*राजेंद्र बनकर / शिर्डी*
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतवली सराटी येथे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरु आहे या आमरण उपोषणाला शिर्डीसह राहाता तालुक्यातील सकल समाज बांधवानी पाठिंबा देत शिर्डी प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले व तीन दिवस साखळी उपोषण चालू असताना चौथ्या दिवसापासून सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. या आमरण उपोषणात
सचिन चौगुले,अनिल बोठे,रवी गोंदकर,कानिफ गुंजाळ,नितीन अशोक कोते,प्रकाश गोंदकर,प्रशांत राहणे आमरण उपोषणास बसले आहे.
आज या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असुन जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे
*सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी यांनी जी भूमिका घेतली आहे.त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आम्ही सात मराठा बांधव आमरण उपोषणास बसलो आहे.शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण,आमरण उपोषण करावे तोडफोड,जाळपोळ या सारखे हिंसक आंदोलन करू नये.असं आवाहन जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला केले आहे.त्याच पद्धतीने राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डीत सुरू असलेल आमरण उपोषण हे शांततेच्या मार्गाने सुरू आहे.कुणीही तोडफोड जाळपोळ किंवा हिंसा होईल अशा प्रकारचे आंदोलन करू नये - सचिन चौगुले*
*राहता तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने २७ तारखेपासून राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.तरीदेखील मराठ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे हेतूने जाणीवपूर्वक कोणत्याही राजकीय नेत्याने बळाचा वापर करून राजकीय कार्यक्रम व दौरे केल्यास त्या नेत्यांच्या विरोधात जाहीरपणे निदर्शने व निषेध करण्यात येईल - रविंद्र गोंदकर*
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अजीजभाई शेख - राहाता*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳..
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment