नागरीकांनी शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा - सरपंच सौ.आहेर
- अजीजभाई शेख - राहाता - / वार्ता -
नागरीकांसाठी शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात अग्रेसर असलेल्या तालुक्यातील मौजे वाकडी येथील ग्रामपंचायत मध्ये वयोश्री योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे बघावयास मिळते आहे.
लोकनियुक्त महिला सरपंच सौ. रोहिणीताई आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वाकडी येथील कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या वयोश्री योजनेला उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून या योजनेचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरुन मिळतील तसेच ६५ वर्ष वयाच्या व्यक्तींचे फॉर्म भरून दिले जातील, ज्यांचे वय ६५ वर्ष व त्यापेक्षा अधिक आहे त्यांनी येताना आपले आधारकार्ड झेरॉक्स, बँकेचे पासबुक झेरॉक्स,एक फोटो बरोबर आणावा,तसेच वयोश्री योजनेबरोबरच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहनही सरपंच सौ. रोहिणीताई आहेर यांनी केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
भाऊराव माळी ✍️✅🇮🇳...
(प्रदेश संघटक)
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महा. प्रदेश)
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment