राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, April 19, 2025

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार - निरीक्षक ऍड.संदीप पाटील


निरीक्षक ऍड.संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक संपन्न 

- नंदुरबार - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक नंदुरबार येथे काँग्रेस जिल्हा निरीक्षक ऍड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
    यावेळी बोलताना ते म्हणाले की, मरगळ झटकत सामंजस्य ठेवले तर नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही , कारण कॉंग्रेस हा १४० वर्षांची परंपरा असलेला पक्ष आहे,नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची सध्या झालेली अवस्था आणी आलेली काहीशी मरगळ दुरुस्त करुन कॉंग्रेस पक्षाला अधीक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी व संघटनासाठी वेळ दिला पाहिजे तसेच जनसंपर्क अजून वाढवला तर पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेसमय होण्यासाठी मोठा मदतगार ठरेल.याकरीता आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि पक्षकार्य हेच डोळ्यासमोर ध्येय ठेवून कामे करा असाही कानमंत्र श्री.पाटील यांनी यावेळी दिला.
    नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे भरपूर मतदार आहेत हे लोकसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे, फक्त एक सक्षम नेतृत्वाची गरज नंदुरबारला आहे , ग्रामीण,शहरी भागात बुत रचना मजबूत करणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे,आणि विरोधी पक्षातील मातब्बरांना धक्का देऊन स्वतःची जागा निर्माण करत विजयाचा आत्मविश्वास ठेवा असे मत राजेंद्र गावित यांनी मांडले.
    काँग्रेस पक्षात असूनही इतर पक्षांच्या कार्यक्रमाला काही कार्यकर्ते,नेते हजेरी लावतात मग ते काँग्रेसचे एकनिष्ठ कसे ?, जो पक्षासाठी काम करेल अशाच लोकांना यापुढे जबाबदारीची पदे दिली जावीत असे मत कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी व्यक्त केले.
    जे काँग्रेसला सोडून गेलेत त्यांचा विचार सोडा व पक्ष मजबुतीसाठी संघटित व्हा आजच्या आढावा बैठकीचे कार्यकर्त्यांची संख्या पाहून नवचैतन्य निर्माण झाले असे मत सुहास नाईक यांनी व्यक्त केले.
 काँग्रेसच्या या आढावा बैठकीत ऍड. सदिप पाटील निरिक्षक नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी, राजेंद्रकुमार गावित, दिलीप नाईक,,
सुहास नाईक, देवाजी चौधरी, पंडित मरोठ,एजाज बागवान, खान मॅडम,राजेंद्र पाटील. विविध सेलचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment