" करबला युद्ध " जगातं -गावां- गावांत शहरातं युद्धाच्या आठवणी आपो-/आपच मोहररम च्या दहा तारखेला " यौम- ए - आशुरा " दिवशी कठोरमनाच्या माणसाला जाग्या होतात.
प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनी अल्लाहच्या सत्यधर्म- ईस्लामचा प्रसार करण्यासाठी अत्यंत हाल- अपेष्टा - छळछावणीत- उपाशीपोटी- कष्ट व सहनशीलतेचे अंत बघून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आशिया- युरोप-अफ्रीका खंडातील बहुतेक देशात सुव्यवस्थित पणे परिवर्तन घडवून आणले, जगातील प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी,जीव -जंतू च्याही रक्षणासाठी जगात ठिकठिकाणच्या राजेशाही, हुकूमशही, बादशही,परीवार वाद, जुलमी राजव्यवस्था संपूर्ण लोकशाही पद्धतीने, आपल्या स्वतःच्या व आपल्या परिवाराच्या- आपल्याला मानणाऱ्या असंख्य अनुयायांच्या आचरणाने संपुष्टात आणुन. " लोकशाही " व्यवस्था कशाला म्हणतात हे समस्त जगाला दाखवून देउंन , अल्लाहच्या पवित्र कुरआन मधील प्रत्येक शब्द न शब्दांच्या शिकवणी व हादीस च्या शिकवणी नुसार ". स्वतः ". पवित्र मदीना शहरात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जगप्रसिध्द मदीना शहरात करून समस्त जगाला दाखवून दिली. आपल्या अनुयायांना- मित्रगण - सहाबा यांना आपल्या हयातीतच माझ्या महानिर्वाणा नंतर समस्त जगात शासन ( राजकीय सत्ता -हुकूमत)व्यवस्था कशा पद्धतीने करावयास हवेत याचे प्रत्यक्षात शिक्षण दिले .
त्यासाठी आपल्या खास विश्वासू मित्र( सहाबा) यांना "खलिफा " अल्लाहच्या नायब ( डेप्युटी) म्हणतात, त्यांना" खलिफा ' म्हणून उल्लेख केला जातो, अशी व्यक्ती ईस्लामी व्यवस्थेची प्रशासकीय प्रमुख असते .त्याला पवित्र कुराण,हादीस व " मजलिस - ए - शुरा" च्या अनुसरून निर्णय घेण्याचा अधिकार असतो. ("मजलिस - ए - शुरा" अर्थात" तज्ञ,जाणकार सल्लागार मंडळ) आशा सल्लागार समिती (" शुराई - निजाम") च्या माध्यमातून लोकप्रशासन करणे यालाच " निजाम - ए -खिलाफत " म्हटले जाते . उदाहरण म्हणून द्यायचे झाल्यास प्रेषित मुहम्मद पैगंबर स्वतः प्रमुख असून सुध्दा आपले कोणतेही निर्णय आपल्या साथीदार मित्रांशी सल्ला मसलत करुनच घेत होते, विशेष गोष्ट त्या मध्ये किती ही गरिब मित्राला ही सल्ला देण्याचा आधिकार होता , प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार होता . यालाच लोकशाही पद्धती म्हटले जाते असो.
प्रेषित मुहम्मद सल्लमांनी आपल्या हयातीतच पुढील पिढीला नेतृत्व म्हणून पुण्यवान ( राशिदीन) व अनुभवी
(१) ह. अबु-बकर सिद्दीक रजि. (२) ह.उमर फारुख रजि. (३) ह. उस्मान गनी रजि. (४) ह. आली बिन आबु तालीब रजि.
या वेगवेगळ्या घराण्यातील कर्तव्यदक्ष साथीदारांची क्रमाक्रमाने पुढील चार खलीफांची निवड करून त्याच्यावर सर्व जगभरातील लोकांना" एकनिष्ठता" ची शपथ ( बैत) दिली गेली. प्रेषित मुहम्मद सल्लमांच्यां महापरिनिर्वाणानंतर चारही खलिफांनी खूप चांगल्याप्रकारे ईस्लामी राज व्यवस्था मध्य आशिया, युरोप, अफ्रीका खंडातील खूप देशात आपल्या प्रतिनिधी मार्फत चालवली..चार खलिफांच्या राजकीय सामाजिक आर्थिक व्यवस्थापनास " खुलफा - ए - राशिदीन " चे युग " म्हणतात, अर्थात या पुण्यंवान लोकांनी अल्लाह च्या पवित्र कुराण-हादिस च्या शिकवणुकीनुसार राज्य व्यवस्था चालवली. जगात आज ही जगात आजरामर केलीत . महात्मा गांधी यांच्या बहुतांश ठिकाणच्या भाषणात व पुस्तकांत यांच्या शाषण पध्दतींचा उल्लेख केला जात असे व आहे.
महात्मा गांधी जी व विविध महामानवांच्या भाषणात व पुस्तकांत वेळोवेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या देशात तशी राजकीय व्यवस्था करण्याची गरज ही व्यक्त केली आहे ,असो.
चौथ्ये खलिफा हज. अली ( रजि.) यांच्या महानिर्वाणानंतर त्यावेळच्या 'सल्लागार(मजलिस ए शुरा) मंडळांने काही काळ ह. अलि. रजिंचे जेष्ठ पुत्र ह. हसन रजि. यांना खलिफा म्हणून घोषित करण्यात आले. मात्र त्याकाळातील राजकीय सामाजिक परिस्थिती नुसार तीव्र स्वरूपाच्या विरोध- मतभेदांमुळे व निष्पाप निरागस नागरिकांचे जीव धोक्यात घालून, निष्पाप नागरिकांना त्रास व रक्त सांडले जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने ह. हसन बिन अली रजि. यांनी स्वतः हुन पदत्याग केला.
या प्रसंगानंतर प्रेषित मुहम्मद सल्लमांच्या शिकवलेल्या तत्त्वाला हारताळ फासून त्या काळातील मजलिस ए शुराला ( कायदे मंडळा) डावलून मनमानी करून प्रेषित मुहम्मद सल्लमांचेच एक सहकारी आमीर मुआविया रजि. यांनी स्वत:ला स्वयंघोषित खलिफा म्हणून घोषित केले , त्यांनी ईस्लामच्या तत्त्वप्रणालीला तिलांजली देऊन हुकूमशाही- राजेशाही पध्दतीनुसार राहणे, वागणूक व मोठ्या भव्य राजप्रासाद ची बांधणी करून राज्य कारभार करण्यात आला.
हे सर्व इस्लामी संस्कृती व परंपरे च्या राज्य व्यवस्थेच्या बिलकुल विरोधात चालले होते ,हे कदापिही मान्य नव्हते. त्यानंतर ह. आमीर मुआविया येथे न थांबता त्यांनी आपल्या हयातीत स्वतः च्या आपात्र मुलगा यजिद यांस आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करून , वीस वर्षे राजेशाही सारखा राज्य कारभार करुन राजधानी मदीना वरुन कुफा ( इराक) वरुन सिरिया येथे हलविण्यात आल्यानंर आपल्या मृत्यू पश्चयात आपल्या आपात्र मुलगा यजिद यांस राजा करण्यात आले. यजिदच्या राजेपदास व क्रुर शासन पध्दतीस लोक जागोजागी तीव्र विरोध होत होता.
नागरिकांना प्रेषित मुहम्मद सल्लमांचे नातू हजरत हुसैन रजि. यांनाच खलिफा म्हणून निवड व्हावी म्हणून संपूर्ण जनमत होते व नागरिक वारंवार पत्र व्यवहार करुन मागणी याचना करून बारा हजारापेक्षा ही जास्त पत्रे लिहिली जाउन सर्वतोपरी मदत सहकार्य करण्याची ग्वाही देत होते . सर्वांच्याच मागणीची दखल घेऊन ह. इमाम हुसैन रजि. आपल्या खानदानातील मुलांबाळांसह, वडील बंधू ह. हसन यांच्या व लहान सर्व बंधू च्या सर्व परीवारासह मदीना वरुन कुफा येथे जाण्यासाठी निघाले. ही बातमी ऐकून राजा यजिद घाबरून आदेश दिला गेला सर्व कुफा वासीयांना जो ह. इमाम हुसैन ला साथ-थारा देईल त्या सर्वांना मृत्यू दंड देण्याची धमकी दिली. राजा यजिदने कुफाशहरातील मुख्य गव्हर्नर ईबने जियाद यांस आदेश देण्यात आले की कोणत्याही परिस्थितीत ह. इमाम हुसैन यांना यजिदला राजा करण्यास राजी करावेत. नाहीतर सरळसरळ कैद करून दरबारात हजर करण्यात यावे.
प्रवासा दरम्यान" फुरात" नदीच्या काठावर करबला येथील मैदानावर गव्हर्नर ईबने यजिद ने चार हजार सैनिकांसह ह. इमाम हुसैन यांचा घेराव करून यजिदला राजा बादशहा करण्याच्या सर्व अटी- शर्ती मान्य करण्यास हुकूम दिला. परंतु जालीम, अत्याचारी, कपटी यजिदला संमर्थन देण्यास ह.इमाम हुसैन यांनी स्पष्ट नकार दिला..
या नकारानंतर क्रुर बादशहा यजिद च्या कमांडर व गव्हर्नर ईबने जियाद ने युद्धाचे स्पष्ट अव्हान केले . ह. ईमान हुसैनांनी रक्त, जीवितहानी टाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत. तीन प्रस्ताव मांडले परंतु क्रुर गव्हर्नर जियाद याने मागेपुढे न पाहता सरळसरळ ह. हुसैन यांच्या वर क्रुर पणे अत्याचार करण्यास सुरुवात करून कुरातनदीच्या तीरावर असुन हुसैन च्या परीवारांस पाणी बंदी केली गेली, तीन दिवस म्हणजे ७२ तास रखरखत्या अरबस्थातील उन्हाळ्यात बिना पाण्याची कुंटूंबावर वेळ आली, हालहाल करून , सहा महिन्याच्या बाळ अली असगर हे पाण्यावीना व्याकुळ होऊन पाणी न देता यांच्या वर त्रिकोणी बाण मारुन हत्या केली, सात वर्षांच्या कासिम या ह. हसन यांच्या मुलाला घोडयाच्या टाचेखाली चिरडून ठार मारले. बहात्तर ७२ लहान मोठ्यांना गळे चिरुन ठार करण्यात आले. युध्दात सर्व पुरुष शहीद( हौतात्म्य )झाले. हा दिवस १० मुहररम हिजरी ६१ ( 10 अॉक्टोबर 680) या दिवशी ७२ हुतात्म्यांनी फक्त अल्लाहच्या व प्रेषित मुहम्मद स्व सल्लमांच्या लोक कल्याणकारी राज्य व्यवस्थेसाठी सहा महिन्यांच्या बाळासह ७२ शहीद( हौतात्म्य ) झालेत.....
करबला च्या या युद्धातुन जगाला संदेश मिळाला की कोणत्याही अत्याचारी व्यवस्थेपुढे गुडघे टाकायचे नसतात तर बलिदान देण्यास तयार राहिले पाहिजे...
क्रुर,जुलमी,अत्याचारी ,दमनकारी सत्ता विरूद्ध गुडघे टेकले असते तर स्वतः व संपूर्ण परिवार वाचला असता परंतु प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणी नुसार अल्लाह च्या सत्य- मुल्यं- रक्षणासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबांचे बलीदान दिले..
म्हणुनच शायर म्हणतो की.. " करबला के बाद ईस्लाम जिंदा होता है.... "
===================================
---------------------------------------------------
लेखक: डॉ.सलीम सिकंदर शेख.✍️✅️🇮🇳...
बैतुशशिफा हॉस्पिटल
---------------------------------------------------
===================================
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111
---------------------------------------------------
===================================