राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, June 16, 2025

महात्मा गांधी शैक्षणिकसंकुलात नवागतांचे स्वागत


अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात विद्यालय व कन्या विद्यालयाच्या वतीने इयत्ता पाचवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत नुकतेच करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नालिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे हे उपस्थित होते. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी केले. याप्रसंगी इयत्ता पाचवी वर्गामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तसेच इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भागवत थोरात, भाऊपाटील धावणे, अनिता लवांडे, मारिया गायकवाड, नरेंद्र ठाकरे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, माधुरी वडघुले यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील आठवणी सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी यांनी केले तर शेवटी संगीता उगले यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 11, 2025

अहमदनगर मुस्लिम फाऊंडेशनकडून गरजु विधवा महिलांना आर्थिक मदत मुस्लीम फाऊंडेशनचे वंचित व दुर्बलांसाठी केलेले कार्य अनुकरणीय - शांताराम राऊत


- अ,नगर - प्रतिनिधी -वार्ता -
समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या "अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन" ने एक अनुकरणीय पाऊल उचलले आहे. संस्थेच्या वतीने शहरातील अनेक गरजू विधवा महिलांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे गरजूंना नवा आत्मविश्वास मिळाल्याचे चित्र आहे. या सामाजिक उपक्रमाचे अनेकांनी खुलेपणाने स्वागत केले असून इतर संस्थांसाठीही ही एक प्रेरणादायक कृती ठरली असल्याचे प्रतिपादन निसर्ग लाॅन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष शांताराम राऊत यांनी केले. 
           अहमदनगर डिस्ट्रिक्ट मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने विधवा महिलांना मदतीचे धनादेश निसर्ग लाॅन औरंगाबादचे संचालक व नाभिक संघटनेचे अध्यक्ष शांताराम राऊत यांच्या हस्ते मुस्लिम फाऊंडेशनच्या कोटला येथील कार्यालयात वाटप करण्यात आले. यावेळी अहमदनगर मुस्लिम वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक व्यवस्थापक व माजी उपनगराध्यक्ष हाजी नजीरभाई,अध्यक्ष डॉ. सईद शेख, सेक्रेटरी मुबीन तांबटकर, ट्रस्टी हाजी मिर्झा, इंजि. इकबाल सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. 
या विशेष कार्यक्रमात प्रत्येक गरजू लाभार्थी महिलेला मदतीचे धनादेश सुपूर्त करण्यात आले. मदतीसोबत महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशा दाखविणारे मार्गदर्शनही देण्यात आले.
पुढे बोलताना शांताराम राऊत म्हणाले की, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे की मुस्लिम फाऊंडेशनने गरजू विधवा महिलांना प्राधान्य दिले आहे. 
महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचे ध्येय मुस्लिम फाऊंडेशनचे असुन "विधवा महिलांसाठी ही मदत फक्त रक्कम नसून त्यांना जगण्याची नवी उमेद देणारी प्रेरणा आहे असे सांगितले.
समाजातील प्रत्येक घटक सुरक्षित आणि सन्मानाने जगावा हेच आमचे ध्यैय आहे. असे मुस्लिम फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सईद शेख यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबीन तांबटकर यांनी केले. तर हाजी मिर्झा यांनी आभार मानले. वृत्त विशेष सहयोग, ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Tuesday, June 10, 2025

माजी आ.भानुदास मुरकुटे व माजी नगर सेवक संजय छल्लारे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबईत काल शनिवार दि. ७ जुन २०२५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी नगरसेवक संजय छल्लारे, निरज मुरकुटे, गणेश छल्लारे, प्रवीण फरगडे, सिद्धांत छल्लारे, लक्ष्मण कुमावत,भगवान उपाध्ये, शेखर दुब्बैया, तेजस बोरावके, रोहित नाईक, संजय साळवे, संजय परदेशी, महेंद्र टाटिया यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे, सचिव संजय मोरे, प्रवक्ते राहुल लोंढे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       या पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद अधिक बळावणार आहे, त्यामुळे श्रीरामपूर चे अनेक गणिते बिघडणार असल्याचे दिसून येत आहे.हा पक्ष प्रवेश प्रामुख्याने विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील अनेक माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्याचा या सोहळ्यात लक्षणीय सहभाग होता. त्यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठे बदल घडण्याची चिन्हे देखील दिसून येत आहेत. याप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही आणल्या.सध्या महायुतीची दुसरे पर्व सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्या नेतृत्वाखाली सरकारने महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेताना 'सर्वसामान्य माणूस' केंद्रस्थानी ठेवला आहे. महाराष्ट्राची प्रगती, औद्योगिक वाढ आणि सामाजिक समरसता हेच आमचे ध्येय

*प्रगती आणि समृद्धीचे सरकार*

एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आणि अनुभवले आहे.महायुतीच्या नेतृत्वाखाली सरकार हे स्थगिती नव्हे तर प्रगती व समृद्धीचे सरकार असल्याचा पुनरुच्चार ना. शिंदे यांनी यावेळी केला.
 मुरकुटे यांच्या प्रवेशाने या सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेतले,निरज मुरकुटे (माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नातू ) यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर थेट शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.याबद्दल शिंदे म्हणाले, "समाजहितासाठी उच्चशिक्षित पिढीने राजकारणात सक्रीय भाग घेणे ही काळाची गरज आहे. निरज मुरकुटे यांच्यासारखे तरुण हे पक्षाला बळकटी देणारे आहेत असेही ना. शिंदे म्हणाले.याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे यांनी चार देशांच्या दौऱ्यात ऑपरेशन सिंदूर' संदर्भात भारताची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि पाकिस्तानचा खरा चेहरा उघड केला. त्या चारही देशांनी भारताला पाठिंबा देत पाकिस्तानला विरोध दर्शवला असेही त्यांनी स्पष्ट केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर आणि पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथे इयत्ता पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आज (०९/०६/२०२५) पासून सुरू झाले आहे. 
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ पासून महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारल्यामुळे पहिलीचा अभ्यासक्रम बदलणे क्रम प्राप्त होते. पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यंदा इयत्ता पहिलीपासून नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात टप्प्याटप्प्याने होत आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दि. २८ ते ३० मे २०२५ या कालावधीत कोकमठाण येथे पहिल्या इयत्तेचे अभ्यासक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्यातील तालुकास्तरावरचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. राहाता येथील पहिली वर्गास शिकवणारे १७० शिक्षकांचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व समन्वयक दिलीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर येथे हे प्रशिक्षण दि. ९ ते ११ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार टप्प्याटप्प्याने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये राहाता तालुका अधिनस्त सर्व जिल्हा परिषद खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली वर्गात शिकवणाऱ्या सर्व शिक्षकास हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आलेले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

राष्ट्रवादी (A.P.) सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष पदी चांगदेव देवराय तर शहराध्यक्ष पदी दीपक कदम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुक्याच्या अध्यक्षपदी कान्हेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते चांगदेव देवराय यांची तर श्रीरामपूर शहरातील पत्रकार दीपक कदम यांची शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली तालुक्याचे माजी आमदार तथा पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष लहुजी कानडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले, पक्ष बळकटी साठी देवराय व कदम यांनी काम करणार असल्याचे यावेळी सांगितले त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष अरुण पा.नाईक, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष निलेश भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष अभिजित लिपटे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, June 8, 2025

वेळ लागणार नाही दुर्घटना घडायला ?कारण जुणे बांधकाम आले पडायला !! देवळाली प्रवरा आरटीओ शिबीर कॅम्पचीजागा बदलावी - नागरीकांची मागणी


- जावेद शेख - राहूरी -/ वार्ता -
गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) उपविभाग श्रीरामपूर या कार्यालयांतर्गत नागरिकांच्या विविध कामांसाठी आरटीओ शिबीर कॅम्प चे आयोजन करण्यात येत असते,परंतू या विश्रामगृहाच्या इमारतीची मोठी दुरावस्था झाल्याने सदरची इमारत कधी कोसळेल याचा भरोसा राहिलेला नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदरील ठिकाणच्या आरटीओ शिबीर (कॅम्प ची) जागा बदलावी अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे. 
श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन (आर टी ओ) कार्यालयांतर्गत राहूरी तालुक्यातील नागरीकांसाठी वाहन चालविण्याचा परवाना,वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) तसेच आर टी ओ अंतर्गत येणाऱ्या विविध कामांसाठी महिन्यातून दोनदा पंधरवाडा शिबीर (आर टी ओ) कॅम्प चे आयोजन देवळाली प्रवरा पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात गेली अनेक वर्षांपासून केले जाते, तालुक्यातून नागरिक या साठी येतं असतात, पाटबंधारे खात्याच्या या विश्रामगृहाचे बांधकाम तब्बल एकशे तेवीस वर्षांपूर्वीचे (सन १९०२) आहे, ब्रिटीश कालीन या बांधकामाची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे,संपूर्ण बांधकाम पडण्याच्या परिस्थिती मध्ये असून काही भागांचे पत्रेही गळूनही पडलेले आहेत, या ठिकाणी दर पंधरा दिवसांनी आरटीओ कॅम्पद्वारे शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याने वाहनं चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला, तरुण, तरुणी,मुले यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, नागरिक आपल्या विविध प्रकारच्या वाहनांचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी याठिकाणी गर्दी करत असतात,राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा या दोन्हीं गावाच्या मध्ये हे शिबीर होत असल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही,त्यावर सदरचे इमारत बांधकाम पडण्याच्या मार्गावर असल्याने कधी काहीही अनर्थ घडण्याची भिती व्यक्त होत असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अधिकच नागरिकांना खबरदारी घ्यावी लागत असल्याने श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे, राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यानं एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय जागेवर शिबीराचे आयोजन केल्यास नागरिकांना यांचा फायदा होईल तरी परिवहन विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. - 

-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
वृत्त विशेष सहयोग,
ज्येष्ठ पत्रकार रमेश बोरुडे,राहूरी, ✍️✅🇮🇳...
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-

=================================
-----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग 💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111
-----------------------------------------------
=================================

आनंदवन हे समाजसेवेचे विद्यापीठ आहे - कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के आनंदवन येथे विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आनंदवनात कामाचे बोलायचे नाही तर त्यांचे काम हेच बोलणे आहे. आनंदवनात गेलो की एक ऊर्जा प्राप्त होते. ही ऊर्जा वर्षभर टिकून राहते. बाबांनी निर्माण केलेले आनंदवन हे समाजसेवेचे स्फुल्लिंग चेतवणारे विद्यापीठ असल्याचे मत सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्यावतीने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील समाजसेवा पुरस्कार आनंदवन येथील महारोगी सेवा समितीला जडणघडणचे संस्थापक संपादक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. भारती आमटे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुखदेव सुकळे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सातारा येथील रयत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे उपस्थित होते. या कार्यक्रमात श्रद्धेय बाबा आमटे व ऍड. रावसाहेब शिंदे यांच्यातील सत्कारापेक्षा सतकार्य या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सुखदेव सुकळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, ज्या कुष्ठरोगांसाठी काम करायचे तीच माणसे सोबत घेऊन बाबांनी काम उभे केले व जगाला दाखवून दिले. केलेले कार्य चिरकाल टिकून राहते हे आनंदवनाने दाखवून दिले आहे. बाबानंतर आज त्यांची तिसरी पिढी अव्याहतपणे आनंदवनाचे कार्य जोमाने करीत आहे. यामुळे पुढच्या पिढीला त्याचा फायदा मिळतो. आनंदवन हे विचारांचे एक ऊर्जा केंद्र असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. विकास आमटे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की समाजाला काहीतरी नवीन द्यायचे असते या दृष्टीने विचार करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी ह.भ.प. सखाराम कर्डिले महाराज, विश्वस्त सुधाकर कडू गुरुजी, कवीश्वर काका, सदाशिव ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविवर्य दीपक शिव यांनी केले. तर विद्या निकेतनचे अधीक्षक रवींद्र नलगंटीवर यांनी सन्मानपत्राचे वाचन व आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅💐...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================