राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, December 4, 2024

आपण विकासासोबत समाजकारण केले मात्र काहींनी जातीचे राजकारण केले - आ.थोरात

मा.आ. बाळासाहेब थोरात यांचा
संगमनेर मध्ये संवाद मेळावा संपन्न

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्नेह संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांनी जमलेल्या विराट जनसमुदायासोबत संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते 
      
     नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते तथा तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती. ती आज या स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर झाली. 
यावेळी माजी आमदार थोरात म्हणाले की, एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी तालुक्यातील जनतेने कायम साथ दिली आहे. आपले राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे ते कोणीही हलवू शकत नाही. काहीही झाले तरी जनता आपल्याच सोबत आहे याची खात्री आहे. मागील ४० वर्षात आपण संगमनेर तालुक्याची ओळख बदलली आहे. सतत दंगली होणारा तालुका आपण सुसंस्कृत व संयमी बनवला. सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकासकामांसोबत समाजकारण केले. यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केला नाही. मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी समाजासमाजात जाती द्वेष आणी धर्म,जाती, भेद निर्माण करत जनतेच्या मनात विष पेरत जे जाती - पातीचे राजकारण केले. त्यास आता मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे. आपणही तीर्थरूप स्व. भाऊसाहेब थोरात यांचे वारसदार असून लढणे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या उभारीने जनतेत जाणार आहे. तालुक्यातील जनतेवर कार्यकर्त्यांवर व सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण कधीही सहन करणार नाही. यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही. पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद व मनभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे. आपण तयार केलेला सुसंस्कृत तालुका व त्याचा विकास ही प्रत्येकाचीच आता जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment