शिरसगांव - प्रतिनिधि - समाचार -
अग्निपंख फाऊडेशन व सुमित फोटो जानकी एजन्सी यांच्या सौजन्याने तिसरा स्टेट बँक आपल्या दारी उपक्रम लोकाग्रहात्सव उंदीरगाव आऊटसाईड व हरेगाव या ठिकाणी राबवण्यात आला, शिबिरात ग्राहक सेवा संचालक नवनाथ शेलार यांनी नागरिकांमध्ये सरकारी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना,प्रधानमंत्री जनधन खाते यांचे महत्त्व नागरिक व तरुणांमध्ये सांगुन जनजागृती करण्यात आली.
या शिबिरामध्ये हरेगांव, उंदीरगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेतला आणि अग्निपंख फाउंडेशन तर्फे आज ओपन केलेल्या खातेधारक लोकांना मोफत दोन लाखाचा अपघाती विमा काढून देण्यात आला. यावेळी शिबीरास भेट देण्यासाठी व्यवस्थापक एस.बी.आय.क्षेत्रीय व्यवस्थापन कार्यालय अहमदनगर महेश लगडे, जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाऊंडेशन,जिल्हा समन्वयक संजीवनी विकास फाउंडेशन अहमदनगर अमोल जवणे, जिल्हा प्रतिनिधी संजीवनी विकास फाऊंडेशन अहमदनगर साक्षी जवणे यांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले.
हे खाते बचत गटातील महिला व पुरुष यांचेसाठी गरजेचे आहे.१० वर्षावरील मुले, मुली, विद्यार्थी ज्यांचेकडे आधारकार्ड आहे. ते सुद्धा या बँकेत नवीन खाते उघडण्यास पात्र असल्याचे बँक अधिकारी महेश लगडे यांनी सांगितले.यावेळी अग्निपंख फाऊंडेशनचे संस्थापक स्वप्निल पंडित,कार्याध्यक्ष महेश निकम यांनी मोलाचे सहकार्य केले.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))
No comments:
Post a Comment