राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 30, 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी परिमंडळ-२ कार्यक्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन


- माजिद खान - नाशिक -/ वार्ता -
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन कारवाईत २ घातक हत्यारे व रु. ८३६५/- किंमतीची अवैध देशीदारुचा माल जप्त करण्यात आले.

श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध करणेसाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्यादृष्टीने, नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ -२ मधील पो. स्टे. हद्दीत दि.२९/१०/२०२४ रोजी ७ ते १० वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविणे साठी श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड व नाशिकरोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.

श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्री. शेखर देशमुख, सहाय्यक
पोलीस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी अधिनस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक कोम्बिंग ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.

१. रेकॉर्डवरील २०७ गुन्हेगार चेक करुन, मिळून आलेल्या गुन्हेगारांकडे चौकशी करुन त्यापैकी ३६ गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरुन घेण्यांत आले. तसेच ४४ हद्दपार इसमांना चेक करण्यांत आले.

२. अवैध शस्त्रसाठा शोध अंतर्गत ६२ गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यांत आलेल्या आहेत.

३. सातपुर व अंबड पो. स्टे. हद्दीत अनुक्रमे इसम नामे मयुर पोळकर, व हासिम खान यांचे ताब्यात घातक हत्यार (कोयते) मिळून आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे ०२ गुन्हे दाखल करण्यांत आले आहे.

४. अंबड, एम. आय. डी. सी. चुंचाळे चौकी, उपनगर, नाशिकरोड व देवळालीकॅम्प पो. स्टे. हद्दीत, ०५ इसमांचे ताब्यात विनापरवाना देशीदारुच्या बाटल्या, एकुण किंमत रु. ८३६५/- चा माल मिळून दारुबंदी कायदयान्वये ०५ गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यांत आली आहे.

 ५. सातपुर पो. स्टे. हद्दीत कोटपा कायदयान्वये ०७ इसमांवर कारवाई करण्यांत आली आहे.

६. टवाळखोर १३ इसमांवर म. पो. का. कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्प्यांत आली आहे.

७. ४३ समन्स व २२ वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.

८. मोटार वाहन कायदयान्वये ९७ इसमांवर कारवाई करण्यांत आली आहे.

विधानसभा आचारसंहिता कालावधीत रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन परिणामकारक अशी कारवाई मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार आहे असल्याचे श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

महंत काशिकानंदजी महाराजांच्या हस्ते जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटनेच्या सभासदांना दिवाळी फराळ वाटप


- शिर्डी - प्रतिनिधी -/ वार्ता -
ना.राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना प्रणित जनेश्वर प्रतिष्ठाण रिक्षा संघटना साईआश्रम एक हजार  रुम रिक्षा संघटनेतील सभासदांना दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.यावेळी महंत काशिकानंदजी महाराज यांनी रिक्षा संघटनेच्या सामाजिक कार्य व उपक्रमांचे कौतुक करत श्री साईबाबांच्या पवित्र भूमित रिक्षा चालक हा खरोखर  श्रमिक वर्ग असुन येणाऱ्या साईभक्तांना प्रामाणिक सेवा देत असल्याचे सांगितले. तर दिवाळी हा आनंदाचा सण आणि या सणानिमित्त रिक्षा चालक , अनाथालय व गरजवंताना दिवाळी फराळ वाटप करुन संघटनेचे संस्थापक प्रशांत कोते व अध्यक्ष रविंद्र शेळके हे साईबाबांच्या शिकवणीचे पालन  करत असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी महंत काशिकानंदजी महाराज यांनी उपस्थिती देऊन त्यांच्या शुभहस्ते हा दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला याचे समाधान व्यक्त करत जनेश्वर प्रतिष्ठाण हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असुन याकामी असंख्य कार्येकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याचे संस्थापक प्रशांत कोते यांनी स्पष्ट  केले.तर साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे म्हणत संघटनेचे अध्यक्ष  रविंद्र शेळके यांनी आज महंत काशिकानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप झाले असल्याचे समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी जनेश्वर रिक्षा संघटनेचे  संस्थापक प्रशांत कोते , अध्यक्ष रविंद्र शेळके , संतोष जेजुरकर , शंकर आवारे , विशाल दहीवाळ , नासीर पठाण , संतोष आवारे , अवी जेजुरकर , अमोल वाडगे , गोकुळ बारगळ , प्रमोद कदम , जाकीर पठाण , रविंद्र जगताप , दिपक वाघ , बाळासाहेब शिंदे , दिपक मगर , मनोज उदावंत , साईराम सोळसे , जयंत शेलार , मछ्चिंद्र तांदळे , प्रवीण डेंगळे आदीसह सदस्य उपस्थित होते.

<^><७><७><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±


पर्यावरणपुरक - आरोग्यमय,आनंदी दिवाळी


*पर्यावरणपुरक - आरोग्यमय,आनंदी दिवाळी*

आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे दिवाळी. वसुबारस ते भाऊबीज पर्यंत दिवाळी सण साजरा करत असताना सर्वांचाच आनंद द्विगुणित झालेला असतो. लहान मुले तर खूपच खुश असतात. कारण; नव नवीन कपड्यां बरोबरच त्यांना फटाके उडवायला मिळालेले असतात.
        दिवाळीला आपण जे फटाके उडवतो त्याची परंपरा खूप शतकांपासून आहे. खूप आधीपासून लढाईमध्ये गनपावडर व तोफांचा वापर करत होते. या गनपावडर पासूनच फटाके तयार होत. पुर्वीच्या काळी विवाह सोहळा व उत्सवांमध्ये फटाक्यांची आतषबाजी केली जायची. आणि तेव्हापासूनच कदाचित भारतीयांमध्ये दिवाळी सणाला फटाके उडवायची परंपरा चालू झाली असावी. फक्त दिवाळीलाच नव्हे तर, इतर उत्सवांमध्ये फटाके उडवायला सुरुवात झाली. अलीकडे तर उद्घाटनप्रसंगी, निवडणूक जिंकल्यानंतर, नविन वस्तू खरेदी प्रसंगी, स्वागत समारंभ प्रसंगी अशा एक ना अनेक प्रसंगी फटाके उडविले जातात. फटाके उडवून एक प्रकारचा आनंद साजरा केला जातो. फटाके उडविणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाते.
           तामिळनाडू मधील " शिवकाशी" हे फटाके निर्मितीचे कोठार समजले जाते. फटाक्यांमध्ये रंगीबेरंगी धूर तयार करणारे फटाके, शंकु आकाराचे फटाके ( झाडं), भुईचक्कर, तोटा, सुतळी बॉम्ब, शुटर्स - रॉकेट्स - हवेत वर जाऊन उडणारे फटाके, अलिकडेच नवीन निघालेले पॉप - पॉप फटाके असे अनेक प्रकार आहेत. या विविध प्रकारच्या फटाक्यांमध्ये बेरियम, आर्सेनिक, सल्फर, क्लोरिन, ॲल्युमिनियम, सल्फर पोटॅशियम, सिलिकॉन, लोह, टायटॅनियम यासारखे रासायनिक घटक वापरले जातात, की जे जीवितास धोकादायक आहेत. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार वाढतात. सततच्या मोठ्या आवाजामुळे कदाचित बहिरेपणा येऊ शकतो, झोपेचा त्रास होतो, त्यामुळे चिडचिड वाढते. नाक व घसा यात जळजळ होते. लहान मुले, गरोदर स्त्रिया, आजारी लोक, वृध्द यांना जास्त त्रास होतो. बर्याच वेळा सामाजिक एकात्मता ढासळते. मानवाबरोबरच प्राणी - पक्षी यांनाही त्रास होतो. बर्याच वेळा मोठ्या आवाजाने प्राणी - पक्षी घाबरतात, गडबडून जातात. मानवाचेही तसेच आहे. फटाके वाजवताना एकमेकांच्या भावनांचा व शारिरीक स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
       फटाक्यांमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदुषण वाढते आणि त्यामुळे प्राणी - पक्षी व मानवी स्वास्थ्य बिघडते.
              फटाके उडवायला विरोध नाही. परंतु; काळजीपूर्वक व पर्यावरणपूरक फटाके उडविले तर; ते सर्वांच्याच भल्याचे असणार आहे. त्यासाठी कमी आवाजाचे व कमी धूर करणारे फटाके उडविले तर आणखी मजा येईल. सर्वांचेच स्वास्थ्य सुरक्षित राहिल.
            फटाके उडविताना आवश्यक ती काळजी घेऊनच फटाके उडविले पाहिजेत. उदा. फटाके उडविताना लहान मुलांना एकटे सोडू नये. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. एकावेळी एकच फटाका लावावा. हातात घेऊन फेकू नये. अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
           आपण असेही करू शकतो की; फटाक्यां ऐवजी लहान मुलांना बुद्धीला चालना देणारे खेळ देऊ शकतो. थोर महात्मे, धाडसी कथा, संस्कारक्षम गोष्टींची पुस्तके देऊ शकतो. तसेच मुलांना सर्जनशील उपक्रमात सहभागी होण्यास प्रवृत्त करू शकतो. जसे की; हस्तकला, बागकाम, नृत्य, संगीत. तसेच मुलांसमवेत निसर्गरम्य परिसराला भेट द्या. त्यामुळे मुलांनाही पर्यावरणातील गोष्टी समजण्यास मदत होईल. घराभोवती, पर्यावरणात कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी कागदी कचरा, फटाक्यांचे रॅपर्स इतरत्र न फेकता कचराकुंडीतच जमा करण्यास सागणे.
        लहान - सहान गोष्टीतूनच अंगचे वळण लागते आणि चांगल्या सवयीही जोपासल्या जातात. अशारीतीने ज्ञानमय, निरोगी आणि आनंदमय दिवाळी साजरी करणे आपल्याच हाती आहे.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ. मिनल अमोल उनउने
सातारा - ९१३०४७०३९७

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><<^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

" भारत रत्न मौलाना आझाद राज्य स्थरीय समाजरत्न पुरस्कार श्रीरामपूरचे डॉक्टर सलीम शेख यांना जाहीर "


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर - येथील एकता सामाजिक सेवाभावी संस्था.. ही 14 चौदा वर्षा पासून संगमनेर शहर व महाराष्ट्र राज्यात सेवाभावी वृत्तीने काम करीत असते.. एक विशेष बाब म्हणजे एका आशिषित रिक्षा ड्राइव्हर ने ही संस्था स्थापन करून शहर व राज्यातील चांगल्या विचार सरणीच्या लोकांना डॉक्टर, इंजिनीअर, वकील, फार्मासिस्ट, वयोरुद्ध सामाजिक समाजसेवक, सर्व धर्मातील सदस्य लोकांना एकत्र करून फार उत्कृष्ट सामाजिक उपक्रम रबवीत असते. खरोखर फार अभिनंदनीय बाब म्हणावं लागेल निच्छिच . त्या मध्ये खास उपक्रम "पुस्तकं वाचन चळवळ "ते प्रत्येक येणाऱ्या पाहुणे व मित्रांना आपल्या घरी किंवा कोणत्याही समारंभात भेट वास्तू म्हणून पुस्तकं च भेट देणार.. असे विविध उपकृत उपक्रम राबविण्यात येतात.. त्याप्रमाणेच दरवर्षी भारत रत्न व भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या136व्या जयंती च औचित्य साधून त्यांच्या नावाने राज्य स्तरीय समजरत्न पुरस्कार दिला जातो आत्ता पर्यंत राज्य व देशातील विविध कर्तव्य बजावलेल्याच मान्यवरांना दिलेला आहेत.
यंदाही पुरस्कार घोषित करताना कोणत्याही उमेदवाराचे स्वतः चे परिचय न मागता समाजातील विविध गटातील सामान्य लोकांचे मत विचारात घेऊन पुरस्कार घोषित केले गेले अर्थात एक पारदर्शक प्रक्रियेतून.पुरस्कारांची निवड केली गेली.
यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध समाजसेवक व सर्व धर्म आदरभाव जपण्यासाठी कायम अग्रही राखण्यासाठी सतत प्रयत्न करणारे व सामाजिक सदभावना जोपसण्यासाठी सतत कार्यरत असणारे श्रीरामपूर चेवैद्यकीय क्षेत्रात अखंड सेवा देणारे डॉक्टर सलीम सिकंदर शेख -बैतुशशिफा दवाखाना यांना 2024-2025 चा " भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद समाजरत्न पुरस्कार "जाहीर करण्यात आला..
तसेच मौलाना आझाद आदर्श आरोग्य मित्र 2024-25 चा पुरस्कार शहानवाज गणी शाहा यांना :,
    तसेच मौलाना आझाद व्यंग-चित्रकार पुरस्कार अरविंद वसंतराव गाडेकर यांना,जाहीर करण्यात आलेत. 
    तसेच, स्व. मिर्झा खालिद बैग राज्य स्थरिय 2024-25चा "आदर्श समाजरत्न पुरस्कार " अफसर बालम शेख यांना जाहीर करण्यात आला आहेत..
भारत रत्न मौलाना आझाद यांची 136 वी जयंती दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येतील...
या सर्व मान्यवारां चे विविध थरातून स्वागत होत आहेत...


=================================
-----------------------------------------------
डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================

Tuesday, October 29, 2024

डॉक्टर हे 'देवदूत' च असून त्यांचा सन्मान योग्यच होय- ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
मानवी जीवनात आरोग्य जपणे गरजेचे झाले असून आजच्या काळात डॉक्टर हे' देवदूत'च असून त्यांचा माऊली वृद्धाश्रम तर्फे झालेला सन्मान योग्यच होय, असे मत ह.भ.प. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी व्यक्त केले.
  शहरालगत शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रम आणि जानकी माऊली निराधार विद्यार्थी आश्रमाच्या वतीने सातवा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसगी डॉक्टरांचा सन्मान करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. वृद्धाश्रमाचे संस्थापक,अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून        
उपस्थितांचा सत्कार केला. 
यावेळी डॉ. कुमार चोथाणी, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सौ. सिंधू पडघन, डॉ. भारत गिडवाणी, डॉ.राजेंद्र लोंढे, डॉ. रवींद्र भिटे यांचा ह.भ.प.आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराचे नियोजन सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, शिरीष वाघुंडे, सौ. गौरी वाघुंडे, अरुणराव विसपुते, सौ. वंदनाताई विसपुते, डॉ. बाबुराव उपाध्ये, पत्रकार राजेंद्र देसाई, संतोष मते, शुभम नामेकर, दत्तात्रय खिलारी, आदिंनी नियोजनात भाग घेतला. आचार्य डॉ. शुभम महाराज कांडेकर यांनी माऊली वृद्धाश्रम हे सेवेचे तीर्थस्थळ आहे. निराधार आजी, आजोबा, विद्यार्थी यांची गेल्या ०७ वर्षापासून मनोभावे सेवाभाव करणारे वाघुंडे परिवार, पदाधिकारी आणि देणगीदार यांचे योगदान आदर्शवत आहे. असे सांगून वृद्धाश्रमासाठी डॉक्टरांचे विनामूल्य कार्य भूषणावह असल्याचे सांगितले. 
यावेळी प्राचार्य टी.ई. शेळके, सुखदेव सुकळे, डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार राजेंद्र देसाई, प्रकाश कुलथे, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ, महेश माळवे,भानुदास खरात, सुरेश कर्नावट, लक्ष्मीकांत जेजुरकर, ओमप्रकाश बनकर, ह.भ.प. गोरक्षनाथ शिंदे , गोरक्षनाथ अकोलकर, दत्तात्रय परदेशी, श्यामराव नवले, चंद्रकला डोळस, तुकाराम डोळस आदींसह देणगीदार यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अण्णासाहेब भिंगारदिवे, रावसाहेब भिंगारदिवे, अमोल भिंगारदिवे, भास्करराव ताके पाटील, राजेंद्र रासने परिवार यांचा सत्कार करण्यात आला.
 संतोष मते यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी आभार मानले.


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

व्यावसायिक मंदी आणी दिवाळी विशेषांक जाहिरातीवरील परिणाम


व्यावसायिक मंदी ही संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी एक गंभीर समस्या आहे. आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक स्पर्धा, ग्राहकांचा बदलता कल, आणि अन्य अनेक घटकांच्या परिणामस्वरूप मंदी येते. याचा परिणाम सर्व उद्योगांवर, तसेच विशेषांकांसारख्या सर्जनशील साहित्यावरही होतो. विशेषतः वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांसारख्या वार्षिक प्रकाशनांवर त्याचा गंभीर प्रभाव पडतो. या लेखात आपण या मंदीचे कारणे, परिणाम, आणि त्यावर उपाय योजना यांचा आढावा घेऊ.

*1. व्यावसायिक मंदीची कारणे*

जागतिक स्पर्धा: आजच्या काळात कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आहेत. अनेक कंपन्या कमी खर्चात जास्त उत्पादन करत असल्याने स्थानिक उत्पादनांना आव्हान निर्माण होते.

ग्राहकांचा बदलता कल: लोकांचे वाचन, खरेदी आणि माहिती मिळवण्याच्या पद्धतीत प्रचंड बदल झाला आहे. डिजिटल माध्यमांमुळे वाचनाची व्याख्या बदलली आहे, त्यामुळे छापील माध्यमांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.

मुद्रा चलनात होणारे बदल: चलनवाढ किंवा रुपयाची घसरण या कारणांमुळे उत्पादन खर्च वाढतो, तर विक्रीत घट होते.

वाढती उत्पादनाची किंमत: उत्पादनातील कच्चा माल, मजुरी, वाहतूक यांवरील खर्च वाढल्यामुळे अनेक कंपन्या किंमत कमी करून उत्पन्न घटवत आहेत, ज्यामुळे त्यांची लाभक्षमतेवर परिणाम होतो.


*2. दिवाळी विशेषांकावर मंदीचा परिणाम*

विक्रीत घट: वाचनात बदल झाल्यामुळे दिवाळी विशेषांकाच्या विक्रीवर परिणाम होतो. लोकांकडे वेळेची कमी असून ऑनलाइन माध्यमांचे आकर्षण वाढले आहे.

*जाहिरातींची कमी मागणी:* 
मंदीमुळे उद्योग व व्यापारांच्या जाहिरातींवरचा खर्च कमी झाला आहे. हे विशेषांक मुख्यतः जाहिरातीतून उत्पन्न मिळवतात, त्यामुळे त्यावर मोठा परिणाम होतो.

उत्पादन खर्चात वाढ: कागद, छपाई, वाहतूक अशा विविध घटकांमुळे विशेषांक तयार करण्याचा खर्च वाढत आहे.

गुणवत्ता कमी होणे: उत्पन्न घटल्यामुळे काही विशेषांक प्रकाशकांना दर्जा कमी करून साहित्य सादर करावा लागतो.


*3. उपाय योजना*

डिजिटल माध्यमांचा अवलंब: डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी दिवाळी विशेषांकांनी डिजिटल रूपांतरण करणे गरजेचे आहे. ई-बुक्स, वेबपोर्टल, ॲप्स यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर विशेषांक सादर करता येईल.

वाचकांसाठी विशेष योजना: नवे वाचक मिळवण्यासाठी विविध ऑफर देणे फायदेशीर ठरू शकते. उदाहरणार्थ, वार्षिक वर्गणीदारांना सवलत किंवा विशेषांकाचे मोफत वितरण.

सामुदायिक आणि व्यवसायिक क्षेत्राशी सहकार्य: उद्योगांशी सहकार्य करून त्यांच्या गरजा ओळखून विषयांची निवड करता येईल, यामुळे अधिक जाहिराती मिळवता येतील.

*जाहिरातीत विविधता आणणे:*
 विशेषांक प्रकाशकांनी विविध उद्योगांशी संबंधित जाहिराती आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये नवीन व लघु उद्योगांनाही सहभागी करता येईल.

वाचनाची नवीन संधी उपलब्ध करून देणे: प्रत्येक अंकामध्ये काही नवीनता आणि वेगळेपणा असावा, ज्यामुळे वाचकांच्या विशेषांकावरील रुची टिकून राहील.

गुणवत्ता राखण्यासाठी साहित्यिकांचा सन्मान: मंदीमुळे साहित्यिकांना योग्य मानधन देणे जरा कठीण असू शकते, तरी त्यांच्या सन्मानाची काळजी घेणे आवश्यक आहे.


यातून पुढे असा निष्कर्ष की व्यावसायिक मंदी ही आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे, परंतु योग्य उपाययोजना केल्यास दिवाळी विशेषांकासारख्या सर्जनशील उपक्रमांचा दर्जा टिकवून ठेवता येतो. डिजिटल रूपांतरण, वाचकांना विशेष योजना देणे, आणि उद्योग व सर्जनशीलता यांमधील संतुलन साधल्यास, विशेषांक पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू शकतात.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

*शौकतभाई शेख*✍️✅🇮🇳...
संस्थापक / अध्यक्ष 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

Monday, October 28, 2024

सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई शेख आणि फरजाना शेख यांची मोहसीन ए मिल्लत कमेटीच्या उपाध्यक्षपदी निवड

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई शेख आणी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या फरजाना शेख यांची मोहसीन ए मिल्लत कमेटीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यानिमित्ताने श्रीरामपूर येथील समता कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोहसिन ए मिल्लत कमेटीचे अध्यक्ष ॲड. मोहसीन शौकत शेख, पदाधिकारी सर्वश्री सरताज शेख, समदानी गुलाम रब्बानी, शब्बीर (राजु कुरेशी), नदीमताज गुलाम, अमीर मेमन आदि मान्यवर उपस्थित होते.

         ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मोहसिन शेख संचलित मोहसिन ए मिल्लत कमेटी सामाजिक कार्यात अग्रेसर असून कमेटीद्वारे सामाजातील उपेक्षित आणी दुर्लक्षीतांसोबत जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न आणी सेवेसाठी सातत्याने विविध सामाजाभिमुख उपक्रम राबविले जातात. मुश्ताकभाई शेख आणी फरजाना शेख यांचे कमेटीत उत्कृष्ट कामे पाहता त्यांना कमेटीच्या उपाध्यक्षपदाची ही जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे यावेळी ॲड. मोहसिन शेख म्हणाले.
        
         या निवडीबद्दल कमेटीचे वरिष्ठ मार्गदर्शक व कार्याध्यक्ष हाजी इलाहीबक्ष कुरैशी, तसेच हाजी फ़याज़ बागवान, ॲड. हारून बागवान, ॲड. मुमताज बागवान, अफ़ज़ल मेमन, आरिफ कुरैशी, यूनुस कुरैशी, इब्राहिम बागवान, जाकिर शाह, जावेद शेख, कलीम शेख (रॉयल रिश्ता), मोहम्मदशफी अंसारी, शब्बीर शेख आदींनी अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Sunday, October 27, 2024

बालकांच्या तन मनाची मशागत वॉरियर्स फाउंडेशन करत आहे - राजेंद्र चोभे



अहिल्यानगर (अहमदनगर) प्रतिनिधी
बालकांना भारतीय सण, संस्कृतीचे महत्त्व लक्षात येण्यासाठी राबवलेला दीपोत्सव उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून बालकांच्या तन,मनाची मशागत करण्याचे काम वॉरियर्स फाउंडेशन करत आहे, ही अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे यांनी व्यक्त केले. 
      अहिल्यानगर (अहमदनगर) मध्ये वॉरियर्स एज्युकेशन सेंटर अँड प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नर येथे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका शर्मिला गोसावी या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून बजाज चे प्रशिक्षक नंदकुमार काळे हे होते. 
पुढे बोलताना राजेंद्र चोभे म्हणाले की, या परिसरातील छोट्या बालकांसाठी वॉरियर्सच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून लहान मुलांच्या मानसशास्त्राचा विचार करून त्या पद्धतीने विविध सण, उत्सव साजरे करण्यात येतात. अभ्यासासोबतच इतर सांस्कृतिक उपक्रम राबवून महनीय व्यक्तींच्या जयंती, पुण्यतिथी साज-या केल्या जातात, ही बालकांवर संस्कार करण्याची निरंतर प्रक्रिया प्रेरणादायी आहे.
    नंदकुमार काळे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले की, मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांना त्या प्रमाणात, त्या त्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास होऊ शकतो. त्यासाठी वॉरियर्सने पुढाकार घेतल्यास आपण निश्चितच सहकार्य करू,असे आश्वासन त्यांनी दिले. 
संचालिका शर्मिला गोसावी यांनी वॉरियर्सच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. छोट्या बालकांनीही फटाके फोडून दिवाळीचा आनंद व्यक्त केला, छत्रपती शिवरायांच्या राजगडाची प्रतिकृती यावेळी उभारण्यात आली होती. विविध वेषभूषेतील बालकांनी दीपावली दीपोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी श्रुतिका घोडेस्वार,व वर्षा गुजर, संगीता गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, October 21, 2024

टिळकनगर धर्मग्रामात मिशन रविवार साजरा


"मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे - प्रभू येशू ख्रिस्त
 
- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
काल रविवार दि.२० ऑक्टोबर संपूर्ण जगात देऊळमाता मिशन रविवार (मिशन संडे) साजरा करण्यात आला.
"मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे असे प्रभू येशू ख्रिस्तांने सांगितले प्रमाणे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या समर्पित व त्यागमय जीवनातून दुसऱ्यांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. ख्रिस्ताचे हे मिशन कार्य गेली आडीच हजार वर्षापासून अविरत सुरू आहे,अनेक संकटे आली तरी हे कार्य सुरुच आहे, हे मिशन कार्य करीत असतांना अनेक धर्मगुरू,धर्मभगिनी,प्रापचिंक यांनी आपले जीवन ख्रिस्ताठायी समर्पित केले आहे. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे. हे मिशन कार्य यापुढेही अविरत चालू राहावे यासाठी आपण प्रयत्न करूयात असे फादर म्हणाले.
आजच्या मिशन संडेचे औचित्य साधून टिळकनगर धर्मग्रामातील आगाशेनगर मधील संत झेवियर विभाग (झोन) मधील राजेंद्र भोसले सर,पी.एस. निकम सर व सतिश पाटोळे साहेब यांच्या संकल्पना व योगदानातून आगाशेनगर मधील डि पॉल 
संस्था संचलित ' इप्रेसिया सेवा संदन ' वृद्धाश्रम मधील माता भगिनींना फळे (सफरचंद,केळी) व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
 याप्रसंगी टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फा.पीटर डिसोझा,सहाय्यक धर्मगुरू फा.संजय पठारे यांनी विशेष प्रार्थना करून आशिर्वाद दिला. तसेच सर्व वृद्ध महिलांची आस्थाने विचारपूस केली . त्यामुळे या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. याप्रसंगी मायकल जगताप हेही प्रामुख्याने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित "साईगंगा न्यूज पोर्टल" चे लोकार्पण

- अजीजभाई शेख -  राहाता -/ वार्ता -
स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या माध्यमातून, संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील पत्रकार रमेश भागवत कापकर संपादित "साई गंगा न्यूज पोर्टल" चे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या शुभहस्ते काल रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीरामपूर येथील समता कार्यालयात अनावरण तथा लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ॲड.मोहसिन शेख, पत्रकार अफजल मेमन, हेमंत शेजवळ,कलिम शेख, इब्राहिम बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.

           पत्रकार रमेश भागवत कापकर हे साईगंगा या साप्ताहिकाचे संपादक असून स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संगमनेर तालुका समन्वयक आहेत, आपल्या साप्ताहिक साई गंगा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या संगमनेर तालुक्यासह त्यांनी राहाता, कोपरगांव,राहूरी,सिन्नर, येवला आदी तालुक्यात आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे तथा विविध विषयांकित विशेषांकाद्वारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, राजकीय , शासकीय, प्रशासकीय यासोबतच धार्मिक आणी पर्यटन, तथा वृक्ष आणी जल संवर्धन, अशा जनहिताच्या विषयांना सातत्याने आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.

          या वर्तमानपत्राने एक पाऊल पुढे टाकत इलेक्ट्रॉनिक मिडियाकडे देखील आगेकूच करत स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित "साई गंगा न्यूज पोर्टल" या नावाने न्यूज पोर्टल सुरु केले आहे. यात देखील विविध विषयांकीत दैनंदिन ताज्या घडामोडींच्या बातम्या असणार आहे.
या साई गंगा या न्यूज पोर्टलसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, कायदेविषयक सल्लागार ॲड.मोहसिन एस.शेख, कार्यकारी संपादक अमोल म्हस्कुले, सहसंपादक संपतराव मैड,उप संपादक हेमंत शेजवळ, मानद संपादक पंढरीनाथ खालकर, व्यवस्थापक - सतिश चिंतामणी तथा संगमनेर तालुक्यासह परिसरातील इतरही तालुक्यातील प्रतिनिधी/ वार्ताहर आदि कामे संभाळत आहेत.

*साई गंगा न्यूज पोर्टल सुरु केल्याबद्दल संपादक रमेश कापकर यांचा स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्यावतीने शौकतभाई शेख यांच्या हस्ते समता कार्यालयात सत्कार करण्यात येवून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या*

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Sunday, October 20, 2024

मौलाना आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले शाळेत स्वातंत्रता सेनानी सरसय्यद अहमद खान यांची जयंती साजरी


सरसय्यद अहमदखान यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला - डॉ.प्रा.अब्दुस सलाम

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पारंपारिक मदरसा प्रणित शिक्षण व्यवस्था आणि ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात आलेली चर्चप्रणित शिक्षण व्यवस्था यातील संघर्षात पारंपारिक मदरसाप्रणित शिक्षण व्यवस्थेला आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचे महत्वपूर्ण कार्य सर सय्यद अहमदखान यांनी पार पाडले. म्हणूनच डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. जाकीर हुसेन सारखे राष्ट्रपती याच मदरसा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होऊ शकले. त्यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला. त्यांनी मध्ययुगीन भारतातील चाळीसपेक्षा जास्त अरबी, फारशी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे केली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले. 
मुकुंदनगर येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत स्वातंत्र्य सेनानी सर सय्यद अहेमद खान यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर सय्यद अहमद खान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मख़दुम एज्युकेशन ऍंड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, प्राचार्या फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, असलम पटेल, फरीदा जहागिरदार, सोलापूरे नाहीद, नाजेमा शेख, खतीजा खान, नफीस अंजुम, सदफ शेख, शेख शाहीन, शेख फरजाना, शेख सुलताना, शेख मुमताज, शेख यास्मिन, शेख हिना आदि उपस्थित होते.
प्रास्तविक करतांना प्राचार्या फरहाना सय्यद यांनी सांगितले की, आज आपण स्वत:चे वाढदिवस थाटामाटात साजरे करत असतो, पण ज्यामुळे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात फार उदासिनता जाणवते, ही समाजाचे दुर्भाग्य आहे, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलायका व सिदरा यांनी केले, तर आभार फरिदा जहागिरदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौलाना आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*💐✅🇮🇳...
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


धामोरी - कोपरगाव रस्त्याची दयनीय अवस्था बांधकाम खात्याने लक्ष देण्याची नागरीकांची मागणी


धामोरी - कोपरगाव रस्त्याची दयनीय अवस्था  बांधकाम खात्याने लक्ष देण्याची नागरीकांची मागणी

- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
कोपरगाव तालुक्यातील धामोरी, मोर्वीस, चासनळी, मायगाव देवी, सांगवी भुसार या गावांतील नागरिकांचे दररोज तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच कोपरगांव ला दैनंदिन कामासाठी जावे - यावे लागले. परंतु सांगावी भुसार, काळ धोंडो ते रवंदा गाढे वस्ती दरम्यान रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे छोटेमोठे अपघात ही होतात. अन् त्यातच रस्त्याच्या कडेला वेडीभाभळींची साम्राज्य 
असल्याने अपघातास निमंत्रण दिले जात आहेत, तरी लवकरात लवकर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेवुन या मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था बघून ह्या मार्गावरील रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी धामोरी, मोर्वीस,चास नळी,मायगाव देवी,सांगवी भुसार येथील प्रवाशी तथा नागरिकांकडून केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------



Saturday, October 19, 2024

आली दीपावली...प्रेम, सुख सावली


दिवाळी सण म्हणजे सर्वांचा आवडता व आनंदाचा सण. दिव्यांचा लखलखाट, फटाक्यांची आतषबाजी, भरगच्च रांगोळ्या, तिखट - गोड फराळ आणि नव-नविन कपडे. वा sss दिवाळीची रंगतच न्यारी. सर्व कुटुंबीय एकत्र येण्याचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी.
          दिवाळी सणाची तयारी २५-२० दिवस अगोदरच सुरू होते. नवीन वस्तू खरेदीबाबतच्या ऑफर्स, सेल अशा अनेक जाहिराती वर्तमान पत्रात वाचायला मिळतात. तसेच हेही वाचतो किंवा मोबाईल वर पाहतो की, ज्यांना खरी गरज आहे - अन्न, वस्त्र, निवारा व मदतीची, अशा लोकांकडूनच पणत्या, आकाशकंदील, रांगोळी खरेदी करावी. पण, प्रत्यक्षात असे किती होते? किंवा कोणी घेते का? खूप कमी ठिकाणी असे दृश्य पाहावयास मिळते. काहीवेळा असेही पाहावयास मिळते की, गावाकडील काही लोक हे शहरामध्ये जाऊन दिवाळीची खरेदी करतात. आणि आवर्जून सांगतात की, ५० रु. जास्त गेले पण, काय भारी आहे. असलं इथं गावात नाही मिळत म्हणून यावेळी शहरातून आणलंय खास दिवाळीला.
           तसेच, गावाकडील काही मंडळी पणत्या, आकाशकंदील, रांगोळी विकण्यास शहरामध्ये जातात. परंतु; पाहिजे तितका नफा त्यांना मिळत नाही. कारण; शहरातील काही दुकानदार महागड्या शोभेच्या वस्तुंनी गिर्हाईक आकर्षित करतात. फॅन्सी व लेटेस्ट या नावाखाली बरयाचदा गिर्हाईकास भूरळ पाडली जाते. आणि बरेचजण पैशाचा विचार न करता खरेदी करत असतात. उंची - महागडी कपडे खरेदी करतात. प्रदूषण पसरविणारे फटाके मोठ्या प्रमाणात वाजवतात. लहान बालके. वृध्द, आजारी यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे प्रदुषण वाढ होऊन अनेकजण आजारीही पडतात.
            फराळाच्या बाबतीतही तसेच. काही घरांमध्ये तर असे पाहावयास मिळते की, भरमसाठ फराळाचे पदार्थ बनविले जातात, अगदी तेलकट - तुपट कसलाही विचार न करता. का तर म्हणे, मामाला, आत्याला डबा द्यायचाय. मित्राला द्यायचंय, मैत्रिणीला द्यायचंय. आणि घरी आलेले इतरांचे डबे काहीवेळा तसेच राहतात. फक्त आवडीचाच पदार्थ खाल्ला जातो. ८-८, १०-१० दिवस काही डबे उघडले जात नाहीत. शेवटी तो फराळ वाया जातो. काहीवेळा असेही आढळते की, त्यांचे पदार्थ चांगल्या तेलातले नसतात, त्याला काही टेस्टच नसते. नको खायला. फक्त आपलेच खा. भरमसाठ पदार्थ करण्याच्या प्रकाराने काहींना विशेषतः लहान बालके व महिलांमध्ये - पित्त, डोके दुखणे, पोट दुखणं यांसारख्या समस्या आढळतात.
        आपणाला जर खरंच समाधानाने व आनंदाने दिवाळी सण साजरा करावयाचा असेल तर साधे दिवे खरेदी करा, साध्या साजेलशा पणत्या, आकाशकंदील गरजू लोकांकडूनच खरेदी करा. काही गरजू, अपंग लोक यांसारख्या वस्तू विक्रीस ठेवतात, तेंव्हा त्यांच्याकडून जरूर घ्या. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल, शिवाय त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा भागविता येतील. आणि त्यातून मिळणारा आनंद हा लाखमोलाचा असणार आहे. आपणाला त्यांच्या गरजा प्रत्यक्षपणे भागविता येत नसतील तर निदान आपण हे तरी करू शकतो.
         कपडे खरेदी करतानाही पैशांचा योग्य विचार करूनच खरेदी करावेत. त्याच्याकडे खूप भारी आहेत म्हणून मलापण तसेच हवे आहे. अशी बरोबरी न करता विचार करूनच कोणतीही खरेदी करावी. दिवाळीला चांगले नवीन कपडे घेतले म्हणून पहिले कपडे ठेवणीत ठेवू नका. येत नसतील पण, जर घालण्याजोगे असतील तर एखाद्या गरजूस ते कपडे भेट द्यावेत. सोबत थोडा फराळही द्यावा.
                  फटाक्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, खूप मोठ्या आवाजाचे, खूप धूर करणारे फटाके वाजवू नका. काळजीपूर्वक हाताळता येतील असेच मोजके फटाके वाजवा. फटाके वेळी लहान मुलांना एकटे सोडू नका.आणि हो...दिवाळी बरोबर ज्ञान दीपावली साजरी करूयात .मुलांना छोटी छोटी ..पण चांगली संस्कार करणारी जगातली पुस्तके भेट देऊयात..फटाके पेक्षा आपण ग्रंथ संस्कृती घरात निर्माण करूया..फटाक्यांचा प्रकाश तात्पुरता असेल..आणि त्यातून कदाचित फक्त धूर मिळेल पण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मुलांना सुट्टीत चांगले खेळ खेळायला देणे हेच आवश्यक वाटते.. दर वर्षी दिवाळीत नवीन कपडे घेतो. तशी ज्ञान देणारी पुस्तके खरेदी केली तर मुलांचे व्यक्तिमत्व आणि प्रभावी होईल.. हलकी फुलकी गोष्टीची पुस्तके ,सुट्टीत निसर्ग सान्निध्य,आपल्या माणसांचे प्रेम मुलांना मिळायला हवे..सर्जनशील होण्याचा आनंद वेगळाच असेल. नोकरी,संसाराच्या व्यापातून मिळणारे दिवाळीचे काही दिवस मन मुक्त होण्याचा आणि सर्वांना आनंद देण्याचे असायला हवेत. 
                दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण, सासुरवाशीण, पै- पाहूणे एकत्र जमलेले असतात, तेंव्हा कोणतीही तेढ मनात न आणता, रुसवे - फुगवे सोडून, आनंदाने सर्वांनी मिळून सण साजरा करा. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित तर होईलच पण; खर्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळेल. आणि म्हणूनच तर म्हणतात ना - 
" सण दसरा,दीपावली मोठा
नाही आनंदा तोटा .".

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ.मीनल अमोल उनउने
सातारा - ९१३०४७०३९७
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

जिल्ह्यात समाजवादी पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार - जोएफ जमादार


जिल्ह्यात समाजवादी पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार - जोएफ जमादार

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टी च्या जिल्हा कार्यालयात नुकतीच जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी कार्यकर्ता - पदाधिकारी यांची मिटिंग संपन्न झाली, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेत समाजवादी पार्टी चे उमेदवार रिंगणात उतरविण्याविषयी तथा अनेक विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सध्या देश आणि राज्यातील राजकीय वातावरण पाहता कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल याचे सांगता येणे मोठे दुरापास्त झाले आहे. सकाळी एका पक्षात असणारा नेता सायंकाळी दुस-या पक्षात प्रवेश करत आहे, सकाळी जो विरोधकांच्या विषयी विरोधात बोलत होता, सायंकाळी तोच विरोधकांच्या समुहात सामील होत मांडीला मांडी लावून त्यांचे गुणगाण गात आहे, हे सर्व पाहून मतदार राजामध्ये प्रचंड प्रमाणात संताप आणि चीड यासोबतच संभ्रमणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सर्व जाती धर्माला बरोबर घेवून चालणारा आणी सर्वांना समान न्याय देणारा असा उमेदवार, असा पक्ष समस्त जागरुक मतदारांना हवा आहे, आणी तो पक्ष केवळ समाजवादी पार्टी हा पक्ष
असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अखिलेशजी यादव, प्रदेशाध्यक्ष आ. अबु असिम आझमी यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

समाजवादी पार्टी हा पक्ष सर्व जाती धर्मांना बरोबर घेवून चालतो, सर्वांना समान न्याय देण्याची भुमिका ठेवतो, उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवित राहतो, करीता समाजवादी पक्षाने निवडणूक लढवावी अशी समाजवादी पार्टी कार्यकर्ता आणी जिल्ह्यातील समस्त मतदारराजांकडून वारंवार सातत्याने मागणी होत असल्याने जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शहरातील समाजवादी पार्टी कार्यालयात मिटिंग घेण्यात आली, त्यात निवडणूक विषयांसह अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने संगमनेर,राहुरी,राहाता (शिर्डी), या विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदार संघातून जोएफ जमादार यांनी उमेदवारी करावी असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रह धरल्याने सदरील ठिकाणी जोएफ जमादार हे स्वतः उमेदवार असणार असल्याचे सांगितले गेले.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते योग्यतेचे असल्याने यातील योग्य उमेदवारास समाजवादी पार्टी निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचे सांगण्यात आले. समस्त नागरीकांच्या मुलभूत गरजा व त्यांचे हक्क, अधिकार याविषयी समाजवादी पार्टी नेहमीच सातत्याने आवाज उठवित असल्याने सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील समाजवादी पार्टी चे कामे देखील पुर्वीपासून मोठ्या प्रमाणात असल्याने विधानसभा निवडणूकीत हमखास यश मिळणार असल्याचे देखील यावेळी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.

या वेळी आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण, अब्दुल सैय्यद, सुल्ताना शाह, राजू शेख, मतीन शेख, अल्तमश शेख, गुफ्फरन जमादार, जैद शेख,संजय वाघ,अनवर तांबोळी, इमरान मंसूरी, अमजद शेख, सलीम शेख, शहेजाद शेख , कलीम शेख, रियाज सैय्यद, उसामा शेख, अली शेख, शोएब शेख, साहिल शेख, फरहान शेख, तौसीन मंसूरी, रफीक शेख, मुबाशहीर पठाण, अरबाज़ क़ुरैशी,अमन इनामदार, आदि मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*यामध्ये प्रामुख्याने संगमनेर,राहुरी,राहाता (शिर्डी), या विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदार संघातून जोएफ जमादार यांनी उमेदवारी करावी असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रह धरल्याने सदरील ठिकाणी जोएफ जमादार हे स्वतः उमेदवार असणार असल्याचे सांगितले गेले.*
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Friday, October 18, 2024

कोणाला निम्मेच तिकीट, तर कोणाला मोफत प्रवास आहे




एस टी बस ची अत्यंत दयनीय
अवस्था,त्याकडे कोण पाहे

एस टी बस चे तुटके बाकमुळे कोपरगांव तालुक्याच्या टाळकी,रवंदा, सांगवी भुसार,धामोरी चासनळी या मार्गावरील प्रवाशांचे होत आहे प्रचंड प्रमाणात हाल

- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत कोपरगांव आगारातील टाळकी, रवंदा, सांगवी भुसार,धामोरी चास नळी या मार्गावरील एस टी बस मधील आसन व्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था झालेली असल्याचे बघावयास मिळते आहे.
सदरील मार्गावर एस टी बस प्रवाशांनी फुल्ल भरलेली असता बस मधील काही आसन व्यवस्थेचे बाक अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे. या तुटलेल्या आसन व्यवस्थेची दयनीय अवस्थेमुळे काही प्रवाशांना उभे राहुन प्रवास करणे भाग पडत आहे.
बसमध्ये उभे राहुन प्रवास करताना तोल जावू नये म्हणून तुटलेल्या बाक चे सहारे घ्यायचे ? की, तुटलेले बाक बसमध्ये इतरत्र मागे पुढे जावू नये म्हणून त्यांना धरुन ठेवायचे ? असा संभ्रम निर्माण होवून प्रवाशांची मोठी पंचायत निर्माण होत आहे.
शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेद्वारे एस टी बस मध्ये कोणाला निम्मेच तिकीट तर कोणास मोफत प्रवास आहे,मात्र एस टी बस ची झालेली दुरवस्था याकडे कोण पाहे असे म्हण्याची वेळ प्रवाशांवर येवून ठेपली आहे.
आणि आतातर दीपावली सण येत असल्याने एस टी बस मध्ये प्रचंड गर्दी ही होणारच आहे, तेव्हा या दयनीय आसन व्यवस्थेची सुधारणा होईल तरी केव्हा ? याकडे देखील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. तरी संबधित महाराष्ट्र राज्य परिवहन ( एस. टी.) महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणी कोपरगांव आगारातील प्रमुख अधिकारी यांनी सदरील बाबी त्वरित दखल घेवुन या दयनीय आसन व्यवस्थेची सुधारणा करावी अशी मागणी रवंदा,सांगवी भुसार,धामोरी चास नळी येथील प्रवाशांकडुन केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच ! - प्रा. डॉ. सुभाष वाघमारे


उंब्रज - सातारा -/ प्रतिनिधी -
‘ बहुश्रुत वाचन केल्यानेच माणूस ज्ञानी होत असतो. आपल्या प्रत्येक घरात जीवनाला विविध प्रकारचे ज्ञान देणारे ग्रंथ असायला हवेत. घर हे सदाचारी व ज्ञानसमृद्ध व्हायचे असेल तर वाचन संस्कृती घरात रुजवली पाहिजे. वाचन व्यासंगानेच जगात विविध क्षेत्रातील विविध विद्वान, संशोधक तयार झाले. त्यांच्या ज्ञानाने माणसाला यथार्थ जग समजू लागले. न्याय व अन्याय कळू लागला. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा गांधी इत्यादींनी देखील खूप वाचन करून देशासाठी योगदान दिले आहे. जगात आपल्या देशाचा दर्जा उंचावला आहे. वाचनाने व्यक्तिमत्व बहुश्रुत बनते, वाचन हे जीवनाला मार्गदर्शन करीत असते. वाचन सतत केल्याने माणूस विवेकी होत जातो.आपल्या घरात कितीही सोनेनाणे असले तरी ज्ञानासाठी ग्रंथाचे कपाट असले तरच मनाची व घराची श्रीमंती वाढते असे मत त्यांनी व्यक्त केले. देशात ज्ञानी पिढी घडविण्यासाठी घराघरात ग्रंथ हवेतच. ग्रंथ वारसा असलेली सर्जनशील माणसे आपण तयार केली पाहिजेत. अनेकांना लिहिते , वाचते केले पाहिजे असे विचार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘अभिजात मराठी भाषा व वाचन संस्कृती’ या विषयावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कांबळे होते. 
  वाचन करण्याविषयी आवाहन करताना ते पुढे म्हणाले की‘ देह जगविण्यासाठी जशी अन्नाची गरज असते तसे मनाचे पोषण होण्यासाठी ग्रंथाची व अनुभवाची गरज असते. ग्रंथ आपल्याशी हितगुज करून सुख दुःख सांगत असतात. आपल्याला जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करीत असतात. व्याकूळ झालेल्या मनाला धीर देतात. तर दुःखी मनाला आधार देतात. ग्रंथ मित्र असतात तसे आपले सेवक असतात. ग्रंथ कधी आदेश देत असतात तर कधी सदुपदेश करीत असतात. ग्रंथ निष्ठावंत असतात. ते आपल्याला अनेक रस प्यायला देतात.आपल्या बालपणात ,तारुण्यात, वृद्धापकाळात देखील आपले सोबती असतात. आपली प्रिय माणसे आपल्याला सोडून गेली तरीही ग्रंथ धीराने राहण्याची हिम्मत देतात आणि शांती आणि आनंदाच्या वाटा सांगत राहतात.आज मात्र ग्रंथ सोडून माणसे मोबाईलमध्ये अडकली आहेत. एकट्याने पुस्तक वाचून जग समजून घेण्याचा आनंद खूप मोठा असतो,म्हणून प्रत्येकाने नियमित दररोज एक तास तरी अवांतर वाचन केले पाहिजे. माणसे मटण खाण्यासाठी भरपूर खर्च करतात पण वर्तमान घडामोडी जाणून घेण्यासाठी वर्तमानपत्र विकत घेत नाहीत अद्ययावत माहितीसाठी नियमित वर्तमानपत्र वाचले पाहिजे.खरोखर अवांतर वाचनाने माणसाचे दृष्टीकोन उदात्त होतात.भाषा हे मन भावना व विचाराचे स्पंदन आहे .मुळात कोणत्याही भाषेची किंमत कमी जास्त नसते. प्रत्येक भाषेला तिची स्वतःची किंमत असते. व्यवहारात,व्यापारात,ज्ञान व्यवहारात त्या भाषेचा वापर जास्त होत गेला तर तिची प्रगती होते. मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने जगभर नाव कमवेल आणि भाषेशी निष्ठा ठेवून तिचा विस्तार करेल तर मराठीचा वापर वाढत जाईल. पण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होत आहे.इतर भाषेतील ग्रंथ मराठी भाषेत भाषांतरीत झाल्याने जगातले विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळत आहे. जगातील विविध माणसांची संस्कृती,अनुभव काय आहेत हे जाणून घेण्याची जिज्ञासा आता वाढलेली आहे. मराठीतील ग्रंथ इतर भाषेत अनुवादित होत आहेत त्यामुळे या पुढच्या काळात मराठीच्या वृद्धीबरोबर जगातल्या अनेकविध भाषा शिकल्या पाहिजेत. 
    अभिजात भाषा निवडीच्या पद्धतीविषयी सविस्तर माहिती देऊन ते पुढे म्हणाले की, ‘ पूर्वी तमिळ,संस्कृत,कन्नड ,तेलगु,मल्ल्याळम,ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला . अलीकडे ३ ऑक्टोबरला मराठी , पाली, प्राकृत ,असामी,बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. यासाठी रंगनाथ पठारे समितीने जे परिश्रम घेतले ,आणि अनेक साहित्यिक व मराठी भाषिकांनी यासाठी परिश्रम घेतले त्यांचे कृतज्ञ आपण राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
         अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.संजय कांबळे म्हणाले की ‘ विद्यार्थ्यांनी कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक वाचले पाहिजे . आपल्या ग्रंथालयात, वैचारिक, ललित चरित्रात्मक अशी अनेक चांगली पुस्तके असून विद्यार्थ्यांनी ती मनापासून वाचली पाहिजेत.जसे शिक्षक विद्यार्थ्यांना मूल्य शिकवतात तसे ग्रंथ न रागावता आपल्याला जागृत करतात. मूल्य विवेक शिकवतात. कार्य संस्कृती जशी महत्वाची तशी ज्ञानासाठी वाचन संस्कृती महाविद्यालयात तयार झाली पाहिजे. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी वाचन ,लेखन या बाबतीत सातत्य ठेवले असून विचारपूर्वक कृती करून ते समाजाचे हित करणारे ते मानवतावादी लेखक असल्याचे त्यांनी सांगितले.लंडन आणि मॉरिशस या देशांना भेटी देऊन त्यांनी तेथील संस्कृती व शिक्षणक्षेत्राची माहिती जाणून घेतल्याबद्दल त्यांनी प्रा.वाघमारे यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात ग्रंथालय विभागाने ‘चांगले वाचक’ म्हणून मराठीचे प्राध्यापक प्रा.घनश्याम गिरी यांची निवड केली. व त्यांचा या कार्यक्रमात ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल प्रा.विकास बर्गे यांनी केले.तर आभार प्रा. सौ.सुवर्णा मूळगांवकर यांनी मानले या कार्यक्रमास प्रा.डॉ.संभाजी गावडे, प्रा. डॉ.अनिल उबाळे,प्रा.डॉ. वंदना मोहिते, प्रा.आर.एस. जाधव,प्रा.प्राजक्ता पाटणे, प्रा.धनाजी सावंत,प्रा. कुलकर्णी, श्रीमती नीता मोहिते , महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते. 

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस 
श्रीरामपूर,९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने प्रा.डॉ.सुभाष वाघमारे युवकांना संदेश दिला.‘ वाचन संस्कृती रुजण्यासाठी एकमेकाला ग्रंथ भेट द्यायला हवेत. वाढदिवशी ज्ञान किती वाढले,माणसे किती जोडली. स्व हिताचे व समाज हिताचे काम किती केले याचा विचार करायला हवा. युवकांनी कोणत्याही विध्वंसक कार्यात सहभागी न होता घराचे व समाजाचे चांगले व्हावे अशाच कामात सहभागी व्हावे. विषमता असलेल्या समाजात समता निर्माण करण्यासाठी बंधुभाव जोपासला पाहिजे आणि माणसे तोडण्याऐवजी माणसे जोडण्याचे काम केले पाहिजे. जगात अनेक प्रकारच्या श्रद्धा निर्माण झाल्या असल्यातरी आपल्याला माणसातच जीवन जगायचे आहे . त्यामुळे स्वतःस व इतरास सुखशांती मिळावी म्हणून आपण कर्म करीत रहायला हवे, म्हणून माणसात रहा. आळशी न राहता उत्साही रहा, कष्टाळू व प्रयत्नवादी व्हा. स्वावलंबी व्हा. जीवनात सदाचारी व्हा, निर्व्यसनी व्हा ,शीलवान व्हा,समतावादी व्हा.मैत्री भावना प्रसार करा. जीवन पुन्हा नाही त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून वाईट कामे न करता चांगलीच कामे करा असे ते म्हणाले. त्यांनी आपले भाषण संवाद पद्धतीने केल्याने विद्यार्थी प्रश्नोत्तरात सहभागी होत समरस झाले होते. या वेळी ग्रंथपाल प्रा. विकास बर्गे यांनी मी पुस्तक बोलतोय या आशयाची कविता सादर केली*
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

अग्राहाचे निमंत्रण साईगंगा न्यूज पोर्टल अनावरण सोहळा



मा.महोदय,महोदया यांसी स.न.वि.वि.
स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित,संपादक संघ. ओआरजी (sampadak sangh.org) च्या माध्यमातून,मिरपूर लोहारे ता.संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार *रमेश भागवत कापकर* संपादित *साई गंगा न्यूज पोर्टल* चे स्वाभिमानी संपादक सेवा संघ संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीरामपूर येथील समता कार्यालयात सकाळी ठिक ११.०० वाजता अनावरण आणी लोकार्पण होणार आहे.तरी या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

=================================
-----------------------------------------------
आपला स्नेहांकित
रमेश भागवत कापकर 
संपादक: साप्ता.साईगंगा
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
(समन्वयक: संगमनेर तालुका)
-----------------------------------------------
=================================

Thursday, October 17, 2024

स्व.पत्रकार लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा आधार *पत्रकार संघाच्यावतीने मदतीचा धनादेश**किराणा व शालेय साहित्याचे वितरण

- ठाणे - प्रतिनिधी -/ वार्ता -
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले पत्रकार स्वर्गीय लक्ष्मण पवार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या त्रिव झटक्याने दुर्दैवी निधन झाले. पवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या राहत्या घराचे वर्णन केल्यास, ते पत्र्याच्या घरात राहत होते, हे त्यांच्या कठीण परिस्थितीचे प्रतिक होते.

लक्ष्मण पवार हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य नसतानाही, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांना समजतात त्यांनी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी चे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांना त्यांच्या परिवाराची भेट घेऊन आर्थिक मदत करण्याचे सांगितले. यानंतर, त्यांनी संघाच्या वतीने पवार यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. विश्वासराव आरोटे आणि पत्रकार संघाचे काही पदाधिकारी पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी डोंबिवली येथे जाऊन पवार कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले आणि त्यांना मदतीचा धनादेश व किराणा साहित्य आणि मुलांच्या शालेय साहित्याचे वाटप केले. 
या प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, पत्रकार विष्णू बुरे आदि उपस्थित होते.
कै. लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला असून पत्रकार संघाच्या या कृतीने सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण देखील घालून दिले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

सामाजिक एकता और समरसता के प्रतीक हैं सार्वजनिक उत्सव ऐक्यं बलं समाजस्य तद्भावे सदुर्बल तस्मात् ऐक्यं प्रशंसन्ति दृष्टं राष्ट्र हितैशिन


हमारा भारत अपनी सांस्कृतिक धरोहर के लिए पूरे विश्व में अपनी अलग पहचान रखता है हमारी संस्कृति हमें अपनी जड़ों से जोड़कर रखती है जिस कारण से हम अपने सभी तीज-त्यौहार को हर्ष और उल्लास के साथ मनाते हैं,और यही तीज-त्यौहार हमें आनंद के साथ ही सकारात्मक सोच बनाए रखने में मदद करते हैं। हर भारतीय परिवार में पीढ़ीयों से चली आ रही परंपरा के अनुरूप अपने धार्मिक उत्सव को मनाया जाता है जो आने वाली पीढ़ियों को भी अपने रीति-रिवाजो से परिचय करवाती साथ ही उस रीति रिवाज को क्यों और किस वजह से मनाया जाता है उनकी बारीकियां भी सिखाती है पीढ़ी दर पीढ़ी चलने वाली इसी परंपरा के कारण ही हमारी सभ्यता आज भी उसी रूप में कायम है जिसकी कल्पना हमारे पूर्वजों ने की थी सनातन धर्म की एक खूबसूरती यह भी है कि वहां समय के अनुरूप खुद को ढाल लेता है या नए शब्दों में कहा जाए तो अपडेट होता रहा है। सार्वजनिक उत्सवों में गणेश उत्सव,दुर्गा उत्सव, होली उत्सव और भी इसी प्रकार के कई उत्सव है जो हमारे समाज को एक दूसरे के साथ घुलने-मिलने का मौका देते हैं और उनमें आपसी भाईचारा और प्रेम बनाकर रखते हैं हर त्यौहार को हम लोग एक नए उत्साह के साथ मना कर अपने जीवन में सकारात्मक ऊर्जा को बढ़ाते हैं जो हमें हर परिस्थिति से लड़ने की शक्ति देता है और हमारा मनोबल बनाए रखता है। सार्वजनिक उत्सव के अनेक महत्व हैं यही उत्सव हमारी सामाजिक एकता को बनाए रखने में अति महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं सामाजिक समरसता के लिए भी इन उत्सवों का अपना एक विशेष योगदान है इन उत्सवों में ही हम जाति ऊंच-नीच अमीरी गरीबी छोटा बड़ा हर बात को पीछे छोड़कर सब एक दूसरे के साथ घुल-मिल कर उत्सव को मनाकर सामाजिक एकता की मजबूत कड़ी को जोड़े रखते हैं। समरसता के लिए भी सार्वजनिक उत्सव अपना विशेष महत्व रखता है किसी भी उत्सव के लिए लोगों का एक दूसरे के साथ घुल-मिल कर रहना आवश्यक है, भंडारे के रूप में एक साथ बैठकर भोजन करना इन सारी बातों से ही समरसता फलती और फूलती है जो हमारे समाज और देश के लिए जरूरी है और सभी में आपसी प्रेम की भावना को जागृत रखती, आज के बदलते आधुनिक युग में सार्वजनिक उत्सवों का महत्व और भी महत्वपूर्ण हो जाता है क्योंकि आज भागती-दौड़ती जिंदगी में हम कई ऐसी महत्वपूर्ण भावनाओं से दूर होते जा रहे हैं जो परिवार और समाज के लिए बहुत जरूरी है, वर्तमान समय में एकल परिवार की संख्या बढ़ती जा रही है जिस वजह से कुछ परिवारों में अपनी संस्कृति के प्रति लापरवाही भी बढ़ती जा रही है जिस कारण से आने वाली पीढ़ियों को अपने संस्कारों की जानकारियों का अभाव होता है और इन अभाव का ही कुछ अधर्मी फायदा उठाकर उन्हें गलत रास्ते पर ले जा रहे हैं, उनकी इन कोशिशों को नाकाम करने में भी सार्वजनिक उत्सवों की अपनी एक महत्वपूर्ण भूमिका है हर क्षेत्र में अपने समर्थ अनुसार सार्वजनिक उत्सव की व्यवस्था की जाती है जिसमें उसे क्षेत्र के लगभग सारे लोग सम्मिलित होकर उस उत्सव का आनंद तो लेते ही हैं साथ ही अपनी परंपराओं से भी जुड़े रहते हैं और सभी का एक दूसरे से संपर्क बने रहता है जो उन्हें सुख दुख में साथ देने के लिए भी प्रेरित करता हैं। सार्वजनिक उत्सवों के अनेकों फायदे हैं वर्तमान में युवा पीढ़ी में सार्वजनिक उत्सवों के द्वारा ही संगठित होकर काम करने की भावना को जगाने में भी सार्वजनिक उत्सव अपनी महत्वपूर्ण भूमिका अदा करते हैं। 
संगठित होना - युवाओं द्वारा छोटी-छोटी टोली बनाकर सार्वजनिक उत्सव के लिए घर-घर जाकर चंदा इकट्ठा कर उस धन संग्रह करते हैं, जिससे सभी लोगों में हमारा भी योगदान है यह भावना बनी रहती है। 
प्रबंधन - यूवा टोली सामूहिक रूप से आयोजन के प्रबंध के लिए योजना बनाकर उसे क्रियान्वित करने की रूपरेखा बनाते हैं जो उनमें कार्य को योजनावत तरीके से करने की कुशलता का विकास करती है। 
संस्कृति से जुड़ाव - सार्वजनिक उत्सव के द्वारा ही हम अपने रीति-रिवाजों और संस्कृति को दोहराते रहते हैं जिनसे आने वाली पीढ़ियों का निरंतर अभ्यास होता रहता है और उनके प्रति उनका विश्वास बढ़ता है।
सांस्कृतिक कार्यक्रम - छोटी-छोटी झांकियों पर नन्हे मुन्ने बच्चों द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम में भाग लेकर अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया जाता हैं जिससे उनकी प्रतिभा का निखार होता है और आत्मविश्वास की बढ़ोत्तरी होती है,
भंडारा - ऐसे अनेक अवसर आते हैं जिसमे भंडारे का आयोजन किया जाता है साथ में भोजन करने से लोगों में एक दूसरे के प्रति प्रेम भाव बढ़ता है और गरीब अमीर जात-पात ऊंच-नीच की भावनाओं को दर किनार कर समरसता की भावना जागृत रहती है। 
लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने 1893 में गणेश उत्सव की शुरुआत की थी तिलक जी का मकसद सभी लोगों को एक मंच पर लाकर सामाजिक एकता को बढ़ाना था, धार्मिक आयोजन के द्वारा राष्ट्रीयता की भावना को जागृत करना था। भारत वर्तमान समय में कुछ राजनीतिक लोगों ने इन आयोजन का राजनीतिक लाभ के लिए ज्यादा उपयोग किया जाता है और कई जगह तो अपनी वर्चस्व की लड़ाई के रूप में भी इसे प्रसारित किया जाता है जो इन आयोजन की मूल भावना को भारी नुकसान पहुंचा कर एक दूसरे के प्रति बैर रखना की भावना ज्यादा बनती जा रही है इन लोगों से सावधान रहकर हमें अपनी मूल भावनाओं पर रहकर सार्वजनिक उत्सव को इस भावना के साथ मनाना चाहिए जिस उद्देश्य के लिए इन उत्सवों का उदय हुआ था, कई जगह देखा गया है कि सार्वजनिक उत्सव अपने महत्व को भूल कर भव्यता पर ज्यादा ध्यान देते हैं और इन उत्सवों का व्यापारिक दृष्टिकोण से ज्यादा लाभ कमाना ही उनका मकसद बन गया है। पर हमें सावधानी के साथ सार्वजनिक उत्सव की मूल भावनाओं को बनाए रखना है जो हमारी अखंडता के लिए अति आवश्यक है राष्ट्रीय प्रेम सामाजिक एकता समरसता इन उत्सवों की मूल भावना रही है। भारत को एक सूत्र में बांधने का काम भी इन सार्वजनिक उत्सव के द्वारा ही किया जा सकता है जो हमें राष्ट्रीयता की भावना को जागृत करके राष्ट्र के प्रति अपने कर्तव्यों का निर्वहन करने की भी प्रेरणा देते हैं।

=================================
-----------------------------------------------
*लेखक*✍️✅🇮🇳...
*राजकुमार बरूआ* 
भोपाल - मध्य प्रदेश
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
मध्य प्रदेश प्रभारी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग*💐✅🇮🇳...
चंद्रकांत सी.पूजारी
महुवा सुरत गुजरात 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
गुजरात प्रदेश प्रभारी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 09561174111
-----------------------------------------------
=================================




विद्यानिकेतनच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेत जिंकली अनेकांची मने


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,स्टेट बोर्डमध्ये नुकतीच वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेत इ.पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी स्पर्धेचे खास आकर्षण ठरलेल्या यशप्राप्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रेक्षक- मान्यवरांची मने जिंकली. 
स्पर्धेतील विद्यार्थ्यांमधून अनुक्रमे इ.पहिली (लोटस) - विहान सोनवणे, विहान धुवावीया,स्वरुप पटारे
इ.पहिली (रोझ) - काव्या परदेशी, नबीहा सय्यद, श्राव्या मेटे,इ.दुसरी (लोटस) -अरहान पोपटिया, मेघना आहेर, श्रीराज खरात, इ.दुसरी (रोझ)
शरण्या मंधारे,श्रेया गौड, 
ओंकार गधे,इ.तिसरी (लोटस) -विश्वजीत मोरगे, स्वरांगी भवार,सोफिया पठाण,इ.तिसरी (रोझ)-
स्वरा परदेशी, अरोही त्रिभुवन, पियुष बिडलान हे विद्यार्थी यशस्वी झाले.

          स्पर्धेत विद्यार्थ्यांना वर्गनिहाय नेचर,कार्टून,
सुपरहिरो, इंडियन कल्चर या थीम देण्यात आल्या होत्या.यावेळी परीक्षक म्हणून प्रतिमा किशोर साळुंके,अश्विनी कांबळे, स्विटी प्रवीण पारख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी वर्गशिक्षिका योगिता गवारे,सोनिका शिरसाट, साक्षी भणगे, ज्योती गाढे,ज्योती खंडागळे, प्रीती नाणेकर,कोमल पारखे, सुप्रिया बाबरस, राजश्री व्हटकर,सोनाली म्हसे,गायत्री तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
          यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके,व्हा. चेअरमन प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, सहसचिव डॉ.अर्चना शेळके, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. 
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन ज्योती खंडागळे यांनी केले,तर आभार प्रीती नाणेकर यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


खंडाळा येथे श्री दुर्गा माता दौड मोठ्या उत्साहात साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे "श्री दुर्गा माता दौड" श्री शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान खंडाळा यांच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरी झाली. शेवटच्या दिवशी "श्री दुर्गा माता दौड" कार्यक्रमाचा समारोप शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाला.खंडाळा गावात श्री दुर्गामाता दौड कार्यक्रम श्रीरामपूर विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
नवरात्री कालावधीत सलग ९ दिवस पहाटे ५:३० वा खंडाळा गावी प्रेरणा मंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.श्री दुर्गामाता,श्री तुळजाभवानी माता,श्री जगदंबा माता,श्री भारत माता आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करत राष्ट्रभक्ती गीतांचे गायन करीत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून गावाचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेऊन जगदंबा मातेच्या चरणी भारत मातेच्या अंतर बाह्य शत्रूंचा नाश करण्याची शक्ती अंगी यावी अशी विनवणी, प्रार्थना करण्यात आली.श्री दुर्गा माता दौड " चे ठिकठिकाणी,जागोजागी अनेक माता-भगिनी कडून मनोभावे पूजन करण्यात आले. "श्री दुर्गामाता दौड" कार्यक्रमात अनेक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस,
 श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

पत्रकार संघाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शालेय साहित्याचे वितरण


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय, प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोझिंरा गावातील कोकणेवाडी, कारवाडी आणि गावठाण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व शालेय साहित्य वितरण करण्यात आले. 
या विभागातील राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात माजी आ. डॉ. सुधीर तांबे,आ. सत्यजित तांबे यांचे विश्वसनीय समर्थक शुभम घुले यांच्याकडून सदरील भागातील शाळेंना मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती ती आज पूर्ण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे,ग्रामपंचायत पिंपळगाव कोझींरा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी पिंपळगाव कोंझीरा गावाच्या प्रथम नागरिक सरपंच सोनाली ताई करपे, उपसरपंच संगम आहेर, शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर तथा सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामस्थ बादशाह पाटील वाळुंज, रोहिदास पाटील मोरे,संदीप करपे, दत्तात्रय कडलक, संजय खर्डे, बाबासाहेब आहेर तथा इतर नागरिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



Wednesday, October 16, 2024

वडाळागाव मध्ये जुलुस - ए - गौसिया मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न


- माजिद खान - नाशिक -/ वार्ता -
नाशिक शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्यारवी शरीफ निमित्ताने
वडाळागाव मध्ये जुलुस - ए - गौसीया मिरवणुक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदरील जुलुस ए गौसिया मिरवणूकीची मौलाना जुनेद आलम साहेब यांच्या मार्गदर्शनाने सकाळी गौसिया मस्जिद पाठीमागील बाजुने सुरुवात करण्यात येवून पुढे,आलीशान सोसायटी, मदार नगर, तैबा नगर, सल्ली पाॅईंट, सादिक नगर, महेबुब नगर या मार्गाने शेवटी ह.चांद शहा वली दर्गाह येथे सांगता झाली.
या वेळी मौलाना जुनेद आलम साहेब, मौलाना असजद रजा, मौलाना अब्दुल रहेमान यासीन, असजद रजा, अमजद मौलाना, इंदिरा नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहा.पो.निरीक्षक अंकोलिकर, पोलिस उपनिरीक्षक धनराज पाटील, संतोष फुंदे,वाल्मीक चौधरी, गोपनीय अमोल मानकर, जाधव साहेब, फरीद शेख, शेरू शाह, असद सय्यद, असिफ शेख, अल्ताफ सय्यद, इक्बाल पटेल, रईस शेख, रफिक शेख,असिफ शेख आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Tuesday, October 15, 2024

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (फोटो-संग्रहित छायाचित्र)


Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024 Live : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्राबरोबरच आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-----------------------------------------------
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates : महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान – राजीव कुमार
-----------------------------------------------
=================================
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान

२२ ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन

२९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख

३० ऑक्टोबर अर्ज छाननी

४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख

२० नोव्हेंबर रोजी मतदान

२३ नोव्हेंबर रोजी निकाल 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


वाचन प्रेरणा दिवस ग्रंथप्रदर्शन व परिसंवादाने साजरा


परिसंवाद कार्यक्रमात सहभागी झालेले प्राध्यापक .: डायसजवळ समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, बसलेले डावीकडून.डॉ.केशव पवार ,प्रा.किशोर सुतार , डॉ.प्रदीप शिंदे ,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,डॉ.विद्या नावडकर ,डॉ.संजयकुमार सरगडे , डॉ.मनोहर निकम मागे प्रा.श्रीकांत भोकरे व ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे 


वाचन प्रेरणा दिवस दिनी ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन हस्ते .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,प्राध्यापक व विद्यार्थी
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सर्वांगीण विकासासाठी ‘वाचन’ दिग्दर्शन

- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषामंडळ व घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग,समान संधी केंद्र , विवेक वाहिनी ,ग्रंथालय विभाग यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी कोलेजच्या डॉ.एन.डी .पाटील सभागृहात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन करून साजरी करण्यात आली. वाचन प्रेरणा दिन निमित्ताने ‘वाचन : सर्वांगीण विकासासाठी दिग्दर्शन ‘या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.यात महाविद्यालयातील भाषा व सामाजिक शास्त्र विभागातील प्राध्यापकांनी परिसंवादात आपली विषय मांडणी केली,या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे उपस्थित होते. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे व आंतरविद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.आर. आर. साळुंखे या मान्यवरांची उपस्थिती होती. या परिसंवाद कार्यक्रमाचे समन्वयक ,विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
              वाचन हे सर्वागीण विकासाचे दिग्दर्शन आहे या विषयावर बोलताना प्रथम प्रा.श्रीकांत भोकरे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले हा दिवस केवळ वाचन प्रेरणा दिवस असत नाही.वाचनाची प्रेरणा कधीही मिळत असते. वाचणे महत्वाचे असते. श्रवण,भाषण ,वाचन ,लेखन ही कौशल्ये आत्मसात करावीत. वाचनाचे कुतूहल का कमी होते हा संशोधनाचा विषय आहे. का वाचायचे ,कसे वाचायचे आणि किती वाचायचे हे प्रश्न स्वतः समजून घ्यावे. वाचन हे व्यक्ती सापेक्ष आहे. कुठूनही वाचायला सुरुवात केलीच पाहिजे. अलीकडच्या काळात कोण कोण लेखक. लिहितात ही जिज्ञासा सतत असली पाहिजे. साहित्य माणसाला संवेदनशील बनविते. पुस्तकात आयुष्य ओतलेले असते. पुस्तक वाचल्याने शब्द संपत्ती वाढते .वाचन निरंतर करावे.त्यातून आपण शहाणे आणि समृद्ध होत जातो. केरळमध्ये अत्यावश्यक सेवेत ग्रंथालय येते. आत्महत्या कमी व्हायच्या असतील तर वाचले पाहिजे. आपण आतून शांत व्हावे तरच वाचलेले लक्षात राहते. आजचा रीडर हा उद्याचा लीडर आहे असे ते म्हणाले. प्रा. किशोर सुतार म्हणाले अर्थशास्त्राला समाजशास्त्राची राणी म्हणतात. पुस्तकाचा संग करावा. संत रामदास यांनी दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे असे म्हटले आहे. बुद्धांचे चरित्र वाचून भीमराव रामजी आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारताचे स्वप्न पाहिले. ते घटनाकार झाले. संविधानामुळे गुलामगिरीत राहिलेला देश आज विकसित राष्ट्र होण्याची आकांक्षा बाळगत आहे. ९ वर्षाच्या तुरुंग वासात ‘नेहरूंनी डस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला . मिसाईल मन असलेल्या अब्दुल कलामांनी खूप मोठे योगदान दिले. न्यूटन ने अभ्यास करून गुरुत्वाकरशन शक्तीचा शोध लावला. पेपर टाकणारे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय संशोधक झाले आणि जगातल्या सर्व पेपरनी त्यांची दखल घेतली. साने गुरुजी यांची सुंदर पत्रे वाचा , शिवाजीराव भोसले यांचे ग्रंथ वाचावेत. ४७ महापुरुषाची चरित्रे लिहिले.गांधीजीनी वाचूनच सत्याचे प्रयोग लिहिले.त्यातूनच स्वातंत्र्याचा मार्ग त्यांना दिसला. विश्वास पाटलांनी नेताजी सुभाष चंद्र बोस हे पुस्तक लिहिले . छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचून सुचली. पुस्तकांनी घडलेले मस्तक हे समाजाचे ,संस्कृतीचे व येणाऱ्या भविष्याचे दिग्दर्शन करेल. 
.डॉ.मनोहर निकम म्हणाले ‘भगतसिंग यांनी कार्ल मार्क्सच्या साहित्याचे वाचन केले त्यातून ते नास्तिक झाले. ते देवाला कधी शरण गेले नाहीत. चित्रपट ,वेब सिरीज पेक्षा पुस्तक वाचणे अधिक चांगले. उपरा, उचल्या वाचल्यावर आपण आपल्या पद्धतीने व्यक्तीचित्रे उभी करत असतो. मी कोसला दरवर्षी वाचला,भुरा वाचला ,पुस्तकामुळे मुलांच्यात समरस व्हायला मला समाधान मिळते. पुस्तक वाचल्यावर आपल्या चांगल्या आशा वाढत असतात. कुसुमाग्रजाचे विशाखा,लेनिन,गौतम बुद्ध,संत कबीर,इत्यादी वाचनाने भक्ती रसापासून आम्ही बाहेर पडलो. तुम्हाला वाचनाने दिशा मिळते. बालकवी ,ना.धो.महानोर,नारायण सुर्वे,भालचंद नेमाडे, डॉ.आंबेडकर,कॉम्रेड शरद पाटील,जैन,बौद्ध तत्वज्ञान, कमलेश्वर अब्राहम लिंकन हे वाचले पाहिजे असे ते म्हणाले. 
        प्रा.डॉ.प्रदीप शिंदे म्हणाले की ‘आपण वाचतो आहोत ,त्याचा उद्देश माणूस बनणे आहे. जे ग्रंथात चांगले आहे त्याचा स्वीकार करावा,निरर्थक आहे ते टाकून द्यावे. कोणतीही क्रांती विद्वानांच्या मुले झाली. महात्मा गांधी हे देखील अनुभवातून लिहिते झाले. विनोबा भावे, इदगाह, प्रेमचंद साहित्य, विविध कथामधून विविध संघर्ष आपल्याला कळून येतात. साहित्य जीवनाचे दर्शन असते. संयम,समय सूचकता,वाचनातून मिळते. वाचनातून सद्सदविवेक बुद्धी जागृत होते. त्यांनी कपाट ही ग्रंथप्रेमी असले पाहिजे. हजारो रुपयाचा मोबाईल घेतात पण आपल्या घरात ग्रंथ घेत नाहीत. कसलेही पुस्तक न वाचता मुले पदवीधर होतात , पुस्तकाबद्दल उदासीन असता कामा नये. स्वयंप्रकाशित होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. आपल्या कॉलेजचे नियतकालिक वाचले पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमात पुस्तक भेट द्यावेत. पुस्तक भेट दिल्याने आठवणी कायम राहतात. ज्ञानकक्षा विस्तार करण्यासाठी ग्रंथ हेच उपयुक्त ठरतील असे ते म्हणाले. डॉ.केशव पवार यांनी आपल्या देशात कोणी वाचावे ,कोणी वाचू नये असे नियम होते. इंग्रज आल्यानंतर आपल्याला वाचण्याची संधी मिळाली. शेक्सपियर कोणत्या शाळेत शिकला नाही पण पुढे त्याने लिहिलेली पुस्तके जगातल्या सर्व ग्रंथालयात दिसतात. इग्लंड मध्ये १४-१५ व्या शतकात ज्ञान उत्सव साजरा केला .अनेक शोध इंग्लंड मध्ये लागले. कलकत्ता , मद्रास ,मुंबई येथे इंग्रजांनी विद्यापीठे सुरु केली. या देशातल्या मुलांनी इंग्रजी शिकून पुढे स्वातंत्र्य मिळवून दिले. महान लेखांच्या ग्रंथातून त्यांनी वाचन केले होते. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील दोन लाख ग्रंथाचा उपयोग करावा. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधले असे ते म्हणाले. अन्न हे शरीराचे पेट्रोल आहे तसे पुस्तक हे मनाचे तेल आहे. डॉ.सुधामूर्ती यांनी ज्यांच्याकडे पुस्तक नाहीत त्यांना गरीब म्हटले आहे. पुस्तकांना वाळवी लागणे हे चांगल्या माणसांचे लक्षण नाही. ग्रंथालयातील अनेक नवी पुस्तक वाचकांची वाट पाहत आहेत. समाजच वाचणार नसेल तर तो काय होईल ? नवनवी पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा, पुस्तके जवळ असतील तर वाचायला दिली पाहिजेत. आमचे विद्यार्थी वाचतील तेंव्हा आपल्याला समाधान होईल. असे त्या म्हणाल्या राजेंद्र केसकर यांनी मराठी व्याकरणाची मी तीन पुस्तके लिहिल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा सबंधीची पुस्तके देखील वाचली पाहिजेत असे ते म्हणाले. 
    
      डॉ.अनिलकुमार वावरे म्हणाले की अब्दुल कलाम यांना भारत ही महासत्ता व्हावी व विकसित भारताचे स्वप्न पाहिले. देशातील युवाशक्तीवर त्यांचा मोठा विश्वास होता असे ते म्हणाले. अब्दुल कलाम यांना प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे असे ते म्हणाले. प्रारंभी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केले. समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले व ग्रंथपाल प्रा.एकनाथ झावरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विवेक वाहिनी, समानसंधी केंद्र ,भाषा व सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



महात्मा गांधी संकुलात वाचन प्रेरणा दिन साजरा


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नुकतेच वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. वैशाली म्हस्के तर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य अलका आहेर या उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी शाहिस्ता शेख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या काही संस्मरणीय आठवणी सांगून जीवनाचे जीवनातील वाचनाचे महत्त्व विशद केले.
 तसेच सखी सावित्री समितीच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली म्हस्के यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रियंका लोंढे, सुवर्णा भोर, प्रतिभा ठोकळ यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार हिरा चौधरी यांनी मांडले. माध्यमिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्राचार्य अंगद काकडे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकातून खरे जीवनमूल्यांचे संस्कार होतात. विद्यार्थ्यांनी अशा संस्काराचे पाईक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्र.पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, जवाहरलाल पांडे, शेजुळ सर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अश्विनी सोहोनी, रेणुका वर्पे आदींनी वाचन प्रेरणातून यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================