राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 17, 2023

चार नवीन एसटीआगारांची होणार निर्मिती जळगाव जिल्ह्यात

जळगाव - प्रतिनिधि - वार्ता - पारोळा, बोदवड आणि भडगाव येथे चार नवीन बस आगारांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू असून या संदर्भात राज्य परिवहन खात्याने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिल्या. ते राज्य परिवहन मंडख व परिवहन खात्यांच्या संयुक्त आढावा बैठकीत बोलत होते.
ना. गुलाबराव पाटील यांनी आरटीओ विभागाला जिल्ह्यातील अपघातप्रवण 70 ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. तर यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून सर्वतोपरी निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही आढावा बैठकांमध्ये दोन्ही खात्यांची माहिती जाणून घेत, संबंधीत अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिलेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकी घेण्यात आल्या. यातील पहिली बैठक ही राज्य परिवहन मंडळ अर्थात एस.टी. खात्याची झाली. यावेळी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी शाम लोही, शाम लोही, विभागीय नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता निलेश पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत सोनवणे, मोटार वाहतूक निरिक्षक सुनील गुरव, सौरव पाटील, हेमंत सोनवणे आदींचा समावेश होता. या बैठकीत ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील राज्य परिवहन खात्याची माहिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी काही महत्वाचे निर्देश दिलेत. यात प्रामुख्याने प्रत्येक तालुक्यात एस.टी.चे एक आगार अपेक्षित असतांना जिल्ह्यात फक्त 11 आगार असून धरणगाव, भडगाव, बोदवड आणि पारोळा येथे एस. टी. डेपो नसल्याने असुविधा होत असल्याबाबत चर्चा झाली.
यावर पालकमंत्र्यांनी चारही ठिकाणी आगारांची निर्मिती करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून यासाठी स्थानिक पातळीवरून प्रस्ताव तयार करण्यात यावेत, असे निर्देश दिले. यासोबत आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पासेससाठी अडचणी होऊ नयेत म्हणून याचे कार्यालय हे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेपर्यंत उघडे रहावे असे ते म्हणाले. तर मोठ्या गावांमध्ये पासेस मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, असेही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले
---------------------------------------------------
===================================
सह,संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना  संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------

No comments:

Post a Comment