राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, December 4, 2024

संगमनेर शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी चोरी गेलेल्या मोटरसायकल हस्तगत करीत मोठ्या शिताफीने आरोपीला केले जेरबंद


- मुज्जफर शेख - प्रतिनिधी -/ वार्ता - संगमनेर -

 संगमनेर शहरासह तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण गेल्या अनेक दिवसापासून दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे तसेच सोनसाखळी चोरीचे गुन्हे देखील खूप वाढलेले आहेत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिनांक २४/४/२०२४ गुन्हा रजिस्टर नंबर ३८६/ २०२४ भादवि कलम ३८९अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक सौ श्री वैभव कलबुमे व उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग संगमनेर यांच्या मार्गदर्शना विशेष पथक तयार करण्यात आले होते त्या आधारे संगमनेर शहरात चोरी झालेल्या मोटर सायकलची माहिती घेऊन त्यांचे तांत्रिक विषयाचे आधारे चोरीच्या मोटरसायकलीचा शोध घेतला असता आरोपी नामे सौरभ शिवाजी वारे वय वीस वर्षे राहणार आष्टी ता. आष्टी जिल्हा बीड यास अटक करून त्याच्याकडून एकूण चार लाख रुपयाचे महागडे दोन चाकी वाहन हस्तगत करण्यात आले यामध्ये तीन बुलेट व एक बजाज कंपनीची पल्सर व एचएफ डीलक्स वाहने संगमेश्वर पोलिसांनी आष्टी करमाळा धाराशिव पेठ मांजरसुंबा जामखेड इथून हस्तगत करीत आरोपीला जेरबंद केलाय यामध्ये संगमनेर शहरातील एकाचा देखील समावेश असून त्याचा पोलीस शोध घेत आहे सदरची कामगिरी श्री डॉक्टर कुणाल सोनवणे व उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक समीर बबन अभंग सचिन धनाड रामेश्वर वेताळ आदींनी केले आहे

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




शब्दगंध चे सभासद होण्याचे आवाहन


- अहिल्यानगर ( अहमदनगर ) - प्रतिनिधी -/ वार्ता -
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक, कवी साठी विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येत असून शब्दगंध च्या वतीने वर्षातून एक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. शब्दगंध ही ग्रामीण भागातील सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था असून संस्थेच्या तालुकास्तरीय शाखाही कार्यरत आहेत,अशा या संस्थेचे सभासद होण्यासाठी संस्थापक सचिव सुनील गोसावी यांचेशी 9921009750 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे. 
दर तीन वर्षांनी मुख्य कार्यकारी मंडळ तर दर दोन वर्षांनी तालुकास्तरीय शाखा कार्यकारी मंडळाची निवड करण्यात येते. यावर्षी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्या निमित्ताने लेखनाची आवड असणारे नवोदित साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची आवड असणारे शिक्षक, पत्रकार, प्राध्यापक, कलावंत, श्रमिक, कष्टकरी, डॉक्टर,इंजिनिअर, समाजसेवक या सर्वांना संस्थेचे सभासदत्व देण्यात येते.
               तरी सभासद होऊ इच्छिणाऱ्यांनी 8 डिसेंबर 2024 पर्यंत 9921009750 वर संपर्क साधावा,असे आवाहन संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे, कार्यवाह सुभाष सोनवणे, उपाध्यक्ष शाहीर भारत गाडेकर,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, सहसचिव सुनील धस, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर,सह कार्यवाह अजयकुमार पवार, राज्य संघटक शर्मिला गोसावी, प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र फंड,संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, राज्य कार्यकारिणीचे सदस्य स्वाती ठुबे, बबनराव गिरी, राजेंद्र पवार,किशोर डोंगरे, रामकिसन माने, बंडूसेठ दानापुरे यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

वाहन चालवितांना नियम व अटींचे पालन केल्यास विनाअपघात प्रवास होईल सुखकर


उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 
अनंता जोशी यांचे प्रतिपादन

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
दुचाकी चालवितांना हेल्मेट आणि चारचाकी वाहन चालवितांना नेहमी सीटबेल्टचा वापर करावा. रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास नि:संकोच मनाने मदत करावी. तुमची छोटीसी मदत कोणाचा जीव वाचवू शकते. तसेच वाहनाने प्रवास करतांना नियम व अटींचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणतेही संकट येणार नाही, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी केले.
        अशोक शैक्षणिक संकुलाचे संस्थापक माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अधिपत्याखालील अशोक इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स, प्रगतीनगर येथे तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सवचे (स्पोर्टमीट) उद्घाटन श्री.जोशी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी श्री.जोशी यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील संधी, वाहतुकीचे नियम, रस्ता सुरक्षा, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, मोबाईल मुक्त विद्यार्थी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 
       याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना सौ.मंजुश्रीताई मुरकुटे म्हणाल्या की, अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी अशोक शैक्षणिक संकुलाची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, आयटीआय, इंग्लिश मीडियम स्कुल, सीबीएससी इत्यादी अभ्यासक्रम सुरू केलेले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना देशी विदेशी खेळाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून भव्य क्रीडांगण उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घेऊन नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 
         प्रारंभी स्कूलचे संगीत शिक्षक सॅम्युअल वडागळे व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्फूर्ती गीताने मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संपत देसाई यांनी केले, तर प्रमुख अतिथींचा परिचय शिक्षिका लक्ष्मी गोल्हार यांनी केला. या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी हाऊस, नेताजी हाऊस, सावरकर हाऊस व भगतसिंग हाऊस पथकाचे शानदार संचालन झाले. त्यानंतर विद्यार्थिनींनी समूह नृत्य सादर केले. मशाल पेटवून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. स्कुलचे ए.इ.एम.एस. अद्याक्षरे असलेले फुगे हवेत सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नीरज मुरकुटे, सतिश ढाकणे आदी उपस्थित होते. शेवटी शिक्षिका रंजना क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर क्रीडा स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
 होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

विद्यानिकेतनमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये तीन दिवसीय वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. प्रसंगी महोत्सवाचा आरंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, रोहन चव्हाण तसेच मिस इंटरनॅशनल इंडिया सौंदर्यवती रश्मी शिंदे यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व स्व.विधिज्ञ रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व मशाल पेटवून झाला.
         दरम्यान सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच अभ्यास, शिस्त, वेळेचे नियोजन, रस्ता सुरक्षेचे नियम व मोबाईलचे फायदे-तोटे याविषयी माहिती दिली. तसेच सौंदर्यवती रश्मी शिंदे यांनी आपल्या भाषणातून वार्षिक क्रीडा महोत्सवास शुभेच्छा देऊन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. यावेळी इ.चौथी ते सहावीच्या विद्यार्थिनींनी 'लाईट द स्काय' या स्फूर्ती गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच इ.आठवी ते दहावीतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्कृष्ट संचलन केले. हेड बॉय साईराज थोरात याने विद्यार्थ्यांसमवेत शाळेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. तसेच ब्ल्यू,रेड,येलो,ग्रीन हाऊसनिहाय विद्यार्थ्यांच्या इ.पहिली ते पाचवी व इ.सहावी ते दहावी या दोन गटात रनिंग रेस,रस्सीखेच, कबड्डी,क्रिकेट,खो-खो,हॉलीबॉल बास्केटबॉल या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक (एनआयएस कोच) अजय आव्हाड,मयूर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
       कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे,खजिनदार डॉ.राजीव शिंदे,सौंदर्यवती रश्मी शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनीषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव गोसावी, अनन्या शिंदे, सूत्रसंचालन राजवर्धन चौधरी, हिंदवी रोडे यांनी केले,तर शेवटी आभार अक्षदा दळे हिने मानले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

आपण विकासासोबत समाजकारण केले मात्र काहींनी जातीचे राजकारण केले - आ.थोरात

मा.आ. बाळासाहेब थोरात यांचा
संगमनेर मध्ये संवाद मेळावा संपन्न

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर येथे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आज स्नेह संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी त्यांनी जमलेल्या विराट जनसमुदायासोबत संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डाॅ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते 
      
     नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्ते तथा तालुक्यातील जनतेच्या मनात एक हळहळ होती. ती आज या स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून दूर झाली. 
यावेळी माजी आमदार थोरात म्हणाले की, एका निवडणुकीत जरी आपला पराभव झाला असला तरी तालुक्यातील जनतेने कायम साथ दिली आहे. आपले राजकारणाचे फाउंडेशन मजबूत आहे ते कोणीही हलवू शकत नाही. काहीही झाले तरी जनता आपल्याच सोबत आहे याची खात्री आहे. मागील ४० वर्षात आपण संगमनेर तालुक्याची ओळख बदलली आहे. सतत दंगली होणारा तालुका आपण सुसंस्कृत व संयमी बनवला. सर्व समाजात शांतता बंधुभाव निर्माण करून लोकाभिमुख विकासकामांसोबत समाजकारण केले. यात कधीही आपला आणि विरोधक असा भेदभाव केला नाही. मात्र या निवडणुकीत काही मंडळींनी समाजासमाजात जाती द्वेष आणी धर्म,जाती, भेद निर्माण करत जनतेच्या मनात विष पेरत जे जाती - पातीचे राजकारण केले. त्यास आता मात्र आपल्याला याची दुरुस्ती करायची आहे. आपणही तीर्थरूप स्व. भाऊसाहेब थोरात यांचे वारसदार असून लढणे आपल्या रक्तात आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्या उभारीने जनतेत जाणार आहे. तालुक्यातील जनतेवर कार्यकर्त्यांवर व सर्वसामान्य नागरिकांवर झालेला अन्याय आपण कधीही सहन करणार नाही. यासाठी लढा द्यावा लागला तरी चालेल आपण मागे हटणार नाही. पुन्हा तालुक्याच्या हितासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद व मनभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे. तालुक्याच्या विकासासाठी मी भक्कम आहे. आपण तयार केलेला सुसंस्कृत तालुका व त्याचा विकास ही प्रत्येकाचीच आता जबाबदारी आहे असेही ते म्हणाले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

मनुष्य एक सामाजिक प्राणी है मगर समाज के बारे में क्यों नहीं सोचता है


यह कथन महान दार्शनिक अरस्तु का है। उनके अनुसार “वह मनुष्य समाज में नहीं रहना चाहता वह या तो देवता है या दानव।”

अरस्तु महान दार्शनिक प्लेटो के शिष्य थे ,एवं सिकंदर के गुरु थे । उनका यह कहना था कि, अन्य जीवो की तरह मनुष्य एक सामाजिक प्राणी है। जिसे हर कदम पर समाज की आवश्यकता पड़ती है। उनका यह कहना है कि, जो मनुष्य समाज में नहीं रहना चाहता वह मनुष्य या तो देवता है या दानव।क्योंकि सभी जीव एक समाज की भांति अपने समूह में रहते है ,वैसे ही मनुष्य को भी एक संगठित समूह में रहना श्रेयस्कर होगा, क्योंकि मनुष्य की जरूरतें,एवं तभी पूरी हो सकती है,जब मनुष्य संगठित होकर रहेगा।
जिस समय अरस्तु ने यह कथन कहीं होगी, उस समय जनसंख्या का घनत्व काफी कम रहा होगा। जंगल की जंगल चारों ओर रहे होंगे ।जंगली जीवो का डर मनुष्यो को सबसे ज्यादा रहता होगा ।आए दिन जंगली जीव , मनुष्य का शिकार करते होंगे। मनुष्य की सुरक्षा हर वक्त असुरक्षित रही होगी। उस परिस्थिति में बहुत ज्यादा जरूरी होगा की, मनुष्य एकजुट होकर समूह में रहे । तभी उनकी सुरक्षा हो सकती है।
अरस्तु द्वारा यह कथा उस वक्त कहा गया होगा, जब धरती पर अन्य जीवो की जनसंख्या भी संतुलन में रही होगी । मनुष्य की भांति अन्य जीव का भी अस्तित्व इस धरती पर मनुष्य के समान रहा होगा।
जैसें जानवर में सारे जानवर अपने अपने झुंड में चलते हैं और दूसरों जीवो से अपनी और अपने साथियों की सुरक्षा करते हैं। वैसे ही मनुष्य जीवन के लिए भी जरूरी है।
पंरतु,धरती पर सारे प्राणियों को प्रकृतिक ने दिमाग दिया किंतु बुद्धि एवं विवेक मनुष्य को दिया । सोचने और समझने ,एवं कुछ करने की क्षमता मनुष्य को दी । इसी विवेक के कारण जो मनुष्य खोजी प्रवृति के होगें जंगलों की ओर चले जाते होंगे ,एव॔ अपनी जान गंवा बैठते होंगे।
इसलिए अरस्तू ने कहा होगा कि अन्य जीवो की तरह मनुष्य भी सामाजिक प्राणी है । मनुष्य को भी समाज में रहना चाहिए । यह उनके कहने का उद्देश्य रहा होगा की,मनुष्य संगठित रहेगे तो, सुरक्षित रहेगे,सरल तरीके से जीवन यापन कर सकेगें।
अरस्तु के इस कथन का वर्तमान में क्या औचित्य है, मैं इस प्रश्न के उत्तर में उलझी हुई हूँ ।
मनुष्य का सामाजिक होना जरूरी है परंतु ,समाज कहते किसे हैं मनुष्य के द्वारा बनाए गए ईट सिमेंट क्रॉंक्रीट के मकानों को ? ऊंचे ऊंचे भवनों को ? या फिर एक कमरे वाले मकान को जिसमें एकसाथ पांच व्यक्ति रहते है।
या सड़को के किनारे जहां बिना सुरक्षा के लोग रात बिताते है।
अरस्तु ने मनुष्य को नसीहत दी और लोग संगठित होने लगे। दो चार परिवार मिलकर कबीला बना कबीले गांव में बदलने लगे,गाँव शहर में बदलने लगे ,छोटे छोटे शहर महानगर बनने लगे। लोगो ने जंगल के जंगल काटकर गांव बना लिया ,शहर बना लिया , महानगर बना लिए।
मनुष्य संगठित होता गया?
जंगल के जंगल कटते चले गये, जंगली जीव का अस्तित्व खतरे में आ चुका है ! जंगली जीव चिड़ियाघर व अभयारण्य की शोभामात्र रह गये है ! पूरी धरती पर जैसे जंगल और जानवर थे, मनुष्य की संख्या सिमित थी ,अब पूरी धरती पर मनुष्य ही मनुष्य है ,जंगल और जंगलीजीवों की संख्या सीमित है ! क्या ऐसे ही समाज की अरस्तु ने परिकल्पना की थी ?
क्या अरस्तु ने ये कहा था की, प्राकृतिक जीवन को छोड़कर कर ईट , सिमेंट कॉंक्रीट का कृत्रिम जीवन मनुष्य अख्तियार कर ले ?समाज के नाम पर प्रकृति का ही दोहन कर दे,जंगली जीवों का ही नाश कर दे !
नही बिल्कुल नही अरस्तु ने वैसे समाज की कल्पना की होगी, जिसमें मनुष्य भी जानवरों की भांति अपने समूह में संगठित रहें। परिवार समाज और संस्कृति धर्म बनाकर मनुष्य एक बेहतर जीवन यापन कर सके। प्रकृति का दोहन न करके प्रकृति के सहारे प्रकृति का विकास कर जीवन यापन कर सके।
अगर अरस्तु के अनुसार यह समाज बना होता तो,मनुष्य जीवन पर संकट वर्तमान में न मडरा रहा होता।
न प्राकृतिक आपदाएं होती न मानवजनित आपदाएं होती। ना ही पूरे विश्व को प्रथम व द्वितीय विश्व युद्ध देखना पड़ता और ना ही वर्तमान की कोरोना महामारी से लाखों लोगो की जान जाती।
समाज ईट सिमेंट कॉंक्रीट के मकानों से नही बनते है बल्कि मनुष्य के मनुष्य के सहयोग से बनते है। एक दूसरे के साथ सहयोगात्मक जीवन जीने से बनते है ना की,बड़े बड़े अपार्टमेंट्स में सैकड़ो की संख्या होने के बाद अकेला जीवन जीने के लिए मजबूर इंसान।
एकता में ताकत होती है , समूह चाहे जानवर का हो या मनुष्य का, जीवन समूह में सरल और सुरक्षित होता है।
परंतु अरस्तु के सारे कथन वर्तमान में निरस्त जैसे लगने लगे है । मनुष्य का समाजिक प्राणी बनने के सफर से मनुष्य असमाजिक प्राणी बनने का सफर शुरू कर चुका है।
अलग-अलग जानवरों की तरह मनुष्य के पूरे विश्व में अलग-अलग समूह बन चुके है।स्थिति ऐसी है कि, मनुष्य ही मनुष्य का दुश्मन है ना की,कोई जानवर ?
मनुष्य को आनेवाले समय में समाजिक प्राणी बनने की जगह फिर से शुरू करनी होगी ,मनुष्य को अपने प्राण बचाने के लिए फिर से कोई समाजिक परिकल्पना करनी होगी ।

=================================
-----------------------------------------------
*आलेख*✍️✅🇮🇳...
सुनीता कुमारी 
(पूर्णियां - बिहार)
-----------------------------------------------
=================================
*आलेख सहयोग*💐✅🇮🇳...
चंद्रकांत सी पुजारी 
महुवा - सुरत (गुजरात) 
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर (महाराष्ट्र) 
M - 9561174111
-----------------------------------------------
==================================


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक



 पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा

- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबईत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने राज्याचे माजी आणि भावी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत पत्रकारांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांचा आढावा घेण्यात आला.
 महायुती सरकारने पत्रकारांच्या आर्थिक विकास महामंडळाची तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या महामंडळाची मंजुरी दिल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 'दीक्षा भूमी ते मंत्रालय संवाद यात्रा' सुरू करण्यात आली होती, या संवाद यात्रेची माहिती तसेच पत्रकारांच्या २२ मागण्यांवर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले की लवकरच प्रलंबित मागण्या मार्गी लावल्या जातील. त्यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी तसेच सोशल मीडियाच्या नियमनासाठी शासन धोरणात्मक निर्णय घेईल, असे सांगितले.

विखे पाटील यांनी पत्रकारांचा लोकशाहीतील योगदान अधोरेखित करताना पत्रकारांना चौथ्या स्तंभाचे महत्त्व पटवून दिले. शासनाला नेहमीच पत्रकारांचे सहकार्य लाभले असून, महायुती सरकार पत्रकार हिताचे निर्णय घेत राहील, असे त्यां
नी नमूद केले.


या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी समूहाचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आणि दैनिक समर्थ गांवकरी ठाणे ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी सुभाष विसे यांच्या शुभहस्ते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ, खोबऱ्याचा हार आणि साईबाबा मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी पेढा भरवून त्यांचा सत्कार केला.

संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या मागण्यांसाठी ठोस पावले उचलली जातील, असे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सांगितले. ही बैठक पत्रकारांसाठी अत्यंत फलदायी ठरली असून, आगामी काळात शासन पत्रकारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================