी आमच्याकडे तोंडी स्वरुपाच्या तक्रारी केलेल्या आहेत. याचा विचार करता राहाता पोलीस स्टेशनने शहरातील सर्वच अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारुन कायमस्वरुपी हे अवैध धंदे बंद करावेत अन्यथा लोकहितासाठी व महिला भगीनींच्या सुरक्षिततेकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. गुन्हेगारी व अवैध धंद्याचे बिमोड करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे शिष्टमंडळ देशाचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब व राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटून विनंती करणार आहेत. प्रसंगी वेळ पडल्यास या विरोधात रि.पा.इ.च्या वतीने लोकहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा रि.पा.इं. चे जिल्हाध्यक्ष प्रदिप उर्फ पप्पुभाऊ बनसोडे यांनी दिला आहे. 
या पत्रकावर तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे, शहर अध्यक्ष राजेंद्र पाळंदे, युवक तालुका अध्यक्ष जितू दिवे, राहाता युवक शहराध्यक्ष अशपाकभाई शेख, दिपक शिंदे, सुनिल लोखंडे, किशोर दंडवते, तुषार सदाफळ, अमोल भोसले, दत्तू गोडगे, गणेश बनसोडे, जॉन त्रिभुवन, अनिल त्रिभुवन, प्रदिप थोरात, नाना त्रिभुवन, प्रकाश लोंढे, पवन गायकवाड, भिमा बनसोडे, अनिल कोळगे, सचिन कोळगे, गणेश वाघमारे आदींची नावे आहेत.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Wednesday, March 19, 2025

मौलाना आझाद उर्दू हायस्कुलमध्ये सेवापूर्तीकाल साजरा


अ,नगर  - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकालाचा समारोप मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुलमध्ये पार पडला.
छात्रशिक्षकांनी दैनंदिन तासिकांप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करुन विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, टाकाऊपासून टिकाऊ, खेळ-वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सय्यद फरहाना होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.प्रा. शेख अब्दुस सलाम, डॉ. शेख एजाज,शेख हसीब, सय्यद शबाना, शेख शबाना, सय्यद सबा आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सय्यद फरहाना यांनी छात्रशिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छात्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
 ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

बालसंगोपन योजनेचे पैसे गेले कुठेविधानसभेत तारांकित प्रश्न; मंत्रीम्हणतात अनुदान प्रलंबित नाही


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसताना हे अनुदान प्रलंबित नसल्याचे बुधवारी विधानसभेत सांगण्यात आले. तर दुसरीकडे लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये मात्र संपूर्ण बारा महिन्यांचे अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखभर लेकरांच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या या पैशांना पाय फुटले की हे पैसे हरवले? नेमके हे पैसे गेले कुठे ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये लाभ देणाऱ्या लाडकी बहीण योजनेची धडाकेबाज अंमलबजावणी करणाऱ्या महिला बालविकास विभागामार्फतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविली जात आहे. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी विभागाच्या पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत केली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना विधिमंडळात सकाळी घोषणा, दुपारी जी. आर., दोन दिवसात डीबीटी असा अतिशय वेगवान प्रवास करून आठवडाभरात सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचे आगाऊ हप्ते यापूर्वी जमा करण्याचे न भूतो न भविष्यती, अशी अचंबित करणारी गतीमानता याच आयुक्तालयाने दाखवली. मात्र याच विभागामार्फत गेल्या पन्नास वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या डी.बी.टी. प्रणाली व अनुदान वाटपातील गोंधळ मात्र थांबायला तयार नाही. त्यामुळेच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा तर सोडाच परंतु सहा सहा महिन्यानंतर देखील अनुदान मिळत नाही. याशिवाय गेल्या एक ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालकल्याण समित्यांकडे बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे या क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालकल्याण समित्यांकडे प्रलंबित असलेले बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव व रखडलेले अनुदान वेळेवर मिळावे, यासाठी साळवे यांनी गेल्या तीन वर्षांपासून आयुक्तालयापासून ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे.
 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान बुधवारी विधानसभेत श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले व रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी बालसंगोपन योजनेच्या प्रलंबित अनुदानाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत राज्यात सुमारे एक लाख बालके लाभार्थी असून गेल्या दोन वर्षांपासून देण्यात येणारे अनुदान मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून काही ठिकाणी अनुदान थेट बँकेत जमा होण्यास विलंब होत आहे. अनुदानाअभावी निराधार बालकांना शिक्षणासोबत इतर खर्च भागविण्यात अडचणी येत आहेत हे खरे आहे काय?, असल्यास महिला व बालविकास आयुक्तांच्या कार्यालयाकडे कोट्यावधी रुपयांचे अनुदान जमा असूनही सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान दीर्घ कालावधीनंतरही प्रलंबित आहे, हेही खरे आहे काय? असल्यास अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे विनंती केली आहे, हे खरे आहे काय?, असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून हे अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत तसेच विलंबास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे?, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आमदार हेमंत ओगले (श्रीरामपूर) व अमोल जावळे (रावेर ) यांनी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले होते.
या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अनुदान प्रलंबित नसल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत १ लाख २३६ लाभार्थ्यांना १०१ कोटी ४६ लाख रुपये इतका निधी डी.बी.टी. द्वारे वितरित करण्यात आलेला आहे. तर केंद्र पुरस्कृत मिशन वात्सल्य योजनेच्या स्पॉन्सरशिप या उपयोजनेतर्गत २७ हजार ४३८ लाभार्थ्यांना १२९ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच या योजनेअंतर्गत निधी वित्त विभागाच्या मान्यतेने वितरित करावयाची कार्यवाही सुरू आहे,असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे विनंती केली असल्याचेही त्यांनी मान्य केले. बाल संगोपन योजनेअंतर्गत वित्त विभागाच्या मान्यतेने निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेला सर्व निधी वितरित केलेला असल्याने चौकशी करण्याचा अथवा विलंबास कारणीभूत असणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखभर लेकरांचे १ ते २ वर्षांपासून थकलेले अनुदानाचे पैसे हरवले की त्याला पाय फुटले नेमके, हे पैसे गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

*अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांची दिशाभूल*
कोरोनानंतर आम्ही कोरोना एकल महिला व नंतर सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी राज्यभरात काम सुरू केले आहे. या महिलांच्या लेकरांच्या शिक्षण, पोषणासाठी बालसंगोपन योजनेचा मोठा हातभार लागला. पण योजनेचे अनुदान वर्ष-वर्ष वेळेत मिळत नाही. अनुदानाची माहिती अधिकारांतर्गत मागणी केली. पण आयुक्तालयाने अनुदानाची पारदर्शी माहिती न देता ती दडपली. यातच सारे आले. लाभ न मिळालेल्या बालकांची माहिती आयुक्त व मंत्र्यांना यापूर्वीच मी लेखी दिली. तारांकित प्रश्नावरही अधिकारी चुकीची माहिती पुरवून मंत्र्यांची दिशाभूल करीत आहेत.
मिलिंदकुमार साळवे,
 समन्वयक महाराष्ट्र साऊ एकल महिला समिती, सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 19 वा, गुरुवार दिनांक 20-03-2025,

रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 19 वा, गुरुवार दिनांक 20-03-2025,

!!"- इस्लाम :- गरजवंत गरीब - अनाथ - विधवां - पीडितांनां - ईद चा आनंद साजरा करू दया."!!
तर, खरा खुरा सदाचारी ते आहेत, कीं, bजें श्रद्धा ठेवतात अल्लाह वर आणि न्यायाच्या अंतिम दिवसावर आणि त्यांच्या दुतावर ( अँनजेल - फॅरिसत्ये ) आणि कुराण वर आणि पैगंबरावर आणि आपलं धन खर्च करतोय अल्लाह च्या प्रेमाखातर नातेवायिक - अनाथ - वाटसरू - व गरजू लोकांवर आणि जें( धर्मदाय प्रयोजनावर)मानव कल्यानासाठी, मागतात त्यांच्यावर, जें नाहक तुरुंगात खिदपट पडलेले बंदिवाण आहेत त्यांच्या सुटके साठी आणि नमाजरूपी नियमित प्रार्थना करीत असतात. आणि दान ( जकात ) देतात असतात. आणि पुन्हा तेच सदाचरणी आहेत जें दिलेले आपलं वाचन पाळतात. कुठल्याही आणीबाणी विप्पत्ती, संकटात जें सहनशील व युद्धाच्या काळात धर्यवान राहतात. " (पवित्र कुरआन सुरह नं. 2, आ. नं. 177).
कालच आपण जकात संबंधि थोडी फार माहिती जानन्याचा प्रयत्न केला, 
आपण बघितलं कीं जकात ही आपल्या वर्षे भर मेहनतीने, कष्टानें, इमानदारीने, कामावलेल्या संपत्ती प्रॉपर्टी तुन तुमच्या सर्व गरजा, तुमचं काही कर्ज देणं घेणं करून राहिलेल्या शिल्लक रकमेतून 2-5% अडीच टक्के गोर गरीब वंचित दारिद्र रेषेखालील लोकांना दान देणं..
एक गोस्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटतेय कीं या मध्ये जोर जबरदस्ती बिलकुल नाहीं काही लोकांचा इस्लाम व मुस्लिमांनबद्दल गैरसमज होतं असतो.. त्यासाठी फक्त्त समजून घेणं गरजेचे आहेत.
@पवित्र कुरआन मध्ये जागोजागी जकात संबंधात अधोरेखित केलेलं आहेत कीं, " (1) लाच घेतलेला व अवैध मार्गाने कामावलेला, कोणाचाही कोणताही कब्जा - हडफ केलेला पैसा,( सुरह नं.2, सुरह बकराह आ. नं. 188), (2),बेईमानी, बेकायदेशीर रित्या कामावलेला पैसा, ( अल - इम्रान ),(3) मूर्ती बनवणारा, मूर्ती विकणारा, मूर्ती चा व्यापारी ( अल - मायदा आ. नं. 90), (4), चोरी करणारा, चोरीचा माल विकणारा, चोरी करणार्यांना सहकार्य मदत करणाऱ्याचा व चोरी करून तो पैसा गडफ करून ठेवणारा, ( अल - मायदा आ. नं. 38)., (5), जें दुकानात तराजू आहेत अशा दुकानात जर तराजू या मापातुन घोटाळा करऊन पैसा कामवीत असेल तर त्याचा पैसा, ( अल -तातफिक आ. नं. 13)., (6), जें मुलं मुली अनाथ झालेले आहेत आणि त्यांचं पालन पोषण तिसरा कोणीतरी करीत असेल व तो मनुष्य जर त्या अनाथ मुलांच्या संपत्ती तुन काही गडबड घोटाळा करून पैसे कामवीत असेल तर तो पैसा बिलकुल चालत नाही ( सुरह अल - निसा आ. नं. 01),. (7), अचानक पने चुकीच्या पद्धतीने कामावलेल्या मिळालेल्या धन लाभ, लॉटरी, मटका झुगार, पत्ते, इत्यादी तुन मिळवलेल्या ( सुरह अल - मायदा आ. नं. 90). (8), दारू चा कोणताच पैसा, दारूचा धंदा करणारे, त्या दारूच्या धंद्याला मदत करणारे, दारू चा कारखानादाराचा. विक्री - वाहतूक - मदत - सहकार्य - या सर्व लोकांचा पैसा जकात म्हणून चालत नाहीं, ( सुरह अल - मायदा आ. नं. 90).(9), अश्लीलता दाखवणारे त्याची जाहिरात करणारे मदत करणारे, प्रोत्साहन देणारे , डान्स बार चालवाणारे मदत सहकार्य करणाऱ्या चा जकात म्हणूनं चालत नाहीं ( सुरह अल - नूर आ. नं. 19.व 33).(10), ज्योतिष व्यवसाय करणारे अर्थातच भविष्य वाणी करणारे, यातून मिळवलेला पैसा.. ( सुरह अल - मायदा आ. नं. 90)
@ वरील उल्लेख केलेल्या सर्व व्यवसाय करून मिळणाऱ्या कोणत्याही व्यवसायिकाणचा पैसा कुठल्याही परिस्थितीत जकात=( दान )म्हणून चालत नाहीं चालत नाहीं म्हणजे नाहीं.!!!.
@:जकात दान कोणाकोणाला देण्यात यावीव खर्च करावी व देणं गरजेचे आहेत :- 👌(1), जवळचे नातेवाईकांना, शेजारी, अनाथ, वंचित, पीडित, णा जकात खर्च करावे., ( सुरह आन - निसा आ. नं. 36).(2), निराधार, अपंग, दिव्यांग( सुरह अल,- जरियात आ. नं. 10).(3)बिना इंटरेस्ट ( बिन व्याजी कर्ज देणं ) याला कर्ज ए हसना म्हणतात, ते देणं, विशषत कर्ज ए हसना हा प्रकार तुम्हीं कर्ज घेणारा म्हणतो कीं मी ठराविक मुदतीत मी तुमची रक्कम ची परतफेड करील..
एक गोस्ट येथे जाणीवपूर्वक सांगावाशी वाटतेय कीं,
  पवित्र कुरआन म्हणतं कीं, " कर्ज घेणं व कर्ज देणं दोन्हीही गुन्हा आहेत निषेध्द आहेत, " ( सुरह अल - बकराह आ. नं. 28)
जें लोकं पीडित आहेत, एखाद्या नैसर्गिक अप्तीतीत ग्रस्त आहेत, भूकंप ग्रस्त आहेत, धरणग्रस्त आहेत, एखाद्या जीवघेण्या साठीच्या आजाराने ग्रस्त आहेत उदा. करोना महामारी इत्यादी. दुष्काळी परिस्थिती आहेत, असा परिस्थितीत जेवढी मदत करता आली तर करावी जकात व्यतिरिक्त ही मदत करावी, अनाथ मुलांच्या पुनर्व्हसणासाठी त्यांच संगोपन पालन पोषण करण्यासाठी, त्यांच लग्नाला, जकातीचा पैसे जरूर द्यावा. गरीब आजारी व्यक्ती आहेत यांना काही मदत म्हणून जरूर जकाती मधून देवू शकतात, जें लोकं एका काळी फार पैसेवाले होते परुंतु आज ते काही परिस्थिती नें लाचार झालेले आहेत, गरीब झालेले आहेत तर अशा लोकांना गुपचूप जावून द्यावा, तसेच ज्या लोकांनी आपल्या घरच्यांसाठी मुलाबलांसाठी, आजार बारा करण्यासाठी हास्पिटल बिल भरण्यासाठी किंवा काही गरजासाठी उधार, कर्जाननें पैसे घेतले असतील परुंतु सध्या त्यांची ते कर्ज फेडण्या ची एपत नसेल तर अशा लोकांना जरूर जकात चा पैसा देण्यात यावा. कारण असे प्रतिष्ठित व्यक्ती कोणालाही पैसे मागत नाहीं त्यांना ते अपमानजनक वाटतं, काहीतरी कमी भावनेच, कमी प्रतिष्ठेचं वाटत म्हणून ते आपलं जीवन संपवतील परुंतु कोणाला भीक मागणार नाहीत म्हणून अशा लोकांना रात्री त्यांच्या घरी जावून गुपचूप जकात रूपी पैसे दान करावेत.. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान ही टिकवून राहिल व आपल्याला त्याच सबाब - पुण्य ही भेटेल.
विधवा स्त्री यांना ही जकात देवून त्यांच्या ही गरजे साठी जकात द्यावी.
तसेच, काही गरीब - श्रीमंत सुद्धा कर्ज घेऊन शिक्षणा साठी कर्ज घेतात परुंतु ते फेडू शकत नाहीत तर अशा शिक्षण घेणाऱ्याला जेवढी मदत देता येईल तेवढी द्यावी. किंवा ते ज्या शिक्षण संस्थेत शिकत असतील त्या शिक्षण संस्थेचे ची वार्षिक फी भरावी त्याच बरोबर जेवणा खाण्याचा राहण्याचा खर्च तरी भरावे.. हें सर्वात जास्त सबाब चे कार्य म्हणावं लागेल.
जें अरबी मदरसे -( मदरसा म्हणजेच शाळा ) या अरबी मदार श्याना कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाहीं व देत सुद्धा नाहीं तर असा अरबी मदर्श्यांना जरूर जकात देण्यात यावी. भारतात जवळ जवळ सर्वच मदरसे हें जकातिच्याच पैशा वर चालतात. काही चॅनेल वाले हेतूपुरस्कार जाणूनबुजून मुस्लिम मदरस्यांची बदनामी करतात. मदरश्या मध्ये लाखोंच्या संख्येने अतिशय गरीब घराण्यातील मुलं शिक्षण घेतात.. त्यांच्या प्रत्येक गोष्टी साठी जकती चा पैसे देवून त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करून अल्लाह च्या ख़ुशी मध्ये सामील व्होवं..
भारतामधील खुप ठिकाणच्या पूरग्रस्त परिस्थिती, आणीबाणी च्या, आपत्ती प्रसंगी नद्या नाल्याना आलेल्या पुरा प्रसंगी हजारो मदरश्या तील शिक्षण घेणाऱ्या मुलांनी वेळोवेळी मदत केलेली आहेत..
म्हणून ज्यांच्या ज्यांच्या वर जकात अनिवार्य केलेली आहेत अशा धनिक श्रीमंत बांधूनी अल्लाह च्या मानवी कल्याण साठी सढळ हाताने मदत करावी.
काही लोकं चिंगूस असतात जकात काढत नाहींत त्यांच्या साठी पवित्र कुर आन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, " गुडगंज संपत्ती गोळा करून घरात ठेवण्याला पवित्र कुर आन नें हराम म्हटले आहेत, ( सुरह आत - तौबा आ. नं. 34).
तसेच, " ज्या लोकांची धन संपत्ती अनुचित मार्गाने गिळणकृत करीत असतात आणि जें लोकं सोनं चांदी चा साठा करून ठेवतात आणि ते अल्लाह च्या मानवी कल्यानाच्या लोकोउपयोगी कार्या साठी खर्च करीत नाहीत, अशा लोकांना मृत्यू नंतर च्या जीवनात भयानक भयावह शिक्षेची वार्ता एकवा. (सुरह आत - तौबा आ. नं. 34-35)
म्हणून जेवढे जमेल त्यावढया लवकरात लवकरच जकात काढून गोर गरीब वंचित अनाथ गरजू लोकांना देवून त्यांच्या मुलाबाळांना ही ईद चा आनंद साजरा करता येईल .
ते आनंद साजरा तर करतील व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून तुमच्या बरोबर अल्लाह ही मनापासून खुश जरूर होतील.

(मित्रांनी लेख आवडल्यास मित्रांना व नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य कळवा )

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल :- 9271640014
🌷🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))


पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात परोपकारी व्यक्तीमत्व असलेले पत्रकार विष्णूभाऊ राऊत


पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात परोपकारी व्यक्तीमत्व असलेले पत्रकार विष्णूभाऊ राऊत 

अमरावती जिल्ह्याच्या जरूड येथील मनमिळावू, सुस्वभावी, सर्व समावेशक, जात-धर्म-पंथ पक्ष लिंग कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करणारा, शिव फुले शाहू-आंबेडकरी विचारधारेचा खंदा पुरस्कर्ता आणि निःपक्षपाती पत्रकारिता करणारा एक प्रामाणिक व सच्चा वार्ताहर म्हणजे आमचे मित्र विष्णू राऊत होय.
विष्णू भाऊ अगदी तरुण वयापासूनच सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय राहिलेले परोपकारी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध चळवळी केल्या, गावातील नागरिकांच्या समस्या शासकीय व प्रशासकीय स्तरावर सोडविण्यासाठी वेळप्रसंगी अधिकाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी घनघोर चर्चा करून जनसामान्याचे प्रश्न अगदी पोट तिडके ने मांडून सोडविण्याचा सतत प्रयत्न विष्णू राऊत यांनी केलेला आहे
९० च्या दशकामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व कार्यप्रणालीशी प्रभावित होऊन विष्णू भाऊ यांनी शिवसेना पक्ष जवळ केला आणि शिवसेना पक्षाची विचारधारा आपल्या तरुण सवंगड्यांना सांगून अनेक शिवसैनिक त्यांनी जोडलेत, त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक जास्त महत्त्व दिले, छत्रपती शिवरायांची जयंती अगदी मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा जरूड परिसरामध्ये विष्णू भाऊ राऊत यांनी सुरू केली ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे १९९५ साली जरूड
येथील गुजरी बाजारामध्ये भव्य शिवजयंतीचा कार्यक्रम विष्णूजी आणि त्यांचे सवंगडी शिवसैनिक यांनी साजरा केला, ज्यामध्ये मी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होतो. त्यानंतर ग्राहक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्यक्रम व उपक्रम विष्णू भाऊ राऊत यांनी राबविलेत, वार्ताहरशिप करत असताना आपल्यावर पक्षपातीपणाचा आरोप लागणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली, आपल्या जीवननिर्वाहासाठी त्यांनी बस स्टैंडवर एक छोटेसे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान थाटले त्या ठिकाणी वर्तमानपत्रांची विक्री आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या भेटीगाठी व चर्चा त्यांनी सुरु केल्या, त्यांनी आपल्या स्वतःचं एक जनसंपर्क कार्यालयात त्याठिकाणी जणू सुरू केलं, मी सुरुवातीलाच हजारात शत्रू वार्ताहर असं म्हटलेलं आहे, त्याचं कारणही तसंच आहे विष्णू भाऊंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधारेचे, सर्वच क्षेत्रातील गणमान्य पासून तर सामान्यांपर्यंत माणसं सकाळला आणि सायंकाळला एकत्रित बसतात आणि माणूस समाज गाव राज्य व राष्ट्रीय पातळीच्या चर्चा त्या ठिकाणी घडवून येतात, सर्वांचे मैत्री राहावी यासाठी त्यांनी जवळपास १०० तरुणांचा एक अभिनव मित्र परिवार म्हणून संच किंवा मंडळ त्यांनी स्थापन केलं, त्यांच्या जीवनकार्यातील एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या मित्र मंडळातील सर्वच सदस्यांचा मोठ्या हिरीरीने व उत्साहाने वाढदिवस साजरा करतात, तरुण मुलांना बोलता यावं, भाषण देता यावं म्हणून त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात किमान २० ते २५ लोकांना एक एक दोन दोन मिनिटं का असेना बोलायला लावतात म्हणजे बोलणारा माणूस चळवळ चळवळीत सहभागी होणारा माणूस समाजकार्यात धडपडीने भाग घेणारा माणूस घडावा ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यांचा १८ मार्च हा त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगावर नेत्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आयुरारोग्य लाभो व दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या अजातशत्रूला त्याच्या कार्यामध्ये सदैव यश मिळत राहो अशी देखील सदिच्छा व्यक्त करतो.


=================================
-----------------------------------------------
*संकलन - सी.टी. पठाण*✍️✅🇮🇳...
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक जरुड
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*लेख प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, March 18, 2025

रमजानुल मुबारक 2025 रोजा नं.18 वा, बुधवार दिनांक 19-03-2025ईसलाम : जकात ; गरिबांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अल्लाह ची योजना...


रमजानुल मुबारक 2025
रोजा नं.18 वा, बुधवार दिनांक 19-03-2025
ईसलाम : जकात ; गरिबांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अल्लाह ची योजना...

लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.
९२७१६४००१४,
   हजरत अब्दुल्लाहा बिन उमर रजि. म्हणतात की , " प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सांगितले की , ' इस्लाम हा पाच मूलभूत स्तंभावर उभा आहे , १) कलमा.;-, (.२) दोन ,नमाज कायम करणे .(३) तीन , रमजानुल मुबारक रोजे ठेवणे (४) जकात आदा करणे(.५) वा, हाज करणे ,
  दिव्य कुरआन सांगितले कि ," जे नमाज कायम आदा करतात ,रोजे ठेवतात ,व जे काही त्यांना (धन, दौलत पैसा ,इत्यादी .) दिलेला आहेत त्यामधून दानधर्म करतात व जकात देतात ते खरेखुरे श्रद्धांवान बांधव आहेत , आणि हेच लोक कयामतच्या ( प्रलय काळाच्या ) दिवशी प्रत्येक यातने पासून दूर राहतील .(सूराह नं.८ अन-अनफाल अ.नं.३४, सुराहा. नं.२ अल-बकराहा आ.नं. २७७).
    आपल्या भारतात - जगातील प्रत्येक देशात एक प्रकारे वर्षभराचा टॅक्स भरावा लागतो , अगदी तसाच आपल्या शरीराचा वं आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा टॅक्स आपल्याला अल्लाह च्या आदेशानुसार गरीब गरजूना दान देवून वर्षातून एकदा भरावाच लागतो. याच अल्लाहच्या टॅक्स ला "जकात " म्ह्टले जाते.
दिव्य कुरआन म्हणते की ,'" हे पैगंबर स्व. तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा ,.आणि सद् वर्तनाच्या मार्गात यांना पुढे करा , यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुआ यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरेल ."( सुराहा. नं.९ अत -तौबा आ. नं. १०३).
 दिव्य कुरआनामध्ये ८२ वेळा " जकात ="( टॅक्स-मी टॅक्स हा शब्द फक्त्त समजून घेण्यासाठी वापरलेला आहेत )आदा. करण्याबद्दल आयाती (ओव्या) आलेले आहेत यावरून इस्लामी अर्थव्यवस्थेत ' जकाती ' चे किती अनन्य साधारण महत्व आहे हे समजून येते.
 ' जकात ' या शब्दाचा शाब्दिक अर्थ ' पवित्रता' व ' वृद्धी ' Growth असा होतो ,. म्हणजेच पहिला जो अर्थ आहे " पवित्रता ' यानुसार तुम्ही जे पवित्र जकात देण्याचे कर्म करतात त्यामुळे तुमचे समाजात महत्त्व वाढते व तुमचा माल हा शुद्ध होऊन तुम्ही ते दान देण्यास प्राप्त होते.. व तुम्हाला समाजात दान देण्याची सवय लागत. तुमचे जे धन असेल ते पवित्र ,शुद्ध होते .
 ' वृद्धि ' Growth तर होतच असते.एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की माणूस जेवढा दानी असतो त्याला सर्व जग आपलंसं करतात व सर्व जगातील गरिबांची दुआ.,पुण्यं,त्याला भेटतं. कालांतराने त्याची सर्व स्तरावर वृद्धीच होते, त्याचे समाजातील स्थान हे उच्च होतात . त्यांच्याकडे लोक चांगले भावनेने पाहतात .आपल्याकडे जे काही काही श्रीमंत लोक असून पैसा फक्त्त च संपत्ती गोळा करून साचून ठेवतात ते दान देत नाहीं अशा श्रीमंतांना समाजात काडीचीही किंमत नसत,
.म्हणुनच प्रेषित पैगंबर म्हणतात कि "जकात दिल्यावर तुमच्या पैशांमध्ये व संपत्तीमध्ये वृद्धी होते व तुमच्या कुठल्याच गोष्टीवर नैसर्गिक आपत्ती येत नाहीत , तुम्ही कधीच नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणार नाहीत ,.व तुमच्यावर ईश्वरी प्रकोप होणार नाहीत .व धन-दौलत तबाह व. बरबाद होणार नाहीत तुम्ही हे लक्षात ठेवा. "(तबराणी).
                    बरोबर आहे जो माणूस समाजात सेवा करतो,. दानधर्म करतो, गरिबांचे पीडितांचे दुःख जाणतो, त्यांच्या गरजेला काम येतो , समाजातील दीन- दुबळे - आंधळा- अनाथ - विधवा -पीडित- मित्रमंडळी वगैरे समाजातील गरजू लोकांना गरजेला कायम पुढे असतो आशा प्रत्येक व्यक्तीस समाजात अदर्श स्थान निर्माण झालेले असते.प्रत्येक व्यवहार कायमच वृद्धिंगत होत असतात. थोडं अपण आपल्या समाजात अशा व्यक्तींचे निरीक्षण करून पाहिले तर लक्षात येईल .
कुुरआनानुसार जकात ही आपल्या वर्षभराच्या सर्व गरजा भागून जी सेविंग, शिल्लक नफा राहील त्या सिल्की वर २.५ % अडीच टक्के ,-रक्कम ठरलेले असते.
उदाहरण द्यायला झाल्यास समजा आजच्या रमजान ईद च्या दिवसापासून ते पुढील रमजानच्या रोजा पर्यंत किंवा आजच्या तारखेपासून ते पुढील आजच्याच तारखेपर्यंत, एक वर्ष पूर्ण झाल्या वर जेवढी रक्कम तुमचे सर्व गरजा भागून शिल्लक- नफा राहिल त्यावर २.५% अडीच टक्के " जकात " असते. किंवा ज्या व्यक्तीकडे अशी रक्कम आहे कि. मग ती स्त्री असो वा पुरुष असो कोणी असो त्याच्याकडे साडे ५२.५ तोळे चांदी silver किंवा ७.५ साडेसात तोळे सोनं Gold असेल किंवा त्या चांदी किंवा सोने एवढी किंमत असेल , ती वर्षभरा पर्यंत असेल तर त्यावर अडीच टक्के२.५% रक्कम ही जकात असते .ती रक्कम तुमच्या सध्याच्या बाजारभावानुसार किंमत असेल त्याच्या अडीच टक्के रक्कम जकात म्हणून अल्लाचे टॅक्स इन्कम असते .
 ती अनिवार्य compulsory कंपल्सरी असते , ती द्यावाच लागेल तर तुम्ही तुमची एवढे करून सार्थकी लागेल . नाहीतर तुम्ही आल्लाहा (परमेश्वरा )जवळ गुन्हेगार ठरतात . तुमची प्रॉपर्टी व्यवसाय असेल ,शेती असेल , शेती निसर्गाच्या पाण्यावर आधारित असेल अशा शेतीवर जकात अनिवार्य आहे , होईल . जो तुमच्या हलाल , कष्टाच्या कमाईतून, कष्टाच्या व्यवसायातून ,कष्टाच्या बळावर तुम्ही मालमत्ता त्यात यावर जकात अनिवार्य आहे हरामाच्या पैशातून जकात देता येणार नाही .
       पवित्र दिव्य कुरआन म्हणते की," तुमची मालमत्ता व तुमची संपत्ती एक कसोटी आहे , आल्लाह त्याचा मोबदला तुम्हाला देणार आहे तर आल्लाहच्या मार्गात आपली मालमत्ता खर्च करा हे तुमच्यासाठी उत्तमच आहेत ,; कोणी आहे का अल्लाहाला उत्तम कर्ज देणारे असतील तर , अल्लाहाला कर्ज द्या तुम्हाला त्याच्या कैकपटीने अल्लाहा कडुन मिळेल . पारा.नं.२८ , सुराहा नं. ६४ , आ.नं.१४,१५,१६,१७).
पवित्र दिव्य कुरआन म्हणतात.," कोण आहे जो अल्लाहाला उत्कृष्ट कर्ज देईल , जेणेकरून आल्लाहा कित्येक पटीने वाढवून परत फेड तुम्हाला करील ; आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला असेल.' (पारा नं.२७,सुराहा नं.५७ ,सुरह.अल-हदिद.अ.नं. ११).
 हे कर्ज अल्लाहा स्वतःसाठी थोडं मागतात , त्यांना काय या कर्जाची गरज . हे कर्ज जे जे आपल्या कष्टाच्या कमाईतून स्वतःचा प्रपंच चालवतात ,.आपल्या हलाल कामातून अपलं घर संसार चालवून कर्ज बाजारी होतात ,कष्टाच्या कमाईतून त्यांची उपजीविका पूर्ण होत नाही , त्यांना कर्जबाजारी होऊन हि आपली पूर्तता ही पूर्ण करू शकत नाहीत. किंवा कष्ट करण्याची शक्तिच शरीरात नसते , काम करण्याची कुवतच शरीरात राहत नाही . किंवा कमाई करून आपल्या प्रपंच्याचा खर्च जास्त असू शकतो किंवा आजारी पडले असेल आजारपणाला उपचारासाठी दोन पैसे कोणाकडून तरी कर्ज घेऊन ते फेडावयाचे असतात. कधीकधी सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारीपणा मुळे त्यांची संपत्ती सावकाराकडे ठेवलेली असेल अशा परिस्थितीत किंवा अशा परिस्थितीतून दारिद्र्य झालेला असेल अशा व्यक्तीस इस्लामी अर्थव्यवस्थेचे वाऱ्यावर सोडून न देता. त्या पीडिताला दलदलीतुन,दरिद्री तुन ,गरीबी तुन , सावरण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा जपून जीवनाची साधनसामग्री करून देऊन ,.त्याचे जीवन सावरण्यासाठी ,.आल्लाहाने जकातीची सोय केलेली आहेत. आल्लाहाला परमेश्वराला प्रत्येकाची काळजी असते .हे
स्पष्ट होते.. 


=================================
-----------------------------------------------
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख,✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.
९२७१६४००१४,
-----------------------------------------------
=================================