राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, July 5, 2025

शहिद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप


÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
शहिद अब्दुल हमीद यांचं बलिदान आपल्याला कर्तव्यात प्रामाणिक आणि देशासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा देते - हाजी आलम खान 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहीद अब्दुल हमीद यांचं जीवन आपल्याला शिकवते की, देशप्रेम ही फक्त भावना नाही ती कृती आहे.आज आपण जरी शस्त्र हातात घेत नाही, पण आपलं शस्त्र म्हणजे शिक्षण, प्रामाणिकपणा, आणि कर्तव्यभावना आहे. अब्दुल हमीद यांचं बलिदान हेच आपल्याला प्रेरणा देतं की आपणही आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहावं आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक योगदान द्यावं. शहीद अब्दुल हमीद यांना त्यांच्या शौर्याबद्दल भारताच्या सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हे भारतातील सर्वात प्रतिष्ठेचे वीरता पदक आहे. हे पदक मिळवणारे ते पहिले मुस्लिम जवान होते.त्यांचे नाव आजही भारतीय लष्करात, आणि प्रत्येक देशभक्ताच्या मनात,अत्यंत सन्मानाने घेतले जाते असे प्रतिपादन शफी हज उमरा टुर्सचे संस्थापक हाजी आलम खान यांनी केले. 
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्यावतीने स्वतंत्रता सेनानी शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातील जिल्हा परिषद शाळा फकीरवाडा येथे मोफत वहया वाटप मरहुमा हज्जन शमीम सैफअली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शफी हज उमरा टुर्स चे संस्थापक हाजी आलम खान, मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, अलनुर आय केयर सेंटर चे तनवीर चष्मावाला, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, शेख दिलशाद मुसा, पठाण सुमय्या मोहसीन, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बुशरा बाजी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आलम खान म्हणाले की वह्यावाटप केवळ शिक्षणसाहित्याचे वाटप नाही तर हा एक संदेश आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक जबाबदारीचा, या लहानशा कृतीतून आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकण्याची प्रेरणा देत आहोत. शिकणे हीच खरी शक्ती आहे, तुम्ही शिकाल, घडाल आणि समाजाचे उज्वल भविष्य घडवाल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार तनवीर चष्मावाला यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

आषाढी एकादशी निमित्त क.जे. सोमैयाची वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न


  - श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
 येथील हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलची बाल वारक-यांची दिंडी मोठ्या भक्तीमय वातावरण संपन्न झाली . हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, जेष्ठ मार्गदर्शक संजय छल्लारे, सहसचिव अशोक उपाध्ये, शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, सुर्यकांत कर्नावट, अरुण धर्माधिकारी, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडी, ग्रंथ दिंडी पालखीचे पुजन करण्यात आले . प्रमुख मान्यवरांच्या समवेत विद्यालयातुन दिंडी शहारात प्रस्थान झाली . दिंडीचे श्रीराम मंदिर चौक, आझाद मैदान या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न झाला . दिंडीचे दैनिक सार्वमतचे उपसंपादक अशोक गाडेकर, नविन मराठी शाळेचे चेअरमन ऋषिकेश जोशी, बालवाडी विभागाचे चेअरमन सुशील गांधी, विजय सेवक,वैशाली जोशी, प्रशासनाधिकारी बी . एस . कांबळे आदि नागरिकांनी स्वागत पालखीचे पुजन केले . श्री विठ्ठल रक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पर्यावरण रक्षण व वाचनाचे महत्व याविषयीचा संदेश विविध घोषणांच्या द्वारे विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थी व पालकांचा दिंडीत मोठा सहभाग व उत्साह होता . दिंडीची सांगता विद्यालयात आरती होऊन झाली . त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख उर्मिला कसार, स्मिता पुजारी, शरयु यरगटीकर, सुरेंद्र पाटील, बाबा वाघ, संकेत गंधे, रमेश धोंडलकर,विनायक चितळकर, राजेंद्र क्षीरसागर यांसह सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी प्रयत्नशील होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

काचोळे विद्यालयाने काढली गुणवत्तेची दिंडीसजवलेल्या रथात गुणवंतांची मिरवणूक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची गुणवत्ता दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाने झांज पथक, ढोल पथक यांच्या गजरात स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप साठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे आदि या प्रसंगी उपस्थितीत होते.
           या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी झाडाचे व ग्रंथांचे महत्त्व ओळखून त्यांना पालखीत पांडुरंगाबरोबर स्थान देत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा, वारकऱ्यांच्या वेशभूषा, करून वारीमध्ये सहभाग नोंदवला.
         विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मीनाताई जगधने म्हणाल्या की काचोळे विद्यालयाने श्रीरामपूर शहरामध्ये आगळा वेगळा उपक्रम राबवला असून आषाढी एकादशी निमित्त गुणवंतांचा गुण गौरव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील. गुणवत्ता शिस्त व संस्कार ही काचोळे विद्यालयाची ओळख आहे. याच बरोबर विद्यालय महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती व परंपरा जोपासत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या संत लोकांची वेशभूषा, वारकऱ्यांची वेशभूषा, विठ्ठल रखुमाई बघून पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांनाच मिळाला.ही रॅली शहराच्या मोरगे वस्ती परिसरात काढण्यात आली.
         या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सुमारे सोळाशे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यालयाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत विद्यालयाची शिस्त व संस्कार याचे कौतुक केले. पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केल्यामुळे वारी यशस्वी संपन्न झाली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
सुनिल साळवे(सर) श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, July 3, 2025

पटेल स्पेशालिटी क्लिनिक तर्फे डॉक्टर डे निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न


डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत
तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ - शेख 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत, तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या सेवेचे आपण ऋणी आहोत, थायरॉईड, लिपिड प्रोफाईल, शुगर व चरबी अशा अनेक महत्वाच्या आरोग्य तपासण्या वीना मुल्य मोफत करून देणे हा खरोखरच पटेल स्पेशालिटी क्लिनिक चा एक स्तूत्य असा समाजोपयोगी आणि आदर्श उपक्रम आहे.
आज अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवली हीच खऱ्या अर्थाने या उपक्रमाची यशोगाथा आहे.अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहो ही अपेक्षा अल करम हॉस्पिटलचे इमरान शेख (भाईजान) यांनी व्यक्त केली.
नगर शहरातील किंग्जगेटरोड रामचंद्र खुंट येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने डॉक्टर डे निमित्त मोफत रक्तातील थायराईड,चरबी, लिपीड प्रोफाईल, शुगर व इतर रक्त तपासण्या व निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डायबेटोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशपाक पटेल, अल करम हॉस्पिटलचे तौफिक तांबोली,इमरान शेख भाईजान, मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सुरुर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. अशपाक पटेल यांनी रुग्णांची तपासणी केली. रक्त तपासण्या तुषार वर्पे, किरण वर्पे, अजीज पठाण, वसीम शेख यांनी केले. या शिबीरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
==================================

शनीसेवा सोशल फाउंडेशनने घेतले निस्पृह समाजसेवेचे व्रत


-:अहिल्यानगर - प्रतिनिधी - वार्ता -
सामाजसेवेस अधिक बळकटी मिळून अधिकाधिक समाजसेवा करता यावी याकरिता अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चांदा येथील ३५ युवकांनी मिळून शनीसेवा सोशल फाउंडेशन ची स्थापना केली आहे. आणि याच माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थान मधे मोफत सेवा देत आहेत तसेच सध्या आषाढी एकादशी च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक गावातून पंढरपूर येथे जाण्यासाठी दिंडी निघत आहे याचे औचित्य साधून शनीसेवा सोशल फाउंडेशन चे संपर्कप्रमुख व मार्गदर्शक डॉ. सुधाकर निकाळजे यांना एक कल्पना सुचली ती अशी की, दैनंदिन कामांचा व्याप आणी महत्त्वाची जबाबदारी मुळे आपण जरी दिंडी ला जावू शकत नसलो तरी कमीतकमी आपण दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देवू असे मत व्यक्त केले. त्यानंतर लगेचच फाऊंडेशनचे खजिनदार वृषभ गांधी व जय माता दी मेडिकल चे संचालक निरज मनोचा यांनी आम्ही दोघे मोफत औषधे पुरवठा करु असे जाहीर केले आणि यानंतर जो काही प्रवास सुरू झाला तो कालपर्यंत येवून पोहचला. आतापर्यंत शनीसेवा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून डॉ. सुधाकर निकाळजे यांनी पंढरपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या वारीतील २८ जुन ते २ जुलै पर्यंत अनेक दिंड्यातील ३४६ वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली आहे. आणि याच सेवेसाठी शनी सेवा सोशल फाउंडेशन चे डॉ. सुधाकर निकाळजे यांचा सत्कार स्वराज्य पोलीस मित्र तथा पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सौ.ज्योती शेटे व पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ. शोभाताई बडवे यांनी पंढरपूर येथे केला. तसेच टेंभुर्णी परते येथे खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. 
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिवाजी मोतीराम दहातोंडे, चंद्रकांत जावळे, बंडू साहेबराव दहातोंडे, संजय वैरागर, भाऊसाहेब दहातोंडे, बाळासाहेब जावळे, शशिकांत कर्डिले, नंदकुमार दहातोंडे, विजय भोपे, शिवा दहातोंडे, शहाजी धुमाळ, योगेश जावळे यांनी अथक परिश्रम घेतले.
सेवेकरीता महाराष्ट्रातील अनेक देवस्थानात संपर्क झालेला आहे तसेच संपर्क न झालेल्या देवस्थान मध्ये संपर्क साधून निशुल्क सेवा देण्यात येईल व कार्तिकी एकादशी साठी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथे सेवेसाठी जाणार आहोत असे शनीसेवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी सांगितले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

महात्मा गांधी संकुलात ग्रंथदिंडी उत्साहात


अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलात आषाढी एकादशीनिमित्त नुकतेच दिंडी आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, डॉ. शरद दुधाट आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दुधाट यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, वारी हे सामाजिक एकतेचे प्रतिक असून या सोहळ्यातून अंत:करणाच्या शुद्धीसोबत शुद्ध निरपेक्षपणे जीवन जगण्याची उर्मी मिळते. दिंडी हे मनुष्य जीवनाची आत्मशुद्धी, सेवा, त्याग आणि परमार्थ आहे. याप्रसंगी प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आषाढी दिंडीचे महात्म्य विशद केले. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आषाढी दिंडीमध्ये व ग्रंथदिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडी सोहळा आयोजनामध्ये अश्विनी सोहोनी, संगीता उगले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

Tuesday, July 1, 2025

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा १६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न


विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / प्रतिनिधी -
सजग पत्रकारितेचा अमीट ठसा उमटवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा चा १६ वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा अत्यंत प्रेरणादायी व ऐतिहासिक स्वरूपात अहिल्यानगर येथील हॉटेल संजोग च्या प्रशस्त ए.सी. हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे नेतृत्व संपादक मा.रमेश जेठे (सर) यांनी कुशलतेने केले. सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर, साहित्यिक, समाजसेवक, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

मुख्य आकर्षण होते आदर्श गांव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती. त्यांच्यासह मान्यवरांमध्ये दैनिक जयबाबा चे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे, डॉ. बबन जोगदंड, टी.एस. चव्हाण, नगरसेवक नितीन वाघमारे, रवि शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात २९ समाजहितैषी मान्यवरांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने गौरवण्यात आले. या मान्यवरांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून ते समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहेत त्यात सर्वश्री भरत विटकर, सदाशिव जाधव, कर्नल ऋषिकेश धोत्रे, राजेश ननवरे, कीर्ती पवार, संदीप कुसळकर, भोरू मस्के, शाम विटकरी, सुरेश विटकर, चंद्रकांत शहासने, ललित गुंदेचा, धर्मात्मा मिश्रीमल मुथ्था, रवि शिंदे,अप्पासाहेब ढूस, राजकुमार आघाव, रामचंद्र मंजुळे, विष्णू पवार, कृष्णा पवार, सचिन शिंदे, राजू ननवरे, दीपक मेढे, किरण तागडकर, सागर धनवटे, मोहन गायकवाड, नितीन शेलार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीवेतेसाठी समता फाऊंडेशन चे संस्थापक / अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, शिवाजी ननवरे, विशाल जेठे, हरिष बंडीवडार, मयूर मिरे, बबलू विटेकर,डॉ. सुहास पाखरे, निरज जेठे व शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्याचे आयोजन हुबेहूब सिनेमासोहळ्याच्या तोडीचे ठरले. अहिल्यानगरच्या धर्तीवर असा भव्य सोहळा प्रथमच पार पडला.
सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि योगदानाचा उज्ज्वल दीप म्हणून शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा ही जनतेच्या मनात अधिक खोलवर अधोरेखित झाली.अलंकार हा वृत्तपत्राला असतो त्याच्या सत्यवचन, निर्भीडतेच्या तेजात...” याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात बघावयास मिळाली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणी सिने क्षेत्रास लाजवेल असे सुयोग्य सुत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदक उध्दव काळापहाड व प्रियांका मॅडम यांनी केले.शेवटी संपादक रमेश जेठे (सर) यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
विशाल व निरज जेठे (देहरे)
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================