- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील न्यायालयात मुठेवाडगांव येथील शेती व पाणी प्रश्नी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे १८ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या आसूड आंदोलनावेळी पाटबंधारे कार्यालयात अधिकाऱ्यांना काळे फासल्याच्या प्रकरणात शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील व आ. बच्चू कडू यांच्यासह १९ जणाविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता, त्यासाठी श्रीरामपूर न्यायालयात आ.बच्चू कडू आले असता त्यांची प्रहार संघटनेच्या वतीने जामखेड तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, शीतल गोरे,रामपूर सरपंच नितीन शिंदे यांच्या वतीने आ.बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी एका महिला पतसंस्थेकडून अनेक खातेदार,सभासद यांना योग्य माहिती न देणे,अशा अनेक तक्रारीचे निवेदन, अनेक कर्जदार, सभासद यांनी प्रहार जनशक्तीच्या वतीने आ.बच्चू कडू यांना देण्यात येवून आपल्या समस्या त्यांचे समोर मांडण्यात आल्या.
त्याचप्रमाणे संबंधित महिला पतसंस्थेची पदाधिकारी असलेल्या एका महिलेने, खातेदार असलेल्या एका महिलेस अनेकवेळा फार त्रास दिला व चक्क आत्महत्यास करण्यास प्रवृत्त करीत असल्याबाबत त्रस्त खातेदार महिलेने अनेक वेळा पोलिसांना निवेदने दिली. परंतु पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तथा संबंधित पतसंस्थेच्या महिला पदाधिकारी यांचेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे आ.कडू यांच्या निदर्शनास आणून दिले,यावर आ.कडू यांनी तातडीने दखल घेऊन शहर पोलीस स्टेशनला योग्य ती कारवाई करणेबाबत सूचना दिल्या.
यावेळी चंदन मुथा,भारती वाणी,उषा साळुंके,नितीन शिंदे,तन्वीर शेख,अमोल गहिरे,अनिल गांगुर्डे,शिवा गहिरे,साईनाथ त्रिभुवन आदी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११
No comments:
Post a Comment