राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 3, 2023

*अशोक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर सारख्या तालुकास्थळी स्थापन झालेली अशोक सहकारी बँकेचा विस्तार अहमदनगर, पुणे, मुंबई जिल्ह्यात झाला असून गेल्या वर्षभरात बँकेने रु.७७८६९.६९ लाखाचा व्यवसाय केला असून रु. २९८३९.९५ लाखाचे कर्ज वाटप करुन निव्वळ नफा रु.३४०.८९ लाख झाला असल्याची माहिती अशोक सहकारी बँकेचे संस्थापक माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी दिली.
अशोक सहकारी बँक लि., अहमदनगरची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल फरहत कॅफे, अहमदनगर येथे बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष सखाहरी चौधरी यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी श्री.मुरकुटे बोलत होते.
बँकेला एकूण नफा रु.७२८.३१ लाख झालेला असून सर्व तरतूदी व आयकर वजा जाता एकूण निव्वळ नफा रु. ३४०.८९ लाख झालेला आहे, असे श्री.मुरकुटे म्हणाले.
सभेत प्रारंभी बँकेचे संचालक सीए. एस.झेड. देशमुख यांनी दिवंगर सभासदांसह मान्यवरांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला, तर बँकेचे कार्यकारी अधिकारी प्रदीप थोरात यांनी अहवाल वाचन केले.
                बँकेचे चेअरमन ॲड्.सुभाष चौधरी यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करुन ३१ मार्च २०२३ अखेर बँकेचे भागभांडवल रु. १५०९.७० लाखावर असून रु. ४८०२९.७४ लाखावर बँकेच्या ठेवी असल्याचे सांगितले.
बँकेच्या व्यवसायात आणखी वाढ होण्यासाठी फोन बँकिंग, मोबाईल बँकिंग सुरु करावे, त्याचबरोबर प्रत्येक शाखेच्या कार्यक्षेत्रात बँकेच्या ठेवी व कर्जावरील व्याजदराची माहिती पत्रके घरोघर व व्यावसायिकांपर्यंत पोहोचवून मार्केटींग करावे, अशा सूचना यावेळी सभासदांनी केल्या. त्यावर लवकरच आपले बँकेमार्फत फोन-पे, गुगल पे व इंटरनेट बँकींग सुरु करण्यात येत असल्याचे श्री.थोरात यांनी सांगितले. सभेप्रसंगी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, बँकेचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब हळनोर, नेवासाचे माजी सभापती दिगंबर शिंदे, शेतकरी सेवा केंद्राचे श्रीधर कोलते, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, विरेश गलांडे, बँकेचे संचालक रणजित बनकर, निलेश मालपाणी, प्रा.गोरख बारहाते, नाना पाटील, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, ॲड्. उमेश लटमाळे, ॲड्.ऋषिकेश बोर्डे, निवृत्ती थोरात, जितेंद्र तोरणे, विशाल फोपळे, उद्योजक रोहन डावखर, सौ.पल्लवी डावखर, अमोल कोलते, सौ.शालिनी कोलते, सौ. अनुजाताई पटारे, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब मांढरे यांचेसह अशोक कारखाना संचालक मंडळाचे सदस्य, बँकेचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*शब्दगंध संमेलनाचे नियोजन महत्त्वाच्या टप्प्यावर : कवी प्रकाश घोडके*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता -
परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये साहित्याला खूप महत्त्व असून साहित्यिकच समाजात परिवर्तन करू शकतो, त्यासाठी शब्दगंध सारख्या साहित्य संमेलनाची आवश्यकता असून शब्दगंध परिषदेचे पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चालू असलेले नियोजन अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट गीतकार,कवी प्रकाश घोडके यांनी व्यक्त केले.
        कोहिनूर मंगल कार्यालय, अहमदनगर येथे शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक प्राचार्य जी.पी.ढाकणे, संस्थापक सुनील गोसावी, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चौभे,पाथर्डी चे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे,कार्याध्यक्ष डॉ.अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     पुढे बोलताना ते म्हणाले की शब्दगंधाची आजवरची सर्व साहित्य संमेलन यशस्वी झालेले असून नवोदित साहित्यिकांचा व मान्यवरांचा यथायोग्य मान सन्मान करून साहित्य सेवा करण्यात येत आहे अहमदनगर जिल्ह्याला भूषणावह असे काम शब्दगंध कडून होत आहे.
यावेळी विविध समित्यांचे गठन करण्यात आले. हिंद सेवा मंडळ व अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक व शेवगाव येथील कृषी भूषण बापूसाहेब भोसले यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक,साहित्यिक, व शैक्षणिक क्षेत्रातील प्रज्ञावंतांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराबद्दल चर्चा करण्यात आली. गंगाधर शास्त्री पुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनातील साहित्यिकांची मुक्कामाची व्यवस्था कोहिनूर मंगल कार्यालयात करण्यात येणार आहे. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी संमेलनाला उपस्थित रहावे यासाठी परिषदेचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार आहेत.
या बैठकीत जयश्री झरेकर, भारत गाडेकर, चंद्रकांत पालवे, प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी केलेल्या सूचनेनुसार नियोजन करण्यात आले आहे.
    बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना अध्यक्ष राजेंद्र उदागे म्हणाले की,आमदार संग्रामभैया जगताप यांच्या स्वागताध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्ते संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असून जास्तीत जास्त साहित्यिक व साहित्य रसिकांनी या संमेलनाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
यावेळी संपत नलावडे, डॉ. रमेश वाघमारे,शाहीर अरुण आहेर, सुभाष सोनवणे, बबनराव गिरी,बी. के.राऊत, आनंदा साळवे, रज्जाक शेख ,मारुती सावंत, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, सरोज अल्हाट शर्मिला गोसावी आरती गिरी, शर्मिला रणधीर, प्रा डॉ अनिल गर्जे,सुरेखा घोलप,स्वाती अहिरे, शामा मंडलिक यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रस्ताविक भगवान राऊत यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Monday, October 2, 2023

खपवुन घेणार नसल्याचा निर्धार सिंहस्थात कुंभ मेळाव्यात दुर्लक्ष......


नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीगेल्या चारही सिंहस्थात शासनाकडुन आलेल्या निधीतुन मुळ पंचवटी व जुने नाशिक मधील विकास दुर्लक्षीत राहीला असुन यंदाच्या सिहस्थात जुन्या पंचवटी व जुन्या नाशिककडे दुुर्लक्ष केल्यास कदापी खपवुन न घेण्याचा निर्धार आज पंचवटीत झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला  पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाला आराखडा सादर करण्यासाठी महापालिकेने ४३ विभागांकडून प्रस्तावित कामांची यादी मागितली आहे. त्या पार्श्वभुमीवर आठवण लॉन्स येथ पुरोहीत संघ, काळराम मंदीर, कपालेश्वर देवस्थान, तपोवनातील मठ मंदीरांचे पुजारी, महंत, विश्वस्त, गोदवरी प्रेमी नागरीक, तसेच गेले चार सिंहस्थांचे साक्षीदार असेलेले ज्येष्ठ नागरीक उपस्थीत होते. यावेळी देवांंग जानी, नंदु पवार, मंडलेश्वर काळे,शांतराम अवसरे, सतीश शुक्ल आदींनी मार्गदर्शन केले.

त्या सर्वांनीच पंंचवटीच्या विकासाकडे झालेल्या दुर्लक्षाकडे लक्ष्य वेधले. येणारा निधी ठरावीक भागात खर्च होता, वर वर विकास दिसतो आतुन मात्र नाशिक भकास असते. त्याचा फायदा मुळ पंचवटी व जन्या नाशिकला अजीबात होत नाही, त्यामुळे हा परीसर अद्यापही विकसीत झाला नाही. अशी खंत यावेळी व्यक्त झाली....
२०२७ व २८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविक साधुमहंतांना सेवा व सुविधा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी प्राप्त होतो. त्याचा फायदा पंचवटीकरांना झाला पाहीजे असा सुर यावेळी व्यक्त झाला. त्यासाठी नियोजन करतानाच जुन्या नाशिक व पंचवटीच्या विकासासाठी सुचना करुन त्यासाठी पाठपुरावा करावा. असे यावेळी ठरले.आमदार, खासदार व लोकप्रतीनीधी यांच्या माध्यमातून आता पासूनच त्यासाठी प्रयत्न केले तरच भविष्यात या भागात विकास कामे होतील, अन्यथा आज पर्यंत झाले तसेच दुलक्ष होत राहील. असे पवार यांंनी यावेळी सांगीतले.

===================================
---------------------------------------------------
: - सहाय्यक - माहिती...वार्ता - प्रविण रामचंद्र देशपांडे...✍️✅🇮🇳...
---------------------------------------------------
===================================









आंदोलनाला सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थितीकंत्राटी भरती विरोधात......


नशिक - प्रतिनिधी - पंचवटी - वार्ता

 महानगर प्रमुख रवी पगारे यांच्या अध्यक्षतेखालीसंपन्न आज वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थी यांची कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती संदर्भात प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र वंचित युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्य भर निघणाऱ्या मोर्च्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे या विषयी सविस्तर बैठक पार पडली. यामधे वंचित बहुजन युवा आघाडीची भूमिका काय असणार आहे यावर चर्चा करण्यात आली याच बरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे योगदान जाणून घेण्यात आले. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक मधुन वंचित बहुजन युवा आघाडी निघणाऱ्या या मोर्चात सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोर्चास उपस्थित राहणार आहे. हा मोर्चा शासनाने काढलेल्या नवीन कंत्राटी भर्ती विरोधात असून याच बरोबर शिक्षक भर्ती , खाजागीकरण करुण सामान्य जनतेच्या विरोधात असलेल्या निर्णयाविरुद्ध आहे...

या बैठकिला वंचित बहुजन युवा आघाडीचे नाशिक महानगर महासचिव दिपक पगारे ,उपाध्यक्ष दिलीप खरात, विशाल भवार, अमोल चंद्रमोरे, शिशुपाल गवई, युवराज मनेरे,विजय गायकवाड, संघटक साहेबराव शिंदे, दिपक दोंदे, प्रसिद्धि प्रमुख शशिकांत वाघमारे,सदस्य ओमकार चव्हाण, संतोष शिराळ.
याच बरोबर वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक तालुक्याचे विकी वाकळे-अध्यक्ष ,संतोष वाघ - महासचिव, मंगेश पवार - संघटक ,गणेश सोनवणे - आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हा अध्यक्ष मिहिर गजबे,महासचिव - संजय मगर उपाध्यक्ष - आदेश मगर उपाध्यक्ष - विजय साळवे सचिव - राहुल नेतावटे सहसचिव - सुरज भालेराव प्रसिद्धी प्रमुख - निशा धाकतोडे सदस्य - सरला गावित सदस्य - सागर मोरे सदस्य - संकेत अहिरे सदस्य - कार्तिक बर्वे सदस्य - अमित वाविकर आदी उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
: - सहाय्यक वार्ता - अनिकेत देशमुख - ✍️✅🇮🇳...
---------------------------------------------------
===================================





महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकण दौरा,समीर राऊत...


^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
=====================================
समीर काशिनाथ राऊत
प्रभाग संघटक - जी / दक्षिण, मुंबई रस्ते, साधन सुविधा व आस्थापना विभाग
<-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><-><->
===================================
1) ऑक्टो. दिवस पहिला कुडाळ सावंतवाडी मालवण २) ऑक्टो दिवस दुसरा कणकवली देवगड रत्नागिरी 
३ ) ऑक्टो दिवस तिसरा संगमेशवर खेड महाड माणगाव ४) ऑक्टो दिवस चौथा श्रीवर्धन पेण म्हसळा

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना कोकण दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा मा. जिल्हाध्यक्ष श्री. धीरज परब, मा. तालुका अध्यक्ष श्री. प्रसाद गावडे, श्री. विनोद सांडव, विध्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष श्री. आशिष सुभेदार, मा. जिल्हाध्यक्ष श्री. कुणाल किणलेकर* यांची *संघटना बांधणीसाठी* भेट घेतली. याप्रसंगी *सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री. अमोल जंगले, मुंबई शहर सचिव श्री. रोशन पावसकर, जी दक्षिण प्रभाग संघटक श्री. समीर राऊत, उपप्रभाग संघटक श्री. विठ्ठल डांगे व इतर महाराष्ट्र सैनिक* उपस्थित होते. यावेळी *मुंबई गोवा महामार्ग कुडाळ येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल* देखील केली.

{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{
लेखक - माहिती प्रसारित - समीर के राऊत...✍️✅🇮🇳...
{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{

Sunday, October 1, 2023

पोलिसदादाच्या कार्यतत्पर्तेने**रुग्णांस मिळाले जीवदान !*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

बेलापुर - प्रतिनिधि - वार्ता -
गावात कुठलीही घटना घडली तर सर्वात आगोदर धावत येतात ते पोलीस दादा ,असेच सर्वांच्या मदतीला कायम धावणाऱ्या पोलीस दादाने केलेल्या अचुक उपचारामुळे व आमदार लहु कानडे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे नुकताच एका नागरीकाला जीवदान मिळाले असुन आता तो रुग्ण रुग्णालयात व्यवस्थित उपचार घेत आहे. या बाबत घडलेली हकीकत अशी की, बेलापुर येथील साई मंदिरात तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांबाबत बैठक बोलविण्यात आली होती, या बैठकीस अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, मंदिरात आमदार लहु कानडे हे भाषण करत असताना त्या ठिकाणी तान्हाजी बापुराव शेलार (वय ७८ वर्ष) हे साई मंदिरांच्या पायरीवर बसले होते, त्यांना अचानक हृदय विकाराचा तिव्र झटका आला, अन् सर्व जण त्यांच्या भोवती गोळा झाले, तेथुन काही अंतरावर द्वारकामाई जवळ बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ आणि नंदु लोखंडे हे उभे होते,गर्दी कशाची जमा झाली म्हणून पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ व नंदु लोखंडे हे त्या ठिकाणी गेले असता बघीतले की एका इसमाची फारच तब्येत ढसाळली आहे,अशावेळी क्षणाचाही विलंब न करता हरिष पानसंबळ दादा तातडीने पुढे सरसावले, त्यानी त्यांचा श्वास पाहीला मानेजवळ बघीतले सर्व शरीर गार पडले होते, त्यांनी तातडीने तान्हाजी शेलार यांची छाती दाबली ठरावीक पद्धतीने छाती पंपीग करताच त्यांनी जोराचा श्वास घेतला,आमदार लहु कानडे हे देखील मदतीसाठी पुढे धावले, बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, रमेश आमोलीक, प्रसाद खराद, सुरेश अमोलीक, गौरव सिकची,सुहास शेलार यांनी तान्हाजी शेलार यांना पुढील उपचारासाठी श्रीरामपुर येथे पाठविण्याची व्यवस्था केली. श्रीरामपुर येथील संतलुक हॉस्पीटल येथे त्याचेवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले असुन त्यांची प्रकृती सुधारत आहे.
पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे शेलार यांना जीवनदान मिळाले आहे .या बाबत शेलार परिवाराने बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ, नंदु लोखंडे यांना धन्यवाद दिले आहे. बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल हरीष पानसंबळ यांनी केलेल्या कार्याबद्दल शेलार परिवार व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पोलीस काँन्स्टेबल हरिष पानसंबळ तसेच पोलीस काँन्स्टेबल नंदु लोखंडे आणी श्री. शेलार यांना वाचविण्यासाठी धडपड करणारे बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले, रमेश अमोली, प्रसाद खराद, सुहास शेलार, गौरव सिकची, सुरेश अमोलीक यांचाही सत्कार कारण्यात आला. यावेळी खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, महेश ओहोळ, असलम बिनसाद, किशोर कदम, पोलीस पाटील अशोक प्रधान प्रकाश कुऱ्हे , बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुहास हापसे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, संपत बढे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर महेश ओहोळ यांनी आभार मानले.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार देवीदास देसाई -बेलापूर
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*काही अविवेकी नेत्यांच्या वक्तव्यामुळे मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण होते - राजेंद्र कोंढरे*


*अजीजभाई शेख - राहाता*
अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सभा आणि मेळावा नुकताच शिर्डीत संपन्न झाला यावेळी,ओबीसी समाजातील काही अविवेकी नेत्यांच्या वक्त्यव्यामुळे मराठा अन् इतर समाजात तेढ निर्माण होत असून मराठा कुणबी आरक्षणास विरोध करणे घटना बाह्य आहे असे परखड मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीयध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केले. 
      अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे शिर्डी येथे करण्यात आले त्यावेळी श्री. कोंढरे अध्यक्षपदावरून बोलत होते. राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, राष्ट्रीय खजिनदार प्रमोद जाधव, राष्ट्रीय चिटणीस गुलाब गायकवाड, युवा प्रतिनिधी आतिष गायकवाड, अमोल निकम, उत्तर महाराष्ट्र संघटक लालूशेठ दळवी, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकात बनकर, नाशिक महिला अध्यक्ष अस्मिता देशमाने, धाराशिव महिला अध्यक्ष रेखा लोमटे, युवक सरचिटणीस योगेश पाटील, मंगेश निकम, किशोर गिराम, अमोल पवार आदी उपस्थित होते.
     भारतीय राज्यघटनेच्या आधारे निर्माण झालेला आरक्षण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रा सहानी खटल्याच्या आधारे निर्माण झालेला राज्य मागासवर्ग आयोगाच्या तरतुदी च्या आधारे आरक्षण धोरण राबविले जाते. या दोन्ही तरतुदीच्या आधार न घेता ज्यांनी ओबीसीतील अतिरिक्त आरक्षण अगोदरच बेकायदेशीर व्यापलेले आहे त्यानी मराठा समाजाच्या आरक्षणास व कुणबी प्रमाणपत्रास विरोध करणे ही भुमिका घटनाबाह्य व कायद्याचा अवमान करणारी आहे. दोन्ही समाज घटकांनी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे समाजा समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही सोशल मीडियावरील अविवेकी तेढ वाढवणाऱ्या पोस्ट टाळल्या पाहिजेत. हे त्यांना स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार आहे रोडमॅप जाहीर करावा. मराठा समाजाला यापुढे ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या तीन सूत्रावर आधारित क्रियाशील व्हावे लागेल 
        एके काळी ग्रामीण अर्थव्यवस्थेत ३० ते ५०% % वाटा व स्थान असलेल्या मराठा समाजाला आज राज्याच्या आर्थिक व्यवस्थेत ३% पर्यंत खाली येण्याची कारणे शोधून त्यावर ते स्थान पुन्हा मिळविण्यासाथी काम करावे लागेल . 
    राज्याच्या विकासात प्रकल्पासाठी कवडीमोल दराने जमिनी घेतल्या इथला इतिहास घडवताना देशाचे संरक्षण करताना ज्या समाजाने त्याग केला आरक्षणाचे धोरण ज्यांनी निर्माण केले त्या समाजातील दुर्बलांच्या साठी सर्व समाजाने उभे राहणे गरजेचे आहे.
      मागील सभेचे प्रोसडींग संयुक्त चिटणीस गुलाब गायकवाड यांनी वाचले. जमा खर्च, हिशोबा चे वाचन सरचिटणीस प्रकाश देशमुख यांनी वाचन केले. यावेळी अनेक सभासदांनी सूचना व ठराव मांडले. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी तर आभार अतिष गायकवाड यांनी मानले
 कार्यक्रम यशस्वीते साठी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, राहुरी तालुकाध्यक्ष दिनकर पवार, संगमनेर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, कोपरगाव तालुकाध्यक्ष ऋषिकेश पवार, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुजित ढोकचौले, राहता तालुकाध्यक्ष रवीराज देसले,विलास वराळ, योगेश निकम, अनिकेत सदाफळ, सुमित निर्मल, अपासाहेब ढोकणे, ऋषिकेश भोसले, बापूसाहेब तनपुरे, विकी गायकवाड, सचिन मुजगुले, निलेश शेजवळ, बंटी नेरपगारे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार रमेशराव बोरुडे - राहुरी
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================