- श्रीरामपूर शहरात वाहनांची पार्कीग रस्त्यावर आल्याने नेहमीच अशी वाहतूक कोंडी निर्माण होते. - (छाया अमोल कदम) -
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील रस्त्याचा ताबा अनधिकृत पार्कीगने घेतला आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या अबालवृध्द, विद्यार्थी आदींसह प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. मेनरोड, छत्रपती शिवाजी रोड, संगमनेर रोड, बेलापूर. रोड आदी रस्त्यांवर रोजच मोठी वर्दळ असते. परंतु पार्कंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने शहरात वाहतूक कोंडींची समस्या नित्याची झाली आहे. याकडे पोलीस व नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील ठिकठिकाणी व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीमधील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावरच आहे. वर्षानुवर्षांपासून वाहनांची मोठी
गर्दी होत असताना, पार्किंगचाही प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. शहरात खरेदीसाठी कुटुंबासह आलेल्यांना वाहन लावायचे कोठे? असा प्रश्न दररोज पडत आहे. हा महत्वाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पार्किंगची सुविधा मिळत नसल्याची स्थिती वर्षानुवर्षे प्रत्येकाला अनुभवायला मिळत आहे.
ठिक ठिकाणची व्यापारी संकुले आणि इमारतींमधील पार्किंगच्या जागा गायब झाल्याने नागरिक रस्त्यालगत वाहने लावतात. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहराचा = विस्तार वाढत असतानाच - वाहनांची संख्याही वाढत आहे. शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, - संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज
आणि इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय असल्याने अनेक ग्राहक कामानिमित्त येतात. येथे पार्किंगची व्यवस्था तोकडी व - कूचकामी आहे. या रस्त्यावरून शासनाचा प्रत्येक अधिकारी- कर्मचारी, पोलीस व अधिकारी, बहुसंख्य नगरसेवक, आजी- माजी लोकप्रतिनिधी दररोज प्रवास करीत असून, त्यांना ही हा त्रास होत असताना त्यावर मात्र अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही.
प्रत्येक व्यापारी संकुलात पार्किंगचा मोठा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. छत्रपती शिवाजी मेनरोड, महाराज रोड, नगरपालिका चौक, बस स्थानक परिसर, संगमनेर रस्ता, मौलाना आझाद चौक, नेहरू फळ आणि भाजी मंडई, सिंधी मंदिरासमोरचा भाग, दशमेशनगर चौक तसेच इतर अनेक शासकीय कार्यालये, कर्मवीर चौकातील
मिनी स्टेडियम समोरचा भाग प्रशासकीय इमारतीसमोरचा भाग अशा अनेक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी वर्दळ असते, परंतु याठिकाणी पार्किंगची कसलीही व्यवस्था नाही.
अनेक इमारतींची पार्कीग स्थळे तळघरात आहेत. तर काही ग्राउंड फ्लोरवर आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवाना मिळेपर्यंत ही जागा पार्किंगसाठी दाखविली जाते. यानंतर मात्र त्याठिकाणी दुसरेच उद्योग, व्यवसाय सुरू केले जातात. परिणामी त्या ठिकाणची वाहने इमारती संकुलास समोरील सार्वजनिक रस्त्यावर लावावी लागत आहेत. याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना तसेच नागरिकांना दुचाकी-चारचाकी वाहने कुठे लावावी, असा प्रश्न सातत्याने . पडत आहे.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment