राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, July 15, 2025

लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांनी केली वर्ग मंत्रिमंडळाची निवड मतदान केंद्र, मतदान अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात रांगेत ईव्हीएम मशीनवर मतदान


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता-
निवडणूक प्रक्रिया काय असते, मतदान केंद्र, ईव्हीएम मशीन, मतदान अधिकारी यांच्या समवेत मतदान कसे करावे आदींचे धडे तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कन्या विद्यालयात नुकतेच वर्गनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात आले. 
लोकशाही पद्धतीने होणारी प्रत्यक्षातली निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाली. या निवडणूक प्रक्रियेतून कन्या व मुले विभागातील प्रत्येक वर्गाचे वर्ग मंत्रिमंडळ या निवडणुकीतून तयार करण्यात आली. शिक्षकांच्या संकल्पनेतून शालेय वर्ग मंत्री मंडळाची निवडणूक घेण्याचे नियोजन केले. यासाठी ॲपच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन तयार करून प्रत्यक्षात डिजिटल बोर्ड तयार केले. इच्छुक उमेदवारांची घोषणा झाली. उमेदवारांना चिन्हही देण्यात आली. विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनवर मतदान कसे करायचे याचे धडे वर्गातून इंटरॲक्टिव्ह बोर्डवर देण्यात आली. विद्यार्थ्यांना मॉकपोल दाखवून अधिकारी एक-दोन-तीन व केंद्राध्यक्ष यांच्या उपस्थित मतदान गोपनीय पद्धतीने करून घेण्यात आले. अधिकाऱ्यांचे कामकाज काय असते याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. बॅलेट बटन दाबताच पसंतीच्या उमेदवारापुढील बटन दाबल्यावर हिरवा लाईट लागतो व विशिष्ट आवाज येतो. ही प्रक्रिया अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते. याशिवाय मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता आणि प्रत्यक्षातला अनुभव घेऊन विद्यार्थी भारावून गेले. कन्या विद्यालयात मुख्याध्यापिका नलिनी जाधव, माधुरी वडघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया आनंददायी आणि उत्साहात पार पडली. यावेळी सर्व वर्गशिक्षकांनी निवडणूक अधिकारी म्हणून उत्तम कर्तव्य बजावले. ही प्रक्रिया राबविण्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले. मुले विभागात ही प्रक्रिया मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, रेणुका वरपे, प्रियंका भालेराव, शुभांगी भरसाकळ, बाबासाहेब अंत्रे याशिवाय वर्गशिक्षक उपस्थित होते. मुख्याध्यापक विनायक मेथवडे यांनी सांगितले, की आधुनिक पद्धतीचा वापर करून लहानपणापासून लोकशाहीचे धडे दिले तर विद्यार्थी जागरूक नागरिक तयार होतील. निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थ्यांना अनुभवताना त्यांच्यातील उत्सुकता आणि चेहऱ्यावरील आनंद हेच या प्रक्रियेचे फलित असल्याचे मत व्यक्त त्यांनी केले. ही प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अश्विनी सोहनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
=================================
-----------------------------------------------

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

नानजी भाई ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा व समाजसेवेचा संदेश सिद्ध योगीराज लक्ष्मणगिरी महाराज संजीवन समाधी येथे भव्य कार्यक्रम संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
कोपरगांव तालुक्यातील वावी येथील सिद्ध योगीराज सद्गुरू लक्ष्मणगिरी महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात सदगुरु रामगिरी महाराज सेवा संस्थान यांच्या वतीने भव्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते थोर समाजसेवक नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते करण्यात आलेले ध्वजारोहण व त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने दिलेला समाजसेवेचा संदेश.

या प्रसंगी बोलताना नानाजीभाई ठक्कर म्हणाले की, "येथील मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून यासाठी योग्य ती मदत केली जाईल. या पवित्र स्थळी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांनी मोफत सेवा करावी. अनेक कीर्तनकार सेवा करतात, परंतु त्यासाठी मोठ्या पाकिटांची मागणी होते. याऐवजी जो मनाने देतो, त्याचे मानधन स्वीकारून धर्मप्रसार होणे ही काळाची गरज आहे."

ते पुढे म्हणाले की, "हाच वारसा येथील हरिभक्त परायण गिरी महाराजांनी सुरू केलेला हा सेवा कार्याचा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे. मुंबई विभागातून साई पालख्या याच मार्गाने जातात आणि त्यांना येथे विश्रांती व निवारा मिळावा यासाठी मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत संयुक्तरित्या प्रयत्नशील आहेत."

एन. के. टी. ग्रुपच्या समाजहिताच्या कार्याचा उल्लेख करत नानजी भाई ठक्कर ठाणावाला म्हणाले की, “हिंदुस्थानात ७० ते ८० हजार मंदिरे बांधली गेली, मात्र समाज व संप्रदाय या दोहोंचा समतोल ठेवून प्रपंच करत परमार्थ केला तर त्यातून खऱ्या जीवनाचा आनंद मिळतो. हा मूलमंत्र आम्ही पुढे नेत आहोत. येथील वारकरी संप्रदाय या कार्यात निश्चितच पुढाकार घेईल.”

कार्यक्रमादरम्यान नानाजीभाई ठक्कर यांच्या हस्ते शिवलिंगाचे विधिवत पूजन करण्यात आले आणि त्यांनी समाजसेवेचा संदेश देत उपस्थितांना प्रेरित केले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, संघाचे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, प्रगतशील शेतकरी शिवाजी मामा नाईकवाडी, एन. के. टी. ग्रुपचे विश्वस्त पांडे, अहील्यानगरचे नामवंत उद्योजक गणेश दादा भांड, ह.भ.प. कृष्णा महाराज गिरी, कीर्तन केसरी ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी वावीकर, शिवसेना अध्यात्मिक आघाडी जिल्हाप्रमुख संपत जाधव, सरपंच विजय काटे, माजी सरपंच संदीप राजे भोसले, गणेश वेलजाळी, सर्जेराव वाजे, सुरेश नाना वेलजाळी यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सोहळ्यानिमित्त संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक नानाजीभाई खिमजीभाई ठक्कर यांचा पुणेरी पगडी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

हा सोहळा धार्मिक भावनेतून आणि सेवाभावातून संपन्न झाला असून येथील मंदिर लवकरच भाविकांसाठी एक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

भ्रष्टाचार ही अब राजशिष्टाचार गजब चल रही है यह सरकार


भ्रष्टाचार ही अब राजशिष्टाचार 
गजब चल रही है यह सरकार 

लेखक :- प्रतीक संघवी राजकोट गुजरात ✍️✅🇮🇳

भ्रष्टाचार को कम या नाबुद करने के इरादे से आई यह सरकार मे भारतीय व्यवस्था की कड़वी सच्चाई आज भ्रष्टाचार हो गया है। भ्रष्टाचार, जो कभी चोरी-छिपे किया जाता था, अब सामाजिक और प्रशासनिक संस्कृति का हिस्सा बन चुका है। यह एक ऐसी बीमारी है, जो देश की प्रगति, जनता का विश्वास, और नैतिकता को खोखला कर रही है। इस लेख में, हम भ्रष्टाचार के स्वरूप, प्रभाव, और समाधान पर चर्चा करेंगे।

भ्रष्टाचार का संगठित स्वरूप
"सबका साथ ले कर होता भ्रष्टाचार" अब भ्रष्टाचार का रूप सुनियोजित तंत्र को उजागर करता है। पहले यह व्यक्तिगत लालच तक सीमित था, लेकिन अब यह सांस्थानिक रूप ले चुका है। उदाहरण के लिए, एक तहसील मुख्यालय में एक ही कंपनी के हजारों स्कैनर 3600 रुपये की बाजार कीमत के बजाय 7500 रुपये में खरीदे गए। "5 वर्ष की अतिरिक्त वारंटी" का बहाना बनाकर पुरानी तारीखों में ठराव बनाए गए। यह सरकारी खरीद में हेराफेरी का जीता-जागता सबूत है, जो जनता के पैसे का दुरुपयोग करता है और विश्वास को तोड़ता है।और इस वाक्या का जीता जागता सबूत में हु अब कोई भी काम करने से पहले ही किसको कितना मैनेज करना हे किसको कितना देना हे वह सब तय ही रहता हे बाद मे ही वह काम मंजूर होता हे या फाइलों से उठकर फैसलो से हो कर जमीन पर आता हे वरना भूल जाओ उसको कोईभी कितना जरूरी काम हो जय श्री राम।

"जो जुड़ जाए, वह धूल जाए, सारे केस माफ" – 
 सत्ता और प्रभाव के बल पर भ्रष्टाचारी आसानी से बच निकलते हैं। बड़े घोटालों के बावजूद प्रभावशाली लोग न केवल बच जाते हैं, बल्कि उनके खिलाफ ठोस कार्रवाई भी नहीं होती। यह व्यवस्था में कानून के डर की कमी को उजागर करता है। और साथ साथ न्याय पालिका पर भी सवाल खड़ा करती हे क्योंकि भ्रष्टाचार के मामले दर्ज तो होते हैं, लेकिन जांच और सजा की कमी उन्हें औपचारिकता बनाकर रख देती है। यह अन्याय को बढ़ावा देता है और समाज में यह संदेश देता है कि सत्ता और संपर्क के दम पर कोई भी गलत काम माफ हो सकता है।और यह हमें भारत की राजनीति में आज साफ दिखाई देता हे खास कर के अब जो सत्ताधारी पक्ष काम कर रहा हे उसमें ऐसे सैकड़ों उदाहरण हे जिस पर कल शाम को भ्रष्टाचार के केस चल रहे हो और आज सुबह वो पक्ष में जुड़े तो केस भी खत्म और भ्रष्टाचार भी।

 टैक्स और कर्ज का दुष्चक्र
यह भी एक गंभीर सवाल है: "टैक्स बढ़े, टैक्सपेयर बढ़े, कर की आय बढ़ी, फिर भी कर्ज क्यों बढ़ रहा है?" इसका जवाब भ्रष्टाचार और कुप्रबंधन में छिपा है। सरकारी योजनाओं और खरीद में भ्रष्टाचार देश के संसाधनों को नष्ट कर रहा है। इसका बोझ आम जनता पर पड़ता है, जो अधिक टैक्स और महंगाई के रूप में कीमत चुकाती है। यह दुष्चक्र जनता को मेहनत का फल नहीं देता, बल्कि उसे और कर्ज के बोझ तले दबाता है। आज कोईभी योजना ऐसी नहीं हे की जिसमें सरकार यह कह दे कि इसमें भ्रष्टाचार नहीं हुआ। भले ही वह योजना के पैसे सीधे ही खाते में जमा होते हो।उसमें भी लोगों की संख्या बढ़ाकर , आय छिपाकर, कमीशन खाकर भ्रष्टाचार करते हे और यह नेताओं के और पक्ष के दलाल इसका भरपूर लाभ भी उठाते हे। जिसमें लाभार्थी को घर बैठे पैसे मिलते हे या काम किए बगैर ही पैसे मिलते हे और दलालों को कमीशन और अंत में देश को कर्ज और कमीशन वाली सिस्टम।?

स्विस बैंक: भ्रष्टाचार का सबूत
स्विस बैंक और अन्य विदेशी बैंकों में भारतीयों के खातों में जमा राशि भ्रष्टाचार और काले धन का प्रतीक है। लेखक का दावा कि "स्विस बैंक में बढ़ती रकम भ्रष्टाचार का सबसे बड़ा सबूत है" सटीक है। यह धन देश की अर्थव्यवस्था को मजबूत कर सकता है, लेकिन भ्रष्टाचार के कारण यह विदेशों में पड़ा रहता है। सरकारें इसे वापस लाने के वादे करती हैं, लेकिन ठोस परिणामों की कमी जनता के अविश्वास को गहरा करती है।

भ्रष्टाचारियों को छूट और अंदरूनी तहकीकात के हिसाब से देश छोड़ने की सलाह।
 बड़े भ्रष्टाचारियों को देश छोड़ने की छूट दी जाती है। इसलिए तो यह व्यवस्था की सबसे बड़ी विफलता है। भ्रष्टाचारियों को सजा के बजाय देश छोड़ने की अनुमति देना भविष्य में और भ्रष्टाचार को बढ़ावा देता है। यह संदेश देता है कि बड़े भ्रष्टाचारी कानून से ऊपर हैं, जो जनता के विश्वास को और कमजोर करता है। इससे भी ज्यादा की बात करे तो यह पक्ष ने साफ कह दिया हे कि अगर एक लिमिट से ज्यादा भ्रष्टाचार कर लिया हो तो आप जब तक हमारी सरकार हे तब तक के समय में ही देश छोड़ दे और हो सके तो विदेशी नागरिकत्व भी ले लो। जिससे आप और आपका परिवार कोई भी आफत में न आए यहां तक भ्रष्टाचारी ओ का ध्यान रखा जाता हे।क्योंकि अब की सरकार और भ्रष्टाचार एक दूसरे के पूरक हो चुके हे।लेकिन सामाजिक और नैतिक क्षति
भ्रष्टाचार केवल आर्थिक नुकसान नहीं करता; यह समाज के नैतिक ताने-बाने को भी तोड़ता है। जब भ्रष्टाचार को सामान्य मान लिया जाता है, तो ईमानदारी और नैतिकता का महत्व कम हो जाता है। युवा पीढ़ी निराश होती है, क्योंकि सत्ता और प्रभाव मेहनत से ज्यादा महत्वपूर्ण बन जाते हैं। यह सामाजिक असमानता और असंतोष को जन्म देता है।

भ्रष्टाचार को जड़ से खत्म करने के तरीके 
*कठोर कानून और त्वरित सजा**: भ्रष्टाचार के मामलों में त्वरित और कठोर कार्रवाई हो। जांच एजेंसियों को स्वतंत्र बनाना जरूरी है। और की भी राजकीय दबाव से उसको परे रखना चाहिए 

**सूचना के अधिकार (RTI)**: जनता को RTI का उपयोग कर सरकारी कामकाज की निगरानी करनी चाहिए।और किसी भी एक्सटीविस्ट को बेन न करे भले ही वो ब्लैकमेल करे तो उसके खिलाफ भ्रष्टाचार का केस बनाए।

**जन जागरूकता**: स्कूलों और कॉलेजों में नैतिकता और ईमानदारी पर जोर देना होगा। जन जागरूकता अभियान चलाए जाएं।और भ्रष्टाचार के नए नए तरीके से लोगो को अवगत कराना चाहिए जिससे कम से कम उसकी तो समझ में आए के हकीकत में क्या चल रहा हे और बदलाव कहा लाना चाहिए।

- **राजनीतिक इच्छाशक्ति**: नेताओं को भ्रष्टाचार के खिलाफ ठोस नीतियां लागू करनी होंगी। और अपने को ही लाभ दिलाओ और कमीशन खाओ की नीति बंध करनी पड़ेगी। सिर्फ गांधीजी , भगतसिंह , वल्लभभाई पटेल के फोटो को हाथ जोड़कर हार पहनाकर फोटो खींचने से कुछ नहीं होगा नेताओं को सामने आकर अपने ही साथियों का भ्रष्टाचार कबूलना होगा या उजागर कर उसे रोकना होगा लेकिन यह सपने में हो सकता हे क्योंकि यह अभी तो सुनियोजित रूप से चल रहा हे।

*काले धन पर कार्रवाई**: कम से कम विदेशी बैंकों में जमा काले धन को वापस लाने के लिए अंतरराष्ट्रीय सहयोग और नीतियां लागू हों। जो बात प्रधान सेवक 2014 से कहते आए हे लेकिन वहा विदेश में पैसे बढ़ते ही जा रहे हे। यह तो एक ड्रीम प्रोजेक्ट में शामिल था लेकिन अभी वह ड्रीम ही दिख रहा हे।

 *जनता और नेताओं की जिम्मेदारी*
यह समय है कि जनता और नेता (कम से कम जो विपक्ष में हो या फ्री बैठे हे और पेंशन खा रहे हे वह नेता )भ्रष्टाचार के खिलाफ एकजुट हों। जनता को अपने अधिकारों के प्रति जागरूक होना होगा और नेताओं से पारदर्शिता की मांग करनी होगी। नेताओं को समझना होगा कि भ्रष्टाचार अल्पकालिक लाभ दे सकता है, लेकिन यह देश की प्रगति और विश्वसनीयता को नष्ट करता है। और इससे कोईभी धर्म और विशेष व्यक्ति बच नहीं सकता हे इसलिए यह जंग हर नागरिक की है।"भ्रष्टाचार ही शिष्टाचार" भारत की व्यवस्था का कड़वा सच है। यह बीमारी देश की प्रगति और नैतिकता को खोखला कर रही है। इसे रोकने के लिए संगठित और जागरूक प्रयास जरूरी हैं। यह केवल सरकार की जिम्मेदारी नहीं, बल्कि हर नागरिक का कर्तव्य है। तभी हम एक ऐसा भारत बना सकते हैं, जहां शिष्टाचार का मतलब ईमानदारी, पारदर्शिता, और न्याय हो।

=================================
-----------------------------------------------
*जागो भारत लगाओ मालम इस घाव का!
भ्रष्टाचार को दूर करो अब समय है बदलाव का
जय हिन्द... 🇮🇳
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*आलेख प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

धाडसी, सामाजिक, अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व असलेले रमेश जेठे सर


थोर संत महंत,विचारवंतांची भूमि असलेल्या अशा अहिल्यानगर जिल्ह्याच्या मातीत जन्मलेले, स्वभावाने सुसंस्कृत, विचाराने व्यापक आणि कृतीतून परिवर्तन घडवणारे सामाजिक योद्धा रमेश सखाराम जेठे सर हे आज समाजसेवेतील एक दैदीप्यमान नाव ठरले आहे. १९९२ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या धडाडीच्या व्यक्तिमत्त्वाने अनन्यसाधारण योगदान दिले आहे.

*नेत्यांचा विश्वास आणि जनतेचा आधार*

१९९४ पासून ते आजपर्यंत, महाराष्ट्र राज्याच्या विविध मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या नेत्यांशी त्यांनी थेट पत्रव्यवहार साधून समाजहिताचे भान जपत संघर्ष केला. शरद पवार, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी सातत्याने संवाद साधत समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवला. या पत्रव्यवहारातून आणि निवेदनांमधून सामाजिक न्याय मिळवून देण्यात रमेश जेठे सरांचे मोलाचे योगदान ठरले.

*शिर्डी एक्सप्रेस : निःपक्ष, निर्भिड पत्रकारितेचे प्रतीक*

त्यांच्या पत्रकारितेचा अविष्कार म्हणजे “शिर्डी एक्सप्रेस” ही निःपक्ष, निर्भिड व समाजाभिमुख वृत्तसेवा. १६ वर्षांपासून कार्यरत असलेली ही साप्ताहिक वृत्तसेवा आज लाखो वाचकांच्या हृदयात स्थान मिळवून आहे. या माध्यमातून त्यांनी वंचित, शोषित, पिडीत घटकांचे कैवार घेत अनेकांना न्याय मिळवून दिला.

*साहित्य, सिनेमा आणि नवाचाराचा संगम*

केवळ पत्रकारिता नव्हे तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही रमेश जेठे सरांनी आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी निर्मिती व अभिनय केलेला “मटण्या” हा लघुपट समाजात जागृती करणारा ठरला. त्यातील त्यांच्या अभिनयाची आणि विषयवस्तूची सर्वत्र चर्चा झाली. पुढे त्यांनी “मौब्बू” या दुसऱ्या लघुपटाची निर्मिती करून सामाजिक संवेदनांना भिडणारी कला रसिकांसमोर आणली.


*‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार’ – समाज गौरवाचा महाउत्सव*

शिर्डी एक्सप्रेसच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त, रमेश जेठे सरांच्या संकल्पनेतून “महाराष्ट्र रत्न पुरस्कार” नामक उपक्रमातून विविध क्षेत्रांतील २९ समाजहितैशी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम इतका भव्यदिव्य ठरला की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर त्याची चर्चा झाली. सिनेमा अवॉर्ड्सच्या धाटणीचा कार्यक्रम होत असूनही त्यामागे होता सामाजिक कृतज्ञतेचा गहिरा भाव.

*पुरस्कारांनी गौरवलेले कार्य*

रमेश जेठे सरांना आजवर ‘समाजरत्न पुरस्कार’, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील अनेक सन्मान, आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या कार्यशैलीत सातत्य, सत्यनिष्ठा, आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उर्मी ही नेहमीच ठळकपणे जाणवते.

*सामाजिक ध्यास, जनतेशी नातं*

जेठे सर हे केवळ नावाने नव्हे तर कार्यानेच समाजसेवक, संपादक, निर्माता, विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जीवन प्रवास हा तुळशीपत्र ठेवून केलेल्या सामाजिक कार्याचा प्रेरणादायी इतिहास आहे. अनेक राज्यांतील दिग्गज नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल अढळ स्थान आहे.

*रमेश जेठे सर यांचा दानशूरपणा*

कोरोना काळात जीवाची बाजी लावत रूग्णांना मदत.. रूग्णालयात दाखल करण्याची किमया.. अनेक जिल्ह्यातील अडकलेल्या लोकांना घरापर्यंत पोहोचविण्यासाठी कोरोनात मदत. ११०० गरजूंना धान्यकिटचे वाटप.. कोरोना काळात अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन..

सन्माननीय रमेश जेठे सर हे समाजमनावर अधिराज्य गाजवणारे, संघर्षातून सिद्ध होणारे, आणि “हटके” कार्यपद्धतीतून नवा विचार घडवणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचं जीवन हे एका सजीव प्रेरणागाथेसारखं आहे, जी आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरावी अशीच ! त्यांच्या सामाजकर्याला अधिकाधिक बळकटी मिळून सामाजातील उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लागो सदरील सामाजहितैशी कार्य करताना धाडसी, सामाजिक,अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व असलेले सन्माननीय रमेश जेठे सरांना भावी आयुष्यात उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
           

   *पत्रकार शौकतभाई शेख, श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±



गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला गुरूंचा सन्मान सोहळा


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
भारतीय संस्कृतीतील गुरू- शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारी गुरुपौर्णिमा तालुक्यातील लोणी येथील प.डॉ.वि.विखे पाटील विद्यालयात नुकतीच मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मंगलगीत सादर केले. मुख्याध्यापक लक्ष्मण रकटे यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांद्वारे गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व सांगून गुरूर्ब्रह्मा, गुरूर्विष्णु, या गुरुस्तोत्राचे सादरीकरण करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोहगांव येथील गंगागिरी महाराज गुरुकुल आश्रमाचे संस्थापक ह.भ.प. संदीप चेचरे महाराज हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, व्यास हे एक व्यक्तीचे नाव नसून एक विचार आहे. व्यास जसा वाढत जातो तसतसे विचारांचे क्षेत्र हे व्यापक बनत जाते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य लक्ष्मण रकटे यांच्यासह उपमुख्याध्यापक संदीप डहाळे, पर्यवेक्षक शोभा कडू, सुभाष भुसाळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख सविता दाभाडे व शितल इंगोले हे उपस्थित होते. प्राचार्य लक्ष्मण रक्त यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दहावीतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करणार - नामदार राधाकृष्ण विखे पाटील


श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना क. जे. सोमैया हायस्कूल यांच्यावतीने क्रीडांगण विकास निधी मधून स्वच्छतागृहासाठी निधी मिळावा या आशयाचे निवेदन देताना चेअरमन रणजीत श्रीगोड, पत्रकार व शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे सर आदि.

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालच्या भौतिक, शैक्षणिक विकासासाठी अहिल्यानगर चे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन विकास बाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड,शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, उत्तर भाजपा अध्यक्ष नितिन दिनकर,शहर भाजपा अध्यक्ष जितेंद्र छाजेड माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी जिल्हा परिषद सदस्य शरदराव नवले, अभिषेक पाटील खंडागळे, के. के आव्हाड यांचे सह आदि मान्यवर उपस्थित होते . या प्रसंगी ना. विखे पाटील यांनी हिंद सेवा मंडळाचे शैक्षणिक विकासासाठी जिल्ह्यात नावलौकीक आहे . या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी तसेच विविध पदावर कार्यरत आहे.
क.जे.सोमैया हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक,भौतिक विकास तसेच विद्यालयाच्या स्वच्छता गृह, महाविद्यालयासाठी
परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी कमी पडणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, July 9, 2025

गुरुद्वारा बिरद बाबा डोमेगांव में ४३ वी पैदल यात्रा'


🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

-भगवंत सिंग प्रितम सिंग बत्रा - गुरुद्वारा ट्रष्टी - / समाचार 
============≠====================

सतकार योग साध संगत जी, फतेह परवान करनी जी ।

गुरुद्वारा बिरद बाबा डोमेगांव में ४३ वी पैदल यात्रा' की खुशीमें


🌹🥀🌺🌸🌷🪷❤️

४३ वी पैदल यात्रा की खुशीमें गुरुद्वारा साहेब की नई इमारत में निचे लिखे हुए प्रोग्राम के मुताबीक दिवान सजनगें ।
साधसंगतजी के सहयोग से हर साल की तरह इस साल भी " महान पैदल यात्रा" गुरूद्वारा श्री गुरूसिंग सभा, श्रीरामपूर से गुरुवार, ता.१०/७/२०२५ के दिन सुबह ४:३० बजे गुरुबाणी किर्तन करते हुए गुरुद्वारा बिरदबाबा डोमगांव, कमालपूर के लिए रवाना होगी।

गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर तथा डोमेगांव की ओरसे बेनती की जाती है कि इस ४३ वी महान " पैदल यात्रा" में में ज्यादा से ज्यादा गिनती में साधसंगत हाजिर होकर पैदल यात्रा की शान बढाएँ तथा गुरूघर की खुशीयाँ प्राप्त करते हुए अपना अनमोल जनम सफल करें।

नोट : -
१) सभी साध संगत सुबह ४:०० बजे गुरुद्वारा साहेब पहुँच जाए। गुरुद्वारे में जपजी साहेबजी, आनंदसाहेबजी के पाठ उपरंत अरदास के बाद कडाह प्रसाद की देग बरतेगी, तथा "पैदल यात्रा" आरंभ होगी ।

२) रास्ते में चायपानी तथा नाश्ते के लिए पैदल यात्रा का स्वागत होगा । ३

3) जिन सज्जनोंको पैदल यात्रा के रस्तेमें सेवा करनी है वे अपने नाम निचे दिये गये मोबाईल नंबर पर लिखवादे ।

किरतन दिवान ग्यानी अनोखसिंग मस्कीन, भाई मनप्रितसिंगजी (हजुरी जथ्था गुरुद्वारासाहिब, श्रीरामपूर), भाई संदीपसिंगजी (ग्रंथी, गुरुद्वारा बिरबाबा, डोमेगांव) सुबह ११:३० से दोपहर १२:३० बजे अरदास, दिवान की समाप्ती, गुरूमहाराज के सुखासन

दोपहर १२:३० से १:३० बजे
साध संगत के सहयोग से गुरु का लंगर अतुट वरतेगा

Reg. Trust A.nagar No. A1352 Dt. 15/3/2015
गुरुद्धारा बिरदबाबा देवस्थान ट्रस्ट,
कमालपूरGIFS
Account No. 915020052482202
Code 0001370
SHRIRAMPUR BRANCH
साध संगत के आसरे
गुरूद्वारा प्रबंधक कमेटी, डोमेगांव
गुरुद्वारा प्रबंधक कमेटी, श्रीरामपूर

मो. 9822059646, 7020308707, 7020183778, 9890188181,8806490555, 9028900117, 9028838878, 9422339034 (पुणे)
पुछताछ : स. हरभजनसिंगजी, हेडग्रंथी गुरुद्वारा बिरदबाबा, डोमेगांव (कमालपूर), मो. 8888446876 -

बंटी धापर, श्रीरामपुर/१८२२३१२९९४

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================