💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अहमदनगर (एस.एम.आदिल)
अहमदनगर येथील सीएसआरडी संस्थेत ग्रासरूट जर्नालिझम संधी उपयोगिता या विषयावर
जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते
माजी कुलगुरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर गव्हाणे आणि महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन मुंबईचे संपादक
अभिजित कांबळे यांची व्याख्याने झाली.
अभिजित कांबळे यांनी ग्रासरूट जर्नालिझम विषयी माहिती दिली
आजच्या युगात डिजिटल आणि व्हिडीओ यांचा पत्रकारितेत महत्व किती वाढला आहे
आणि बातमी हि ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न प्रशासना पर्यंत पोहचविणायची जबाबदारी
ही पत्रकाराची असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले की,जेथे लोकशाही नाही तिथे मुक्त पत्रकारिता नाही आणि सत्य सांगण्याचा व्यवसाय हीच पत्रकारिता सत्य मांडण्याची पत्रकारिता संपता कामा नये आणि पत्रकारितेत पत्रकाराचा पाठीचा कणा ताठ ठेवणे
आवश्यक आहे तो झुकता कामा नये ही आजच्या काळात अत्यावश्यक बनली आहे असे प्रतिपादन माजी कुलगुरू व
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले.
ग्रासरूट जर्नालिझम या कार्यशाळेत पुढे बोलतांना प्रा. गव्हाणे म्हणाले की, मुख्य प्रवाहातील पत्रकार आणि
माध्यमे ही जनतेपासून दूर जात आहेत आणि चुकीच्या मार्गावर जास्त जात असल्याचे सध्या दिसत आहे.
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा जनसामान्यांचे प्रश्न मांडणार कोण? असा प्रश्न निर्माण होतो आणि तेव्हा लोकांनां आपले प्रश्न वेशीवर टांगावी लागतात. आजची बातमी शुद्ध आणि पवित्र राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी
महाराष्ट्र अधिस्वीकृती समितीच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल
लोकमतचे संपादक सुधीर लंके आणि सांयदैनिक स्नेहप्रकाशचे संपादक प्रकाश कुलथे यांची महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अधिस्वीकृती समितीच्या राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल
प्रा.डॉ सुधीर गव्हाणे,पत्रकार अभिजित कांबळे यांच्या हस्ते हार्दिक शभेच्छा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश पठारे, बापू चंदनशिवे आदी उपस्थित होते.
सत्य दाबता येणार नाही आणि सत्य लपविताही येत नाही तेव्हा सत्याच्या बाजूने उभे राहून सत्य जनतेसमोर आणण्याची खरी जबाबदारी पत्रकाराची आहे, समस्या आणि प्रश्ने ज्या-ज्या भागात आहेत त्या भागातून तिथल्या रहिवाशी असलेल्या नागरिकांनी पत्रकार म्हणजेच सिटीझन रिपोर्टर ही काळाची गरज आहे आणि अशा प्रकारची
अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.
*Grassroot Journalism:*
*ग्रासरूट जर्नालिसमने क्रांती घडविली*
*आफ्रिकेतील एका गावात भीषण पाणी टंचाई झाली असताना लोकांना पाणी विकत आणावे लागत असल्याचे पाहून एका ११ वर्षीय लहान मुलीने हा विषय तिथे विहिरीची अत्यावश्यक गरज त्या मुलीने सोशल मीडियावर अत्यन्त प्रभावीपणे मांडली आणि काही दिवसातच विहिरीसाठी संपूर्ण जगभरातून निधी आला आणि यानंतर पुढे ९ ते ११ गावांमध्ये या मुलीच्या ग्रासरूट जर्नालिसमने क्रांती घडविली*
या कार्यशाळेत अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील पत्रकार,
सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment