राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, April 27, 2025

जागतिक पुस्तक दिन निमित्त मख़दुम सोसायटी तर्फे मोफत पुस्तके वाटप


पालक व शिक्षकांनी विधार्थयांना पुस्तकाशी जवळीक निर्माण करावी - आबीद खान 

- अ,नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेत जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुल्हे खान यांनी उद्घाटनपर भाषण केले. आणि शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटली आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व, पुस्तके वाचण्याची उपयुक्तता आणि सध्याच्या युगात विद्यार्थ्यांचे पुस्तकांपासूनचे अंतर या विषयांवर मार्गदर्शन केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पण पुस्तकांना महत्त्व आहे. त्यामुळे पालक व शिक्षकांनी विद्यार्थयां मध्ये पुस्तकांशी जवळीक निर्माण केली पाहिजे असे सांगितले.या वेळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नौशाद सय्यद, असलम पटेल,यास्मिन शेख, फरजाना शेख, शाहीन शेख, काझी मुमताज, शेख सुलताना, शेख हीना यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले. तर आभार नौशाद सैय्यद यांनी मांनले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
----------------------------------------------
=================================

बालसंगोपन योजनेचा आढावा घ्या,आयुक्तांना निवेदन - मिलिंदकुमार साळवे यांची मागणी


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी कोट्यवधींचा निधी असूनही लाभार्थी वंचित

पुणे - श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पन्नास वर्षे पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची हजारो प्रकरणे व लाखभर बालकांचे अनुदान कोट्यवधींचा निधी उपलब्ध असूनही रखडले आहे. त्यामुळे या योजनेचा राज्य पातळीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन गती दयावी, अशी मागणी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.
 साळवे यांनी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयात आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन देऊन योजनेच्या अंमलबजावणीतील समस्यांकडे लक्ष वेधले.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत गेल्या पन्नास वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामध्ये तसेच विविध आजार व दुर्घटनांमध्ये आई, वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या एकल, अनाथ बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी ही योजना राबविली जाते. त्यानुसार अशा पात्र लाभार्थी बालकांना दरमहा २ हजार २५० रू. अनुदान दिले जात आहे. तर कोरोनामध्ये पालक गमावलेल्या बालकांना केंद्र सरकारच्या प्रायोजित योजनेंतर्गत दरमहा ४ हजार रू. लाभ दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून दोन्ही योजनांसाठी दरवर्षी तीनशे ते चारशे कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला जात आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तत्परतेने राबविणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत बालसंगोपन योजनेच्या प्रस्ताव मंजुरी व निधी वाटपात मोठा गोंधळ आहे. प्रस्ताव मंजूर असूनही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक, दोन वर्षे अनुदान जमा होत नाही. प्रस्ताव दाखल केले तर दीड, दोन वर्षे लाभार्थ्यांना आपण दाखल केलेल्या प्रस्तावाचे काय झाले?हेच कळत नाही. त्यामुळे या सर्व गोंधळाची चौकशी करून योजनेचा जिल्हा निहाय आढावा घ्यावा, तातडीने प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात देय संपूर्ण कालावधीचे अनुदान डी.बी.टी.द्वारे वर्ग करावे, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांची आयुक्तालयात समक्ष भेट घेऊन केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -✍️✅🇮🇳... 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, April 25, 2025

देखो देखो भाई, बहनों, माताओं,स्नेहीजनों देखो राम राज्य आ गया मगर क्या सचमुच रामराज्य आ गया


देखो देखो भाई बहनों माताओं, स्नेहीजनों देखो राम राज्य आ गया ! देखो-देखो परिवार के साथ परिवार के प्रत्येक मनुष्य जीव आत्मा सुखी है और आनंद ही आनंद उनके मुंह पर दिखाई दे रहा है , "जलाओ दीप आंगन में मेरे प्रभु राम आए हैं बजाओ ढोल नगाड़े आंगन में मेरे प्रभु राम आए हैं? "
क्या वास्तव में राम आए हैं, या राम राज्य आया है तो देश में इतना ऊथल‌पुथल क्यों है? क्यों अब कोई नेता भ्रष्टाचार का विरोध नहीं करता, क्यों अब जनता थक-हार कर चुपचाप टेबल के नीचे से रूपया देकर अपना काम कराना बेहतर समझती है? अब तो जैसे जनता भी मान चुकी है कि, नेता हैं तो भ्रष्टाचार करेंगा ही क्योंकि अब कोई भी नेता शरीफ नहीं हो सकता है ?
इसलिए जनता चुप रहना बेहतर समझती है, और अपना काम टेबल के नीचे रूपया देकर करवाना बेहतर समझती है या दुसरे शब्दों में नेताओं के साथ साथ जनता भी भ्रष्टाचार में भागीदार बनी हुई है इसलिए आजकल दोनों मिलकर गा रहें हैं "राम आएंगे तो अंगना सजाऊंगी"क्योंकि विरोध करने से कोई लाभ नहीं। चोर के मामले में पहले यह कहावत मशहूर थी चोर चोर मौसेरे भाई जबकि अब यह कहावत उल्टी हो गई है "चोर हपाही भाई -भाई"
आजकल जो भारत में राजनीतिक परिदृश्य दिख रहा है,कहीं से नहीं लगता है राम आएंगे?
वो रामराज्य का दौर ही अलग था एक आदर्श शासन प्रणाली का प्रतीक थी, जिसकी कल्पना हिंदू धर्मग्रंथों और रामायण में की गई है। यह वह समय था जब भगवान राम अयोध्या के राजा थे। राम राज्य को न्याय, धर्म, समानता, समृद्धि और शांति से परिपूर्ण माना जाता है। 
1. न्याय और धर्म का पालन – राजा राम ने हमेशा धर्म और सत्य के मार्ग पर चलकर शासन किया।
2. जनता की भलाई – सभी नागरिक सुखी, संतुष्ट और सुरक्षित थे। कोई दुखी, गरीब या शोषित नहीं था।
3. प्राकृतिक संतुलन – वर्षा समय पर होती थी, फसलें अच्छी होती थीं, और कोई अकाल या विपत्ति नहीं आती थी।
4. नैतिक शासन – राजा राम खुद को जनता का सेवक मानते थे, और कोई भी कानून सब पर समान रूप से लागू होता था।
5. शासन में पारदर्शिता – हर निर्णय में जनहित को सर्वोपरि रखा जाता था।
6.धर्म आधारित शासन – राजा राम ने धर्म और नैतिकता के अनुसार शासन किया।
7. न्याय और समानता – सबको समान अधिकार और न्याय मिला।
8. जनता की भलाई – हर व्यक्ति सुखी और सुरक्षित था।
9. शांति और समृद्धि – कोई युद्ध, अकाल या बीमारी नहीं थी।
10. प्राकृतिक संतुलन – मौसम सही रहता था और फसलें अच्छी होती थीं।
राम राज्य वह आदर्श शासन था जो भगवान श्रीराम के द्वारा स्थापित किया गया था। यह एक ऐसा राज्य था जहाँ जनता खुशहाल, सुरक्षित और संतुष्ट थी। रामायण के अनुसार, राम राज्य में कोई दुखी, गरीब, बीमार या अन्याय का शिकार नहीं था। वहाँ धर्म, सत्य, न्याय और शांति का पालन होता था।
जबकि आज का समाज बिल्कुल विपरीत है?
हर क्षेत्र में पतन हुआ है चाहे नेता हो या जनता सभी इस पतन में बराबर के भागीदार बने हुए हैं ?ऐसी परिस्थिति में राम राज्य की कल्पना कैसे पुरी हो सकती है??ये ऐसा युग है जहां चोर सिपाही आपस में भाई भाई है और जनता दोनों को रुपए देकर दूर से राम सलाम करती है? आपस में मिलकर राम नाम का जयकारा लगाती हैं?यह कलयुग है द्वापरयुग नहीं यहां चोर उचक्के, सिपाही पुलिस मिलकर राम नाम का जयकारा लगाती है भला राम राज्य आए तो आए कैसे ?

=================================
-----------------------------------------------

*चंद्रकांत सी.पूजारी*✍️✅🇮🇳...
महुवा - सुरत (गुजरात) 
+91 79847 50817
-----------------------------------------------
=================================


विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !हल्लीच्या वाढत्या रस्तेअपघातांवर मात करा !!




विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- समोनि.राणी सोनवणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी या शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद औताडे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण टेकाळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, माजी सरपंच सोपानराव औताडे, उपसरपंच भागुबाई मगन घोडके, आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम,असिस्टंट मॅनेजर मिथिलेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करताना सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे यांनी वाढत्या रस्ते अपघातांवरील नियंत्रण म्हणजेच वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनी देखील रस्त्याने चालताना घ्यावयाची काळजी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना तथा वाहन चालविताना घ्यावयाची खबरदारी याविषयी उपयुक्त माहिती विषद केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो करीता "विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !, हल्लीच्या वाढत्या रस्ते अपघातांवर मात करा !!" असेही त्या म्हणाल्या.
 शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धा परीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बालकलाकारांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. केंद्रस्तरीय लांब उडी,उंच उडी,धावणे, कथाकथन, आणि वकृत्वस्पर्धेत केंद्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे,एकनाथ ठाकरे, सराल्याचे सरपंच शंकर विटेकर, किरण बनसोडे, बबन तात्या औताडे,रवींद्र मोहन,प्रकाश मोहन, आशाबाई फुलारे,ताहेर शेख, रामभाऊ वमने, देविदास वमने, वैभव नेद्रे,गणेश लबडे, विजय मोहन, अविनाश उमाप,अंकुश मोहन, सोनल औताडे, मनोज घोडके,सचिन वमने, विलास औताडे, राहुल औताडे, जाकीर शहा, कालिंदी घोडके,रूपाली घोडके, रेश्मा शेख,शीतल ठाकरे, आसाराम लबडे सुवर्ण वमने, सुनीता ठाकरे, शांता मोहन आदी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपक्रमशील शिक्षक श्री. शेख यांनी केले व शेवटी आभार मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लोखंडे, मीरा ससाणे, मीनाक्षी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------

 *वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव ✍️✅🇮🇳...

-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111

-----------------------------------------------
=================================

नाईंटीस् च्या गोल्डन इरा मधुर गीतांच्या महफिलचे रविवारी नगरमध्ये आयोजन


वाद्य वाजवणाऱ्या ४० कलावंताबरोबर नगर मध्ये प्रथमच मोठी संगीत मेजवानी 

अह,नगर - प्रतिनिधी - प्रतिनिधी -/ वार्ता -
नगर मधील संगीतप्रेमीं रसिकश्रोत्यांसाठी सुमधुर गाण्यांची महफिल डॉ. दमन काशीद (पाटील), महेश घावटे व निलेश महाजन प्रस्तुत "९० गोल्डन इरा" मध्ये कुमार सानू, उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, अनुराधा पौडवाल यांच्या नवाजलेल्या रोमांटिक गीतांची मैफिलीचे रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शहरातील स्टेशन रोड येथील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे नगरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ.दमन काशीद यांनी सांगितले.
या कार्यक्रमात डॉ. दमण काशीद, डॉ. गायत्री कुलकर्णी, निलेश महाजन, महेश घावटे, प्रतिभा साबळे, पूजा गडकरी, सारिका रघुवंशी, सुशील देठे, सचिन चंदनशिवे आदि गीते सादर करणार असून दहा प्रोफेशनल गायक कोरस देणार आहे. सहा डांसर असून उत्तम सूत्रसंचालन असणार आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी असल्याकारणाने श्रोत्यांसाठी चहा नाश्त्याची देखील मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. दमण काशीद यांनी सांगितले.
प्रथमच नगरमध्ये असा शो होत आहे ज्यामध्ये गीतांना संगीत देण्यासाठी ४० संगीत वाजविणारे कलावंत असणार आहे. ज्यामध्ये ऑक्टोपॅड, रिदम, तबला, साईड रिदम, पर्शियानिस्ट, कीबोर्ड, सेक्सोफोन, फ्लूट, सितार, गिटार, लीड गिटार, बेस गिटार, ब्रास सेक्शन, ट्रम्प पॅड, व्हायलंस साठी आठ कलाकार, गिटार कॉर्डिनेशन ग्रुप मध्ये आठ महिला कलाकार आदी वाजंत्रीचे या शोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. हा शो सर्वांसाठी मोफत आहे. पण प्रवेशिका अनिवार्य आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माने यांच्या ८९५६३६३६६८ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहनही डॉ. दमण काशीद यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर

-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111

-----------------------------------------------
=================================


Wednesday, April 23, 2025

क.जे.सोमय्या हायस्कूलमध्ये 'जागतिक पुस्तक दिन ' मोठ्या उत्साहात साजरा


क.जे.सोमय्या हायस्कूलमध्ये 'जागतिक पुस्तक दिन ' मोठ्या उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आज बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ जागतिक पुस्तक दिन क जे सोमय्या हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती जपणे व वाचनाची चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. पुस्तके आपले आयुष्य समृद्ध करतात आपल्याला अनेक अनुभव देतात तसेच जीवन जगण्याचे सूत्र हे पुस्तकातच लपलेले असते ते शोधण्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांचे नियमित वाचन करावे असे आवाहन विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड यांनी केले . तर पुस्तके जेथे असतील तेथे स्वर्ग निर्माण होतो म्हणून पुस्तकांचे नेहमी स्वागत करा पुस्तकांना जपा असे विचार ज्युनिअर कॉलेज विभागाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गोपाळे सर, पर्यवेक्षक श्री.लकडे सर, स्कूल कमिटी सदस्य किशोर फुणगे, उमेश तांबडे, प्रशासन अधिकारी श्री. कांबळे सर्व शिक्षक, शिक्षिका सेवकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
-----------------------------------------------

नाजेमा बेगम नवाब शेख यांना"संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार" प्रदान


नाजेमा बेगम नवाब शेख यांना
"संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार" प्रदान

- अह,नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, सुरेश निवडुंगे, प्रवीण ठुबे, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई झरेकर, संगीता कुरकुटे, उज्वला वासाल, स्वाती गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाजेमा शेख म्हणाल्या की कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते. काम करताना समाजातून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. नाजेमा शेख यांना नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, मखदूम सोसायटी व समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================