राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 30, 2024

महंत काशिकानंदजी महाराजांच्या हस्ते जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटनेच्या सभासदांना दिवाळी फराळ वाटप


- शिर्डी - प्रतिनिधी -/ वार्ता -
ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना प्रणित जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटना साईआश्रम एक हजार  रुम रिक्षा संघटनेतील सभासदांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी महंत काशिकानंदजी महाराज यांनी रिक्षा संघटनेच्या सामाजिक कार्य व उपक्रमांचे कौतुक करत श्री साईबाबांच्या पवित्र भूमित रिक्षा चालक हा खरोखर  श्रमिक वर्ग असुन येणाऱ्या साईभक्तांना प्रामाणिक सेवा देत असल्याचे सांगितले. तर दिवाळी हा आनंदाचा सण आणि या सणानिमित्त रिक्षा चालक , अनाथालय व गरजवंताना दिवाळी फराळ वाटप करुन संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते व अध्यक्ष रविंद्र शेळके हे साईबाबांच्या शिकवणीचे पालन  करत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी महंत काशिकानंदजी महाराज यांनी उपस्थिती देऊन त्यांच्या शुभहस्ते हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला याचे समाधान व्यक्त करत जनेश्वर प्रतिष्ठाण हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असुन याकामी असंख्य कार्येकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे संस्थापक प्रशांत कोते यांनी स्पष्ट  केले.तर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संघटनेचे अध्यक्ष  रविंद्र शेळके यांनी आज महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप झाले असल्याचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जनेश्वर रिक्षा संघटनेचे  संस्थापक प्रशांत कोते , अध्यक्ष रविंद्र शेळके , संतोष जेजुरकर , शंकर आवारे , विशाल दहीवाळ , नासीर पठाण , संतोष आवारे , अवी जेजुरकर , अमोल वाडगे , गोकुळ बारगळ , प्रमोद कदम , जाकीर पठाण , रविंद्र जगताप , दिपक वाघ , बाळासाहेब शिंदे , दिपक मगर , मनोज उदावंत , साईराम सोळसे , जयंत शेलार , मछ्चिंद्र तांदळे , प्रवीण डेंगळे आदीसह सदस्य उपस्थित होते.

<^><७><७><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±


पर्यावरणपुरक - आरोग्यमय,आनंदी दिवाळी


*पर्यावरणपुरक - आरोग्यमय,आनंदी दिवाळी*

आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत दिवाळी सण साजरा करत असताना सर्वांचाच आनंद द्विगुणित झालेला असतो. लहान मुले तर खूपच खुश असतात. कारण; नव नवीन कपड्यां बरोबरच त्यांना फटाके उडवायला मिळालेले असतात.
        दिवाळीला आपण जे फटाके उडवतो त्याची परंपरा खूप शतकांपासून आहे. खूप आधीपासून लढाईमध्ये गनपावडर व तोफांचा वापर करत होते. या गनपावडर पासूनच फटाके तयार होत. पुर्वीच्या काळी विवाह सोहळा व उत्सवांमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जायची. आणि तेव्हापासूनच कदाचित भारतीयांमध्ये दिवाळी सणाला फटाके उडवायची परंपरा चालू झाली असावी. फक्त दिवाळीलाच नव्हे तर, इतर उत्सवांमध्ये फटाके उडवायला सुरुवात झाली. अलीकडे तर उद्घाटनप्रसंगी, निवडणूक जिंकल्यानंतर, नविन वस्तू खरेदी प्रसंगी, स्वागत समारंभ प्रसंगी अशा एक ना अनेक प्रसंगी फटाके उडविले जातात. फटाके उडवून एक प्रकारचा आनंद साजरा केला जातो. फटाके उडविणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाते.
           तामिळनाडू मधील " शिवकाशी" हे फटाके निर्मितीचे कोठार समजले जाते. फटाक्यांमध्ये रंगीबेरंगी धूर तयार करणारे फटाके, शंकु आकाराचे फटाके ( झाडं), भुईचक्कर, तोटा, सुतळी बॉम्ब, शुटर्स - रॉकेट्स - हवेत वर जाऊन उडणारे फटाके, अलिकडेच नवीन निघालेले पॉप - पॉप फटाके असे अनेक प्रकार आहेत. या विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये बेरियम, आर्सेनिक, सल्फर, क्लोरिन, ॲल्युमिनियम, सल्फर पोटॅशियम, सिलिकॉन, लोह, टायटॅनियम यासारखे रासायनिक घटक वापरले जातात, की जे जीवितास धोकादायक आहेत. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार वाढतात. सततच्या मोठ्या आवाजामुळे कदाचित बहिरेपणा येऊ शकतो, झोपेचा त्रास होतो, त्यामुळे चिडचिड वाढते. नाक व घसा यात जळजळ होते. लहान मुले, गरोदर स्त्रिया, आजारी लोक, वृध्द यांना जास्त त्रास होतो. बर्याच वेळा सामाजिक एकात्मता ढासळते. मानवाबरोबरच प्राणी - पक्षी यांनाही त्रास होतो. बर्याच वेळा मोठ्या आवाजाने प्राणी - पक्षी घाबरतात, गडबडून जातात. मानवाचेही तसेच आहे. फटाके वाजवताना एकमेकांच्या भावनांचा व शारिरीक स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
       फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदुषण वाढते आणि त्यामुळे प्राणी - पक्षी व मानवी स्वास्थ्य बिघडते.
              फटाके उडवायला विरोध नाही. परंतु; काळजीपूर्वक व पर्यावरणपूरक फटाके उडविले तर; ते सर्वांच्याच भल्याचे असणार आहे. त्यासाठी कमी आवाजाचे व कमी धूर करणारे फटाके उडविले तर आणखी मजा येईल. सर्वांचेच स्वास्थ्य सुरक्षित राहिल.
            फटाके उडविताना आवश्यक ती काळजी घेऊनच फटाके उडविले पाहिजेत. उदा. फटाके उडविताना लहान मुलांना एकटे सोडू नये. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. एकावेळी एकच फटाका लावावा. हातात घेऊन फेकू नये. अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
           आपण असेही करू शकतो की; फटाक्यां ऐवजी लहान मुलांना बुद्धीला चालना देणारे खेळ देऊ शकतो. थोर महात्मे, धाडसी कथा, संस्कारक्षम गोष्टींची पुस्तके देऊ शकतो. तसेच मुलांना सर्जनशील उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करू शकतो. जसे की; हस्तकला, बागकाम, नृत्य, संगीत. तसेच मुलांसमवेत निसर्गरम्य परिसराला भेट द्या. त्यामुळे मुलांनाही पर्यावरणातील गोष्टी समजण्यास मदत होईल. घराभोवती, पर्यावरणात कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी कागदी कचरा, फटाक्यांचे रॅपर्स इतरत्र न फेकता कचराकुंडीतच जमा करण्यास सागणे.
        लहान - सहान गोष्टीतूनच अंगचे वळण लागते आणि चांगल्या सवयीही जोपासल्या जातात. अशारीतीने ज्ञानमय, निरोगी आणि आनंदमय दिवाळी साजरी करणे आपल्याच हाती आहे.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ. मिनल अमोल उनउने
सातारा - ९१३०४७०३९७

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

" भारत रत्न मौलाना आझाद राज्य स्थरीय समाजरत्न पुरस्कार श्रीरामपूरचे डॉक्टर सलीम शेख यांना जाहीर "


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर - येथील एकता सामाजिक सेवाभावी संस्था.. ही 14 चौदा वर्षा पासून संगमनेर शहर व महाराष्ट्र राज्यात सेवाभावी वृत्तीने काम करीत असते.. एक विशेष बाब म्हणजे एका आशिषित रिक्षा ड्राइव्हर ने ही संस्था स्थापन करून शहर व राज्यातील चांगल्या विचार सरणीच्या लोकांना डॉक्टर, इंजिनीअर, वकील, फार्मासिस्ट, वयोरुद्ध सामाजिक समाजसेवक, सर्व धर्मातील सदस्य लोकांना एकत्र करून फार उत्कृष्ट सामाजिक उपक्रम रबवीत असते. खरोखर फार अभिनंदनीय बाब म्हणावं लागेल निच्छिच . त्या मध्ये खास उपक्रम "पुस्तकं वाचन चळवळ "ते प्रत्येक येणाऱ्या पाहुणे व मित्रांना आपल्या घरी किंवा कोणत्याही समारंभात भेट वास्तू म्हणून पुस्तकं च भेट देणार.. असे विविध उपकृत उपक्रम राबविण्यात येतात.. त्याप्रमाणेच दरवर्षी भारत रत्न व भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या136व्या जयंती च औचित्य साधून त्यांच्या नावाने राज्य स्तरीय समजरत्न पुरस्कार दिला जातो आत्ता पर्यंत राज्य व देशातील विविध कर्तव्य बजावलेल्याच मान्यवरांना दिलेला आहेत.
यंदाही पुरस्कार घोषित करताना कोणत्याही उमेदवाराचे स्वतः चे परिचय न मागता समाजातील विविध गटातील सामान्य लोकांचे मत विचारात घेऊन पुरस्कार घोषित केले गेले अर्थात एक पारदर्शक प्रक्रियेतून.पुरस्कारांची निवड केली गेली.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध समाजसेवक व सर्व धर्म आदरभाव जपण्यासाठी कायम अग्रही राखण्यासाठी सतत प्रयत्न करणारे व सामाजिक सदभावना जोपसण्यासाठी सतत कार्यरत असणारे श्रीरामपूर चेवैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवा देणारे डॉक्टर सलीम सिकंदर शेख -बैतुशशिफा दवाखाना यांना 2024-2025 चा " भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाजरत्न पुरस्कार "जाहीर करण्यात आला..
तसेच मौलाना आझाद आदर्श आरोग्य मित्र 2024-25 चा पुरस्कार शहानवाज गणी शाहा यांना :,
    तसेच मौलाना आझाद व्यंग-चित्रकार पुरस्कार अरविंद वसंतराव गाडेकर यांना,जाहीर करण्यात आलेत. 
    तसेच, स्व. मिर्झा खालिद बैग राज्य स्थरिय 2024-25चा "आदर्श समाजरत्न पुरस्कार " अफसर बालम शेख यांना जाहीर करण्यात आला आहेत..
भारत रत्न मौलाना आझाद यांची 136 वी जयंती दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येतील...
या सर्व मान्यवारां चे विविध थरातून स्वागत होत आहेत...


=================================
-----------------------------------------------
डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================

Tuesday, October 29, 2024

डॉक्टर हे 'देवदूत' च असून त्यांचा सन्मान योग्यच होय- ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
मानवी जीवनात आरोग्य जपणे गरजेचे झाले असून आजच्या काळात डॉक्टर हे' देवदूत'च असून त्यांचा माऊली वृद्धाश्रम तर्फे झालेला सन्मान योग्यच होय, असे मत ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.
  शहरालगत शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रम आणि जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रमाच्या वतीने सातवा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसगी डॉक्टरांचा सन्मान करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. वृद्धाश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून        
उपस्थितांचा सत्कार केला. 
यावेळी डॉ. कुमार चोथाणी, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सौ. सिंधू पडघन, डॉ. भारत गिडवाणी, डॉ.राजेंद्र लोंढे, डॉ. रवींद्र भिटे यांचा ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराचे नियोजन सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, शिरीष वाघुंडे, सौ. गौरी वाघुंडे, अरुणराव विसपुते, सौ. वंदनाताई विसपुते, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार राजेंद्र देसाई, संतोष मते, शुभम नामेकर, दत्तात्रय खिलारी, आदिंनी नियोजनात भाग घेतला. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी माऊली वृद्धाश्रम हे सेवेचे तीर्थस्थळ आहे. निराधार आजी, आजोबा, विद्यार्थी यांची गेल्या ०७ वर्षापासून मनोभावे सेवाभाव करणारे वाघुंडे परिवार, पदाधिकारी आणि देणगीदार यांचे योगदान आदर्शवत आहे. असे सांगून वृद्धाश्रमासाठी डॉक्टरांचे विनामूल्य कार्य भूषणावह असल्याचे सांगितले. 
यावेळी प्राचार्य टी.ई. शेळके, सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार राजेंद्र देसाई, प्रकाश कुलथे, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ, महेश माळवे,भानुदास खरात, सुरेश कर्नावट, लक्ष्मीकांत जेजुरकर, ओमप्रकाश बनकर, ह.भ.प. गोरक्षनाथ शिंदे , गोरक्षनाथ अकोलकर, दत्तात्रय परदेशी, श्यामराव नवले, चंद्रकला डोळस, तुकाराम डोळस आदींसह देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अण्णासाहेब भिंगारदिवे, रावसाहेब भिंगारदिवे, अमोल भिंगारदिवे, भास्करराव ताके पाटील, राजेंद्र रासने परिवार यांचा सत्कार करण्यात आला.
 संतोष मते यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

व्यावसायिक मंदी आणी दिवाळी विशेषांक जाहिरातीवरील परिणाम


व्यावसायिक मंदी ही संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक गंभीर समस्या आहे. आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक स्पर्धा, ग्राहकांचा बदलता कल, आणि अन्य अनेक घटकांच्या परिणामस्वरूप मंदी येते. याचा परिणाम सर्व उद्योगांवर, तसेच विशेषांकांसारख्या सर्जनशील साहित्यावरही होतो. विशेषतः वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांसारख्या वार्षिक प्रकाशनांवर त्याचा गंभीर प्रभाव पडतो. या लेखात आपण या मंदीचे कारणे, परिणाम, आणि त्यावर उपाय योजना यांचा आढावा घेऊ.

*1. व्यावसायिक मंदीची कारणे*

जागतिक स्पर्धा: आजच्या काळात कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आहेत. अनेक कंपन्या कमी खर्चात जास्त उत्पादन करत असल्याने स्थानिक उत्पादनांना आव्हान निर्माण होते.

ग्राहकांचा बदलता कल: लोकांचे वाचन, खरेदी आणि माहिती मिळवण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झाला आहे. डिजिटल माध्यमांमुळे वाचनाची व्याख्या बदलली आहे, त्यामुळे छापील माध्यमांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.

मुद्रा चलनात होणारे बदल: चलनवाढ किंवा रुपयाची घसरण या कारणांमुळे उत्पादन खर्च वाढतो, तर विक्रीत घट होते.

वाढती उत्पादनाची किंमत: उत्पादनातील कच्चा माल, मजुरी, वाहतूक यांवरील खर्च वाढल्यामुळे अनेक कंपन्या किंमत कमी करून उत्पन्न घटवत आहेत, ज्यामुळे त्यांची लाभक्षमतेवर परिणाम होतो.


*2. दिवाळी विशेषांकावर मंदीचा परिणाम*

विक्रीत घट: वाचनात बदल झाल्यामुळे दिवाळी विशेषांकाच्या विक्रीवर परिणाम होतो. लोकांकडे वेळेची कमी असून ऑनलाइन माध्यमांचे आकर्षण वाढले आहे.

*जाहिरातींची कमी मागणी:* 
मंदीमुळे उद्योग व व्यापारांच्या जाहिरातींवरचा खर्च कमी झाला आहे. हे विशेषांक मुख्यतः जाहिरातीतून उत्पन्न मिळवतात, त्यामुळे त्यावर मोठा परिणाम होतो.

उत्पादन खर्चात वाढ: कागद, छपाई, वाहतूक अशा विविध घटकांमुळे विशेषांक तयार करण्याचा खर्च वाढत आहे.

गुणवत्ता कमी होणे: उत्पन्न घटल्यामुळे काही विशेषांक प्रकाशकांना दर्जा कमी करून साहित्य सादर करावा लागतो.


*3. उपाय योजना*

डिजिटल माध्यमांचा अवलंब: डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी दिवाळी विशेषांकांनी डिजिटल रूपांतरण करणे गरजेचे आहे. ई-बुक्स, वेबपोर्टल, ॲप्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विशेषांक सादर करता येईल.

वाचकांसाठी विशेष योजना: नवे वाचक मिळवण्यासाठी विविध ऑफर देणे फायदेशीर ठरू शकते. उदाहरणार्थ, वार्षिक वर्गणीदारांना सवलत किंवा विशेषांकाचे मोफत वितरण.

सामुदायिक आणि व्यवसायिक क्षेत्राशी सहकार्य: उद्योगांशी सहकार्य करून त्यांच्या गरजा ओळखून विषयांची निवड करता येईल, यामुळे अधिक जाहिराती मिळवता येतील.

*जाहिरातीत विविधता आणणे:*
 विशेषांक प्रकाशकांनी विविध उद्योगांशी संबंधित जाहिराती आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये नवीन व लघु उद्योगांनाही सहभागी करता येईल.

वाचनाची नवीन संधी उपलब्ध करून देणे: प्रत्येक अंकामध्ये काही नवीनता आणि वेगळेपणा असावा, ज्यामुळे वाचकांच्या विशेषांकावरील रुची टिकून राहील.

गुणवत्ता राखण्यासाठी साहित्यिकांचा सन्मान: मंदीमुळे साहित्यिकांना योग्य मानधन देणे जरा कठीण असू शकते, तरी त्यांच्या सन्मानाची काळजी घेणे आवश्यक आहे.


यातून पुढे असा निष्कर्ष की व्यावसायिक मंदी ही आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे, परंतु योग्य उपाययोजना केल्यास दिवाळी विशेषांकासारख्या सर्जनशील उपक्रमांचा दर्जा टिकवून ठेवता येतो. डिजिटल रूपांतरण, वाचकांना विशेष योजना देणे, आणि उद्योग व सर्जनशीलता यांमधील संतुलन साधल्यास, विशेषांक पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू शकतात.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*शौकतभाई शेख*✍️✅🇮🇳...
संस्थापक / अध्यक्ष 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

Monday, October 28, 2024

सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई शेख आणि फरजाना शेख यांची मोहसीन ए मिल्लत कमेटीच्या उपाध्यक्षपदी निवड

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई शेख आणी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फरजाना शेख यांची मोहसीन ए मिल्लत कमेटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानिमित्ताने श्रीरामपूर येथील समता कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोहसिन ए मिल्लत कमेटीचे अध्यक्ष ॲड. मोहसीन शौकत शेख, पदाधिकारी सर्वश्री सरताज शेख, समदानी गुलाम रब्बानी, शब्बीर (राजु कुरेशी), नदीमताज गुलाम, अमीर मेमन आदि मान्यवर उपस्थित होते.

         ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मोहसिन शेख संचलित मोहसिन ए मिल्लत कमेटी सामाजिक कार्यात अग्रेसर असून कमेटीद्वारे सामाजातील उपेक्षित आणी दुर्लक्षीतांसोबत जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न आणी सेवेसाठी सातत्याने विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. मुश्ताकभाई शेख आणी फरजाना शेख यांचे कमेटीत उत्कृष्ट कामे पाहता त्यांना कमेटीच्या उपाध्यक्षपदाची ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे यावेळी ॲड. मोहसिन शेख म्हणाले.
        
         या निवडीबद्दल कमेटीचे वरिष्ठ मार्गदर्शक व कार्याध्यक्ष हाजी इलाहीबक्ष कुरैशी, तसेच हाजी फ़याज़ बागवान, ॲड. हारून बागवान, ॲड. मुमताज बागवान, अफ़ज़ल मेमन, आरिफ कुरैशी, यूनुस कुरैशी, इब्राहिम बागवान, जाकिर शाह, जावेद शेख, कलीम शेख (रॉयल रिश्ता), मोहम्मदशफी अंसारी, शब्बीर शेख आदींनी अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Sunday, October 27, 2024

बालकांच्या तन मनाची मशागत वॉरियर्स फाउंडेशन करत आहे - राजेंद्र चोभे



अहिल्यानगर (अहमदनगर) प्रतिनिधी
बालकांना भारतीय सण, संस्कृतीचे महत्त्व लक्षात येण्यासाठी राबवलेला दीपोत्सव उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून बालकांच्या तन,मनाची मशागत करण्याचे काम वॉरियर्स फाउंडेशन करत आहे, ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांनी व्यक्त केले. 
      अहिल्यानगर (अहमदनगर) मध्ये वॉरियर्स एज्युकेशन सेंटर अँड प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका शर्मिला गोसावी या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून बजाज चे प्रशिक्षक नंदकुमार काळे हे होते. 
पुढे बोलताना राजेंद्र चोभे म्हणाले की, या परिसरातील छोट्या बालकांसाठी वॉरियर्सच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून लहान मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करून त्या पद्धतीने विविध सण, उत्सव साजरे करण्यात येतात. अभ्यासासोबतच इतर सांस्कृतिक उपक्रम राबवून महनीय व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी साज-या केल्या जातात, ही बालकांवर संस्कार करण्याची निरंतर प्रक्रिया प्रेरणादायी आहे.
    नंदकुमार काळे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की, मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांना त्या प्रमाणात, त्या त्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यासाठी वॉरियर्सने पुढाकार घेतल्यास आपण निश्चितच सहकार्य करू,असे आश्वासन त्यांनी दिले. 
संचालिका शर्मिला गोसावी यांनी वॉरियर्सच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. छोट्या बालकांनीही फटाके फोडून दिवाळीचा आनंद व्यक्त केला, छत्रपती शिवरायांच्या राजगडाची प्रतिकृती यावेळी उभारण्यात आली होती. विविध वेषभूषेतील बालकांनी दीपावली दीपोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी श्रुतिका घोडेस्वार,व वर्षा गुजर, संगीता गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================