श्रीरामपूर प्रतिनिधी:(अजहर शेख )
येथील गोंधवणी रोडवरील मॅरेज हॉल समोरील दुभागून इदगाहकडे जाणाऱ्या खालच्या रस्त्यात्याची गत अनेक वर्षांपासून दैना झाली होती, या रस्त्यावर येणाऱ्या - जाणाऱ्या पादचारी आणि वाहन चालकांसमवेत परिसरात राहणाऱ्या नागरीकांना देखील मोठा त्रास सहन करणे भाग पडत होते, नगर पालिकेचे लक्ष वेधण्याकरीता सामाजिक कार्यकर्ते अजहर शेख (ABS)
यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत आंदोलने केली कारण हा रस्ता संजयनगर,इदगाह परिसर, रामनगर,मिल्लतनगर, फातेमा हौसिंग सोसायटी जि.प.कर्मचारी सोसायटी आदि ठिकाणी जाण्या- येण्याकरीता हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र हा रस्ता जणू नगर पालिकेने कायमचाच दुर्लक्षत केल्याने सदरील परिसरातील नागरिकांनी कमालीचा त्रास सहन करणे भाग पडत आहे,श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील गोंधवणी रोड पुलाजवळील प्रभाग १ व १२ कडे जाणारा सुमारे १०० मीटर पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावेत अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजहर शेख (ABS) यांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिनांक ०८/०२/२०२२ रोजी दिलेल्या निवेदनात केली होती.तथा नगर पालिकेचे लक्ष वेधण्याकरीता
दि.२६ ऑगस्ट २०२२ रोजी सदरील रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलनही छेडण्यात आले होते.सोबत सदरील निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनाही पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली होती.त्याची दखल घेत नगर पालिकेने खडी,मुरुम टाकून कच्चा रस्ता बनविला मात्र यावर डांबरीकरण किंवा कॉंक्रीटीकरणास नगर पालिकेला मुहूर्त काही सापडेनासे झाले आहे, तोपर्यंत हा रस्ता आवकाळी पावसाने पुर्णतः वाहुन न गेल्यास मिळवली असेच म्हणावे तथा समजावे लागेल, कारण आज (दि.२८/०४/२०२३ रोजी दुपारी) झालेल्या थोडक्याशा आवकाळी पावसात हा रस्ता वाहुन गेल्याने रस्त्यावर पुन्हा जैसे थे खड्डे पडले असल्याचे दिसून येत आहे (मग या रस्त्याची क्वालिटी काय असणार हा संशोधनाचा भागच ठरत आहे.) यामुळे समस्त नागरीकांना पुन्हा मोठा मनस्ताप सहन करणे भाग पडू लागले आहे.
शिवाय जयभोले चौकात सदरील रस्त्यामुळे उंचवटा निर्माण झाल्याने पावसाचे पाणी नेहरुनगरमधील रहिवासियांच्या घरात शिरणार आहे,याकरीता याठिकाणी निर्माण झालेल्या लवनाचा वेळीच योग्य बंदोबस्त करण्यात यावा तसेच सदरील रस्ता बनविल्याने पाटाच्या खालच्या पुलावरील कठडे नाहिसे झाल्याने संभव्य अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली आहे, याठिकाणी तात्काळ कठडे बसविण्यात यावेत पुन्हा पुर्वीसारखे उग्र आंदोलन छेडण्याची वेळ येवू देवू नये.
किंवा नसेल जमत तर यामुळे घडणाऱ्या संभाव्य अपघाताची जबाबदारी तरी नगर पालिकेने घ्यावी असेही अजहर शेख (ABS) यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*अजहर शेख यांची संतप्त प्रतिक्रिया*
शासकीय,निमशासकीय अधिकारी,कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक हेच समजून येत नाही, नुसते आश्वासनावर आश्वासने देणे हेच यांचे काम होऊन बसले आहे. जसे यांनी विकासकामे केली तर जनतेवर मोठे उपकार होणार आहे,संबधित ठेकेदार देखील नेहमी कॉलवर आश्वासनच देत आहे, आठ दिवस, दहा दिवस थांबावेत म्हणून, यामुळे जनतेचे प्रश्न पूर्णपणे सुटत नाही, या रस्त्याप्रकरणी अजहर शेख यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वतः दखल घेवून आयएएस अधिकारी डॉ. सोनिया सेटी यांच्या विभागात सदरील प्रकरण पुढे फॉरवर्ड केलेले आहे, तरीही संबंधित मुख्याधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी आणि ठेकेदार दिवसागणिक नुसते आश्वासनच देत आहे याला काय म्हणावे ? हजारो लोकांसाठी एक युवा सामाजिक कार्यकर्त्याला छोट्याश्या रस्त्यासाठी कित्येक महिने संघर्ष करावा लागतोय तरीही नगर पालिका प्रशासक, मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार सदरील कामांसाठी टाळाटाळ करत आहे, वर्क ऑर्डर निघून पडली आहे तरीही कामे मात्र पूर्णपणे होत नाही ही मोठी शोकांतिका असल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील अजहर शेख यांनी आमच्या प्रतिनिधीसोबत बोलताना व्यक्त केली.
*वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर*
No comments:
Post a Comment