💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. उमाजी राजे नाईक यांनी इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असल्याने जनतेनेही त्यांना मनापासून साथ दिली. अशा या क्रांतिकारकांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक दिलीप नागरे, के.सी.शेळके, कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा मुख्य समन्वयक मास्टर सरवरअली सय्यद, अशोक जगधने, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, बाबा वायदंडे, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे, प्रताप गुजर, राजेश जोंधळे, सिद्धार्थ सोनवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment