राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 1, 2024

श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल - मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २०२२-२३ वर्षामध्ये
अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे नुकसानीचे
 सरसकट पंचनामे करुन वंचित राहिलेल्या सर्व शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी असे
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने श्रीरामपूर प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की,
राज्य सरकारने आदेश देवुन महसूल अधिकाऱ्यांना
 सांगितले आहे की सर्व शेतकऱ्यांचे बांधावर जाऊन
 सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करावे, असे असताना देखील श्रीरामपूर तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले श्रीरामपूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन आपले महसुलचे सर्कल अधिकारी, तलाठी हे व्यवस्थित रित्या पंचनामा करुन आपल्याकडे व शासनाकडे शेतकर्‍यांचे नाव,गाव, पत्ता बँकेचे अकौंट नंबर, पासबुक झेरॉक्स व्यवस्थित न दिल्याने अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. तसेच अनेक शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतजमीनीचे सर्कल व तलाठ्याने पंचनामे न करता शेतकर्‍यांकडूनच फोटो व माहिती मागून घेऊन अर्धवट माहिती आपल्या महसुल अधिकार्‍यांनी शासनाकडे पाठविले. आपल्या महसुल अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.अनेक शेतकर्‍यांनी आमच्याकडे तक्रार केले आहे. आपण स्वत: पुढाकार घेऊन सर्व शेतकर्‍यांशी संवाद साधून खरच महसुल अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधवर जाऊन पंचनामा केला की नाही याची शाहनिशा करुन दोषी आढळणार्‍या अधिकार्‍यांवर कामात कर्तव्य कसुरु केल्याबद्दल त्यांना बडतर्फ करुन त्यांचे विरुद्ध कठोर कायदेशीर शासन करुन गुन्हे दाखल करण्यात यावे. जेणे करुन यापुढे कामात कामचुकारपणा होणार नाही व आपला अन्नदात्या शेतकर्‍यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी काळजी यापुढे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना आपण आदेश द्यावे . आमच्या निवेदनाची दखल घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांना त्वरीत अनुदान (मदत) देण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, आंदोलन प्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास श्रीरामपूर येथील महसूल अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असेही मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले.
याप्रसंगी बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष,विलास पाटणी,मनसे उपजिल्हाध्यक्ष,गणेश दिवसे मनसे
 तालुकाध्यक्ष,
सतिश कुदळे मनसे शहराध्यक्ष, संतोष धुमाळ प्रसिद्धीप्रमुख डॉक्टर संजय नवथर, भास्कर सरोदे,नितीन जाधव, ऋषभ बर्वे प्रसाद परे,अमोल साबणे, संदीप विशंमभर,सुरेश शिंदे, दीपक सोनवणे,राजू जगताप, सुरेश शिंदे, विकी परदेसी, नितीन खरे, मारुती शिंदे, आदी. पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment