- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व "शिवप्रहार"च्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह "श्रीरामपूर जिल्हा" व्हावा या मागणी करताच्या साखळी उपोषण आंदोलनाचा आज दि.१० ॲाक्टोबर २०२४ रोजी ५६ वा दिवस आहे.
श्रीरामपूर शहरातील वार्ड ०७, बेलापूररोड, बजरंगनगर या ठिकाणी चालू असलेल्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मुंडन आंदोलन करण्यात आले.
४० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री / उपमुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आले. ५० दिवस पुर्ण झाल्यावर काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला.
श्रीरामपूरसह नगर जिल्ह्याच्या इतिहासात ५६ दिवस इतक्या दीर्घकालीन आंदोलन झाले नाहीये. तरीदेखील जर अजूनही सरकार दखल घेणार नसेल, आचारसंहितेआधी सरकार मागण्यांबाबत ठोस कृतीशील कार्यवाही करणार नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर सर्व व्यापारी बांधव, श्रीरामपूर जिल्हा कृती समिती सदस्य व शिवप्रहारच्या मावळ्यांसोबत विचारविनिमय करून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल असे शिवप्रहारप्रमुख,माजी पी.एस.आय सुरजभाई आगे यांनी स्पष्ट केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳... B
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment