असल्याची अनेक उदाहरणे आढळून येतील. माहीम येथील मगदूम बाबाच्या दर्ग्यावर स्थानिक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल चादर चढवतो. अशा परंपरा या सुरु ठेवल्या पाहिजेत. पण त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकाराकडे चुकीच्या नजरेने पाहणाऱ्यांची वृत्ती कोती आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घ्यावा. बाहेरच्या लोकांनी त्यामध्ये पडू नये, अशा स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ते शनिवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना धारेवर धरले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जे काही घडलं ते चूक आहे. या माध्यमातून कोणाला दंगली घडवायच्या आहेत का? जिथे चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे प्रहार करणे गरजेचे असते, असे सांगत राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली.जाणुनबुजून काही खोदून काढायचं याला अर्थ नाही. जिथे मराठी मुसलमान राहतात, तिथे दंगली होत नाही, हा माझा अनुभव आहे. त्यांची पोरबाळं तिथेच शिकतात, ते तिकडेच राहतात, त्यामुळे अशा ठिकाणी दंगली होत नाहीत. पण काही लोक हे सामंजस्य बिघडवत आहेत. बहुसंख्य हिंदू असलेल्या राज्यात 'हिंदू खतरे मे' कसा काय असू शकतो, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
------------------------------------------------------------------------
=====================================
((( हायलाइट्स )))
धार्मिक स्थळी हिंदू-मुस्लीमांमध्ये सख्य असल्याची अनेक उदाहरणे आढळून येतील
माहीम येथील मगदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर स्थानिक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल चादर चढवतो
अशा परंपरा या सुरु ठेवल्या पाहिजेत
=====================================
------------------------------------------------------------------------
कर्नाटक निकालांवरून राज ठाकरेंचा भाजपला पुन्हा टोला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन लगेच काही निष्कर्ष काढता येणार नाही. एका राज्यावर देशभरातील गोष्टींचा आराखडा मांडू शकत नाही. आगामी काळात गोष्टी कशा बदलत जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. कर्नाटक निवडणुकीच्या बाबतीत मी जेव्हा माझी प्रतिक्रिया दिली, ते भाजपने समजून घेणे गरजेचे आहे. पण भाजपचं असं म्हणणं आहे की, इतरांनी कोणी प्रतिक्रिया देऊ नयेत. मग उद्या वर्तमानपत्रांनी अग्रलेखही लिहायला नकोत. याचा अर्थ भाजपबाबत कोणी बोलायचंच नाही का? हे मात्र कोणाच्याहीबाबतही बोलणार, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
राज ठाकरे यांनी नोटाबंदीच्या निर्णयाबाबत धरसोडपणाचे धोरण असल्याची टिप्पणी केली. कधी नोट आणायची, कधी नोट बंद करायची. सुरुवातीला नोटाबंदी झाली तेव्हा २००० रुपयांच्या नोटा एटीएममध्ये जात नव्हत्या. असा धरसोडपणा परवडणारा नाही. आता लोकांना परत बँकांमध्ये पैसे टाकावे लागतील. असे प्रयोग होत असतात का? मी तेव्हाच बोललो होतो की, नोटाबंदी देशाला परवडणारी नाही, असे राज ठाकरे यांनी जहीर पत्रकात म्हणाले.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
: - राजु मिर्जा...✍️✅️🇮🇳...+919730595775...
----------------------------------------------------===================================
No comments:
Post a Comment