राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 23, 2025

भरत कुंकुलोळ यांचीचेअरमनपदी फेरनिवड


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
हिंद सेवा मंडळ अहमदनगर संचलित शा. ज.पाटणी विद्यालयाच्या चेअरमनपदी भरत बुधमल कुंकुलोळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली आहे.
      भरत कुंकुलोळ अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत आहेत. नगरपरिषदेचे नगरसेवक, भाग्योद्यय पतसंस्था संचालक, राजाराम तरुण मंडळ, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, बुद्धिबळ असोशियन आदी विविध ठिकाणी पदाधिकारी म्हणून ते कार्य करत आहेत.त्यांची निवड त्यांच्या कार्याची पावतीच आहे.
             श्रीरामपूर शहर जडणघडणीत त्यांचे परिवाराचा मोठा वाटा आहे.
           त्याच्या या निवडी बद्दल हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, सोमय्या हायस्कूल चेअरमन संजय छलारे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


=================================-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कलमा,नमाज, जकात, रोजा हज हे इस्लाम धर्माचे पाच मूलस्तंभ

कलमा,नमाज, जकात, रोजा हज हे इस्लाम धर्माचे पाच मूलस्तंभ 


तर आदर्श माणूस,आदर्श कुटुंब व आदर्श समाज निर्मिती हा रोजाचा मूळ उद्देश – डॉ. रफिक सय्यद

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रोजा म्हणजे पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाणी सोडणे नव्हे, रोजा डोळ्यांचा, जीब्हेचा, कानांचा, हातापायांचा सुद्धा आहे.आदर्श माणूस,आदर्श कुटुंब व आदर्श समाज निर्मिती हाच रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजेदार माणसाचे बोलणे, ऐकणे, पहाणे,वागणे आणि देवाण- घेवाण आदर्शवत असली पाहिजे. इंद्रियावर ताबा असायला हवा अन्यथा रोजा ठेवून जो खोटे बोलतो, खोटे वागणे सोडत नाही त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाह ला काडी मात्र गरज नसल्याचे व हेच प्रेषितांना अपेक्षित असल्याचे डॉ. रफिक सय्यद यांनी रोजा इफ्तार कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील जामा मस्जिद याठिकाणी हिंदू - मुस्लिम यांच्या संयुक्तिक रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते.
इस्लाम व रोजा याविषयी मार्गदर्शन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.संभाजी बोरुडे उपस्थित होते .


कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज हे इस्लामचे मूळ स्तंभ असल्याचे सांगून डॉक्टर सय्यद पुढे म्हणाले की, रमजान या पवित्र महिन्यात रोजे अदा केले जातात. सूर्य उगवण्याच्या दीड तास अगोदर पासून रोजाची सुरुवात होऊन सूर्यास्तानंतर इफ्तार ने याची सांगता होते. दरम्यानच्या काळात परमेश्वराचे नामस्मरण, इबादत (प्रार्थना) केली जाते. केवळ उपाशी रहाणे म्हणजे रोजा नव्हे. तर रोजेदारावर अनेक बंधने असतात. त्यांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक असते तरच रोजा पूर्ण होतो. रोजा असताना रोजेदाराने आपले डोळे, कान, हात, पाय, जीव्हा आदींवर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वाईट बोलणे, वाईट ऐकणे, हाताने, पायाने कोणाला त्रास देणे असे प्रकार घडल्यास त्याला रोजा म्हणता येणार नाही. आपल्यापासून इतरांना त्रास होईल असे कृत्य आपल्याकडून होता कामा नये याचीही पुरेपूर काळजी घ्यावी लागते. पवित्र ग्रंथ कुराणचा दाखला देत त्यांनी म्हटले आहे की, जीवनाचे सार्थक करा ज्यांच्यात वाद आहेत ते मिटवा. भावा - भावात असलेले मतभेद मिटवा. त्यांना जोडण्याचे काम करा .घोटाळे बेइमानी करू नका, परोपकार करा, चांगले कर्म करा ते तुमच्या बरोबर येणार आहेत.या शिकवणी नुसार पालन केले तर तुमच्या रोजाचे व जीवनाचे सार्थक होईल व या पवित्र महिन्यात आचरणात आणलेल्या प्रत्येक चांगल्या सवयीचे तुम्ही आदी व्हाल. ज्यामुळे तुम्हास कायम चांगले वागण्याची सवय लागेल. डॉक्टर नाही होता आले, इंजिनिअर नाही होता आले, वकील नाही होता आले तरी चालेल किमान चांगले माणूस झालात तरी खूप असे सांगून त्यांनी मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगितला.
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड.
बोरुडे यांनी आज प्रथम वेळेस या पवित्र ठिकाणी आल्याचा आनंद तर झाला आहेच, मुस्लिम समाजाच्या लोकांनी सर्व समाजातील लोकांना एकत्रित बोलावून प्रेषितांना अपेक्षित असा जीवन जगण्याचा मार्ग दाखवून या अमृततुल्य ‘डोस ‘ बरोबरच इतक्या प्रेमाने जवळ बसवून स्वतः घेत असलेल्या रोजाचा प्रसाद अर्थात आपल्या घासातील घास आम्हालाही दिला हा भाई चारा पाहून आपण भारावून गेलो आहोत. असे सांगत बोरुडे म्हणाले बाहेर ज्याप्रमाणे मुस्लिमांबद्दल गैरसमज पसरवून हे वाईट आहेत असे भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र इथे आल्यानंतर वेगळीच पवित्रता आणि बंधुभाव व प्रेम पहायला मिळाले याचा मनस्वी आनंद झाल्याचे सांगून हे कार्यक्रम वारंवार व्हावेत त्यामुळे आपा-पसातील प्रेम आणखी वृध्दींगत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली .यावेळी अनेक हिंदू बांधवांनी पवित्र रमजान व रोजा निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या व इफ्तार कार्यक्रमाची सांगता झाली.मुस्लिम बांधवांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे व प्रेमाने दिलेल्या इफ्तार पार्टीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 22 वां, रविवार दिनांक 23-03-2025


रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 22 वां, रविवार दिनांक 23-03-2025
"प्रत्येक समाजात चांगले मूल्यवर्धन संस्कार रुजणे गरजेचे आहेत.." प्रेषित( पैगंबर) मुहम्मद स्व.
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " आज तुम्ही जगात तो सर्वोत्तम जणसमुदाय आहेत कीं, ज्याला अखिल मनावजातीच्या कल्याण साठी अस्तित्वात घडवून पुढे आणण्यात आणले गेले आहेत..!, तुम्हीं सदाचाराचा ( चांगल्या संस्कार )आदेश देता व दुराचार करण्यापासून प्रतिबंध करतात :, अल्लाह वर श्रद्धा ठेवतात., ( पारा नं 04, सुरह नं. 03,आ. नं. 110).
आजच्या परिस्थितीत, कोणताही देश असो कोणताही समाज धर्म असो त्यामध्ये चांगले विचाराचे, चुकीच्या विचाराचे, दोन्हीही विचाराचे लोकं असतात, तसेच प्रत्येक समाजात पाप - पुण्य, बरे - वाईट, चांगलं - वाईट, सत्य - असत्य, या सगळ्या प्रवृत्ती चे लोकं असतात,त्यामध्ये समाजासमाजात फूट पडणारे द्वेष फैलावणारे, नफरत फैलावणारे, समाजात जाणूनबुजून खोट्या बातम्या-गोष्टी - किस्से - मनघडत -काहीतरी चुकिच्या कहाण्या किस्से चे लिखाण करून,समाजात दुही पसरून त्या दुहीचा समाज मनावर चुकीचा संदेश जावून एकमेकांच्या मनामध्ये द्वेष कलह मत्सर निर्माण होऊन कालांतराने एकमेकात मन दूषित होऊन भांडण निर्माण होतं.. हें फक्त्त आपल्या किरकोळ फायदा करण्यासाठी असतात.. काही लोकांची ती विकृती असते , एक म्हणं आहेत कीं, "व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ".
आजची परिस्थिती मध्ये प्रत्येक प्रकारच्या मीडिया मध्ये तो मग प्रिंट मीडिया असो, सोसिअल मीडिया असो, प्रत्येक ठिकाणी मुलांना मनावर विपरीत परिणाम होतील असं वातावरण निर्माण केलं जातं, मुलं उग्र होऊन काहीतरी चुकीचं करावेत म्हणून वेळोवेळी त्यांच्या मस्तकात काहीतरी खोटे खोटे किस्से घालून त्यांच्या कोवळ्या मनावर चुकीचं बिबवण्याचं सतत प्रयत्न होतं आहेत या मुळे सध्या व कालांतराने मुलं विधातक कृत्य कारण्या साठी प्रोत्साहन मिळेल व मुलं चुकीच्या मार्गाने जाण्याचं प्रमाण वाढेल, गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होईल, म्हणून, समाजात असत्य, द्वेष, मत्सर गुन्हेगारी प्रवृत्ती, या सर्वाना आज रोखलं नाहीं तर उदयाची, भविष्यात जगातील परिस्थिती फार भयानक होईल, अराजक्ततां माजेल, अंधा दूंधी माजेल, कोणीच कोणाचं ऐकणार नाहीं, कोणीच कोणाच ऐकणार नाहीं ती एकन्याच्या परिस्थितीत राहणारच नाहीं, फार विदारक चित्र निर्माण होईल होतील.त्यामुळे शुल्लक कारणांसाठी काही विधातक शक्ती त्यांचा दंगली, जाळपोळ करण्यासाठी वापर करतील. हें कोणालाही कोणत्याही परिस्थिती फायद्याचे ठरणारे नाहीं म्हणजेच नाहीं..
 अगर ये सर्व आटोक्यात आणायचं असेल तर, जितकं जास्त लवकरात लवकर त्या कोवळ्या मनावर चांगल्या संस्कार घडवण्याची गरजेचं आहेत. त्यासाठी आई वडीलाना च पुढे येऊन चांगलं संस्कार स्वतः ही जोपासून आपल्या मुलांना संस्कार देण्याची गरज आहेत. त्याच बरोबर प्रत्येक शाळेत मूल्य संस्कार देण्याची गरज तर आहेच आहेत. सुशिक्षित मुलांना चांगल्या नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती नरमान होणार नाहीं याची दक्षता घेतली पाहिजे, सोसिअल मीडिया व प्रिंट मीडिया, TV चॅनेल वर चांगल्या सिरीयल ची गरज आहेत, कोणत्याही नेगेटिव्ह बातम्या न टाकता समाजासमाजात एकता एकोपा सामानतात शांतता कसा वृद्धिंगत होईल यासाठी सतत प्रयत्न कारण गरजेचं आहेत, 
इस्लामी संस्कृती धारणे मध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत कीं, ज्याप्रमाणे मुलांच्या मातापित्याना आपल्या मुलांनी केलेल्या चुकीच्या गोष्टी वर जाब विचारण्याचा हक्क आहेत किंवा विचारपूस करू शकतात अगदीच तसाच हक्क मुलांना सुद्धा आहेत कीं आपल्या जन्म दात्या आई वडील काही चुकिचे करीत असतील तर त्यावर त्यांना जाब विचारण्याचा व त्या चुकीच्या गोष्टी रोखण्या चा.
त्याच प्रमाणे पती आपल्या पत्नीला, व पत्नी आपल्या पतीला दुष कृत्य रोखण्याचा हक्क आहेत.
म्हणून कायम सतत चांगल्या प्रवृत्ती,चांगल्या विचारांच्या लोकांबरोबर, चांगल्या विचारांच्या मित्रा बरोबर राहून चांगले मूल्यवर्धक संस्कार सदाचारी सदवर्तन करण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले पाहिजे,मानवी हक्क मूल्यांची पायमल्ली होणार नाहीं याची काळजी घेतली पाहिजे.
 म्हणून पैगंबर मुहम्मद स्व. सततसांगत होते कीं, सत्य स्थापण करण्यासाठी सत्कार्म सदा वर्तन साठी सत्याचा आदेश देण व दुराचार, दुष्कार्म, दूराचार रोखन्यासाठी वयक्तिक तर सतत प्रयत्न करणे तर गरजेचे आहेत पण सार्वजनिक पातळीवर करणे ही गरजेचं आहेत...
म्हणून पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं, " रसूल, पैगंबर ( मुहम्मद स्व. ), जिस बात का आदेश दै, उस बात पर अंमल करो....!. और.. जिस बात से मना ( रोखे )करें, उस से दूर रहे " ( सुरह अल - हशर आ. नं. 7).
या मध्ये फायदा हा सर्वांचा आहेत.फक्त्त एकट्या साठी किंवा एका समाजा पुरता मर्यादित न राहता सर्वांगीण फायदया चा विचार होणं व करणं फार गरजेचं आहेत.. कारण ती आग फक्त्त एका घरा पूर्ती मर्यादित राहत नसते कधी ना त्याची झळ आपल्या घरावरती ही येते लागते.. हें विसरून कधीच चालणार नाहीत म्हणून.
         जगप्रसिद्ध चित्रपट कवी शायर, राहत इंदोरी साहेब म्हणतात कीं," लगेंगी आग तों आयेंगे घर कई जद में...!
   यहाँ पर सिर्फ हमारा मकाम थोडा है..!!"
(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. त्यांना ही फायदा होईल.. प्रतिक्रिया आवश्य कळवा )

(((*))))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^><^><^>

आपला मित्र डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल नं. 9271640014.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
(((*))))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
<^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^><^><^>

Saturday, March 22, 2025

विद्यानिकेतन स्टेट बोर्डमध्ये फूड फेस्टिवल उत्साहात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पाककला या विषयाच्या अध्ययन-अध्यापना च्या दृष्टीने विद्यार्थ्यांना भारतीय खाद्य संस्कृतीची परिपूर्ण ओळख व्हावी,या हेतूने फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. फेस्टिवलमध्ये इ.पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. दरम्यान विद्यार्थ्यांनी वर्गनिहाय प्रत्येक राज्यातील खाद्य पदार्थ वर्ग शिक्षकांसोबत तयार करून विक्रीसाठी ठेवले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पदार्थ बनविणे व त्यांची विक्री करणे हे व्यवहार चातुर्य जाणून घेतले.पालक व विद्यार्थी यांनी स्वादिष्ट व रुचकर पदार्थ खरेदी करून त्यांचा मनमुराद आस्वाद घेतला.
        शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या या खाद्य संस्कृती उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रसंगी विद्यार्थी व पालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.  
         यावेळी फूड फेस्टिवलमध्ये विद्यार्थी व वर्गशिक्षक यांनी चना चाट, कप केक, इडली, मेदु वडा, चटणी, भाजी, चोको बॉम्ब,आप्पे, वडापाव, भेळ, सँडविच, चॉकलेट्, नूडल्स, चायनीज भेळ, दाबेली, मसाला पापड, कटलेट्स, पाणीपुरी, पावभाजी, मंचुरियन सूप, सोयाबीन चिली, मोमोज, रगडा, शेवपुरी, फ्राईड राईस, गुलाबजाम इ.खाद्यपदार्थ तर कोकम, लिंबू सरबत, लस्सी, मठ्ठा,रूह अफझा इ.शीतपेये व आईस्क्रीम विक्रीसाठी ठेवले होते.
यावेळी संगणकीय खेळ व गेम् झोन फेस्टिवलचे खास आकर्षण ठरले. फूड फेस्टिवल यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.
         यावेळी खाद्य संस्कृती या उपक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, अमेरिकास्थित रोहित शिंदे, सौंदर्यवती रश्मी शिंदे,प्रा.डॉ. शंकरराव गागरे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 21 वां, शनिवार दिनांक 22-03-2025


! "लैलतुल कद्र - एहतेकाफ मानवी मुल्यं वृद्धिंगत करण्यासाठी "!
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " (1),आम्ही या ( पवित्र कुरआन ) ला कद्र च्या पवित्र रात्रीतच अवतारीत केलं आहेत, (1),
         (2) तुम्हाला काय माहित, कीं, त्या कद्र च्या रात्रीचे महत्व काय आहेत??(2), 
         (3) ती( एक )कद्र ची रात्र हजार महिन्यांन पेक्षा काही अधिक उत्तम आहेत.,(3),
          (4), त्या रात्री असंख्य स्वर्ग इशदूत व ( प्रमुख स्वर्ग दूतां पैकी एक असलेले जिब्राईल अलै.) हे स्वर्ग दूत आपल्या पालनकर्त्याच्या आदेशानुसार प्रत्येक गोष्टीबाबतीतले आदेश घेऊन पृथ्वी तलावर उतरतात,(4),
          (5) ते पहाट होयीपर्यंत ती संपूर्ण रात्रं शांतता व सुरक्षिततेची रात्रं आहेत... ( पवित्र कुरआन, पारा 30 वां, सुरह नं. 97, अल - कद्र आ. नं. 01 ते 05.संपूर्ण ).(5).
आज 21वां रोजा वीस रोजे पूर्ण होऊन शेवटच्या विभागाला( अशराह )अर्थातच "जहान्नम ( नरका)तील अग्नी पासून स्वरक्षण " म्हणून, त्यासाठीच कळत- नकळ केलेल्या चुकीच्या कामाची- कार्याची- चुकांची माफी मागून निष्कलंक होण्यासाठी रात्रंदिवस अल्लाह च्या दरबारात सतत माफी मागने.
 सध्याच्या 21 रोजा ते 30 या दहा दिवसातील " विषम " ताक" "संख्या असलेल्या रात्री ना लैलतुल कद्र च्या" ताक "रात्री म्हणून संबोधित कारतात. लैल म्हणजेच पवित्र -शुभ -शुभ रात्री. या एका रात्री मध्ये आपण जेवढ्या प्रार्थना दुवा, नमाज कुरआन किंवा जें काही काही शुभ कामे करू त्या प्रत्येक शुभ कामाचे " किम्मत ही एक हजार महिन्यांच्या रात्री पेक्षा ही जास्त किमतीचे पुण्य, साबब.. मिळणार आहेत किंवा तुम्हीं तेवढी प्रार्थना नमाज इत्यादी अदा केल्या सारखं होईल.. म्हणून जगात श्रद्धांवान बंधू याच रात्रीचे वर्षे भर आतुरतेने वाट बघत असतात.
रमजान महिन्यात शेवटच्या विभागात अशराह मध्ये विसाव्या रोज्याच्या रात्री पासून लैलतल कद्र ची 21 वी विषम "ताक "रात्रं चालू होत असते त्यामध्ये संपूर्ण दहा दिवस 24 तास जगातील प्रत्येक मस्जिद मध्ये आप आपल्या मोहल्ला, गाव, गल्ली, शहरातील जबाबदार प्रमुख लोकं काही श्रद्धांवान बंधूना आग्रहाचे निमंत्रण देवून कोणाला दहा दिवसासाठी तर कुणाला आपल्या फुरसत च्या वेळे नुसार मस्जिदच्या एका कोपऱ्यात बसवून अल्लाहशी नतमस्तक होऊन 24 तास नामस्मरण करण्यासाठी विनंती करतात त्याला "एहतेकाफ " म्हणतात. जेवढ्या जास्त संख्येणे भाविक बसतील तेवढे चांगले असते.. संपूर्ण गाव मोहल्ला, गल्ली न बसू शकत नाहीं,तर ज्यांना नामस्मरण करण्यासाठी वेळ असेल अशा श्रद्धांवान बंधू ना बसून सर्वान तर्फे त्यांना सर्व जगाच्या शांततेसाठी- सुखरूप आरोग्य लाभावे, -सुख -समृद्धी लाभावी, या साठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केली जाते.
  वीस दिवसात आपण काहीच केले नाहीं आपण अपल्या रोजच्या संसरातच्याच फेऱ्यात अडकून पडलो होतो, म्हणून येणाऱ्या दहा दिवस बाकी आहेत संधी अजूनही आहेत म्हणून बाहेरील जगाचा राहाडा विसरून अल्लाह शी एकरूप होऊन, देहभान विसरून,अल्लाह च्या नामस्मरनात तल्लीन होऊन विलीन होणं. अगदी धायमोकलून रडून डोळ्यात पाणी आणून आपण कोणाला अजानतेपणी काही बोललो असेल, एखाद्याला वेडे वाकडे बोललो असेल, कुणाचे मन दुखावले असेल, अप शब्द बोलले असेल कळत- नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असेल, किंवा स्वतः मध्ये अहंकार शिरला असेल, काही कधी कधी लयी गर्व झालेला असेल तर त्वरित अल्लाह जवळ लवकरच माफी मागा.. माफ करणारा फक्त्त व फक्त्त अल्लाह च आहेत.. 
अहंकारा मुळे आयुष्यात खूप काही गडबडी होतात.. सगळे काही संपून जातोय.. नांव गाव इज्जत पैसा प्रॉपर्टी संपत्ती. काहीच शिल्लक राहत नाहीं म्हणून..
      प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " ज्या व्यक्तीच्या मानत तिळमात्र देखील अहंकार, मी, गर्व आहेत, असेल, तर, अशा व्यक्ती स्वर्गात कधी जाणार नाहीं ".
पुन्हा, प्रेषित मुहम्मद स्व. म्हणतात कीं, " अल्लाह हें सुंदर आहेत अल्लाह ला सौंदर्य आवडते. अहंकार हा सत्याला नाकारतो आणि दुसऱ्याला तुच्छ समजतो, " ( हदीस इब्न मसउद, मुस्लिम शरीफ ).
म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये, आपल्या मध्ये आलेला " मी "अहंकार आपल्या उन्नती साठी बाधा ठरतो, आयुष्याच्या प्रगतीला अडचणीत आनीत असतो, आपल्या आयुष्यात जागोजागी गडबड करीत असतो म्हाणून अहंकाराला संपूर्ण पने घालवण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ काढून एका जागी शांत बसून अल्लाह शी समर्पण समरप्रीत निर्वीकार होऊन एकरूप होऊन दुवा प्रार्थना जरूर करावी आपल्या अंतर्गत अंतर्मणातील दडलेल्या प्रत्येक पापाची, दुषकृत्या व केलेल्या चुकांची लिन होऊनमनमोकळे जस खास मित्रां बरोबर जशा सगळ्या मनातील गोष्टी बिनंधास्त बोलतोय बिनधास्त सांगतोय अगदीच त्याच प्रमाणे आरे -कारे च्या स्वरूपात अल्लाह जवळ व्यक्त होऊन माफी मागणं -रित्या करणे -व्यक्त होणं, रडून अगदीच धाय मोकळून रडू रडून वारंवार मागणं.. अल्लाह ला राजी करणे हेच महत्वाचं असतं...
शास्र -सायंटिस्ट सांगतात कीं जेव्हा आपण आपल्या अंतर मनातील सर्व विसरून हात वर करूनतन मनाने जोर जोराने बोलत असतो त्याला सेल्फ सममोहंन - स्वतःच स्वतः ला सममोहित करीत असतो, अर्थात आपल्या मनातील चुकीचं विचार गोष्टी= नेगेटिव्ह एनर्जी,),(- ve)गोष्टी घालवून (पॉसिटीव्ह) सकारात्मक एनर्जी विचारामध्ये परवार्तीत ( ट्रांसफर ) होत असतात. मन मोकळे होऊन मनुष्य ताजातावन होत असतो. एका प्रकारे नवीनच ऊर्जा प्राप्त झाल्या सारखं होऊन मनुष्य मोकळा होतो.. मोकळं झालं सारखं होतं मनातील अपराधी पानाची भावना एकदा ची कमी होते.अशा मुळे नकारत्मक विचाराचे सकारात्मक विचारात परिवर्तन होतं आणि हेच साध्य करायचं असतं आणि हेच साध्य होतं.
यातूनच आपल्यातील लोकं कल्यानासाठी मानवी मूल्य वृद्धगत जरूर होतील,
म्हणून या दहा दिवसाच्या लैलतल कद्र च्या रात्रीचा जरूर फायदा उचला..
(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

लेखक डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
, मोबाईल नं. 9271640014👍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Friday, March 21, 2025

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शहरातील नेवासा - संगमनेर रोडचे काम अखेर सुरू


शिवसेनेच्या ढोल बजाओ आंदोलनास यश; शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने संबंधित कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सत्कार

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील नेवासा-संगमनेर रोडचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. या मार्गावरून रोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि व्यापारी प्रवास करतात. परंतु रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतुकीला अडथळा येत होता, अपघातांचे प्रमाण वाढले होते आणि स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अखेर नागरी सुविधा विकास निधी अंतर्गत या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी प्रशासक किरण सावंत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप तसेच अभियंता गवळी यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली हा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्यात आला.
नेवासा-संगमनेर रोड विकसित झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल यामुळे वाहतुकीला गती मिळेल, व्यापार-उदीम सुलभ होईल आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता येईल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
हा रस्ता केवळ एका भौतिक सुविधेचा विकास नसून, संपूर्ण परिसराच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. भविष्यातही असेच विकासकामे वेगाने व्हावीत अशी जनतेची अपेक्षा आहे.

याप्रसंगी तालुकाप्रमुख लखन भगत, शहरप्रमुख संजय छल्लारे, तालुकाप्रमुख राधाकिसन बोरकर, ज्येष्ठ नेते अशोक (मामा) थोरे, भगवान उपाध्ये, संजय साळवे, तेजस बोरावके, युवासेना तालुकाप्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहरप्रमुख सिद्धांत छल्लारे, श्री.कल्याणकर, बापू बुधेकर, शरद गवारे, संजय परदेशी, सुहास परदेशी, विशाल पापडीवाल, रोहित नाईक, प्रमोद गायकवाड, अकील पठाण, विशाल दुपाटी, दत्त करडे, अजय छल्लारे, सुनील फुलारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

हारीस तौफिक तांबोळी चा पहिला रोजा


अ,नगर - अल करम सोसायटीचे तौफिक अब्बास तांबोली यांचे चिरंजीव हारीस तांबोली याने रमजान चा पहिला रोजा पुर्ण केला. 
हारीस तांबोली हा सात वर्षांचा असुन हा गंजबाजार येथील प्रसिद्ध पान व्यापारी जावेद तांबोळी यांचा पुतण्या आहे. तो मुकुंदनगर येथे माॅडर्न चिल्ड्रन अकॅडमी मध्ये पहिलीत शिकत आहे. त्याने एवढया कडक उन्हात उपवास पुर्ण केल्याबद्दल त्याचे अलकरम सोसायटी व मख़दुम सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================