राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, July 6, 2025

आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमलं' राज ठाकरे...


- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता - 
राज्य सरकारने हिंदी सक्ती भाषेचा जीआर
मागे घेतल्यावर वरळी डोम येथील विजयी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. या भाषणामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गळाभेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदा भाषण सुरू केलं. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ज्याच्यातून या गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्रा मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. आता संध्याकाळी सर्व सुरू होईल आता, बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं, कोणी बोलतायेत का ? आपल्याकडे मूळ विषय सोडून बाकी विषयात रस असतो. खरं तर आजचा हा मेळावा, कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही. खरंतर हा प्रश्नाच अनाठायी होता. हिंदीचं कुठून आलं समजलं नाही, कशासाठी, कोणासाठी हिंदी?, लहान मुलांवर जबरदस्ती करता आहात तुम्ही, कोणाला विचारायचं नाही काही, आमच्याकडे सत्ता आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल विधानभवनात आमच्या हातात सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली दादा भुसे आले म्हणाले. आम्ही काय
बोलतोय ते एकून घ्या त्यांना एक सांगितलं, दादा ऐकून घेईन पण ऐकणार नाही,असं राज ठाकरे म्हणाले.

सन्माननीय उद्धव ठाकरे, म्हणाले जमलेल्या माझी मराठी बंधू भगिणी आणि मातांनो, खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणून सर्व बाजूने कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला पाहिजे होता, पाऊस आहे त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाहीत.

त्यामुळे इथे यावं लागलं, बाहेर जे उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================








No comments:

Post a Comment