राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, January 30, 2024

विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नांतून पूर्ण होणार - राज्यपाल रमेश बैस


*पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी प्रदान*

*महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा ३७ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषि विद्यापीठांच्या प्रयत्नातून व या विद्यापीठातून पदवी घेतलेले कृषि पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्यानेच साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी स्नातकांना राज्यपाल रमेश बैस हे दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ट्रस्ट फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर.एस. परोदा, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषचेदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेचे

 उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते.
राज्यपाल रमेश बैस म्हणाल की, कृषि हा आपल्या

 देशाचा मुख्य आधार असुन 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषिक्षेत्राशी निगडीत आहेत. या कृषिक्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषि विद्यापीठांची भूमिका महत्वाची असणार आहे. कृषि विद्यापीठातून केवळ पदवी घेतलेले पदवीधर विद्यार्थी नसुन तुम्ही नवपरिवर्तनाचे अग्रदुत आहात. महाराष्ट्राला कृषिची समृध्द अशी परंपरा लाभलेली असून ही परंपरा सर्मपक भावनेने जपण्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे जीवन पुर्णपणे शेतीवर अवलंबून आहे अशा लोकांचे जीवन समृध्द बनविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहनही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

    राज्याचे कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती धनंजय मुंडे यांचा संदेश कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी वाचून दाखवला. त्यांच्या संदेशात कृषि मंत्री म्हणाले कृषि क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानामुळे अधिक प्रगती होत आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सध्या कृषि क्षेत्र हे बदलत्या हवामानाला सामोरे जात आहे. या बदलत्या हवामानाला सामोरे जातांना शाश्वत शेतीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. मानद डॉक्टर पदवी मिळालेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले, विलास शिंदे व पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदनही केले.

डॉ. आर.एस. परोदा म्हणाले की, सन 2030 सालापर्यंत आपल्या देशात एकही गरीब नसणे व कोणीही उपाशी राहणार नाही हे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर वातावरणातील बदलाला सामोरे जाणे, पाणी व जमीन या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास थांबविणे, सामाजिक व आर्थिक विषमता दुर करणे ही आपल्या समोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पायाभुत सुविधांचा विकास, नविन तंत्रज्ञान, पारदर्शक योजना व संस्थापक यंत्रणा या चार मुद्द्यांवर काम करावे लागणार आहे. भविष्यातील शेती ही डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे. विद्यापीठ आपल्या संशोधनामध्ये ड्रोन, आय.ओ.टी. व सेंसर्सवर आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करीत असून यातील संशोधनामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सुलभ होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या वतीने कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते राज्याचे महसल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले व विलास शिंदे यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले.

  यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाच केले. 73 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 300 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6 हजार 522 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6 हजार 895 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन 2022-23 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. पुजा नवले, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. ऐश्वर्या कदम, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली कु. गौरी चव्हाण यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमप्रसंगी कृषिदर्शनी-2024, पौष्टिक तृणधान्य माहिती पुस्तीका, मफुकृवि आयडॉल्स व मफुकृवि दिनदर्शिका प्रकाशनांचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी कुलगुरु डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. सुभाष पुरी, डॉ. राजाराम देशमुख, डॉ. तुकाराम मोरे, डॉ. के.पी. विश्वनाथा, डॉ. एम.सी. वार्ष्णेय, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव
लवांडे, डॉ. संजय सावंत, डॉ. विलास भाले, श्री चंद्रशेखर कदम, माजी संचालक डॉ. किरण कोकाटे, डॉ. हरी मोरे, विद्या परिषद सदस्य, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग
प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व डॉ. भगवान देशमुख यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
========================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

पशुधनास ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबवा - महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
पशुधनास ऑनलाईन टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीचे काम अभियान स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथुन दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महसुल मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.
महसुल मंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परंतु या अनुदानासाठी पात्र पशुधनाच्या कानात टॅगिंग करुन भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक असल्याने या कामास गती देत अभियान स्वरुपात हे काम पुर्ण करण्यात यावे. शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या दुध अुनदानापासुन एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देशही महसुल मंत्री श्री विखे पाटील यांनी याावेळी दिले.

पशुधनास टॅगिंग व नोंदणीस शेतकरी, पशुपालकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत 21 हजार 325 पशुधन नोंदणी, 5 हजार 824 पशुपालक नोंदणी, 13 हजार 115 पशुपालक हस्तांतरण नोंदणी 1 हजार 772 पशुधनाच्या नोंदीत बदल, 585 कानातील टॅग बदल नोंदी, 1 हजार 782 पशुपालकांच्या नावातील बदल तसेच अतिरिक्त 50 हजार टॅग नव्याने उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती मंत्रीमहोदयांना दिली असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे यांनी कळविले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


मोक्षा चोपडा यांचा दीक्षा समारोह श्रीरामपुरात होणे मोठे भाग्य- ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
मोक्षा चोपडा यांचा भगवती दीक्षा समारोह श्रीरामपूर मध्ये होणे मोठे भाग्याचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील जैन समाजातील प्रसिद्ध व्यापारी नेमीचंदजी माणकचंदजी चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत नेमीचंदजी चोपडा यांची कन्या मोक्षा चोपडा यांचा जैन भगवती दीक्षा समारोह श्रीरामपूर येथील थत्ते मैदान रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता संपन्न होणार आहे.

 श्रीरामपूर मधील जैन संघास ४० वर्षानंतर मोक्षा चोपडा यांच्या रूपाने जैन भगवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे. श्रीरामपूर ची भूमी प्रभू श्रीराम, राष्ट्रसंत पु.श्री. आनंद ऋषीजी, कर्नाटक गजकेसरी गुरुदेव पु.श्री. गणेश मलजी महाराज साहब व अनेक संत साध्वीजी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. मोक्षा चोपडा यांच्या दीक्षा महोत्सवासाठी श्रीरामपूर नगरीमध्ये प. पू. प्रतिभा कंवर जी म. सा. यांचे आगमन झालेले आहे. याप्रसंगी मोक्षा चोपडा यांचा सत्कार माजी

 नगराध्यक्ष राजश्रीताई ससाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मा. नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, मा नगरसेवक रमेश शेठ कोठारी,दिलीप नागरे, अशिष धनवटे,रितेश रोटे, सुहास परदेशी, प्रवीण नवले, मनसुख चोरडिया, रमेश गुंदेचा, नंदू कोठारी, जावेद शेख, सनी मंडलिक, युनुस पटेल, अजय धाकतोडे, गोपाल भोसले, विशाल साळवे, देवेन पिडीयार, आकाश जावळे, श्रेयस रोटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Monday, January 29, 2024

लोकशाही सक्षम होण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक- प्रांतधिकारी किरण सावंत - पाटील


 - श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
भारतीय लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदार नोंदणी होणे गरजेचे आहे,कोणताही घटक दुर्लक्षित राहता कामा नये यांकरिता अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांनी दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी मोलाचे योगदान दिले, दिव्यांग व्यक्ती करिता त्यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.

मतदार नोंदणी केल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा अधिकार आपण वापरला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांनी केले.

मतदार नोंदणी अधिकारी २२० श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ संघ श्रीरामपूर,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना आणि सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा येथील सी.डी.जैन काॅलेज ऑफ कॉमर्स यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते.
दिव्यांग मतदार जनजागृती अभियान राबवून दिव्यांग मतदार नोंदणीसाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल श्रीरामपूरच्या आसान दिव्यांग संघटनेला निवडणूक मित्र पुरस्कार संघटनेचे संस्थापक संजय साळवे व सचिव वर्षा गायकवाड यांना प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,सी डी जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,ॲड.प्रसन्ना बिंगी यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. डी. जैन काॅलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पिंगळे यांनी केले तर आभार सौ. पाटील यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
=====================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Sunday, January 28, 2024

वाहन चालविताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी - महेश देवकाते


*रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियम जन जागृतीकरीता पेण शहरात मोटार सायकल रॅली*

पेण प्रतिनिधी:
केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला पेण येथील बायपास रोड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी मोटरसायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
ही मोटरसायकल रॅली पेणमधून काढण्यात आली होती. यामध्ये विविध खासगी, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारीवर्ग तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून सहभाग घेतला होता. या वेळी पेण आरटीओ कार्यालयाच्या वतीने मोटरसायकल तसेच वाहन चालकांना वाहतुकीचे सर्व नियम पाळावे, असे सांगण्यात आले. तसेच या वेळी हेल्मेटचा वापर करणे, सिट बेल्ट लावणे, उजवी- डावी बाजू पाहणे, वेगावर नियंत्रण ठेवणे या सर्व गोष्टींचे पालन करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. यावेळी बोलताना आरटीओ अधिकारी महेश देवकाते म्‍हणाले की, वाहनधारकांनी वाहन चालविताना आपल्यासह इतरांच्याही सुरक्षिततेची जबाबदारी घ्यावी. यामुळेच अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होतील. तसेच या अभियानाद्वारे विविध ठिकाणी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळूनच वाहने
 चालवावीत, असे त्यांनी सांगितले. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, सहाय्यक अधिकारी माधव सूर्यवंशी, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरमे, अधिकारी अनिल बागवान, सुरेश तुरकणे, प्रशांत बच्छाव, सहायक वाहन निरीक्षक नंदन राऊत, दत्तात्रेय जगताप, अभिजित तेरी, जगनाडे, दिनेश शर्मा, समीर चव्हाण आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न


 - श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत सालाबादप्रमाणे मुलांच्या कलागुणांचा विकास व्हावा तसेच शैक्षणिक अध्ययना बरोबर व्यावसायिक,अध्यात्मिक, साहित्यिक ज्ञान अवगत व्हावे यासाठी शाळेच्या माध्यमातून सतत वर्षभ विविध उपक्रम राबविण्यात येतात,आनंद बाजाराचे आयोजन यामुळे विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने काही विद्यार्थी घरगुती भाजीपाला तसेच शालेय साहित्य, मिठाई, कपडे, चप्पल, बूट अशा विविध स्वरूपात विक्री करण्यासाठी स्टॉल लावतात. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय वृद्धी तसेच बौद्धिक विकास याचा लाभ होण्यास मदत होते यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी प्रमुख पाहुण्या मनीषाताई आगाशे व पूजाताई नगरकर तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे नैसर्गिक शेती तज्ञ साबदे काका व किशोर अण्णा थोरात यांनी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले व स्वतःच्या शेतामध्ये पिकविलेला सेंद्रिय भाजीपाला विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवला तसेच या कार्यक्रमाला बॉबी बकाल, देवाभाई चौधरी, भरत भाटिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार, मंजुषा कसार,ज्ञानेश्वरी तुंगार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आनंद बाजारचे सूत्रसंचालन सारिका कोते व रेखा पाटील यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Saturday, January 27, 2024

मोहमदिया एज्युकेशन सोसायटीत ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा


- अहमदनगर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
 येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स् अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दु) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी प्रजासत्ताक दिना बद्दल बोलतांना “धार्मिक एकात्मता व अखंडता” व भारतीय
घटनेबद्दल आपले सखोल व सविस्तर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरीदा भाभी तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिर्झा नवेद गयासबेग, शेख शरफुद्दीन जैनोद्दीन व इतर सभासद तसेच मुख्याध्यापक नौशाद सय्यद व सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यायाचे सर्व प्राध्यापक वृंद इत्यादी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.
सुत्रसंचालन बहार सय्यद यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन फरीदा जहागिरदार यांनी केले व शेवटी तलमीज सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अबीदखान, अहमदनगर*
===============
*सहयोगी*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Friday, January 26, 2024

श्रीरामपूर बाजार समितीचा १२ कोटी २४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर -सभापती सुधीर नवले


आजवरच्या इतिहासात संस्थेला उच्चांकी उत्पन्न व नफा-

 श्रीरामपूर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १२ कोटी २४ लाख ५१ हजार ६८१ चा मुळ अर्थसंकल्प पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर केला असुन संस्थेला आजवरच्या वाटचालीत विक्रमी उत्पन्न व नफा मिळाला असल्याची माहिती सभापती सुधीर पा. नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे पा .यांनी दिली आहे

श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या कामकाजा विषयी माहीती देताना सभापती सुधीर नवले व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी पुढे सांगितले की, संस्थेची दि.३० एप्रिल २०२३ रोजी निवडणूक होऊन दि.१३ मे २०२३ मा.आ.भानुदास मुरकुटे व युवा नेते करण दादा ससाणे यांच्या नेतृत्वाखाली नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. संस्थेला डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजार ६६० रुपयांचे उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजार ५८२ रुपयांचा नफा झाला आहे.
या बजेटमध्ये मुख्य बाजार आवारात ८ कोटी १३ लाख व बेलापूर व टाकळीभान उपबाजार आवारातील १ कोटी ९५ लाखांची नियोजित बांधकामे समाविष्ट आहेत. तसेच संस्थेमार्फत एक नवीन उपबाजार, टाकळीभान येथे पेट्रोल पंप उभारणे, जनावरांच्या बाजार वाढीसाठी आवश्यक ते प्रयत्न करणे, फळे व भाजीपाला विभागात शितगृह उभारणी, नवीन डाळिंब मार्केट सुरु करणे आदी कामे करण्याचा मानस आहे. संस्थेला आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ४३ लाख ७२ हजारांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असुन ७१ लाख ७० हजारांचा नफा मिळाला आहे, आजवरच्या वाटचालीत हे उत्पन्न आणि नफा उच्चांकी असल्याचे सभापती नवले यांनी सांगितले. संस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक व काटकसरी पद्धतीने सुरु असल्याची माहिती प्रभारी सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

तसेच संस्थेच्या बँकेत तीन कोटी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी एक कोटी अशा एकुण चार कोटींच्या मुदत ठेवी आहेत. पणन संचालक यांच्याकडे चार कोटींची कामे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचेही सभापती नवले व प्रभारी सचिव वाबळे यांनी सांगितले.


=================================
*पत्रकार देवीदास देसाई -बेलापूर*
====================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

तहसील कार्यालयाच्या नुतन इमारतीमधुन शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
नेवासा येथे उभारण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीमधून शासनाच्या धोरणांची, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याबरोबरच
 सर्वसामान्यांची कामे वेळेत मार्गी लागून त्यांची अपेक्षापूर्ती व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे महसूल,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे
 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.


नेवासा येथे तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकरझ अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, नितीन पाटील, दीपक पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Lपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगिण विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन अनेकविध योजना राबवत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मूलमंत्र घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा वेगाने विकास होत असल्याचेही ते म्हणाले.

शिर्डी व अहमदनगर येथे औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या काळात या वसाहतीमध्ये मोठं मोठे उद्योग येऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. नजीकच्या काळात अहमदनगर येथे भव्य अशा महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून या मेळाव्यासाठी ४०० ते ५०० कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यातून जिल्ह्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नेवासा येथे ज्ञानेश्वर मंदिर व परिसराचा विकास करण्याचा संकल्प केला असुन या ठिकाणी ज्ञानेश्वर सृष्टी निर्माणाचा आराखडा तयार करण्याच्या प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. या विकास कामांसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले.

कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा धनादेश, कृषी विभागामार्फत लाभार्त्याना ट्रॅक्टरचे वितरण, उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभाचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच इमारतीसाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांचा पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



राजळे महाविद्यालयात माजी सैनिकांचा सन्मान


वजीर शेख/प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गेल्या १९ वर्षांपासून सातत्याने दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेतील दादा पाटील राजळे कला व विज्ञान महावि‌द्यालयात साजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो .

यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी,जवखेडे-खालसा, जवखेडे दुमाला, कासारवाडी, ढवळेवाडी, चितळी, पाडळी, कोपरे, कामतशिंगवे, निवडूंगे, मांडवे, माळीबाभुळगाव, धामणगांवदेवी, पाथडी-शहर, शिरापूर, सुसरे, साकेगाव,

 पागोरीपिपळगाव, कान्होबावाडी, सातवड, दगडवाडी, भोसे आणि वैजुबाभूळगाव, लोहसर इत्यादि गावातील एकूण ३४८ माजी सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करून वि‌द्याथ्यांऀच्या मनात देशसेवा आणि देशप्रे

निर्मितीबद्दलचे भाव रुजविण्याचे प्रयत्न करण्यात आले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये शुक्रवार दिनाक

२६ जानेवारी २०२४ रोजी खांडगाव आणि जोहारवाडी तालुका: पाथडीऀ येथील २० माजी सैनिकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. महाविद्यालय प्रांगणात सैनिकांच्या आगमन झाल्यानंतर प्रथमतः शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादा पाटील राजळे तथा भाऊ यांच्या समाधी स्थळाचे सर्वांनी दर्शन घेतले. यानंतर राष्ट्रीय झेंड्याला सलामी देऊन जनगणमन व 'झेंडा उंचा रहे हमारा' या राष्ट्रगीतांचे गायन झाले.
 या सत्कार सोहळ्याप्रसगी जोहारवाडी येथील माजी सैनिक म्हणून श्री ब्रह्मदेव जगन्नाथ सावंत, श्री गोरक्ष इंद्रजीत सावंत, श्री म्हातारदेव बाजीराव सावंत, श्री भास्कर किसन सावंत, श्री रामराव सोमनाथ चव्हाण, श्री भगवान गणपत शेरतपे, स्वर्गीय पुंजा धोंडीबा सावंत यांचे प्रतिनिधी श्री दादासाहेब पुंजा सावंत, स्वर्गीय नवनाथ इंद्रजीत सावंत यांचे प्रतिनिधी श्री विजय नवनाथ सावंत उपस्थित होते. आणि याचप्रसंगी खांडगाव येथील माजी सैनिक म्हणून श्री बबन नामदेव ससे, श्री भाऊसाहेब बन्सी जाधव, श्री छत्रपती कारभारी वांढेकर, श्री भाऊसाहेब मोहन वांढेकर, श्री काशिनाथ नामदेव चव्हाण, श्री संभाजी लक्ष्मण पवार, स्वर्गीय विलास दामोदर शेरकर यांच्या प्रतिनिधी गंगा भागीरथी चंद्रकला विलास दामोदर, श्री रामकिसन विठ्ठल साळवे, श्री सावित्राबा धोंडीबा वांढेकर, श्री रसिक कुंडलिक दानवे यांच्या प्रतिनिधी सौ. संगीता रसिक दानवे, श्री देवराव बळवंत भंडारे, श्री भाऊसाहेब गुजाबा जगदाळे, तसेच फ्लिपकार्टचे एरिया मॅनेजर श्री दाणवे राहुल रसिक उपस्थित होते.

   सत्कार प्रसंगी या सर्वांना विद्यार्थिनींकडून रांगोळी काढून, गंधाक्षता करून त्यांना बॅडज लावून मा. मुख्याध्यापक श्री रामदास यशवंत म्हस्के सर कासार पिंपळगाव; मा. श्री डॉक्टर प्रदीप देशमुख प्राचार्य, आप्पासाहेब राजळे फार्मसी कॉलेज आणि प्राचार्य डॉक्टर राजधर जयवंतराव टेमकर दादापाटील राजळे महावि‌द्यालय, प्राचार्य श्री सुनील पानखडे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी तंत्रनिकेतन विद्यालय आदिनाथनगर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व महावि‌द्यालयाचे नियत कालिक देऊन माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना अल्पोपहार व चहापान करण्यात आले. श्री ब्रह्मदेव जगन्नाथ सावंत आणि म्हातारदेव बाजीराव सावंत यांनी आपल्या मनोगतात युद्धातील काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले . आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यक्रमातून देशसेवेचे व्रत स्वीकारावे असे आवाहन केले. यानंतर अध्यक्षीय भाषणात माननीय रामदास मस्के सर यांनी माजी सैनिकांचे आपल्या प्रति ऋण व्यक्त केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना अग्निवीर मधून निवड होण्याकरिता व्यायाम व सरावाची गरज असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत फोटो सेशन झाले.

याप्रसंगी मा. श्री वजीर शेख (पत्रकार दैनिक महाभारत व हिंदूसम्राट तसेच झी-लाईव्ह, महाराष्ट्र २४ मराठी न्यूज, तुफान क्रांती, वैराग्यमूर्ती), प्राध्यापक व सेवक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सदर सत्कार सोहळ्याचे समन्वयक म्हणून डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख (अर्थशास्त्र पदवी व पदवीव्युत्तर विभाग आणि वाणिज्य शाखाप्रमुख) यांनी पाहिले.

सदर कार्यक्रमाची प्रेरणा माननीय आमदार मोनिकाताई राजळे तसेच शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री राहुल राजळे तसेच शिक्षण संस्थेचे सचिव जे. आर. महाजन यांच्याकडून मिळाली.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अशोक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथनाट्य सादरीकरण


 श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू युवा संघटन व अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता दिन साजरा करण्यात आला. तसेच अशोकनगर परीसरात प्रभात फेरी काढून घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजी चौक येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती याविषयी पथनाट्य सादर केले आणि समाजातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.

  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सुनीताताई गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनीही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे आणि गावातील लोकांचे व्यसनमुक्ती साठी प्रबोधन केले. तसेच महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी यांनीही व्यसनमुक्ती याविषयी युवकांना मार्गदर्शन केले.

  या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा संगीता खंडीझोड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
*पत्रकार राजु मिर्जा*
============
ब्यूरो चिफ: नाशिक विभाग
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

प्रजासत्ताक दिन व स्मारकाच्या प्रथम वर्धापन दिन निमित्ताने माजी सैनिकांच्या वतीने मानवंदना


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
त्रिदल सैनिक सेवा संघ व तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्यावतीने शहीद स्मारकास ज्येष्ठ माजी सैनिक मेजर वसंतराव कराळे यांच्या हस्ते झंडा वंदन करण्यात येणार होते परंतु त्यांची तब्येत बरी नसल्याने ज्येष्ठ माजी सैनिक माजी नायब तहसीलदार राजेंद्र कांदे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.याप्रसंगी शहीद स्मारक ठेवण्यासाठी माजी सैनिकांना भरीव मदत करणारे प्रकाशअण्णा चित्ते, प्रसिद्ध उद्योगपती प्रतापराव भोसले, मिलिंदकुमार साळवे, ओमप्रकाश नारंग, देविदास चव्हाण,माजी नगरसेवक महंता यादव, यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी त्रिदल सैनिक सेवा संघाचे मेजर कृष्णा सरदार, संग्राम यादव, बाळासाहेब बनकर, रवींद्र कुलकर्णी,संजय बनकर, छायाताई मोटे,मिनानाथ गुलदगड, रामदास वाणी, अनिल लगड, रोहिदास काळे,मेजर खंडागळे, संदिप यादव भगिरथ पवार, जयश्रीताई थोरात, तसेच आजी - माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब उंडे, राजेंद्र शिंदे, घनश्याम निसळ,अनिल सिन्नरकर इत्यादी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच रावबहादूर नारायणराव बोरावके ( आर.बी.एन.बी.) महाविद्यालयाचे एनसीसी ऑफिसर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
==============
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*🌹✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


उंदीरगाव येथे पशु वैद्यकीय केंद्राची गरज


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
दि.२६ जानेवारी रोजी तालुक्यातील उंदिरगांव येथे दुपारी २ वाजता ग्रामसभा पार पडली.सर्वप्रथम ग्रामसेवक श्री. डौले यांनी ग्रामसभा इतिवृत्तांत वाचन केले,त्यानंतर सागर गिऱ्हे या ग्रामस्थाने गावामध्ये वेळेवर पाणी येत नाही,तसेच उंदिरगाव पंचक्रोशीला जोडणारे उंदिरगांव - खैरी, उंदिरगाव -गोंडेगांव, उंदिरगाव - खानापुर या रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परीषद तसेच आमदार खासदार यांना त्वरित पाठवावे तसेच शासनाकडुन पशुपालकांना मिळणारे अनुदान आणि विविध योजनांसाठी इअर टॅगींग तसेच पशुधन कार्ड साठी आपल्या गावामध्ये विलंब होत असल्याची तक्रार केली,
यासोबतच आपल्या उंदीरगावामध्ये नवीन पशुवैद्यकीय उपकेंद्र व्हावे व महीलांसाठी कमीत कमी ४ ठिकाणी बाथरुम तसेच टॉयलेट ची व्यवस्था व्हावी, इतर गावांमध्ये अद्ययावत लायब्ररीसाठी भरीव निधी उपलब्ध होतो, मग आपल्या गावाला का नाही ?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अशी खंत व्यक्त केली.
त्याचप्रमाणे दिवसेंदिवस गावात वाढलेल्या चो-या बघता,
 याआधीच केलेली सीसीटीव्ही तसेच स्ट्रीट लाईट का
 बसवले नाही असा प्रश्नही उपस्थित केला. नियमीत
 पाणीपट्टी भरणा-या ग्रामस्थांना आरओचे पाणी मोफत
 मिळण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी देखील यांनी करत ग्रामपंचायत पदाधिका-यांना धारेवर धरले.
या सर्व मागण्यांना ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील पंडीत तसेच तेथे उपस्थित ग्रामस्थांनी पुर्णपणे पाठींबा दिला.
त्यानंतर डाॅ. राजगुरु यांनी वैद्यकीय योजनांबाबत मोलाच
मार्गदर्शन केले.या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतीभाताई गोलवड या होत्या.,या ग्रामसभेला मार्केट
कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे तसेच संचालक
विरेश गलांडे,माजी उपसरपंच रमेश गायके तसेचबाळासाहेब निपुंगे सदस्य स्वप्नील पंडीत, गिरीष परदेशी, उज्वला शेळके, प्रकाश ताके,रामचंद्र आव्हाड,सुनिलताके, मुन्नाभाई इनामदार,विरेश बोधक,अविनाश काळे,आदित्य बारहाते,आप्पा डोखे,हाजुभाई सय्यद तसेच इतर ग्रामस्थ तसेच महीला भगीनी उपस्थित होत्या.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 25, 2024

नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी करत मतदान प्रक्रियेत अधिक संख्येने सहभागी व्हावे



ऑनलाईन सुविधेचा वापर करत युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

*जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय*
 *मतदार दिवस उत्साहात साजरा*

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नवयुवकांनी मतदार म्हणून नोंदणी करत मतदान प्रक्रियेत अधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १४ व्या राष्ट्रीय
 मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्री. सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर

 जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील, उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील, उपजिल्हाधिकारी जयश्री आव्हाड, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, दिव्यांग मतदार अलका, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, देशात साजरा होत
 असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्याच्या मतदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प आपण सर्व मिळून यानिमित्ताने करूयात. मतदार यादीत समानता असली पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व घटकांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. मतदारांची संख्या वाढविण्यासाठी बी. एल. ओ. पासून ते वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी जागरूकपणे काम केल्यामुळे मतदारांची नोंदणी वाढली आहे. या प्रक्रियेत शिक्षक,विविध विभागांचे कर्मचारी, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सहभाग महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 मतदान जागृती मोहिमेत १ लाख २५ हजारापेक्षा अधिक नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात मतदान नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी व्यक्त केला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना मतदान कार्डचे
 वाटपही करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,

 सहायक मतदार नोंदणी अधिकारी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे तर मतदार जागृतीच्या उत्कृष्ट कामाबद्दल तहसीलदार संजय शिंदे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल पाटील यांनी केले.
यावेळी नवमतदारांनी आपल्या मनोगतातून सर्वांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मतदान जागृतीसाठी विश्वभारती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्त्यांनी पथनाट्यही सादर केले. शालेय विद्यार्थ्यांच्या ढोल व लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी नवमतदारांना प्रतिज्ञाही देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार निवडणूक शाखेचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मानले.
कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्राध्यापक यांच्यासह शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त* *शालेय विद्यार्थ्यांची रॅली संपन्न


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आनंद माध्यमिक विद्यालयापासुन सुरुवात झालेल्या या रॅलीस उपजिल्हाधिकारी निवडणूक राहुल पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली.


यावेळी उप‍ विभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आनंद माध्यमिक विद्यालयापासुन सुरुवात झालेली ही
 रॅली पारिजात चौक- स्वामी समर्थ मंदिर येथुन निघून

 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विसर्जित करण्यात आली. मतदार जागृतीसाठी विद्यार्थ्यांच्या हातातील
 फलक व घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणुन गेला होता.
 हे फलक व घोषणा सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेत
 होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Wednesday, January 24, 2024

हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांची निवड

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या समाजाला जाणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांची नुकतीच हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली.

 नगर येथे सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतीच हिंद सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक त्यांच्या अध्यक्षतेखाली तर कार्याध्यक्ष अनंतराव फडणीस मानद सचिव संजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थित झाली.

  श्री गुलाटी यांनी श्रीरामपूर नगर परिषदेत नगरसेवक ते उपनगराध्यक्ष सह अनेक समितीवर गेल्या अनेक वर्षापासून काम पाहत राजकारणासह समाजकारणात देखील श्री गुलाटी यांनी जय मातादी मित्र मंडळ च्या माध्यमातून दरवर्षी शहरात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. त्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. जय मातादी मित्र मंडळ मार्फत रक्तदान शिबिर गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकाचे वाटप तेवढेच नव्हे तर जय मातादी मित्र मंडळ मार्फत दरवर्षी वैष्णोदेवी यात्रेचे आयोजन करून हजारो भाविकांचे वैष्णोदेवी दर्शन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो तसेच अहमदनगर जिल्हा केमिस्ट व डिग्रिस्त असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळे आरोग्य शिबिर देखील शहरासह अनेक ग्रामीण भागात घेत असतात सहकारात देखील जय मातादी नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायला आर्थिक कर्ज पुरवठा करून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. अशा अनेक समाज कामात गुलाटी यांचं काम असल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व समजणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली.

 या निवडीच्या वेळी सुमतीलाल कोठारी, अजित बोरा,पारस कोठारी,संजय छल्लारे,अशोक उपाध्ये,दत्तात्रय साबळे ,भरत कुंकलोळ, राजेश अलग, अनिल देशपांडे, रणजीत श्रीगोड, बबन मुठे, डॉ दिलीप शिरसाट,मोहन कुकरेजा,राजेंद्र जोशी ,मोहन कथुरिया ,सुनील बोलके ,सुशील गांधी, अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड,दीपक कुराडे, योगेश देशमुख ,चंद्रकांत संगम,डॉ. रमेश झरकर ,अनिल भनगडे ,अरुण धर्माधिकारी,विजय सेवक ,चेतन भुतडा, शशिकांत भुतडा ,देविदास चव्हाण ,डॉ,जोत्सना तांबे, सौ वैशाली जोशी सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.या निवडीचं गुलाटी यांचं सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- सह, संपादक - जितेश बतरा श्रीरामपूर - संकलन वार्ता - ✍️✅🇮🇳 +919890720961
-----------------------------------------------
=================================



समाजवादी च्या जिल्हाध्यक्षपदी जोएफ जमादार यांची नियुक्ती

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जोएफ जमादार यांची समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबु आझमी यांच्या आदेशान्वये

समाजवादी पक्षाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 श्री.जमादार पुर्वी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असताना त्यांनी पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले तथा उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवत त्यांना उचित न्याय मिळवून देणेकामी सातत्याने संघर्ष केला असल्याने

त्यांच्या अशा या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून पक्षाने त्यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे.

यावेळी नियुक्ती पत्र देताना समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महासचिव परवेज़ सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव रऊफ शेख,महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रताप होगाड़े, युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फहद अहमद, माजी नगरसेवक शान ए हिंद,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती साजेदा निहालअहमद (मालेगांव), धुळे शहराध्यक्ष गुड्डू काकर, धुळे येथील माजी नगरसेवक डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक अमीन पटेल,जमील मन्सूरी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.जमादार यांच्या या नियुक्ती बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

पक्षाचे आपल्यावर टाकलेला विश्वास आणी जबाबदारी यास पुर्णपणे सार्थ करण्याचा प्रयत्न करणार असुन पक्ष वाढीसाठी आहोरात परिश्रम घेवून कार्यकर्त्यांची मोठी फळी जिल्ह्यात उभी करुन जनसामान्यांचे ज्वलंत प्रश्न आणी त्यांच्या न्याय हक्कासाठींचा लढा हा अधिक जोमाने पुढे नेणार आहे सोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकीत समाजवादी पक्ष पुर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याचे यावेळी जोएफ जमादार यांनी सांगितले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
===================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, January 23, 2024

प्रत्येकामध्ये वाचन संस्कृती रुजवत आपली भाषा व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावेत - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


- अहमदनगर -  जिमाका -/ वृत्तसेवा -
आजच्या आधुनिकतेच्या युगात जागतिकीकरण अत्यंत वेगाने होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातुन संपुर्ण जग अगदी हातामध्ये आले असले तरी ऊर्जा, शक्ती, विचार देण्याची ताकद पुस्तकांमध्येच आहे. प्रत्येकामध्ये वाचन संस्कृती रुजवत आपली भाषा व विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या पंधरवड्यातून व्हावे,अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, तहसिलदार शिल्पा पाटील, शिक्षणाधिकारी श्री. कडूस, डॉ. संजय कळमकर, डॉ.संजय गोरडे, गणेश मरकड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये आपण मराठी भाषेचा वापर करत असतानासुद्धा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा साजरा करावा लागत आहे. या विषयावर गांभिर्याने विचार होणे गरजेचे आहे.जीवनाला दिशा देण्याची ताकद पुस्तकांमध्ये आहे. येणाऱ्या काळात भाषा संवर्धनाची जबाबदारी पुढच्या पिढीवर असल्याने पुढच्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रूजविण्याची गरज असल्याचेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यावेळी म्हणाले.

 पुस्तके प्रत्येक घरात तसेच मुलांपर्यंत पोहोचली पाहिजेत. यासाठी मोबाईल लायब्ररीसारखा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज असुन प्रत्येक शाळा, महाविद्यालयात वाचन कक्ष सुरु करण्यात यावेत. विरंगुळ्याच्या ठिकाणी पुस्तके पोहोचली पाहिजेत. सर्व आव्हाने पेलत मराठी भाषेचे संवर्धन, जतन व विकास होण्यासाठी केवळ पंधरवडा न साजरा करता ही एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी व्यक्त केली.

उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ म्हणाल्या की, मराठी भाषा संवर्धनासाठी वाचनाचा छंद जोपासणे गरजेचे आहे. साहित्यातूनच मराठी भाषा जोपासली जावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

साहित्यिक डॉ. संजय गोरडे म्हणाले की, आपले जीवन दु:खमुक्त केवळ ज्ञानानेच होऊ शकते. आपल्याला ज्ञान देऊन समृद्ध करण्याची ताकद केवळ ग्रंथांमध्ये आहे. जीवनातील विरोधाभास दूर करण्याचे सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. जीवनाला एक योग्य दिशा देऊन जीवन आनंदी बनविण्यासाठी प्रत्येकाने ग्रंथांना शरण जात वाचनाची सवय अंगिकारण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

साहित्यिक डॉ. संजय कळमकर म्हणाले की, मोबाईलच्या अतिवापरामुळे पुस्तके वाचण्याची सवय लोप पावत चालली आहे. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथवाचनाची सवय प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज असुन सामर्थ्यावान आयुष्यासाठी प्रत्येकाने ग्रंथांशी मैत्री करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विविध पुस्तकांचा समावेश असलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही या ठिकाणी उभारण्यात आले होते. हे प्रदर्शन या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधुन घेत होते.
कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा युवकांवर प्रभाव - ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा' असा नारा देणारे नेताजी सुभाष चंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील असामान्य व प्रतिभा शाली नेते होते. तर शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नेताजी सुभाष चंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते.

ससाणे पुढे म्हणाले की भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुभाष चंद्र बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली. ते क्रांतीकारकांचे स्फूर्ती स्थान होते. सुभाष चंद्र बोस यांच्या देशभक्तीने अनेक भारतीयांच्या मनावर कायमची छाप पाडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांच्या असामान्य वकृत्वामुळे महाराष्ट्राच्या जनतेत त्यांच्याविषयी नेहमीच आदर होता.आपल्या असामान्य कर्तुत्वाने त्यांनी मराठी माणसांच्या मनात घर केले. याप्रसंगी नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, माजी नगरसेवक दिलीप नागरे, के.सी. शेळके, आशिष धनवटे, मर्चंट चे संचालक निलेश नागले, प्रवीण नवले,रावसाहेब आल्हाट, सुरेश ठुबे, अशोक जगधने, डॉ राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, युवराज फंड, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, रियाजखान पठाण, भगवान जाधव, युनुस पटेल, लक्ष्मण शिंदे, गणेश काते,संजय गोसावी, योगेश गायकवाड, अजय धाकतोडे, विशाल साळवे, सुरेश बनसोडे, राजेश जोंधळे, श्री पवार, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
(ब्यूरो चिफ नाशिक विभाग)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================