राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 20, 2025

रमजान मुबारक 2025, रोजा नं. 20 वां, शुक्रवार दिनांक 21-03-2025,

!!! "जो सर्वभौम शक्तीशाली असूनही बदल्याची भावना जोपासत नाहीं तोच खरा समर्थशाली " प्रेषित मुहम्मद स्व.....!!!

आज 20 रमजान, इस्लामी इतिहासातील सर्वात अतुलनीय अभूतपूर्व व आठवणीच्या हिंदोळ्यावरील...
म्हणजेच मदिना विजय... सार्वजनिक माफी चा दिवस.
.

हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म इसवी 570 मध्ये कुरेश काबील्यात झाला, सरासरी 1250 मैल लांब व 750 मैल रुंद असा सुमारे 10 लाख चौ. मैल अर्थातच 30 लाख चौ. किलोमीटर क्षेत्रफळाचा भुभाग त्यामध्ये 90% भाग हा वाळवंटाचा, भरातसारखीच तिन्ही बाजूने समुद्री किनारा, याच भागात एका पट्ट्यात सुपीक पट्टा अन याच पट्ट्यात पवित्र मक्का व मदिना ही शहरे, वाळवंटी भागामुळे येथील जीवन मान भटकंती चे होते, मेंढपाळ, व्यापार, लूटमार, हें येथील प्रमुख व्यवसाय, त्यातच येथे थोडयाशा गोष्टीं मधून रक्त रणजित संघर्ष, संपूर्ण पने अराजक्त परिस्थिती, चोरी डकैती, लूटमार, खून खराबी येथील रोजचाच, दारू, झुगार चुकीच्या रितिरिवाज , परंपरा चालीरिती वेगवेगळ्या, मुली स्त्री या फक्त्त भोगवीलासासाठी नाच गाणं, वेश्या व्यवसाय, जन्म झालेल्या मुलींना त्या जन्म दात्या मुलीचा बाप स्वतः त्या जिवंत मुलींना पुरीत होते एवढ्या अराजक्त परिस्थिती.. अशा परिस्थिती मध्ये अल्लाह नें 570 मध्ये हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म झाला, ते जसे जसे वाढत होते तसे तसेच अल्लाह ( परमेश्वर ) त्यांना विकसित करीत होते.. त्यांना वयाच्या चाळीसव्या (40) वर्षी.. पैगंबर -प्रेषित अर्थात अल्लाह चा संदेश जगात सर्व विश्वासाठी सर्व जाती धर्मासाठी सांगणारा (रहेंमतलील आलमीन )
म्हणून एका गार नावाच्या गुहेत जाहीर केलं.. तसें प्रेषित मुहम्मद स्व.लहानपणापासूनच पुरोगामी परिवर्तन वादी मताचेच होते, पैगंबर =(संदेशवाहक ) झाल्या नंतर त्यांच्या कामाने जास्त स्वरूपात परिवर्तन ला वेग आला, त्यांनी एकेश्वर वादाची अर्थात जगात एकच अल्लाह, ( परमेश्वर ) आहेत व अंतिम संदेश वाहक हें मुहम्मद स्व. आहेत म्हणून सर्व अरबी लोकांना संदेश देण्यासाठी सतत दिवस रात्री मेहनत घेत होते.. ही पुरोगामी परिवर्तन ची नांदी चाहूल होती यामुळे जुन्या सर्व प्रथा,रितरिवाज, परंपरा, पुरोहित वादी प्रथा बंद होऊन नवीन पुरोगामी पद्धत येऊन मानवी कल्याण होण्याची सुरुवात प्रेषित मुहम्मद स्व यांनी सुरुवात केली होती त्यामध्ये बरेच समविचारी मित्रांनी नवीन इस्लाम धर्म ही स्वीकारले होते व काही नवीन धर्म स्वीकारित होते.. ही परिवर्तनाची सुरुवात फार चांगल्या रीतीने पुढे पुढे जातं होती, कोणतेही परिवर्तन हें लवकर कधीच होत नसते ती हळू हळू निरंतर होणारी असतं व त्या मध्ये अगदीच टोकाचा विरोध होणं सहजकीच असते, सहजासहजी कोणतं परिवर्तन होत नसते म्हणून तेथील तथाकठीत सरमजामशाही वादी मंडळी नें अतोनात विरोधाला सुरुवात केली, जागोजागी छळ, त्रास देत होते, मध्ये तीन वर्षे सर्व अरबी सरंमजाम शाही वादयानी तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या व त्यांना त्यांना मानणाऱ्या मित्र च्या परिवाराला तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्काराणे खूप त्रास दिला गेला, त्या सर्वांनी अल्लाह च्या पुरोगामी परिवर्तन वादी धर्मा साठी अतोनात छळ 11 वर्षे सहन केलेत परुंतु त्रासाची सीमा ही जीवावर यण्याची वेळ आली प्रेषिताना जीवे मारण्याचा कट कारस्थान करण्यात आले शेवटी अल्लाह चा आदेशानुसार दिनांक 16 जुलै 622 रोजी मक्का सोडून मदिना येथे स्थलांनस्तर करण्यात आले.
मदिना व आसपासच्या हजारो किलोमीटर च्या परिसरात व जवळच असलेल्या आफ्रिकन देशा पर्यंत इस्लाम चा मानवता वादी प्रसार प्रचार जोरात होत होता व चालूच होता हें पुरोगामी परिवर्तन वादी पैगंबर व त्यांच्या सहकार्य यांच्या आचार विचार व जीवन शैली बघून हजारोच्या संख्येनें रोज च लोंढेचे लोंढे येऊन इस्लाम धर्म स्वीकारात होते. व इस्लाम स्वीकारलेल्या बंधूनची प्रगती व उन्नती उत्साह बघून तेथील त्या बंधूना ही मक्का वासिय त्रास देत होते, मधल्या काळात किरकोळ कारणावरून लढाया, रक्त रंजित खुनी संघर्ष हा सतत चालूच होता व काही प्रसिद्ध लढाया हीप्रसिद्ध झाल्या आहेत, हें फार अति प्रमाणात चाललं व झालं होतं. म्हणून याला कुठेतरी शांतता आली पाहिजे व आळा घातला पाहिजे, म्हणून यावर तोडगा म्हणजे परस्पर समझोता - तह - करण्याचा प्रयत्न झाला आणि तो " हुदैबिया " या गावात करण्यात आला, तो समझोता -तह "- सुलाह हुदैबिया " म्हणून जगतात प्रसिद्ध आहेत.
सुलाह -हुदैबिया तह समझोता ची मर्यादा 10 दहा वर्षाची ठेवण्यात आली होती, दोन्हीही बाजूच्या बऱ्याच अटी शर्ती ना मान्यता देण्यात आली होती, विरोधी मक्कावासिय गटांनें जास्त प्रमाणात जाचक अटी घातल्या होत्या, येवढ्या जाचक अटी असूनही प्रेषित मुहम्मद स्व यांनी शांततेसाठी - खून खराबा - अजून जास्त रक्त सांडू नाहीं म्हणून आपल्या सहकार्य यांच्या विरोधात ही मान्य केला. ( अटी शर्ती मोठया आहेत असो ).
थोडयाच दिवसात म्हणजे दोन अडीच वर्षांमध्येच मक्कावासियांनी शांतता करार समझोता उल्लंघन तोडण्याची सुरुवात केली. वारंवार या कराराचे उललंघन होत होते, न राहवून कुठ पर्यंत त्रास सहन करायचे म्हणून शेवटी पैगंबर प्रेषित मुहम्मद स्व. नी आपल्या दहा हजार योद्धा सहाबाना घेऊन मक्का कूच करण्याचा आदेश 23-डिसेंबर 629 व 10 रमजान o8 हिजरी.ला देवून दहा दिवसात कोणतीही खबर बात गुप्त ठेवता आपल्या ताफया सह 2 जानेवारी 630 रोजी हिजरी तारीख " 20 रमजान 08,"सकाळी सकाळी मक्का शहरात पोहचले हें बघून मक्कातील प्रत्येक नागरिक हें अचानक झालेलं चित्र बघून अक्षरशा भांबवला सैरा -वैरा पळत सुटला, कोणाला काही कळत होत नव्हतं, कारण हें मक्कावासियांना माहित होते, कीं,आपल्या पूर्वज आपल्या घरातील लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व च्या अनुयायीना, मित्रांना किती अतोनात त्रास दिला छळ केला खुनी व रक्त रंजित संघर्ष केला याच जणींवेतून व आपण केलेल्या पापाची जाणीव असल्यामुळे जीव मुठीत घेऊन जीव वाचवीत होते लहान मोठे अगदीच धस्तावलेलं होते कारण इलाज काहीच नव्हता कारण आपण केलेल्या कृत्याना या जगात तरी माफी नाही व मिळणारच नव्हती व माफिच्या लायक ही नव्हतं.. 
कारण आज बदल्याचा दिवस होता, अतोनात यातना त्रास छळ ज्यांनी केला त्या सर्वाना शिक्षा करण्याचा दिवस होता.. बदला..
 परुंतु झाले उलटे च, हो सहाबा (सहकारी)च्या विचार करण्यापाली कडे झाले.. होते..
एका युद्धात प्रेषित पैगंबर यांच्या आवडते चुलते हजरत हमजा रजि. जें प्रेषित यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तन मन धन नें सहकार्य मदत करायचे त्या आवडत्या चुलते हजरत हमजा यांना युद्धात वीर गती नंतर मक्का सरदार अबू सुफियान ची पत्नी हिंदा नें हमजा रजि. चे काळीज काढून खाल्लं होतं व कानं कापून आपल्या गळ्यात माळ घातली होती. अशा कौर्य करणाऱ्याना माफी मिळणे तर अश्यक्यच होतं..
परुंतु झाले अगदीच उलटं पैगंबर यांनी सर्व मक्का वासियांना एका झटक्यात माफी देवून टाकलं -माफी -माफी -माफी..
ज्या चुलती हिंदा हिने आपल्या चुलते अबू हमजा रजि. यांचे काळीज खाल्लं व कानाचा गळ्यात हार घातला होता अशा क्रूर कामाजारणाऱ्या ला ही सरसकट माफी दिली.. मक्का विजय च्या दिवशी हिंदा आपली ओळख पटू नयेत म्हणून आपलं तोंड झाकून क्षमा दानात आली होती परंतु पैगंबर मुहम्मद यांनी तिला ओळखत आपल्या चुलत्याची आठवण काढून रडत रडत म्हणाले आज " हिंदा " आज तुलाही माफी माफी.
मक्के च्या काबागृहा जवळच घोषणा केली कीं " आज कोणावरही सूड उगवला जाणार नाहीं... कोणाची ही हत्या करण्यात येणार नाहीं..
कोणाचाही बदला घेण्यात येणार नाहीं.. जें आप आपल्या घरात लपून बसलेले आहेत त्यांना ही माफी देण्यात आली आहेत..
यावर अगोदर कुणाला ही विश्वास बसला नाहीं व बसत ही नव्हता कारण त्यांनी केलेल्या क्रूर कृत्याची शिक्षा ही फाशी कच होतं होती,...परुंतु झाले उलटंच...अपक्षे वेगळं...
आजच्या घडीला प्रेषित पैगंबर मुहम्मद स्व. यांच्या कडे लष्करी ताकत, सर्वभौम सत्ता - अफाट साम्राज्य - संपत्ती - सगळ्या गोष्टीनी युक्त होते त्यांना कोणीही रोखू शकत नव्हतं..
येवढ असूनही बदला घेण्याच्या बदल्यात आपल्या दुश्मनाना एवढे मोठ- मोठ्ठाले पपी कृत्याच्या बदल्यात माफ केलं... ती पण सार्वजनिक माफी...
तो दिवस होता 20 वां रमजान रोजा.. आणि 08 हिजरी.
इसवी सन होतं 2 जानेवारी 630... 
आज ही 20 वां रोजा हिजरी 1446 वार शुक्रवार.. ईद चा दिवस.
पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात कीं, " जो: सर्व शक्ती शाली असूनही : बदल्याची भावना ठेवत नाहीं.. तोच खरा.. शक्तिशाली श्रद्धांवान ( बंधू ).. त्यालाच अल्लाह पसंद करतात.. अल्लाह ला माफ करणारे पसंद ( प्रिय ) आहेत..

(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोदवां..)

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*))) (((*)) (((*))) (((*))) (((*))) (((*))) (((*)))

लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल.. मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल 9271640014...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*))) (((*)) (((*))) (((*))) (((*))) (((*))) (((*)))

राहाता शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करा,अन्यथा याविरोधात रि.पा.इं.चे उग्र आंदोलन - जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे


राहाता शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करा,अन्यथा याविरोधात रि.पा.इं.चे उग्र आंदोलन - जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे

अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता,-
सध्या राहाता शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरु असून यामुळे गुन्हेगारीत प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे,या सर्वच अवैध व्यवसायावर राहाता पोलिसांनी वेळीच योग्य कारवाई करावी अन्यथा रि.पा.इं. च्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा रि.पा.इं. चे जिल्हाध्यक्ष प्रदिप उर्फ पप्पू भाऊ बनसोडे यांनी दिला आहे.
        प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासुन राहाता शहर व परिसरात प्रचंड प्रमाणात अवैध धंदे वाढले असुन यावर कुणाचा वचक नसल्याचे दिसुन येत आहे. या अवैध धंद्यातून येणाऱ्या अमाप पैश्यामुळे गुन्हेगारी निर्माण होत असुन, तिचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्याचा त्रास अनेक सुज्ञ नागरीक, महिला भगीनी आणि शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींना होतो आहे. मात्र या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे कोणी धजावत नाहीत. या अवैध धंद्यावर राहाता पोलीसांनी कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, गुन्हेगारी, नशाखोरी यामुळे शिर्डी शहरात खुनाच्या घटनाही घडल्या आहेत, त्या पार्श्वभुमीवर शिर्डी शहरातील पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलीस ॲक्शन मोडवर असुन अवैध धंदे व गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.
परंतू राहाता शहर व परिसरात या उलट परिस्थिती निर्माण झालेली आहे. मटका, जुगार, दारु, बिंगो तसेच बेकायदेशीर वाळू उपसा या सारख्या अवैध व सर्व सामान्य युवकांचे कुटूंब उध्वस्त करणारे अवैध व्यवसाय राजरोसपणे चालु आहेत. यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. हे व्यवसाय कुणाच्या आशिर्वादाने चालतात याचा शोध घेवून त्यांच्या विरोधात देखील उचित कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अशा अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीस पाठबळ मिळत असुन युवकवर्ग गुन्हेगारीकडे वळत आहेत व यातुन गोरगरीबांचे संसार आणी प्रपंच उध्दवस्त होत आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे राहाता शहर व परिसरामध्ये अशांतता निर्माण होत आहे, त्यामुळे शिर्डी शहरात अवैध धंदे व गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी उचललेल्या पावलांच्या धर्तीवर राहाता शहरात व परिसरात सुरू असलेल्या सर्वच अवैध धंद्यांविरोधात राहाता पोलीसांनी धडक मोहिम उभारुन कठोर कारवाई करावी, त्यामुळे नागरीकांचे जीवन अधिक सुरक्षित होईल. या संदर्भात रि.पा.इं. चे पदाधिकारी म्हणून काही सुज्ञ नागरीकांनी, महिला भगीनींनी आमच्याकडे तोंडी स्वरुपाच्या तक्रारी केलेल्या आहेत. याचा विचार करता राहाता पोलीस स्टेशनने शहरातील सर्वच अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारुन कायमस्वरुपी हे अवैध धंदे बंद करावेत अन्यथा लोकहितासाठी व महिला भगीनींच्या सुरक्षिततेकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. गुन्हेगारी व अवैध धंद्याचे बिमोड करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे शिष्टमंडळ देशाचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले साहेब व राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना भेटून विनंती करणार आहेत. प्रसंगी वेळ पडल्यास या विरोधात रि.पा.इ.च्या वतीने लोकहितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा रि.पा.इं. चे जिल्हाध्यक्ष प्रदिप उर्फ पप्पुभाऊ बनसोडे यांनी दिला आहे. 
या पत्रकावर तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे, शहर अध्यक्ष राजेंद्र पाळंदे, युवक तालुका अध्यक्ष जितू दिवे, राहाता युवक शहराध्यक्ष अशपाकभाई शेख, दिपक शिंदे, सुनिल लोखंडे, किशोर दंडवते, तुषार सदाफळ, अमोल भोसले, दत्तू गोडगे, गणेश बनसोडे, जॉन त्रिभुवन, अनिल त्रिभुवन, प्रदिप थोरात, नाना त्रिभुवन, प्रकाश लोंढे, पवन गायकवाड, भिमा बनसोडे, अनिल कोळगे, सचिन कोळगे, गणेश वाघमारे आदींची नावे आहेत.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Wednesday, March 19, 2025

मौलाना आझाद उर्दू हायस्कुलमध्ये सेवापूर्तीकाल साजरा


अ,नगर  - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्रशिक्षकांचा छात्रसेवाकालाचा समारोप मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुलमध्ये पार पडला.
छात्रशिक्षकांनी दैनंदिन तासिकांप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करुन विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रश्नमंजुषा, टाकाऊपासून टिकाऊ, खेळ-वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना आझाद उर्दू मुलींचे हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सय्यद फरहाना होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.प्रा. शेख अब्दुस सलाम, डॉ. शेख एजाज,शेख हसीब, सय्यद शबाना, शेख शबाना, सय्यद सबा आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सय्यद फरहाना यांनी छात्रशिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छात्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
 ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

बालसंगोपन योजनेचे पैसे गेले कुठेविधानसभेत तारांकित प्रश्न; मंत्रीम्हणतात अनुदान प्रलंबित नाही


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नसताना हे अनुदान प्रलंबित नसल्याचे बुधवारी विधानसभेत सांगण्यात आले. तर दुसरीकडे लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये मात्र संपूर्ण बारा महिन्यांचे अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखभर लेकरांच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या या पैशांना पाय फुटले की हे पैसे हरवले? नेमके हे पैसे गेले कुठे ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यभरातील सुमारे अडीच कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये लाभ देणाऱ्या लाडकी बहीण योजनेची धडाकेबाज अंमलबजावणी करणाऱ्या महिला बालविकास विभागामार्फतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविली जात आहे. या दोन्ही योजनांची अंमलबजावणी विभागाच्या पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत केली जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना विधिमंडळात सकाळी घोषणा, दुपारी जी. आर., दोन दिवसात डीबीटी असा अतिशय वेगवान प्रवास करून आठवडाभरात सुमारे अडीच कोटी महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपयांचे आगाऊ हप्ते यापूर्वी जमा करण्याचे न भूतो न भविष्यती, अशी अचंबित करणारी गतीमानता याच आयुक्तालयाने दाखवली. मात्र याच विभागामार्फत गेल्या पन्नास वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या डी.बी.टी. प्रणाली व अनुदान वाटपातील गोंधळ मात्र थांबायला तयार नाही. त्यामुळेच बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा तर सोडाच परंतु सहा सहा महिन्यानंतर देखील अनुदान मिळत नाही. याशिवाय गेल्या एक ते दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालकल्याण समित्यांकडे बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे या क्षेत्रात कार्य करणारे महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बालकल्याण समित्यांकडे प्रलंबित असलेले बालसंगोपन योजनेचे प्रस्ताव व रखडलेले अनुदान वेळेवर मिळावे, यासाठी साळवे यांनी गेल्या तीन वर्षांपासून आयुक्तालयापासून ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे.
 महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान बुधवारी विधानसभेत श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले व रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी बालसंगोपन योजनेच्या प्रलंबित अनुदानाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत राज्यात सुमारे एक लाख बालके लाभार्थी असून गेल्या दोन वर्षांपासून देण्यात येणारे अनुदान मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून काही ठिकाणी अनुदान थेट बँकेत जमा होण्यास विलंब होत आहे. अनुदानाअभावी निराधार बालकांना शिक्षणासोबत इतर खर्च भागविण्यात अडचणी येत आहेत हे खरे आहे काय?, असल्यास महिला व बालविकास आयुक्तांच्या कार्यालयाकडे कोट्यावधी रुपयांचे अनुदान जमा असूनही सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान दीर्घ कालावधीनंतरही प्रलंबित आहे, हेही खरे आहे काय? असल्यास अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे विनंती केली आहे, हे खरे आहे काय?, असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून हे अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत तसेच विलंबास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे?, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आमदार हेमंत ओगले (श्रीरामपूर) व अमोल जावळे (रावेर ) यांनी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारले होते.
या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अनुदान प्रलंबित नसल्याचे सांगितले. राज्य शासनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत १ लाख २३६ लाभार्थ्यांना १०१ कोटी ४६ लाख रुपये इतका निधी डी.बी.टी. द्वारे वितरित करण्यात आलेला आहे. तर केंद्र पुरस्कृत मिशन वात्सल्य योजनेच्या स्पॉन्सरशिप या उपयोजनेतर्गत २७ हजार ४३८ लाभार्थ्यांना १२९ कोटी ५९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच या योजनेअंतर्गत निधी वित्त विभागाच्या मान्यतेने वितरित करावयाची कार्यवाही सुरू आहे,असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. अनुदान तातडीने वितरित करण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे विनंती केली असल्याचेही त्यांनी मान्य केले. बाल संगोपन योजनेअंतर्गत वित्त विभागाच्या मान्यतेने निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. वित्त विभागाने उपलब्ध करून दिलेला सर्व निधी वितरित केलेला असल्याने चौकशी करण्याचा अथवा विलंबास कारणीभूत असणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असेही महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखभर लेकरांचे १ ते २ वर्षांपासून थकलेले अनुदानाचे पैसे हरवले की त्याला पाय फुटले नेमके, हे पैसे गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

*अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांची दिशाभूल*
कोरोनानंतर आम्ही कोरोना एकल महिला व नंतर सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी राज्यभरात काम सुरू केले आहे. या महिलांच्या लेकरांच्या शिक्षण, पोषणासाठी बालसंगोपन योजनेचा मोठा हातभार लागला. पण योजनेचे अनुदान वर्ष-वर्ष वेळेत मिळत नाही. अनुदानाची माहिती अधिकारांतर्गत मागणी केली. पण आयुक्तालयाने अनुदानाची पारदर्शी माहिती न देता ती दडपली. यातच सारे आले. लाभ न मिळालेल्या बालकांची माहिती आयुक्त व मंत्र्यांना यापूर्वीच मी लेखी दिली. तारांकित प्रश्नावरही अधिकारी चुकीची माहिती पुरवून मंत्र्यांची दिशाभूल करीत आहेत.
मिलिंदकुमार साळवे,
 समन्वयक महाराष्ट्र साऊ एकल महिला समिती, सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 19 वा, गुरुवार दिनांक 20-03-2025,

रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 19 वा, गुरुवार दिनांक 20-03-2025,

!!"- इस्लाम :- गरजवंत गरीब - अनाथ - विधवां - पीडितांनां - ईद चा आनंद साजरा करू दया."!!
तर, खरा खुरा सदाचारी ते आहेत, कीं, bजें श्रद्धा ठेवतात अल्लाह वर आणि न्यायाच्या अंतिम दिवसावर आणि त्यांच्या दुतावर ( अँनजेल - फॅरिसत्ये ) आणि कुराण वर आणि पैगंबरावर आणि आपलं धन खर्च करतोय अल्लाह च्या प्रेमाखातर नातेवायिक - अनाथ - वाटसरू - व गरजू लोकांवर आणि जें( धर्मदाय प्रयोजनावर)मानव कल्यानासाठी, मागतात त्यांच्यावर, जें नाहक तुरुंगात खिदपट पडलेले बंदिवाण आहेत त्यांच्या सुटके साठी आणि नमाजरूपी नियमित प्रार्थना करीत असतात. आणि दान ( जकात ) देतात असतात. आणि पुन्हा तेच सदाचरणी आहेत जें दिलेले आपलं वाचन पाळतात. कुठल्याही आणीबाणी विप्पत्ती, संकटात जें सहनशील व युद्धाच्या काळात धर्यवान राहतात. " (पवित्र कुरआन सुरह नं. 2, आ. नं. 177).
कालच आपण जकात संबंधि थोडी फार माहिती जानन्याचा प्रयत्न केला, 
आपण बघितलं कीं जकात ही आपल्या वर्षे भर मेहनतीने, कष्टानें, इमानदारीने, कामावलेल्या संपत्ती प्रॉपर्टी तुन तुमच्या सर्व गरजा, तुमचं काही कर्ज देणं घेणं करून राहिलेल्या शिल्लक रकमेतून 2-5% अडीच टक्के गोर गरीब वंचित दारिद्र रेषेखालील लोकांना दान देणं..
एक गोस्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटतेय कीं या मध्ये जोर जबरदस्ती बिलकुल नाहीं काही लोकांचा इस्लाम व मुस्लिमांनबद्दल गैरसमज होतं असतो.. त्यासाठी फक्त्त समजून घेणं गरजेचे आहेत.
@पवित्र कुरआन मध्ये जागोजागी जकात संबंधात अधोरेखित केलेलं आहेत कीं, " (1) लाच घेतलेला व अवैध मार्गाने कामावलेला, कोणाचाही कोणताही कब्जा - हडफ केलेला पैसा,( सुरह नं.2, सुरह बकराह आ. नं. 188), (2),बेईमानी, बेकायदेशीर रित्या कामावलेला पैसा, ( अल - इम्रान ),(3) मूर्ती बनवणारा, मूर्ती विकणारा, मूर्ती चा व्यापारी ( अल - मायदा आ. नं. 90), (4), चोरी करणारा, चोरीचा माल विकणारा, चोरी करणार्यांना सहकार्य मदत करणाऱ्याचा व चोरी करून तो पैसा गडफ करून ठेवणारा, ( अल - मायदा आ. नं. 38)., (5), जें दुकानात तराजू आहेत अशा दुकानात जर तराजू या मापातुन घोटाळा करऊन पैसा कामवीत असेल तर त्याचा पैसा, ( अल -तातफिक आ. नं. 13)., (6), जें मुलं मुली अनाथ झालेले आहेत आणि त्यांचं पालन पोषण तिसरा कोणीतरी करीत असेल व तो मनुष्य जर त्या अनाथ मुलांच्या संपत्ती तुन काही गडबड घोटाळा करून पैसे कामवीत असेल तर तो पैसा बिलकुल चालत नाही ( सुरह अल - निसा आ. नं. 01),. (7), अचानक पने चुकीच्या पद्धतीने कामावलेल्या मिळालेल्या धन लाभ, लॉटरी, मटका झुगार, पत्ते, इत्यादी तुन मिळवलेल्या ( सुरह अल - मायदा आ. नं. 90). (8), दारू चा कोणताच पैसा, दारूचा धंदा करणारे, त्या दारूच्या धंद्याला मदत करणारे, दारू चा कारखानादाराचा. विक्री - वाहतूक - मदत - सहकार्य - या सर्व लोकांचा पैसा जकात म्हणून चालत नाहीं, ( सुरह अल - मायदा आ. नं. 90).(9), अश्लीलता दाखवणारे त्याची जाहिरात करणारे मदत करणारे, प्रोत्साहन देणारे , डान्स बार चालवाणारे मदत सहकार्य करणाऱ्या चा जकात म्हणूनं चालत नाहीं ( सुरह अल - नूर आ. नं. 19.व 33).(10), ज्योतिष व्यवसाय करणारे अर्थातच भविष्य वाणी करणारे, यातून मिळवलेला पैसा.. ( सुरह अल - मायदा आ. नं. 90)
@ वरील उल्लेख केलेल्या सर्व व्यवसाय करून मिळणाऱ्या कोणत्याही व्यवसायिकाणचा पैसा कुठल्याही परिस्थितीत जकात=( दान )म्हणून चालत नाहीं चालत नाहीं म्हणजे नाहीं.!!!.
@:जकात दान कोणाकोणाला देण्यात यावीव खर्च करावी व देणं गरजेचे आहेत :- 👌(1), जवळचे नातेवाईकांना, शेजारी, अनाथ, वंचित, पीडित, णा जकात खर्च करावे., ( सुरह आन - निसा आ. नं. 36).(2), निराधार, अपंग, दिव्यांग( सुरह अल,- जरियात आ. नं. 10).(3)बिना इंटरेस्ट ( बिन व्याजी कर्ज देणं ) याला कर्ज ए हसना म्हणतात, ते देणं, विशषत कर्ज ए हसना हा प्रकार तुम्हीं कर्ज घेणारा म्हणतो कीं मी ठराविक मुदतीत मी तुमची रक्कम ची परतफेड करील..
एक गोस्ट येथे जाणीवपूर्वक सांगावाशी वाटतेय कीं,
  पवित्र कुरआन म्हणतं कीं, " कर्ज घेणं व कर्ज देणं दोन्हीही गुन्हा आहेत निषेध्द आहेत, " ( सुरह अल - बकराह आ. नं. 28)
जें लोकं पीडित आहेत, एखाद्या नैसर्गिक अप्तीतीत ग्रस्त आहेत, भूकंप ग्रस्त आहेत, धरणग्रस्त आहेत, एखाद्या जीवघेण्या साठीच्या आजाराने ग्रस्त आहेत उदा. करोना महामारी इत्यादी. दुष्काळी परिस्थिती आहेत, असा परिस्थितीत जेवढी मदत करता आली तर करावी जकात व्यतिरिक्त ही मदत करावी, अनाथ मुलांच्या पुनर्व्हसणासाठी त्यांच संगोपन पालन पोषण करण्यासाठी, त्यांच लग्नाला, जकातीचा पैसे जरूर द्यावा. गरीब आजारी व्यक्ती आहेत यांना काही मदत म्हणून जरूर जकाती मधून देवू शकतात, जें लोकं एका काळी फार पैसेवाले होते परुंतु आज ते काही परिस्थिती नें लाचार झालेले आहेत, गरीब झालेले आहेत तर अशा लोकांना गुपचूप जावून द्यावा, तसेच ज्या लोकांनी आपल्या घरच्यांसाठी मुलाबलांसाठी, आजार बारा करण्यासाठी हास्पिटल बिल भरण्यासाठी किंवा काही गरजासाठी उधार, कर्जाननें पैसे घेतले असतील परुंतु सध्या त्यांची ते कर्ज फेडण्या ची एपत नसेल तर अशा लोकांना जरूर जकात चा पैसा देण्यात यावा. कारण असे प्रतिष्ठित व्यक्ती कोणालाही पैसे मागत नाहीं त्यांना ते अपमानजनक वाटतं, काहीतरी कमी भावनेच, कमी प्रतिष्ठेचं वाटत म्हणून ते आपलं जीवन संपवतील परुंतु कोणाला भीक मागणार नाहीत म्हणून अशा लोकांना रात्री त्यांच्या घरी जावून गुपचूप जकात रूपी पैसे दान करावेत.. त्यामुळे त्यांचा स्वाभिमान ही टिकवून राहिल व आपल्याला त्याच सबाब - पुण्य ही भेटेल.
विधवा स्त्री यांना ही जकात देवून त्यांच्या ही गरजे साठी जकात द्यावी.
तसेच, काही गरीब - श्रीमंत सुद्धा कर्ज घेऊन शिक्षणा साठी कर्ज घेतात परुंतु ते फेडू शकत नाहीत तर अशा शिक्षण घेणाऱ्याला जेवढी मदत देता येईल तेवढी द्यावी. किंवा ते ज्या शिक्षण संस्थेत शिकत असतील त्या शिक्षण संस्थेचे ची वार्षिक फी भरावी त्याच बरोबर जेवणा खाण्याचा राहण्याचा खर्च तरी भरावे.. हें सर्वात जास्त सबाब चे कार्य म्हणावं लागेल.
जें अरबी मदरसे -( मदरसा म्हणजेच शाळा ) या अरबी मदार श्याना कोणत्याही प्रकारचं सरकारी अनुदान नाहीं व देत सुद्धा नाहीं तर असा अरबी मदर्श्यांना जरूर जकात देण्यात यावी. भारतात जवळ जवळ सर्वच मदरसे हें जकातिच्याच पैशा वर चालतात. काही चॅनेल वाले हेतूपुरस्कार जाणूनबुजून मुस्लिम मदरस्यांची बदनामी करतात. मदरश्या मध्ये लाखोंच्या संख्येने अतिशय गरीब घराण्यातील मुलं शिक्षण घेतात.. त्यांच्या प्रत्येक गोष्टी साठी जकती चा पैसे देवून त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करून अल्लाह च्या ख़ुशी मध्ये सामील व्होवं..
भारतामधील खुप ठिकाणच्या पूरग्रस्त परिस्थिती, आणीबाणी च्या, आपत्ती प्रसंगी नद्या नाल्याना आलेल्या पुरा प्रसंगी हजारो मदरश्या तील शिक्षण घेणाऱ्या मुलांनी वेळोवेळी मदत केलेली आहेत..
म्हणून ज्यांच्या ज्यांच्या वर जकात अनिवार्य केलेली आहेत अशा धनिक श्रीमंत बांधूनी अल्लाह च्या मानवी कल्याण साठी सढळ हाताने मदत करावी.
काही लोकं चिंगूस असतात जकात काढत नाहींत त्यांच्या साठी पवित्र कुर आन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, " गुडगंज संपत्ती गोळा करून घरात ठेवण्याला पवित्र कुर आन नें हराम म्हटले आहेत, ( सुरह आत - तौबा आ. नं. 34).
तसेच, " ज्या लोकांची धन संपत्ती अनुचित मार्गाने गिळणकृत करीत असतात आणि जें लोकं सोनं चांदी चा साठा करून ठेवतात आणि ते अल्लाह च्या मानवी कल्यानाच्या लोकोउपयोगी कार्या साठी खर्च करीत नाहीत, अशा लोकांना मृत्यू नंतर च्या जीवनात भयानक भयावह शिक्षेची वार्ता एकवा. (सुरह आत - तौबा आ. नं. 34-35)
म्हणून जेवढे जमेल त्यावढया लवकरात लवकरच जकात काढून गोर गरीब वंचित अनाथ गरजू लोकांना देवून त्यांच्या मुलाबाळांना ही ईद चा आनंद साजरा करता येईल .
ते आनंद साजरा तर करतील व त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून तुमच्या बरोबर अल्लाह ही मनापासून खुश जरूर होतील.

(मित्रांनी लेख आवडल्यास मित्रांना व नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य कळवा )

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल :- 9271640014
🌷🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))


पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात परोपकारी व्यक्तीमत्व असलेले पत्रकार विष्णूभाऊ राऊत


पत्रकारितेसह सामाजिक क्षेत्रात परोपकारी व्यक्तीमत्व असलेले पत्रकार विष्णूभाऊ राऊत 

अमरावती जिल्ह्याच्या जरूड येथील मनमिळावू, सुस्वभावी, सर्व समावेशक, जात-धर्म-पंथ पक्ष लिंग कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करणारा, शिव फुले शाहू-आंबेडकरी विचारधारेचा खंदा पुरस्कर्ता आणि निःपक्षपाती पत्रकारिता करणारा एक प्रामाणिक व सच्चा वार्ताहर म्हणजे आमचे मित्र विष्णू राऊत होय.
विष्णू भाऊ अगदी तरुण वयापासूनच सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीमध्ये सक्रिय राहिलेले परोपकारी व्यक्तिमत्व आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध चळवळी केल्या, गावातील नागरिकांच्या समस्या शासकीय व प्रशासकीय स्तरावर सोडविण्यासाठी वेळप्रसंगी अधिकाऱ्यांशी व पदाधिकाऱ्यांशी घनघोर चर्चा करून जनसामान्याचे प्रश्न अगदी पोट तिडके ने मांडून सोडविण्याचा सतत प्रयत्न विष्णू राऊत यांनी केलेला आहे
९० च्या दशकामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी व कार्यप्रणालीशी प्रभावित होऊन विष्णू भाऊ यांनी शिवसेना पक्ष जवळ केला आणि शिवसेना पक्षाची विचारधारा आपल्या तरुण सवंगड्यांना सांगून अनेक शिवसैनिक त्यांनी जोडलेत, त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक जास्त महत्त्व दिले, छत्रपती शिवरायांची जयंती अगदी मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा जरूड परिसरामध्ये विष्णू भाऊ राऊत यांनी सुरू केली ज्याचा साक्षीदार मी स्वतः आहे १९९५ साली जरूड
येथील गुजरी बाजारामध्ये भव्य शिवजयंतीचा कार्यक्रम विष्णूजी आणि त्यांचे सवंगडी शिवसैनिक यांनी साजरा केला, ज्यामध्ये मी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होतो. त्यानंतर ग्राहक चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक कार्यक्रम व उपक्रम विष्णू भाऊ राऊत यांनी राबविलेत, वार्ताहरशिप करत असताना आपल्यावर पक्षपातीपणाचा आरोप लागणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली, आपल्या जीवननिर्वाहासाठी त्यांनी बस स्टैंडवर एक छोटेसे जीवनावश्यक वस्तूंचे दुकान थाटले त्या ठिकाणी वर्तमानपत्रांची विक्री आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या भेटीगाठी व चर्चा त्यांनी सुरु केल्या, त्यांनी आपल्या स्वतःचं एक जनसंपर्क कार्यालयात त्याठिकाणी जणू सुरू केलं, मी सुरुवातीलाच हजारात शत्रू वार्ताहर असं म्हटलेलं आहे, त्याचं कारणही तसंच आहे विष्णू भाऊंच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सर्वच पक्षाचे, सर्वच विचारधारेचे, सर्वच क्षेत्रातील गणमान्य पासून तर सामान्यांपर्यंत माणसं सकाळला आणि सायंकाळला एकत्रित बसतात आणि माणूस समाज गाव राज्य व राष्ट्रीय पातळीच्या चर्चा त्या ठिकाणी घडवून येतात, सर्वांचे मैत्री राहावी यासाठी त्यांनी जवळपास १०० तरुणांचा एक अभिनव मित्र परिवार म्हणून संच किंवा मंडळ त्यांनी स्थापन केलं, त्यांच्या जीवनकार्यातील एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या मित्र मंडळातील सर्वच सदस्यांचा मोठ्या हिरीरीने व उत्साहाने वाढदिवस साजरा करतात, तरुण मुलांना बोलता यावं, भाषण देता यावं म्हणून त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात किमान २० ते २५ लोकांना एक एक दोन दोन मिनिटं का असेना बोलायला लावतात म्हणजे बोलणारा माणूस चळवळ चळवळीत सहभागी होणारा माणूस समाजकार्यात धडपडीने भाग घेणारा माणूस घडावा ही त्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यांचा १८ मार्च हा त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभ प्रसंगावर नेत्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उत्तम आयुरारोग्य लाभो व दीर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या अजातशत्रूला त्याच्या कार्यामध्ये सदैव यश मिळत राहो अशी देखील सदिच्छा व्यक्त करतो.


=================================
-----------------------------------------------
*संकलन - सी.टी. पठाण*✍️✅🇮🇳...
सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक जरुड
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*लेख प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, March 18, 2025

रमजानुल मुबारक 2025 रोजा नं.18 वा, बुधवार दिनांक 19-03-2025ईसलाम : जकात ; गरिबांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अल्लाह ची योजना...


रमजानुल मुबारक 2025
रोजा नं.18 वा, बुधवार दिनांक 19-03-2025
ईसलाम : जकात ; गरिबांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी अल्लाह ची योजना...

लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख ,
बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.
९२७१६४००१४,
   हजरत अब्दुल्लाहा बिन उमर रजि. म्हणतात की , " प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सांगितले की , ' इस्लाम हा पाच मूलभूत स्तंभावर उभा आहे , १) कलमा.;-, (.२) दोन ,नमाज कायम करणे .(३) तीन , रमजानुल मुबारक रोजे ठेवणे (४) जकात आदा करणे(.५) वा, हाज करणे ,
  दिव्य कुरआन सांगितले कि ," जे नमाज कायम आदा करतात ,रोजे ठेवतात ,व जे काही त्यांना (धन, दौलत पैसा ,इत्यादी .) दिलेला आहेत त्यामधून दानधर्म करतात व जकात देतात ते खरेखुरे श्रद्धांवान बांधव आहेत , आणि हेच लोक कयामतच्या ( प्रलय काळाच्या ) दिवशी प्रत्येक यातने पासून दूर राहतील .(सूराह नं.८ अन-अनफाल अ.नं.३४, सुराहा. नं.२ अल-बकराहा आ.नं. २७७).
    आपल्या भारतात - जगातील प्रत्येक देशात एक प्रकारे वर्षभराचा टॅक्स भरावा लागतो , अगदी तसाच आपल्या शरीराचा वं आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा टॅक्स आपल्याला अल्लाह च्या आदेशानुसार गरीब गरजूना दान देवून वर्षातून एकदा भरावाच लागतो. याच अल्लाहच्या टॅक्स ला "जकात " म्ह्टले जाते.
दिव्य कुरआन म्हणते की ,'" हे पैगंबर स्व. तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा ,.आणि सद् वर्तनाच्या मार्गात यांना पुढे करा , यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुआ यांच्यासाठी फार महत्त्वाचे ठरेल ."( सुराहा. नं.९ अत -तौबा आ. नं. १०३).
 दिव्य कुरआनामध्ये ८२ वेळा " जकात ="( टॅक्स-मी टॅक्स हा शब्द फक्त्त समजून घेण्यासाठी वापरलेला आहेत )आदा. करण्याबद्दल आयाती (ओव्या) आलेले आहेत यावरून इस्लामी अर्थव्यवस्थेत ' जकाती ' चे किती अनन्य साधारण महत्व आहे हे समजून येते.
 ' जकात ' या शब्दाचा शाब्दिक अर्थ ' पवित्रता' व ' वृद्धी ' Growth असा होतो ,. म्हणजेच पहिला जो अर्थ आहे " पवित्रता ' यानुसार तुम्ही जे पवित्र जकात देण्याचे कर्म करतात त्यामुळे तुमचे समाजात महत्त्व वाढते व तुमचा माल हा शुद्ध होऊन तुम्ही ते दान देण्यास प्राप्त होते.. व तुम्हाला समाजात दान देण्याची सवय लागत. तुमचे जे धन असेल ते पवित्र ,शुद्ध होते .
 ' वृद्धि ' Growth तर होतच असते.एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते की माणूस जेवढा दानी असतो त्याला सर्व जग आपलंसं करतात व सर्व जगातील गरिबांची दुआ.,पुण्यं,त्याला भेटतं. कालांतराने त्याची सर्व स्तरावर वृद्धीच होते, त्याचे समाजातील स्थान हे उच्च होतात . त्यांच्याकडे लोक चांगले भावनेने पाहतात .आपल्याकडे जे काही काही श्रीमंत लोक असून पैसा फक्त्त च संपत्ती गोळा करून साचून ठेवतात ते दान देत नाहीं अशा श्रीमंतांना समाजात काडीचीही किंमत नसत,
.म्हणुनच प्रेषित पैगंबर म्हणतात कि "जकात दिल्यावर तुमच्या पैशांमध्ये व संपत्तीमध्ये वृद्धी होते व तुमच्या कुठल्याच गोष्टीवर नैसर्गिक आपत्ती येत नाहीत , तुम्ही कधीच नैसर्गिक आपत्तीचे बळी ठरणार नाहीत ,.व तुमच्यावर ईश्वरी प्रकोप होणार नाहीत .व धन-दौलत तबाह व. बरबाद होणार नाहीत तुम्ही हे लक्षात ठेवा. "(तबराणी).
                    बरोबर आहे जो माणूस समाजात सेवा करतो,. दानधर्म करतो, गरिबांचे पीडितांचे दुःख जाणतो, त्यांच्या गरजेला काम येतो , समाजातील दीन- दुबळे - आंधळा- अनाथ - विधवा -पीडित- मित्रमंडळी वगैरे समाजातील गरजू लोकांना गरजेला कायम पुढे असतो आशा प्रत्येक व्यक्तीस समाजात अदर्श स्थान निर्माण झालेले असते.प्रत्येक व्यवहार कायमच वृद्धिंगत होत असतात. थोडं अपण आपल्या समाजात अशा व्यक्तींचे निरीक्षण करून पाहिले तर लक्षात येईल .
कुुरआनानुसार जकात ही आपल्या वर्षभराच्या सर्व गरजा भागून जी सेविंग, शिल्लक नफा राहील त्या सिल्की वर २.५ % अडीच टक्के ,-रक्कम ठरलेले असते.
उदाहरण द्यायला झाल्यास समजा आजच्या रमजान ईद च्या दिवसापासून ते पुढील रमजानच्या रोजा पर्यंत किंवा आजच्या तारखेपासून ते पुढील आजच्याच तारखेपर्यंत, एक वर्ष पूर्ण झाल्या वर जेवढी रक्कम तुमचे सर्व गरजा भागून शिल्लक- नफा राहिल त्यावर २.५% अडीच टक्के " जकात " असते. किंवा ज्या व्यक्तीकडे अशी रक्कम आहे कि. मग ती स्त्री असो वा पुरुष असो कोणी असो त्याच्याकडे साडे ५२.५ तोळे चांदी silver किंवा ७.५ साडेसात तोळे सोनं Gold असेल किंवा त्या चांदी किंवा सोने एवढी किंमत असेल , ती वर्षभरा पर्यंत असेल तर त्यावर अडीच टक्के२.५% रक्कम ही जकात असते .ती रक्कम तुमच्या सध्याच्या बाजारभावानुसार किंमत असेल त्याच्या अडीच टक्के रक्कम जकात म्हणून अल्लाचे टॅक्स इन्कम असते .
 ती अनिवार्य compulsory कंपल्सरी असते , ती द्यावाच लागेल तर तुम्ही तुमची एवढे करून सार्थकी लागेल . नाहीतर तुम्ही आल्लाहा (परमेश्वरा )जवळ गुन्हेगार ठरतात . तुमची प्रॉपर्टी व्यवसाय असेल ,शेती असेल , शेती निसर्गाच्या पाण्यावर आधारित असेल अशा शेतीवर जकात अनिवार्य आहे , होईल . जो तुमच्या हलाल , कष्टाच्या कमाईतून, कष्टाच्या व्यवसायातून ,कष्टाच्या बळावर तुम्ही मालमत्ता त्यात यावर जकात अनिवार्य आहे हरामाच्या पैशातून जकात देता येणार नाही .
       पवित्र दिव्य कुरआन म्हणते की," तुमची मालमत्ता व तुमची संपत्ती एक कसोटी आहे , आल्लाह त्याचा मोबदला तुम्हाला देणार आहे तर आल्लाहच्या मार्गात आपली मालमत्ता खर्च करा हे तुमच्यासाठी उत्तमच आहेत ,; कोणी आहे का अल्लाहाला उत्तम कर्ज देणारे असतील तर , अल्लाहाला कर्ज द्या तुम्हाला त्याच्या कैकपटीने अल्लाहा कडुन मिळेल . पारा.नं.२८ , सुराहा नं. ६४ , आ.नं.१४,१५,१६,१७).
पवित्र दिव्य कुरआन म्हणतात.," कोण आहे जो अल्लाहाला उत्कृष्ट कर्ज देईल , जेणेकरून आल्लाहा कित्येक पटीने वाढवून परत फेड तुम्हाला करील ; आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला असेल.' (पारा नं.२७,सुराहा नं.५७ ,सुरह.अल-हदिद.अ.नं. ११).
 हे कर्ज अल्लाहा स्वतःसाठी थोडं मागतात , त्यांना काय या कर्जाची गरज . हे कर्ज जे जे आपल्या कष्टाच्या कमाईतून स्वतःचा प्रपंच चालवतात ,.आपल्या हलाल कामातून अपलं घर संसार चालवून कर्ज बाजारी होतात ,कष्टाच्या कमाईतून त्यांची उपजीविका पूर्ण होत नाही , त्यांना कर्जबाजारी होऊन हि आपली पूर्तता ही पूर्ण करू शकत नाहीत. किंवा कष्ट करण्याची शक्तिच शरीरात नसते , काम करण्याची कुवतच शरीरात राहत नाही . किंवा कमाई करून आपल्या प्रपंच्याचा खर्च जास्त असू शकतो किंवा आजारी पडले असेल आजारपणाला उपचारासाठी दोन पैसे कोणाकडून तरी कर्ज घेऊन ते फेडावयाचे असतात. कधीकधी सावकाराकडून कर्ज घेऊन कर्जबाजारीपणा मुळे त्यांची संपत्ती सावकाराकडे ठेवलेली असेल अशा परिस्थितीत किंवा अशा परिस्थितीतून दारिद्र्य झालेला असेल अशा व्यक्तीस इस्लामी अर्थव्यवस्थेचे वाऱ्यावर सोडून न देता. त्या पीडिताला दलदलीतुन,दरिद्री तुन ,गरीबी तुन , सावरण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा जपून जीवनाची साधनसामग्री करून देऊन ,.त्याचे जीवन सावरण्यासाठी ,.आल्लाहाने जकातीची सोय केलेली आहेत. आल्लाहाला परमेश्वराला प्रत्येकाची काळजी असते .हे
स्पष्ट होते.. 


=================================
-----------------------------------------------
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख,✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना ,श्रीरामपूर.
९२७१६४००१४,
-----------------------------------------------
=================================