राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, March 10, 2025

रमजान मुबारक 2025 रोजा नं.10 वा, मंगळवार दिनांक 11-03-2025


रमजान मुबारक 2025
रोजा नं. 10वा, मंगळवार दिनांक 11-03-2025
!!! अल्लाह च्या" रहमत " ( दया व कृपा ) साठी आपल्याला ही काही चांगलं केलं पाहिजेत ना!!
   प्रेषित मुहम्मद स्व. नी कथन केलं कीं, " रमजान महिना असा आहेत कीं त्याचे तीन विभाग ( आशराहा )केलेलं आहेत, ज्यामध्ये पहिला (1) विभाग " रहमत "(2)विभाग " मगफिरात "आणि तिसरा(3) विभाग हा " जहाँनम से आझादी ( नरका तील भडकत्या आगी पासून सुरक्षता ).
मित्रांनो आज बोलता बोलता रमजान मुबारक चे 10 दहा रॊजे पूर्णतःवास जात आहेत तरीही आपण गाफिल व निष्काळजी आहोत, एवढी मोठी संधी असताना आपण खुशाल संधीची वाट लावत आहोत, पहिले दहा रोज़े हें "रहमत " अर्थातच "दया " करणारा, अल्लाह हें कायमच दया करणारे आहेत आपल्या हातून दिवस भरात किती कळत न कळत अशा गोष्टी होत असतात कीं अपल्याला त्यांच गुमान ही नसतं. उदाहरण दयायच झाले पुष्कळ देता येतील चालता चालता कोणाला तरी शिवी देतो, व्यवहार करताना चुकींच खोटे बोलून शपथ खाऊन माल विकतात किंवा घेतात अर्थातच कोणाला तरी फसवूनच हें व्यवहार चालतात, भाजी विकताना भाजीवाला वारंवार भाजीवर ताजी दिसावी म्हणून पाणी मारून ताजी आहेत म्हणून विकतात, कोणाचे पैसे डुबवलं जातात, वारंवार खोटे बोलून घरी बसले जाते, देणं घेणं खोटे बोलून टाळलं जातं, असं असंख्य गोष्टी कळत न कळत केलं जातं, वारंवार खोटे बोललं जातंय आपल्या दोस्ताला, वडिलांना, आपल्या बॉस बरोबर असं असंख्य उदाहरण देता म्हणून याची काहीतरी कमी व्यव्ही म्हणून आपण ते टाळण्यासाठी म्हणून आपण काहीतरी सत्कार्य करीत कुढे तरी मनात रुख रुख असतं म्हणून रमजान चं रोज्या मध्ये वारंवार अल्लाह ची रहमत व्यव्ही म्हणून आम्ही अल्लाह जवळ कायम कायम वारंवार माफी मागितली पाहिजे व वारंवार होणाऱ्या आपल्या चुका पुन्हा कधी ही होणार नाहीं याची अल्लाह जवळ गवाही साक्ष दिली पाहिजेत. अल्लाह हा दायवंत कृपावंत कृपाळू ही आहेत. अल्लाह आपल्या बंद्यावर सत्तर आई पेक्षा जास्त प्रेम करत असतो म्हणून वारंवार माफी मागत चला, ज्याच्या ज्याचाशी तुम्हीं चुकीचं वागलात, बोललात, चुकीचा व्यवहार केलेत त्या सर्वांशी पुन्हा पुन्हा माफी मागा अल्लाह एवढा दयावान आहेत तर आपल्या समोरील व्यापारी, आई, बाबा, मित्र, ज्या बरोबर चुकीचं वक्तव्य केलं तो तर मनुष्य आहेत.. चुका या माणसा कडूनच होतं असतात.. फक्त्त जगात चुका या फारिस्ते च करीत नसतात, मनुष्य प्राणी हा वारंवार चुका करणारा असतो म्हणून अल्लाह त्याच्या राहमत साठी दुवा करा... म्हणून रामजानुल मुबारक चा या पवित्र महिना अल्लाह चा आवडता महिना आहेत म्हणून जास्त जास्त चुका माफ होण्याचा संधी चा महिना आहेत...
म्हणून प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, या महिन्यात काही गोष्टी वारंवार कराव्यात, (1) वारंवार अल्लाह ( परमेश्वर ) एक आहेत व प्रेषित मुहम्मद स्व, अल्लाह चे अंतिम प्रेषित (पैगंबर, संदेशष्टा आहेत..
(अर्थातच ला ई लहा ईललिल्लाह मुहम्मद दूर रसूललिल्लाह स्व.).
(2) इस्तीगफार (.वारंवार आपण केलेल्या भूतकाळातील चुकांची माफी मांगने ) 
(3)जन्नत कीं तलब ( मारणोत्तर जीवनानंतर स्वर्गातील जागेची इच्छा ).
(4).. आग से पन्हा ( मारणोत्तर जीवनामधील नरकातील अगी पासून रक्षण ).
समाजातील बहुतेक बंधूना उपासना मागचा उद्देशच माहिती नसते, केवळ समाजातील लोकं, आजूबाजूला, शेजारी करतात म्हणून करीत असतात, रमजानचे उदाहरणं म्हणजेच जगातील सर्व देशात एकाच वेळी-एकच दिवस- महिना - उपवास ची सेहर व इफ्तार वेळा या त्या त्या देशाच्या वातावरणाच्या हिशोबाने असतात प्रौढ बंधू बघीनी चा विचार केलं तर 70-80% लोकं जगात रोजा ठेवतात अपवाद फक्त्त असाध्य रोगानी ग्रस्त , गर्भवती स्त्री व दूध पाजणारी माता यांना रोजा ठेवण्यासाठी सवलत दिलेली आहेत परंतु त्यांनी नंन्तर त्याची पुर्तता 
केली पाहिजे. 
   परुंतु एवढ्या रोजे ठेवणाऱ्या रोजीदारांना रोजे ठेवण्याचा उद्देश विचारलं तर,फारच थोडया लोकांना व्यवस्थित उत्तर देता यईल म्हणून सर्व रोजदारांनी आपलं उदीष्ट काय आहेत हें माहित करून उपासना केली तर किती मजा येईल अल्लाह ही राजी होईल होतील.. म्हणून या, "रहमत मगफिरात" मिळणाऱ्या महिना ची संधी साधून जरूर बंपर ऑफर चा फायदा उचला.
उद्या पासून मगफिरात चा अश रहा चालू होणार अल्लाह जवळ आपण केलेल्या चुकांची माफी मागायची... माझ्या साठी ही अल्लाह जवळ दुवा मागा व माझ्या सह जगातील समस्त जगातील शांती व एकोपा टिकावं म्हणून ही आपल्या दुवा मध्ये सामील करून द्यावेत.....
(मित्रांनो लेख आवडला तर जरूर आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवा.. जरूर फायदा होईल... प्रतिक्रिया अवश्य कळवा 🙏)

=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल --मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर.. जिल्हा :- अहमदनगर 
9271640014
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
-----------------------------------------------
=================================

Sunday, March 9, 2025

रात्र वैऱ्याची आहे,जाग्या रहा, कायद्याचा योग्य वापर करा - विद्याताई क्षीरसागर


रात्र वैऱ्याची आहे,जाग्या रहा, कायद्याचा योग्य वापर करा - विद्याताई क्षीरसागर

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रात्र वैऱ्याची आहे, जाग्या राहा, कायद्याचा योग्य वापर करा तरच समाज सक्षम होईल असे उद्गार श्रीरामपूर येथील राज्य महिला आयोगाच्या तसेच विद्या कलानिकेतन संस्थेच्या अध्यक्षा विद्या क्षीरसागर यांनी तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी मंच आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमात त्या "राज्य महिला आयोग आणि महिलांची सुरक्षा" या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर श्रीरामपूरच्या माजी सभापती सुरेखा क्षीरसागर उपस्थित होत्या. त्या पुढे असेही म्हणाल्या की, कुणीही अन्याय, अत्याचार सहन करू नये, कायद्यांचा गैरवापर करू नये. गुन्हे दाखल करताना योग्य ती काळजी घ्यावी. भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व महामानव आपण वाचले पाहिजेत. स्वातंत्र्याचा गैरवापर करू नका असेही त्या म्हणाल्या. 
श्रीरामपूरच्या माजी सभापती सुरेखाताई शिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. 
     कराटे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रुमुख अतिथींच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कराटे प्रशिक्षणाचे आयोजन डॉ.विनायक काळे यांनी केले तर तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून अकबर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्राचार्य डॉ .गुंफा कोकाटे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संयोजन प्रा.रुपाली उंडे यांनी केले. प्रा.अमृता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.स्वाती कोळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान तीन हजार रूपये करावे


संजय गांधी निराधार योजनेचे
अनुदान तीन हजार रूपये करावे

मिलिंदकुमार साळवे यांची मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

२७ लाख महिलांना देवाभाऊंकडून अपेक्षा

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या संजय गांधी, निराधार अनुदान व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थी २७ लाख विधवा महिलांना दरमहा मिळणारे पंधराशे रूपये अनुदान वाढवून तीन हजार रू. करण्याची मागणी भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंद कुमार साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
 सोमवारी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही साळवे यांनी याबाबत निवेदने दिली आहेत.
साऊ एकल महिला समिती विधवा व सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी महाराष्ट्र राज्यात काम करीत आहे. राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करून घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करीत दोन महिन्यांचे आगाऊ अनुदान देखील त्यांच्या बँक खात्यात जमा केले. तसेच निवडणुकी नंतर लाडकी बहीण योजनेचे अनुदान पंधराशे रूपयांवरून वाढवून ते दोन हजार दोनशे रू. करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. संजय गांधी निराधार योजनेसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा फक्त एकवीसशे रूपये कायम ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी मात्र वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख रूपये ठेवण्यात आली. तसेच कुटुंबात चारचाकी वाहनधारक व आयकर भरणारा सदस्य नसावा, अशाही अटी घालण्यात आल्या. केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले. 
या योजनेची घिसाडघाईत अंमलबजावणी करताना अर्जांची छाननी देखील झाली नाही. त्यामुळे हजारो सधन महिलांना योजनेचा लाभ मिळाला. दुसरीकडं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची मात्र काटेकोरपणे छाननी होत आहे. हयातीचा दाखला, आधार सिडिंग नसेल तरी लगेच अनुदान बंद केले जात आहे. अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्यामुळे सुमारे पाचशे कोटींहून अधिक रूपयांची उधळपट्टी सरकारी खजिन्यातून झाली आहे.
एकाच राज्यात महिलांच्या दोन योजनांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेत व अंमलबजावणीत भेदभाव होत असल्याने गरजू, घरातील कर्ता पुरुष, आधार गमावलेल्या एकल महिलांवर तांत्रिक बाबींमुळे मोठा अन्याय होत आहे.
         आज राज्यात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान (पेन्शन) घेणाऱ्या १५ लाख ९७ हजार, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शनचा लाभ मिळणाऱ्या ११ लाख १४ हजार अशा एकूण २७ लाख महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे अगोदरच संकटात असलेल्या या एकल महिलांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी असलेली वार्षिक एकवीसशे रू. उत्पन्नाची मर्यादा वाढवून अडीच लाख रू. करावी, तसेच लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना तात्काळ वगळून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे दरमहा अनुदान पंधराशे रूपयांवरून तीन हजार रूपये करण्याची गरज आहे.
    
अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, पण २१ हजार उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे अन्यायकारक, विचित्र विसंगतीचे चित्र यातून निर्माण होत आहे. अनेक श्रीमंत कुटुंब कमी उत्पन्न दाखले देऊन लाभ घेत आहेत. पण संजय गांधी पेन्शन मिळते म्हणून २१ हजार रू.च्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या गरजू, गरीब महिला मात्र वंचित राहत आहेत.
एका कुटुंबात अनेक कर्मचारी असतील तरी वेतन, पेन्शन कपातीचा कोणताच निकष नसतो आणि गरीब कुटुंबातील एकल निराधार महिलांना फक्त १५०० रुपये जास्त देताना त्या जणू पेन्शन घेऊन श्रीमंत झाल्या, असा सरकार अर्थ घेते हे अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे लाडक्या भगिनींसोबतच सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा दरमहा पंधराशे रू. दरमहा लाभ घेणाऱ्या विधवा, निराधार, परित्यक्ता भगिनींच्या दरमहा अनुदानात वाढ करावी, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025रोजा नं. 09, सोमवार दिनांक 10-03-2025...

रमजान मुबारक 2025
रोजा नं. 09, सोमवार दिनांक 10-03-2025..
रोजा :-!! विविध पर्याय उपलब्ध आहेत तरी अल्लाह च्या क्रोधा पासून सावध राहणे "!!
         पवित्र कुरआन मध्ये, "उपवासाचे काही ठराविकच दिवस आहेत, परंतु तुमच्या पैकी जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर, त्यांनी इतर वेळी ते राहून गेलेले रोजा ( उपवास ) ठेवून ते दिवस पूर्ण करावे. आणि ज्या लोकांना उपवास करतांना अतिशय कठीण प्रवास करावे लागत असतील,तर, त्यांनी एका उपवासाच्या बदल्यात एका गरीब माणसाला जेवण द्यावे, आणि जो कोणी आवश्यकते पेक्षा जास्त चांगले कार्य करेल, तर, ते त्यांच्यासाठीच अधिक चांगले आहेत. परंतु, तुम्ही उपवास करा ते तुमच्यासाठी अधिक चांगले आहेत, जर तुम्ही त्या उपवासाचे महत्व जाणाल तर." अद्याय नं. 02, सुरह बकराह आ. नं. 184.).
इस्लामी सत्ता चे दुसरे खलिपा हजरत उमर बिन खत्ताब रजि. सांगतात कीं,'" तुम्हीं मनापासून ( मना ) मध्ये केलेल्या दृढ निश्चया ( नियत ) वर व इच्छानुसार किंवा भावना नुसार तुम्हाला त्यांच फळ रिझलट ( Result ) मिळत असतात. ".( सहीहं बुखारी हा. नं 01)
कालच आपण मधुमेह सारख्या आजारा बद्दल नियोजन करण्याचं बघितलं आहेत तर आजून बरेच आजार असे आहेत कीं रोजा व उन्हाळ्यात बाहेर येतात किंवा उदभवतात, मार्च महिन्यात उन्हाळा ची अगदी सुरुवातच झालेली असते लोकांना तापमानाशी जुळवून घ्यायला जरा वेळच लागतो या मध्ये पुन्हा रमजान मुबारक चे अनिवार्य फर्ज रोज़े आलेत, 
काही जर्जर झालेल्या आजार काळजी घेणं गरजेचे आहेत, उदाहरणं :- मधुमेह, रक्त दाब, थायरॉईड, सांधेवांत, किंवा किडनी आजार वाल्याचा मुतखडा, मूळव्याध, फिटच झटके येणाऱ्या, इत्यादी.
यातील काही आजार दीर्घकाल राहणारे आहेत. त्याची तीव्रता अजून वाढू न देता ते आटोक्यात आणण्यासाठी नियोजन करणं गरजेचे आहेत कारण त्या आजाराचे योग्य उपचार न झाल्या मुळे दुसरे तिसरं दुसरेच आजार वाढण्याची शक्यता असते म्हणून आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जावून योग्य उपचार करन सोयीचे असते,त्यासाठीच आताच काही प्रयत्न करणं गरजेचे आहेत उदाहरणं द्यायचे झाले तर आपल्या दैनंदिन जीवन शैलीत काही बदल करावे लागतात, व नियमित निगा ठेवून वेळेवर औषधं घेतल्यास हें सर्व आजार नियंत्रनात राहू शकतात.
मधुमेही रोजदारांची कधी साखरेचं प्रमाण कमी होऊ शकते, साखरेचं नियमन करणारी यंत्रणा कोलंडून पडू शकते म्हणून मधुमेही रुग्णांनी आपल्या इन्सुलिन चा डोस सेहरी व इफ्तार करतांना डोस कमी ठेवावं आपल्याला पचेल असंच सेहरी इफ्तारी द्यावी.
 रोजा मध्ये ब्लड प्रेशर हृदय विकार वाल्यानी रोजा ठेवताना आपल्या औषधं सकाळी सेहरी मध्ये द्यावीत प्रमाण मात्र रोजच्या पेक्षा कमीत कमी डोस ठेवावा जेणेकरून नंतर आपलं प्रेशर कमी कमी जावून आणीबाणीची परिस्थिती उद्भवेल त्यांनी मिठाचं प्रमाण योग्यच ठेवावं कारण इफ्तारी व सेहरी मध्ये पक्वन्न जरा जास्त खारट, तेलकट, चटपटीत असतात म्हणून थोडी काळजी घेऊन रोजा च नियोजन करावे.
तसेच थयीरॉईड वाल्यानी सुद्धा आपला एल्ट्रोक्सिन , थायरोक्सिन चा किंवा तत्सम गोळया चं डोस अर्धा वर च ठेवावं,कमीत कमी डोस द्यावं, आपल्या आहारातील प्रमाण ही योग्य तेच ठेवावं.
 मुतखडा असलेल्या रोजदारांनी जेवढे जास्त होईल तेवढे पाणी जास्त प्यावं, मुतखडा च्या रुग्णांना एक विनंती राहील कीं आपल्याला जास्त पाणी पिण्याची गरज आहेत, त्यांच प्रमाणे सरबत द्रव्य पदार्थ नारळ पाणी, कोकम सरबत इत्यादी चं प्रमाण जास्त ठेवावं.
तसेच किडनी विकरातील डायलेसिस च्या रुग्णांनी उपवास ठेवुच नयेत किंवा आपल्या संबंधित डॉक्टर चा सल्ला द्यावा.
मूळव्याध व बांधकोष्टतता वाल्यानी ही पाणी जास्त पियावे..
शक्यतो सर्व आजारी व आजारी नसलेल्या रोजदारांनी पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावेत, मार्च चं ऊन आहेत तर कधी कधी dehyadration दिहैद्राशन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं.
तसेच वारंवार ऍसिडिटी होणाऱ्यांच प्रमाण खूप जास्त आहेत म्हणून अशा रोजदारांनी सेहरी बरोबर ऍसिडिटी गोळया घेऊनच सेहरी करावी किंवा इफ्तारी नंतर लगेच गोळी द्यावी.
फिटचे झटके येणारे नी आपली एपटॉईन गोळी दोन वेळा द्यावून रोजा ठेवावं..
तसेंच एक फार महत्वाचं प्रश्न आहेत तो म्हणजेच संधिवात झालेल्या रुग्ण व रोजदार नमाझीचा कारण संधिवात झाल्यामुळे नमाज अदा कार्यासाठी साध्याची हालचाल ली काही मर्यादा येतात किंवा ज्यांच्या खुबे व गुढग्याचे ऑपरेशन म्हणजेच रिप्लेसमेंट झालेलं आहेत अशा नमाझी नी खुर्चीवरच chair वरच नमाज अदा करावी.
आपण अगोदरच हजरत उमर बिन खात्ताबा रजि. यांनी सांगितलेली हद्दीथ हदीस, ज्यांच्या मनातील इच्छानुसार ( नियत )प्रत्येक गोष्टींचे फळ भेटत असतात ".
अगर तुमची खरोखरच रामाझान मधील सर्व साबब नमाज रोजा इत्यादी करायची इच्छा असेल परंतु प्रकृती शरीर साथ देत नसेल तर तो नाईलाज समजावं अल्लाह सर्व काही बघणारा आहेत व असतो, इस्लाम मध्ये अल्लाह नें पर्याय ही ठेवलेले आहेत अल्लाह एवढे क्रूर तर नक्कीच नाहींत, अल्लाह तर कृपालू दयाळू, माफ करणारा आहेत.. अल्लाह ला कोण बनवा बनवी करतोय हें सगळे माहित आहेत. अल्लाह ला बनवा बनवी चालत नाहीं नाहीतर अल्लाह एवढा क्रोध कोणालाही येत नाहीं.. मग कोणाचीही खैर नाहीं.. म्हणूनचं अल्लाह च्या क्रोधा पासून वाचवण्यासाठी सर्व श्रद्धावनंत कायमच प्रार्थना दुवा करीत असतात, कायमच दुवा मे लिन व्याकुळ झालेलं असतात, "अल्लाह हम्हारी मागफिरत आता करणा.. अल्लाह हम्हारे से राजी होना..हम्हारे से जो भी गलती हुये है उस गलती को माफ करणा, "अल्लाह हम्मा अजीरणा मिनिनणार "
म्हणून रोजीदारांनी अल्लाह च्या क्रोधा पासून सावधान राहिले पाहिजे...
( मित्रांनो लेख आवडला तर आपल्या सर्व नातेवाईकांना जरूर पाठवा, ते ही फायदा उचलतील, प्रतिक्रिया अवश्य कळवा ).

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर.✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
🌷🌷9271640014🌷🌹
-----------------------------------------------
=================================

Saturday, March 8, 2025

महिला सक्षमीकरण धोरणाचे पुरस्कर्तेपंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


महिला सक्षमीकरण धोरणाचे पुरस्कर्ते
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने महिला सक्षमीकरणाची गरज महत्वाची असून पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कल्पना आणि आदर्शांचे अनुकरण कृतीतून करत आहेत. 
      मोदी म्हणतात, महिला सक्षमीकरण नाही तर महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आहे. महिला सक्षमीकरणाचे मोदी नेहमीच समर्थक राहिले आहेत. महिला आरक्षण विधेयक पारीत करून महिलांचा सन्मान वाढवला आहे. ३३℅ आरक्षण देण्याच वचन पूर्ण केले.
      मोदीजी नी जन धन खात्याच्या माध्यमातून व मुद्रा लोंन योजनेतून कोट्यवधी महिलांना आर्थिक सक्षम करून उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमुळे तीन कोटींहून अधिक महिलांना धूरमुक्त जीवन जगण्याची कल्पना प्रत्यक्षात राबवली आहे. सहा कोटींहून अधिक शौचालये बांधली आहेत, ज्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर आणि प्रतिष्ठेवर होतो. ते मोदींनी शक्य करून दाखवले आहे. 
बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत स्वच्छ शाळा अंतर्गत मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात आली, ज्यामुळे मुलींचे शाळाबाह्य प्रमाण कमी झाले.  
     भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा भाजपने प्रशासनात किंवा पक्ष संघटनेत महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाचे समर्थन केले आहे. भारताच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महिला द्रौपदी मुर्म यांना बसवले आहे. निर्मला सीतारमण यांच्या रूपात एका महिलेला पूर्णवेळ संरक्षण मंत्री म्हणून पाहिले. नंतर अर्थमंत्री म्हणून काम दिले. मोदी सरकारमध्ये सहा महिला कॅबिनेट मंत्री आहेत. कदाचित मंत्रिमंडळात महिलांची संख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. पंचायतीपासून संसदेपर्यंत राजकारणात महिलांचा सहभाग वाढवण्याचे आवाहन मोदींनी अनेकदा केले आहे. ही पद्धत त्यांच्या आणि पक्षाच्या घरापासून सुरू होते हे स्पष्ट आहे. १७ व्या लोकसभेला आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला खासदारांचा बहुमान मिळाला आहे हे एक समाधानकारक सत्य आहे. लोकसभा खासदारांपैकी जवळजवळ निम्म्या महिला भाजपच्या आहेत. 
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यात भाजप नेहमीच विधिमंडळात महिलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास समर्थक राहिले आहे. अटलजी नी १९९८ ला हे विधेयक मांडले होते, परंतु इतर पक्षांच्या पाठिंब्याअभावी ते अयशस्वी झाले. पक्ष संघटने त महिलांसाठी ३३% जागा राखीव ठेवून भाजपने महिला प्रतिनिधित्व दिले आहे. प्रवक्त्यांमध्ये अनेक महिला आहेत.
           महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्रजी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्याच चौथ्या महिला धोरणाची घोषणा केली. ‘महिला धोरण अष्टसूत्रीवर आधारित असून, त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्य व पोषण आहारावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागांत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यावरही भर देण्यात येणार आहे. शिवाय, शिक्षण, कौशल्यासाठी माध्यमिक आणि वरिष्ठ पातळीवरील शाळांमध्ये १०० टक्के नोंदणी होईल आणि ती टिकून राहील, यासाठी लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याबरोबरच कौशल्य विकास योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांविरोधातील सर्व प्रकारच्या हिंसाचारास आळा घालण्यासाठी सर्व संस्थांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक अतंर्गत समितीची स्थापना करण्याची सूचना करण्यात आली आहे. निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींसाठी नेतृत्व, नियोजन, अर्थसंकल्प आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना धोरणात करण्यात आली आहे.’
     राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला १५००/- रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला व त्याची प्रभावी अंमलबजावणीही होत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करुन देण्याची महत्वाकांक्षी योजना आणली आहे. राज्यात मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे. नुकतेच राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षणासह खाजगी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये ५०७ अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.
        मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप केवळ महिला-केंद्रित धोरणांन मुळे शहरे आणि गावांपासून ते संसदेपर्यंत देशाच्या विकासात महिलांची भूमिका वाढत आहे ही अभिमानाची बाब आहे. महिलांचा प्रशासनाचा केंद्रबिंदू बनवण्यातच नव्हे तर सत्तेच्या पदांवर चांगले प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यातही आघाडीवर आहे ही आणखी अभिमानाची बाब आहे.नवीन भारत म्हणजे महिलांना त्यांच्या जन्मजात नेतृत्वगुणांना व्यक्त करण्याची संधी देणे. उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता, संवाद कौशल्ये, बहुकार्य करण्याची क्षमता यासारख्या महिलांच्या गुणांचा फायदा राष्ट्राला होईल.

=================================
-----------------------------------------------
*शब्दांकन*✍️✅🇮🇳...
भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मीडिया सेल,उत्तर नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025रोजा नं. 08, रविवार दिनांक 09-03-2025 - विषय :- रोजा :- मधुमेही रोजदारांनी नियोजन करणं गरजेचे आहेत....



रमजान मुबारक 2025
रोजा नं. 08, रविवार दिनांक 09-03-2025
विषय :- रोजा :- मधुमेही रोजदारांनी नियोजन करणं गरजेचे आहेत....

" हें आज्ञाधारक ( श्रद्धांवान )लोकांनो!तुमच्या साठी रोजे (उपवास ) अनिवार्य करण्यात आलेले आहेत जसे, तुमच्या पूर्वजांवर अनिवार्य केले होते, हें यासाठीच कीं, तुम्ही सदाचरणीं बनावेत ( पवित्र कुरआन आद्याय नं 02सुरह बकराह (स्लोक आ. नं :-183).
उपवासाचे (रोजाचे ) काहीच ठराविक (मोजकेच )दिवस आहेत, तरीही आणखीन तुमच्या साठी एक सोपी गोष्ट ही आहेत कीं, तुमच्यापैकी एखादी व्यक्ती आजारी आहेत तर तिला उपवास करणं कठीण असेल, हानिकारक असेल, किंवा प्रवासात असेल, तर इतर दिवशी ( राहून गेलेले )रोजा करून उपवासा ( रोजा ) ची संख्या पूर्ण करावी, आणि ज्या लोकांना उपवास करतांना अतिशय कठीण प्रवास करावे लागते असतील तर त्यांच्या साठीदुसरी सोपी गोस्ट ही आहेत कीं, ज्यांची कुवत ( एपत ) आहेत त्यांनी एका गरीबाला जेवण द्यावे, आणि एखाद्यानें यापेक्षा जास्त पुण्य कमावले तर त्याच्या साठी ही चांगलीच गोस्ट असेल, तरीही उपवास करणे तुमच्यासाठी चांगलेच आहेत, जर तुम्हाला उपवास केल्याणे फायद्याचे ज्ञान असेल. (" पवित्र कुर आन आद्यय नं. 02 सुरह बकराह आ. नं. 184).
या आयतीत आजारी व प्रवासात असणाऱ्या लोकांना अल्लाह णे सवलत दिलेली आहेत ती पण फारच आजारी किंवा कठीण प्रवासात.
सध्या मार्च महिना चालू आहेत, वातावरना मध्ये कधी एक्दम उष्णता तर थोडं थंड तर कधी वेगवेगळ्या हवामान चालू आहेत, वातावरणाच्या या बदला मुळे लोकांना सर्दी खोकला, घसा तडतड करतोय तर कधी भरपूर खोकला येतोय. काहींना चक्कर येत आहेत तर काहीच होतं नाहीं. वातावरणातील काही दिवस असेच चालू राहणारे आहेत दहा पंधरा दिवसांनतर लोकांना वातावरणाची सवय होईल तर रोजची ही सवय होईल,
परंतु काही लोकांना काहीतरी बहाणा लागतो म्हणून सूल्लक कारणाने पवित्र रोजे सोडतात त्यांच्या साठी 
हजरत अबू हुरेरा रजि. सांगतात कीं, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं कीं, ज्या व्यक्तीनें जाणूनबुजून रमजान मुबारक मधील रोजे सोडले त्यानं नंन्तर कितीही रोजे ठेवलं तरी त्या रमजान मधील एका रोजाची किंमत जन्मभर कधीच चुकवू शकणार नाहीत ( तिर्मिझी शरीफ ).
मार्च च्या विविध ढंगी वातावरणामुळे बरेच रोजदार आजारी पडू राहिले आहेत, त्यामध्येच जे विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत उदाहरण म्हणून आम्ही मधुमेही, हृदय विकार, थयोरॉईड, संधिवात किडनी आजार व त्याबरोबर होणारे इतर आजार. व वयोरुद्ध व्यक्ती, वरील सर्व आजार हें बाराही महिने औषधं द्यावे लागतातच. अशा रोजदारांनी आपल्या रोजा व दैनंदिन औषधं यांच्या नियोजन करण्याची गरजेचं आहेत. काही काही आजार हें काही वेळा सिरीयस आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्या वरच लक्षात येते. म्हणून वयोंदृद्ध लोकांनी वेळोवेळी आपल्या फॅमिली डॉक्टर कडून तपासनी करणं गरजेचे आहेत.
जागतिक आरोग्य संघटना च्या 2003च्या सर्वे नुसार, जगातील एकूण, 19 कोटी मधुमेह रुग्णा पैकी एकट्या भारतात 5 पांच कोटी फक्त्त भारतातच आहेत.. भारत देश हा मधुमेही ची राजधानी झाली आहेत. पूर्वी भारत देश हा साथीच्या आजाराचे माहेरघर समजलं जायचं परुंतु सध्या प्रत्येक घरोघरी म्हणा किंवा प्रत्येक एक घरा आड एक मधुमेह रुग्ण आढळत आहेत.. अगदी लहानलहान मुलांना सुद्धा मधुमेह, हृदय विकार, ब्लड प्रेशर, असे विविध आजार बघवयास मिळत आहेत. परंतु यातील खूप आजार हें नियंत्रणात आणता येतात त्यासाठी नियोजन करणं गरजेचे आहेत, 
या मधुमेही रुग्णांनी रोजा ठेवताना पहिल्या प्रथम आपल्या सर्व रिपोर्ट केली पाहिजे उदाहरणं,:- मधुमेहीचे रक्तातील साखरेचं प्रमाण तपासणं गरजेचे आहेत उपाशी पोटी ( Fasting p- 60 ते 90/100 असणं व post prandl( खाल्यावर दोन तासाने 90-ते 140/160 मिलिग्राम, असणं गरजेचे आहेत, कधीकधी HbA1c ही टेस्ट करणं ही गरजेचे आहेत, मधुमेही चे रोजा मध्ये कधी कधी रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं, कधीकधी शरीररातील साखरे व्यवस्था कोलंडून पडते व त्या बरोबरच बहुतेक मधुमेहीना Blood presser ही असतो किंवा थयोरॉईड thyoroid, ही असतात म्हणून अशा रुग्णांनी सेहरी करतांना सर्व अन्न घटक मर्यादित व योग्य प्रमाणात घेणं उचित असेल, त्या बरोबर च आपल्या दैनंदिन रोजच्या औषधं घेणं गरजेचे आहेत परुंतु रोजा ठवायचा असेल तर आपल्या डोस ( मात्रा ) dos चे प्रमाण थोडं कमी करावे, आपल्या Injection इन्सुलिन घेणाऱ्यानं आपल्या कायमच्या डॉक्टर कडून dos ची व्यवस्थित adjustment करूनच injection घावी आपल्या स्वतः च्या मनाने कृपया dos adjust करू नयेत. माझ्या मते मधुमेही रुग्णांनी आपल्या dos चे प्रमाण थोडेच ठेवावे कारण संपूर्ण महिना भर रोजे ठेवायचं आहेत.
शक्यतो आपल्या प्रकृती नुसार आपल्या रोज्यांच नियोजन करणं गरजेचे आहेत.. मी म्हणतो भिऊ नका... नियोजन करा.
इस्लाम मध्ये कोणत्याही प्रकारची सक्ती नाहीं अल्लाह नें यासाठीच काही पर्याय देखील सुचवलेले आहेत.त्या पर्यायचा ही लाभ घ्यायला हवा.
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, तुमच्या पैकी एखादी व्यक्ती आजारी असतील, तर त्यांना उपवास करणं कठीण असेल, तर, अशा लोकांनी इतर दिवशी उपवास करून आणि उपवासाची संख्या पूर्ण करावी, तरीही तुमच्या साठी उपवास करणं तुमच्या साठी अधिक चांगलेच आहेत, जर तुम्हाला उपवासाचे होणारे फायद्याचे ज्ञान ( माहिती ) असेल तर. ( अद्याय नंबर 02, आयात नं. 184)..
उपवासाच्या काय काय फायदे आहेत हें जाणून आपल्याला जे योग्य नियोजन करून रोजा ठेवता आले तर तसं नियोजन करा.
अल्लाह सर्व काही बघतच असतो.. शेवटी तोच दयाळू कृपाळू व क्षमा माफी करणारा आहेत...
(मित्रांनो लेख आवडल्यास जरूर आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवा याचा फायदा सर्वाना जरूर होणार आहेत..)

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
###9271640014
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025 रोजा नं. 07:, शनिवार दिनांक 08-03-2025,


विषय :- '"तुम्हाला स्वर्गात माझ्या महाला शेजारी स्थान भेटेल " प्रेषित मुहम्मद स्व.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
                 एक वेळा हजरत मुसा( अलै.( मोझेस )यांनी अल्लाह जवळ प्रश्न उपस्थित केला कीं, येअल्लाह (परमेश्वरा )तु आपल्या आवडत्या व्यक्तीवर मेहरबान खूष झाला तर काय करतोय? तर अल्लाह नें उत्तर दिले कीं, माझा आवडत्या व्यक्ती जर विवाह बद्ध असेल तर त्याला एक मुलगी देतो, 
                   पुन्हा मुसा अलै. प्रश्न करतात कीं पुन्हा खुश झाले तर, अल्लाह पुन्हा तेंच सांगतात कीं मी पुन्हा त्याला दुसरी मुलगी देतो, 
            पुन्हा न राहवून मुसा अलै. पुन्हा तोच प्रश्न विचारतात तर अल्लाह पुन्हा तेंच सांगतात कीं मी त्याला तिसरी मुलगी देतो.
नंतर, अल्लाह म्हणतात कीं, मी जेंव्हा त्याला मुलगा son, दिला तर त्यास सांगतो कीं, ये मुला तु आपल्या बापाचा खांदा बन अर्थात सर्व जबाबदारी उचलून बापाच्या खांद्याला खांदा लावून मेहनत करून आपल्या प्रपंचांची जबाबदारीं उचल.
आणि मुलगी दिली तर मी स्वतः त्या बापाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या बरोबर राहतो....
                             म्हणजेच अल्लाह (परमेश्वरा)ला त्या मुलींची एवढी काळजी.
प्रेषित मुहम्मद स्व. हें प्रेषित ( पैगंबर ) वयाच्या चालीसव्या वर्षी पैगंबर झाले, ते बनन्याच्या अगोदर अरब महाद्विपात स्त्री यांची परिस्थिती फार भयानक भयंकर होती नैतिकता, नितिमूल्य हा विषय च नव्हतं, एक्दम अराजक्ता पसरलेली होती , एखाद्याला मुलगी झाली तर अरब त्या व्यक्ती ला नावं ठेवत असतं, काय काय नाहीं बोलत, मुलगी ही अशुभ समजली जायची, ज्याला मुलगी झाली त्या मुलीचा बाप स्वतः त्या मुलीला वाजत गाजत नेहून खड्डे घेऊन पुरायचा.. एवढी भयाण अवस्था होती, स्त्री फक्त्त भोग विलासाचे साधन होते, फक्त्त मनोरंजना पूर्ती च मर्यादित बस.
प्रेषित मुहम्मद स्व. यांनी त्या अज्ञानी काळात आपल्या पेक्षा 15 पंधराह वर्षे वयाने मोठया असलेल्या माँ आई खादीजा रजि. या पवित्र विधवे बरोबर लग्न केलं. त्यांना चार मुली (1)हजरत जैनब रजि. (2) हजरत रुकय्या रजि. (3)उम्मे कुलसूम रजि. (4)हजरत फातिमा रजि. झाल्या, त्या चारही मुलींचे योग्य पालनपोषण करून योग्य वरांची निवड करून लग्न करून दिलेत.. म्हणजेच त्याकाळातील त्या परिस्थिती च्या विरुद्ध अर्थातच तेथील लोकांना एक शिकवणूक म्हणून, उदाहरणं म्हणून. याचं आदेश आपल्या सर्व सहकारी मित्र ( सहाबा ) यांना ही ताकीद आदेश दिले. 
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " तुम्ही अगर एका मुलीला जन्म देवून तिचं पालनपोषण करून योग्य स्तळी विवाह लावून दिलं तर मारणानंतर स्वर्गात जागा भेटेल, त्यावर काही मित्रांनी प्रश्न केला कीं दोन तीन असल्या तर, प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सांगितलं कीं त्या तिन्ही मुलींचे योग्य प्रकारे पालनपोषण करून लग्न लावून दिलं तर, स्वर्गात माझ्या महालाच्या बाजूलाच त्या मुलींच्या बापांच( पित्या )च घर राहील. " 
तसेंच प्रेषित मुहम्मद स्व. यांच्या जगप्रसिद्ध अंतिम हाज यात्रे मध्ये एक ते दीड लाखांच्या आपल्या अनुयायी समोर प्रबोधन, प्रवचन Farewell speech महिला विषय, " माझे प्रबोधन काळजी पुर्वक एका, या वर्षा नंतर मी तुमच्यात असेन नसेन हें मी सांगू शकत नाहीं, अल्लाह चे भय बाळगा तुमचं प्राण, वित्त,सर्व अंतिम निर्णय सर्व अंतिम दिनापर्यंत अल्लाह च्याच हातात आहेत तर तुमच्या जीवनातील सर्वांचा हिशोब तुम्हाला अल्लाह समोर द्यावायचा आहेत म्हणून, तुमच जसं तुमच्या पत्नी वर अधिकार आहेत, अगदी तसेच अधीकार तुमच्या पत्नीचे तुमच्या वर आहेत, पत्नीला चांगलं वागवा, त्यांना त्यांचं अधिकार त्यांना दया, वडिलांच्या वारसा हक्क संपत्तीतुन त्यांचा हिस्सा दया, पतींच्या हिसस्यातून त्यांचा हिस्सा दया, त्यांना मारू नका, त्रास बिलकुल देवू नका, त्यांचा जो अधिकार आहेत त्यांना जरूर दया. नाहीतर अल्लाह हें सर्व बघणारा आहेत.. तुम्हाला तुमच्या सर्व कर्माचा हिशोब तर द्यावाच लागणार आहेत म्हणून स्त्री बरोबर न्यायाने वागा.. "
प्रेषित मुहम्मद स्व यांना महिला बघीनी विषयी एवढी काळजी होती.
विशेष गोस्ट म्हणजेच पवित्र कुरआन मध्ये सांगितलं कीं, " हें प्रेषित" बंधूना श्रद्धावंत ) सांगा कीं, पुरुषांनी आपली दृष्टी ( नजर ) ची जपवणूक करावी, ( नजरा खाली ठेवाव्यात, ).आणि आपल्या लज्जा स्थनांचे रक्षण करावे, ही त्यांच्या साठी पवित्र पद्धत आहेत! जेणेकरून त्यांच्या साठी शुद्ध चरित्र्याचं ठरेलं. व जे काही करतील, त्याची अल्लाहला सर्व खबर (जाणीव) आहेत,..( पवित्र कुर आन आद्यय नं. 18.आ. नं. 30).
म्हणजेच पुरुषांना आपल्या स्वतः च्या घरात दाखल झाले तरी दरवाजा वर टिक टिक आवाज देवून घरात प्रवेश करावा कारण कधी महिला घरामध्ये फिरतात, तर पुरुषांना घरात सुद्धा खाली नजरा करून चालण्याचं आदेश दिले आहेत. 
इस्लाम नें महिलांना अनेक सवलती सूट दिलेली आहेत, महिलांना प्रत्येक क्षेत्रात वाव दिलेला आहेत व जागोजागी काही सोयीची करून ठेवलेल्या आहेत परुंतु इस्लामच्या चौकटीत राहून, याला काही बंदिस्त म्हणू शकत नाहीं. असो 
   आशी वेगवेगळे प्रकारे समजावून, आदेश, सक्ती देवून बक्षीस त्यांना देवून , प्रबोधन करूनं महिला विषय आपली तळमळ कायम व्यक्त केलीली आहेत.
 आजही1500 वर्षा पूर्वीच परिस्थिती अगदीच तशीच झालेली आहेत, प्रेषित मुहम्मद स्व.नी त्याकाळात भविष्यात काय वाढून ठेवलं आहेत हें जाणून आज च्या काळा साठी काय योग्य होईल म्हणून त्यांनी त्या काळी योजना अखल्या होत्या हें आज आपल्याला समजून राहिले..
प्रेषित मुहम्मद स्व हें खरोखरच एक परिवर्तन वादी व महिलांचे रक्षण करते होते हें आज- उद्या - भविष्यात ही सत्यच राहील.
8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
(मित्रांनी लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा )

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर 
9271640014.
-----------------------------------------------
=================================


















.