राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, January 18, 2025

मानव सुरक्षा सेवा संघाचा वर्धापन दिन आणी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न


बशीरभाई भुरे यांची सलग पाचव्यांदा मानव सुरक्षा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर येथील व्यापारी असोसिएशनचे च्या प्रशस्त हॉल मध्ये मानव सुरक्षा सेवा संघाचा वर्धापन दिन आणी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे, प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे, पोलिस मित्र दक्षता समीती प्रदेशाध्यक्ष अजीत गाढे, पत्रकार सुरक्षा न्याय समीती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत कराळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या वतीने बशीरभाई भुरे व चंद्रकांत कराळे, यांना समाज भुषण पुरस्कार, तर राजेश सातपुते यांना आदर्श उद्योजक तसेच भास्कर शिंदे यांना आदर्श अकॅडमी तर सुभान शेख यांना उत्कृष्ट हाड वैद्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देखील गुणगौरव करुन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे म्हणाले की, मानव सुरक्षा सेवा संघ या संघटनेमध्ये देशभरातील जवळपास तीनशे पन्नास हुन अधीक विधी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत, यामध्ये विधीज्ञ (वकील) तर सेवानिवृत्त मा.न्यायधिश महोदयांचे देखील महत्वाचे योगदान आहेत यासोबतच पोलिस आणी महसूल तथा इतर अशा सर्वच प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी यांचे मोठे मोलाचे योगदान आहे.
करीता मानव सुरक्षा सेवा संघ ही संघटना केवळ राज्य पातळीवर नव्हेतर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असुन या संघटनेच्या माध्यमातून सामाजातील रांजले - गांजले, अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळवून देण्याचे कार्य संघटनेमार्फत केली जात असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
मानव सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांचे कार्य सामाजासाठी खुपच पोषक ठरलेले असुन राज्यभरात कोणत्याही ठिकाणाहून अन्यायग्रस्तांच्या साधा कॉल जरी आला तरी त्यास योग्य मार्गदर्शन करत त्याच्या समस्या सोडविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करुन त्या सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी क्षणाचा विलंब न करता प्रत्यक्ष त्या अन्यायग्रस्तांच्या गावी त्या स्पॉटवर पोहोचून कितीही जटील समस्या असल्यातरी त्या सोडविण्यासाठी कसोसिने प्रयत्न करत अशा अनेकांना उचित न्याय मिळवून देण्याकामी श्री.भुरे यांनी सातत्याने मोठे योगदान दिले असल्याने त्यांची सलग पाचव्यांदा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करताना मोठा आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार संजय नवले पत्रकार अमोल वैद्य जेष्ठ साहित्यिक व्यगचित्रकार अरविंद गाडेकर आठवले गट तालुका अध्यक्ष आशिष शेळके संगमनेर शहर अध्यक्ष कैलास कासार समाजभूषण परशराम पवार सर माजी सरपंच मधुकर मुंतोडे राष्ट्रीय सचिव भारत म्हसे राष्ट्रीय सदस्य भास्कर चकोर जेष्ठ सदस्य नरसाय्या पगडाल आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment