- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या १ लाख सहकारी बांधवांना अहमदनगर येथे श्रीरामपूरकर जेवण देणार आहेत. यासाठी श्रीरामपूर तालुक्यात जोरात तयारी सुरू आहे.याच कार्याला हातभार लावण्यासाठी उंदिरंगाव येथे दिनांक १२ जानेवारी २०२४ ला श्री स्वामी समर्थ केंद्रात मराठा बांधवाची बैठक झाली. त्यात रोख रक्कम जमा करण्याचा निर्णय झाला. ठरल्याप्रमाणे ७ दिवसात ज्याला जी रक्कम देण्याची इच्छा असेल ती वर्गणी गोळा करण्यात आली.
सदर वर्गणी गोळा करण्यात बाळासाहेब घोडे,प्रकाश ताके, दिलीप भालदंड,सतीश नाईक, नवनाथ गायके,सुनील ताके, सुनील भालदंड यांनी मोलाची भूमिका बजावली.
जमा झालेली सर्व रक्कम *₹ ४१,०००/-* व त्या रकमेचा हिशोब आज मराठा समाज ऑफिस श्रीरामपूर येथे पोहच करण्यात आला आहे.
=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment