पुणे (वाघोली) प्रतिनिधी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा २३ जानेवारी रोजी मुंबईकडे जात असताना वाघोली (पुणे) येथे आगमन होताच. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवणाची, अन्नदानाची स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी, कटकेवाडी, रामनगर , गाढेवस्ती येथील सर्व तरुण सकल मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबईकडे जाणाऱ्या सर्व आंदोलक सकल मराठा बांधवांकरिता जेवणाची , पाण्याची व्यवस्था कटकेवाडी चौकात अतिशय नियोजनबद्ध केली. येथील सर्व तरुण युवकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत नियोजन केले होते.यासाठी सर्व नियोजक तरुण वर्गांकरिता देखील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.
=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment