( मुंबई ) - ANI - News - Ajancy - सेवा (Nashik) केंद्रीय अर्थमंत्री (Centre) निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी मोदी सरकारच्या (Narendra Modi) कार्यकाळातील नववा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. तो आगामी लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ जुमला आहे. यंदाचा तेच ते अर्थसंकल्प हा फक्त आकड्यांचा धूर आहे. त्यातून सर्वसामान्यांच्या हाताला काहीच लागणार नाही, अशी टिका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली आहे. (Ordinery class people nothing get from centre`s this budget)
श्री. भुजबळ म्हणाले, मागील काही वर्षात अर्थसंकल्पातून केलेल्या घोषणांचे नेमके काय परिणाम कारक प्रगतीशील घडलं याचं उत्तर अनुत्तरीत आहे. मोदी सरकारकडून अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे जुमलेबाजी कायम आहे.
एकीकडे देशाचा अर्थसंकल्प मांडला जात असतांना नुकताच इंडियन बर्ग या संस्थेने अदानी समुहाबाबत संशोधनात्मक विश्लेषण केले आहे. त्यानंतर लगेचच अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी घसरण झाली. या अदानी समूहाला एलआयसी सारख्या शासकीय संस्थांनी अर्थसहाय केलं आहे. शासकीय उपक्रमांनी खाजगी उद्योगांना सहाय केल्यामुळे हे खाजगी उद्योग डुबले तर या शासकीय संस्थाचे मोठं नुकसान होणार आहे. चुकीचे निर्णय घेतले तर ज्याप्रमाणे दिवाळखोरीमुळे श्रीलंकेची परिस्थिती झाली त्याप्रमाणे आपली परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केवळ अर्थसंकल्पाचे रक्कम फुगवून दाखवत येणार नाही.
No comments:
Post a Comment