- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नव स्वराज्य सेनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेला श्रीरामपूर येथील आझाद मैदान या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष विजयराव खाजेकर यांनी प्रतिपादन केले की, ज्यावेळी भारतासारख्या रुढी वादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात चुल आणि मुल एवढे या पर्यंतच मर्यादित स्थान होते. महिलांना समाजात कोणताही दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा नवसंजीवनी देण्याचे महान कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा या महान ज्ञानज्योती फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले त्यांचे योगदान तर्कसंगतता आणि सत्य समानता आणि मानवता यासारख्या मानवी कारणाभोवती फिरते. जगेल तर लोकांसाठी व मरेल तर लोकांसाठी हा जनसेवेचा ध्यास घेऊन जगणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले पुणे येथे आलेल्या प्लेग च्या साथीमध्ये लोकांची सेवा करताना आपल्या मधून निघून गेल्या त्यांचा आदर्श घेणे म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले.
यावेळी संजय वाहूळ, भाऊसाहेब त्रिभुवन, उत्तम हिवराळे , सागर धेंडे, डॅनियल शिंदे ,खंडागळे मास्तर,अनिल वाघमारे, सुरज मगर, यश वाहुळ, लक्ष्मण जाधव, सुरेश बनसोड, योसेफ जगताप, जोसेफ फर्नांडिस, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment