- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
राजमाता जिजाऊ यांची शिकवण आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहेत. छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊ होत्या. तर स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्त्वाचा प्रसार संपूर्ण जगभर पसरविण्याचे काम केले. त्यांचे विचार आजही तरुणांना प्रोत्साहन देणारे असल्याचे प्रतिपादन मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त श्री.मुरकुटे यांनी प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक बँकेचे चेअरमन अॅड्. सुभाष चौधरी, अॅड्.पृथ्वीराज चव्हाण, विशाल धनवटे, प्रमोद करंडे, पत्रकार सुरेश कांगुणे, कैलास भागवत, जयेश परमार, संजय वेताळ आदी उपस्थित होते.
तसेच अशोक साखर कारखाना कार्यस्थळावर राजमाता जिजाऊ भोसले व स्वामी विवेकानंद यांचे जयंती निमित्त व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, मॅनेजर ऍग्री नारायण चौधरी, चीफ अकाऊंटंट मिलिंद कुलकर्णी, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, बाबासाहेब तांबे, विलास लबडे, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment