ऐवज असलेली त्यांच्याकडील पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरली होती.या प्रकरणी लांडगे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) फिर्याद दिली होती. सदर चोरीची (Theft) घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर (LCB PI Dinesh Aher) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डीले, संतोष खैरे, रोहित मिसाळ, रणजीत जाधव, आकाश काळे, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, फुरकान शेख, संभाजी कोतकर यांचे पथक समांतर तपास करीत होते.सदरच्या गुन्ह्यातील चोरटे हे मध्यप्रदेश पासींगच्या दुचाकीवरून पुणे (Pune) येथून नगर जिल्ह्याकडे येत आहेत, अशी माहिती निरीक्षक आहेर यांना मिळाली होती.
निरीक्षक आहेर यांनी पथकास पंचांना सोबत घेवुन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे पथकाने सुपा टोल नाका ( Toll Plaza ) परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना नगरचे दिशेने बातमीतील वर्णनाप्रमाणे दुचाकीवर आलेल्या दोघांना पकडले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता 80 हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन मिळुन आल्याने रोख रकमेबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरची रक्कम ही नगर शहरातील बंधन लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये चोरी केले असल्याबाबत सांगितले.
रक्कम बँक खात्यात पाठवली
चोरट्यांनी 80 हजार रूपये रोख रक्कम व दोन मोबाईल काढून दिले असले तरी चोरीला गेलेल्या उर्वरीत रकमेबाबत त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी एक लाख रूपये वसंत कुमार (पुर्ण नाव माहित नाही, रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) व कालुसिंह (पुर्ण नाव माहित नाही, रा. लक्ष्मीपुरा, राजस्थान) यांच्या बँक खात्यामध्ये पाठविले असल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्यातील चोरी केलेले मोबाईल हे फेकुन दिल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्या इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्यांनी साथीदार भुपेद्रसिंह अर्जुनसिंह भानेरीया (रा. कडीयासासी, मध्यप्रदेश) याच्या सोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

