- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
स्त्री शक्ती जागरूक असली तरच मुलांवर योग्य संस्कार करू शकते, आपल्या मुलांना योग्य वळण लावू शकते, ज्या घरातील स्त्री कडक आहे त्या घरात छत्रपतींचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही, त्या साठी प्रत्येक स्त्रीने जीजाऊ होण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे. या जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर, संत निळोबा, महंत रामगीरीजी महाराज, गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज असे थोर साधु संतांचा हा जिल्हा आहे. याच जिल्ह्यातून हे विश्वची माझे घर म्हणत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लीहीला. ज्ञानोबा परदेशाला समजले पण अद्यापपर्यंत आपल्या घराघरात पोहचले नाही पण तरीही आपला भारत देश हा माऊलीच्या दृष्टीने या विश्वाचे देवघर असल्याचे प्रतिपादन पुणे येथील सुप्रीयाताई साठे महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान प्रांगणात शारदीय नवरात्रौत्सवानिमीत्त आयोजीत गाथा पारायण, दुर्गासप्तशदी पाठ व जाहीर हरीकिर्तन महोत्सवप्रसंगी कीर्तन सेवेत उपस्थीतांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगीतले. यावेळी निवृत्ती महाराज विधाटे, प्रसाद महाराज गायकवाड, किरण महाराज हराळे, ऋषीकेश महाराज शेटे, आण्णासाहेब चौधरी तसेच सोहळ्याचे कार्यवाहक ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड आदि प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.
इतर धर्मात ज्याप्रमाणे बालवयापासून धर्माची बंधनं घालत संस्कार केले जातात त्याप्रमाणे आपल्या घरात नियमीत सुख व शां:ती मिळविण्यासाठी आपल्या मुलांना योग्य वयात अध्यात्मीक शिक्षण द्या, योग्य वेळीच योग्य वळण लावा, हि जबाबदारी पार पाडताना त्या कुटूंबातील, घरातील स्त्री हि जागरूक व संस्कारशिल असावी लागते. देवाजवळ जाण्यासाठी संतांजवळ जावे लागते, कारण संत हे आपल्याला अध्यात्माच्या मार्गाने देवाजवळ जाण्याचा मार्ग दाखवितात. त्याच बरोबर आपल्याला अध्यात्मीक उर्जा देण्याचे कार्य करत असतात. भगवंत आपल्या कडून जेव्हा एखादी गोष्ट काढून घेत असतो त्या वेळी त्याच्या लाखपटीची गोष्ट आपल्याला दिल्याशिवाय राहत नाही, त्यासाठी आपली दृष्टी व कर्म तशी असावी लागतात.
परमार्थ करताना आपल्याकडे उर्जा व शक्ती असावी लागते, त्यासाठी प्रथम शक्तीची उपासना करावी लागते. अध्यात्मीक शक्तीला जवळ केले तर आपले पुण्य वाढते, याच पुण्याच्या जोरावर आपण त्या पांडूरंग परमात्म्याशी एकरूप झाले तरच आपल्याला सुख प्राप्त होत असते. जीवंतपणी सुख मिळावे अन् मृत्यूनंतर मुक्ती मिळविण्यासाठी श्रीहरीचे पाय धरा. आज आपल्या मुलांकडे जन्मत:च मोबाईल आला आहे, त्यातून तो नेहमीच मोबाईलच्या संपर्कात जातो अन् नको त्या गोष्टीत अडकतो, इतकेच नाही तर तो कधी ही अध्यात्माकडे वळत नाही पर्यायाने त्यावर योग्य वयात, योग्य संस्कार होत नाही, याचे दुष्परीणाम कुटुंबातील सर्वांनाच भोगावे लागतात. त्यासाठी आपल्या मुलांना बालवयापासून आपला धर्म, संस्कार व अध्यात्म शिकवा म्हणजे त्याला आपल्या धर्माबद्दल आसक्ती निर्माण होवून तो भविष्यात आपले संस्कार व संस्कृती जपल्याशिवाय राहणार नाही असे हि यावेळी सुप्रीयाताई साठे यांनी सांगीतले.
यावेळी गयाबाई शेळके, कल्पना आसावा, सुशिलाबाई काळे, शेवंताबाई बेरड, संगीता लोखंडे, जयश्री छल्लारे, अनिता पाचपिंड, लक्ष्मीबाई मते, मच्छींद्र काळे, पोपट वाकडे, दिपक पटारे, सखाराम दिवटे, प्रकाश आहेर, माजी सरपंच दत्तात्रय आहेर, जितेंद्र छल्लारे, सिताराम शिंदे, अशोक शिंदे, भानुदास अभंग, भास्कर विधाटे, विठ्ठल शेळके आदिंसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थीत होते. किर्तन सेवेनंतर येथील संदिप अमोलीक, मुन्वर सय्यद, भाऊसाहेब काळे, गोरख अमोलीक यांनी खिचडी फराळ महाप्रसादाचे अन्नदान केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment