राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, July 15, 2025

धाडसी, सामाजिक, अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व असलेले रमेश जेठे सर


थोर संत महंत,विचारवंतांची भूमि असलेल्या अशा अहिल्यानगर जिल्ह्याच्या मातीत जन्मलेले, स्वभावाने सुसंस्कृत, विचाराने व्यापक आणि कृतीतून परिवर्तन घडवणारे सामाजिक योद्धा रमेश सखाराम जेठे सर हे आज समाजसेवेतील एक दैदीप्यमान नाव ठरले आहे. १९९२ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या धडाडीच्या व्यक्तिमत्त्वाने अनन्यसाधारण योगदान दिले आहे.

*नेत्यांचा विश्वास आणि जनतेचा आधार*

१९९४ पासून ते आजपर्यंत, महाराष्ट्र राज्याच्या विविध मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या नेत्यांशी त्यांनी थेट पत्रव्यवहार साधून समाजहिताचे भान जपत संघर्ष केला. शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने संवाद साधत समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला. या पत्रव्यवहारातून आणि निवेदनांमधून सामाजिक न्याय मिळवून देण्यात रमेश जेठे सरांचे मोलाचे योगदान ठरले.

*शिर्डी एक्सप्रेस : निःपक्ष, निर्भिड पत्रकारितेचे प्रतीक*

त्यांच्या पत्रकारितेचा अविष्कार म्हणजे “शिर्डी एक्सप्रेस” ही निःपक्ष, निर्भिड व समाजाभिमुख वृत्तसेवा. १६ वर्षांपासून कार्यरत असलेली ही साप्ताहिक वृत्तसेवा आज लाखो वाचकांच्या हृदयात स्थान मिळवून आहे. या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित, पिडीत घटकांचे कैवार घेत अनेकांना न्याय मिळवून दिला.

*साहित्य, सिनेमा आणि नवाचाराचा संगम*

केवळ पत्रकारिता नव्हे तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही रमेश जेठे सरांनी आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी निर्मिती व अभिनय केलेला “मटण्या” हा लघुपट समाजात जागृती करणारा ठरला. त्यातील त्यांच्या अभिनयाची आणि विषयवस्तूची सर्वत्र चर्चा झाली. पुढे त्यांनी “मौब्बू” या दुसऱ्या लघुपटाची निर्मिती करून सामाजिक संवेदनांना भिडणारी कला रसिकांसमोर आणली.


*‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ – समाज गौरवाचा महाउत्सव*

शिर्डी एक्सप्रेसच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त, रमेश जेठे सरांच्या संकल्पनेतून “महाराष्ट्र रत्न पुरस्कार” नामक उपक्रमातून विविध क्षेत्रांतील २९ समाजहितैशी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम इतका भव्यदिव्य ठरला की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर त्याची चर्चा झाली. सिनेमा अवॉर्ड्सच्या धाटणीचा कार्यक्रम होत असूनही त्यामागे होता सामाजिक कृतज्ञतेचा गहिरा भाव.

*पुरस्कारांनी गौरवलेले कार्य*

रमेश जेठे सरांना आजवर ‘समाजरत्न पुरस्कार’, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील अनेक सन्मान, आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कार्यशैलीत सातत्य, सत्यनिष्ठा, आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी ही नेहमीच ठळकपणे जाणवते.

*सामाजिक ध्यास, जनतेशी नातं*

जेठे सर हे केवळ नावाने नव्हे तर कार्यानेच समाजसेवक, संपादक, निर्माता, विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जीवन प्रवास हा तुळशीपत्र ठेवून केलेल्या सामाजिक कार्याचा प्रेरणादायी इतिहास आहे. अनेक राज्यांतील दिग्गज नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अढळ स्थान आहे.

*रमेश जेठे सर यांचा दानशूरपणा*

कोरोना काळात जीवाची बाजी लावत रूग्णांना मदत.. रूग्णालयात दाखल करण्याची किमया.. अनेक जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कोरोनात मदत. ११०० गरजूंना धान्यकिटचे वाटप.. कोरोना काळात अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन..

सन्माननीय रमेश जेठे सर हे समाजमनावर अधिराज्य गाजवणारे, संघर्षातून सिद्ध होणारे, आणि “हटके” कार्यपद्धतीतून नवा विचार घडवणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचं जीवन हे एका सजीव प्रेरणागाथेसारखं आहे, जी आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावी अशीच ! त्यांच्या सामाजकर्याला अधिकाधिक बळकटी मिळून सामाजातील उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लागो सदरील सामाजहितैशी कार्य करताना धाडसी, सामाजिक,अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व असलेले सन्माननीय रमेश जेठे सरांना भावी आयुष्यात उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
           

   *पत्रकार शौकतभाई शेख, श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±



गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला गुरूंचा सन्मान सोहळा


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
भारतीय संस्कृतीतील गुरू- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारी गुरुपौर्णिमा तालुक्यातील लोणी येथील प.डॉ.वि.विखे पाटील विद्यालयात नुकतीच मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मंगलगीत सादर केले. मुख्याध्यापक लक्ष्मण रकटे यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगून गुरूर्ब्रह्मा, गुरूर्विष्णु, या गुरुस्तोत्राचे सादरीकरण करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोहगांव येथील गंगागिरी महाराज गुरुकुल आश्रमाचे संस्थापक ह.भ.प. संदीप चेचरे महाराज हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, व्यास हे एक व्यक्तीचे नाव नसून एक विचार आहे. व्यास जसा वाढत जातो तसतसे विचारांचे क्षेत्र हे व्यापक बनत जाते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य लक्ष्मण रकटे यांच्यासह उपमुख्याध्यापक संदीप डहाळे, पर्यवेक्षक शोभा कडू, सुभाष भुसाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता दाभाडे व शितल इंगोले हे उपस्थित होते. प्राचार्य लक्ष्मण रक्त यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दहावीतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करणार - नामदार राधाकृष्ण विखे पाटील


श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना क. जे. सोमैया हायस्कूल यांच्यावतीने क्रीडांगण विकास निधी मधून स्वच्छतागृहासाठी निधी मिळावा या आशयाचे निवेदन देताना चेअरमन रणजीत श्रीगोड, पत्रकार व शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे सर आदि.

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालच्या भौतिक, शैक्षणिक विकासासाठी अहिल्यानगर चे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन विकास बाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड,शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, उत्तर भाजपा अध्यक्ष नितिन दिनकर,शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र छाजेड माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, अभिषेक पाटील खंडागळे, के. के आव्हाड यांचे सह आदि मान्यवर उपस्थित होते . या प्रसंगी ना. विखे पाटील यांनी हिंद सेवा मंडळाचे शैक्षणिक विकासासाठी जिल्ह्यात नावलौकीक आहे . या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी तसेच विविध पदावर कार्यरत आहे.
क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक,भौतिक विकास तसेच विद्यालयाच्या स्वच्छता गृह, महाविद्यालयासाठी
परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, July 9, 2025

गुरुद्वारा बिरद बाबा डोमेगांव में ४३ वी पैदल यात्रा'


🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

-भगवंत सिंग प्रितम सिंग बत्रा - गुरुद्वारा ट्रष्टी - / समाचार 
============≠====================

सतकार योग साध संगत जी, फतेह परवान करनी जी ।

गुरुद्वारा बिरद बाबा डोमेगांव में ४३ वी पैदल यात्रा' की खुशीमें


🌹🥀🌺🌸🌷🪷❤️

४३ वी पैदल यात्रा की खुशीमें गुरुद्वारा साहेब की नई इमारत में निचे लिखे हुए प्रोग्राम के मुताबीक दिवान सजनगें ।
साधसंगतजी के सहयोग से हर साल की तरह इस साल भी " महान पैदल यात्रा" गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा, श्रीरामपूर से गुरुवार, ता.१०/७/२०२५ के दिन सुबह ४:३० बजे गुरुबाणी किर्तन करते हुए गुरुद्वारा बिरदबाबा डोमगांव, कमालपूर के लिए रवाना होगी।

गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर तथा डोमेगांव की ओरसे बेनती की जाती है कि इस ४३ वी महान " पैदल यात्रा" में में ज्यादा से ज्यादा गिनती में साधसंगत हाजिर होकर पैदल यात्रा की शान बढाएँ तथा गुरूघर की खुशीयाँ प्राप्त करते हुए अपना अनमोल जनम सफल करें।

नोट : -
१) सभी साध संगत सुबह ४:०० बजे गुरुद्वारा साहेब पहुँच जाए। गुरुद्वारे में जपजी साहेबजी, आनंदसाहेबजी के पाठ उपरंत अरदास के बाद कडाह प्रसाद की देग बरतेगी, तथा "पैदल यात्रा" आरंभ होगी ।

२) रास्ते में चायपानी तथा नाश्ते के लिए पैदल यात्रा का स्वागत होगा । ३

3) जिन सज्जनोंको पैदल यात्रा के रस्तेमें सेवा करनी है वे अपने नाम निचे दिये गये मोबाईल नंबर पर लिखवादे ।

किरतन दिवान ग्यानी अनोखसिंग मस्कीन, भाई मनप्रितसिंगजी (हजुरी जथ्था गुरुद्वारासाहिब, श्रीरामपूर), भाई संदीपसिंगजी (ग्रंथी, गुरुद्वारा बिरबाबा, डोमेगांव) सुबह ११:३० से दोपहर १२:३० बजे अरदास, दिवान की समाप्ती, गुरूमहाराज के सुखासन

दोपहर १२:३० से १:३० बजे
साध संगत के सहयोग से गुरु का लंगर अतुट वरतेगा

Reg. Trust A.nagar No. A1352 Dt. 15/3/2015
गुरुद्धारा बिरदबाबा देवस्थान ट्रस्ट,
कमालपूरGIFS
Account No. 915020052482202
Code 0001370
SHRIRAMPUR BRANCH
साध संगत के आसरे
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, डोमेगांव
गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर

मो. 9822059646, 7020308707, 7020183778, 9890188181,8806490555, 9028900117, 9028838878, 9422339034 (पुणे)
पुछताछ : स. हरभजनसिंगजी, हेडग्रंथी गुरुद्वारा बिरदबाबा, डोमेगांव (कमालपूर), मो. 8888446876 -

बंटी धापर, श्रीरामपुर/१८२२३१२९९४

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



घनकचरा व्यवस्थापनाकडे कचरा उचलण्याची मागणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील वॉर्ड क्र.२ मधील पाटाच्या कडेस "वैदूवाडा पुल ते दाळवाले चाळ पर्यंत" नगर पालिका प्रशासनाने सिमेंट क्रॉंकिटचा रस्ता बनवला याबाबत नगर पालिका प्रशासनास धन्यवाद. 

मात्र याठिकाणी पाटाच्या कडेला जो कचरा टाकला जातो यामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरतेच शिवाय या कचऱ्यामुळे मोकाट कुत्रे आणी डुकरे यांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे,
तसेच या रस्त्यावर शालेय विद्यार्थी, महिला, मुले, वयोवृद्ध यांच्या ये जा ची मोठी वर्दळ असल्याने तथा याठिकाणी पाटाच्या कडेला असलेल्या वाढलेले गवत आणी अनावश्यक झाडा झुडपात डुकरे दिवसभर लपून बसलेली असतात, कोणी कचरा टाकल्यास त्यावर ताव मारण्यासाठी कुत्रे व डुकरे कचऱ्यावर तुटून पडतात, कधी काळी नागरीकांच्या अंगावर धावूनही येतात यामुळे भविष्यात काही अप्रिय घटना घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही,तसेच सदरील कचरा हा काही वेळा पाटाच्या पाण्यात जातो आहे तर काही वेळा रस्त्यावर येत असल्याने रस्त्यावरुन ये - जा करणाऱ्या नागरीकांना दुर्गंधीसोबतच मोठ्या त्रासाचा सामना करणे भाग पडत आहे. करीता घनकचरा व्यवस्थापन विभागाने दररोजच सदरील ठिकाणचा कचरा उचलत जावा यासोबतच सदरील ठिकाणचे गवत व अनावश्यक झाडे झुडपे काढणेकामी नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, ज्यामुळे परिसरातील नागरीकांच्या समस्या दुर होवू शकतील अशी परिसरातील नागरीकांकडून मागणी केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, July 7, 2025

ऑबट श्रीमती मायादेवी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून सायकल वाटप !


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रयत शिक्षण संस्थेच्या भिंगार (जि.अहिल्यानगर) येथील श्रीमती ऑबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल चे माजी विद्यार्थी अक्षय रमेश थोरात यांनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून या विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले. भिंगार येथील श्रीमती मायादेवी ऑबट विद्यालयात नुकताच सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य तथा उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे हे होते. तर व्यासपीठावर रमेश थोरात, अक्षय थोरात, संध्या थोरात, मुकुल थोरात ,रेवती थोरात मनीष गायकवाड, पूजा साळवे, यशराज उबाळे, सागर साळवे, नितीन गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी १२ विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या सायकलींचं वाटप करण्यात आले. अक्षय थोरात म्हणाले की, सामान्य घरातील माझा जन्म असून शाळेबद्दलच्या आपुलकी पोटी या सायकली मी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून नाव कमवावे. प्रमोद तोरणे म्हणाले की, पैशाने श्रीमंत खूप असतात परंतु देणारे कमी असतात शाळा दानशूरांना कधीच विसरणार नाही. यावेळी विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याचं आयोजन सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव रेवगडे यांनी केले तर आभार पर्यवेक्षिका कविता शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज : - प्राचार्य विनायक मेथवडे


रयत शिक्षण संस्था कृत्रिम बुद्धिमत्तेचे 
शिक्षण देणारी पहिली शिक्षण संस्था

- अजिजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
 रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नाविण्याचा ध्यास घेणारी संस्था असून कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण देणारी पहिली संस्था आहे. स्वविकासाबरोबरच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. 
प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात नुकतेच इयत्ता बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विनायक मेथवडे हे होते तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पालक प्रतिनिधी कल्पना शेळके व तुषार थेटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी सीईटी पॅटर्नवर विश्वास मोहिते, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर शाहिस्ता शेख, उपप्राचार्य अलका आहेर, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी कल्पना पेंढारे व श्रेया घोगरे यांनी सीईटी, नीट व जेईई परीक्षांच्या उत्कृष्ट निकालाबद्दल कौतुक केले. प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, गेल्या तीन वर्षापासून एमजी महाविद्यालयाने सीईटी व नीट परीक्षेत आपला स्वतःचा एक पॅटर्न तयार केला असून रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीचे अधिकचे प्रयत्न केले जात आहे. सीईटी, नीट अभ्यासक्रमाबरोबरच रयत स्वतःची हजारो एम.सी.क्यू प्रश्नांची पतपेढी आणि युट्युबवर शेकडो व्हिडिओ लेक्चर्स तयार करत आहे. महाविद्यालयातील तासिकांचे अध्यापन इंटरॅक्टिव्ह बोर्डवर प्रभावीपणे घेतले जात आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा ठोकळ यांनी केले तर आभार देवेश आहेर यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️💐🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================