स्वसंरक्षण ही काळाची गरज - ज्येष्ठ विचारवंत सुधीर कसार
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली होती, जुनी ग्रामपंचायत चौकात येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुधीर पाटील कसार यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करत स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केले तसेच आपले रक्षण आपणच करावयाचे आहे असेही श्री. कसार पाटील यांनी यावेळी सांगितले, वयाच्या ८० व्या वर्षी लाठीकाठी फिरवून तसेच तलवारबाजी व इतर साहित्याच्या साधनाने आपण संरक्षण कसे करू शकतो याची प्रचिती श्री. कसार यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवीली,
याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. सुधीर पा कसार यांच्या समवेत श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी चि. आदर्श ढाकले याने देखील प्रात्यक्षिक सादर करताना सुधीर कसार यांची मदत केली त्याबद्दल दोघांचेही वडाळा महादेव ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले व छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी याप्रसंगी सर्वांचेच आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
=================================
-----------------------------------------------
No comments:
Post a Comment