राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 8, 2024

नगरपालिकेच्या बेलगाम कारभाराला शिस्त लावण्याचे नव्या मुख्याधिकाऱ्यांपुढे आव्हान नागरिक त्रस्त, कर्मचारी मस्त, प्रशासन सुस्त

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता - 
कधीकाळी आपल्या उत्कृष्ट प्रशासनाने राज्यात नावाजलेली श्रीरामपूर नगरपालिकेची आज खूपच दैयनिय अवस्था झाली आहे, प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने कर्मचारी बेलगाम सुटले आहेत त्यामुळे ज्याला जे वाटेल त्या पद्धतीने काम सुरू आहे कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे एका कर्मचाऱ्यांचा मानसिक धक्क्यांनी मृत्यू झाल्याची ही चर्चा एकीकडे होत असताना दुसरीकडे पालिकेचे मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव यांची प्रशासकी कारणास्तव बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी आलेले नूतन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यापुढे पालिकेच्या या विस्कटलेल्या घडीला बसविण्याचे मोठ्या आव्हान आहे .एक अभ्यासपूर्ण अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे आणि म्हणून आता ते पालिकेचा विस्कटलेला हा कारभार कसा सावरतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधी कार्यरत असताना पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून चार वर्षांपूर्वी गणेश शिंदे यांनी कारभार स्वीकारला त्यांच्या पूर्वी चार वर्षात सात मुख्याधिकारी पालिकेला लाभले होते, त्यामुळे मोठे अनागोंदी होती परंतु शिंदे यांनी आपल्या कार्य कौशल्याने सर्वांना सांभाळून घेत कारभार केला, एकीकडे पालिकेचे पदाधिकारी नगरसेवक विरोधी गटाचे सदस्य या सर्वांशी सामुच्चाराने घेतानाच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे शिस्तही लावली त्यांचे आदेशानुसार व्यवस्थित कारभार सुरू होता त्यांची बदली झाल्यानंतर सोमनाथ जाधव यांनी मुख्याधिकारी म्हणून कारभार सुरू केला मात्र येथील कर्मचाऱ्यांच्या गटबाजीला ते बळी पडले, काही ठराविक कर्मचाऱ्यांनी आपले जाळे त्यांच्यावर टाकले आणि मग त्यांच्या इशाऱ्यानुसार जाधव कारभार करू लागले त्यामुळे नगरपालिकेमध्ये ठराविक कर्मचारी म्हणतील त्याच पद्धतीने कामकाज सुरू झाले. नागरिकांचे प्रश्न मात्र प्रलंबितच राहिले . नागरिकांच्या तक्रारीची कोणतीही दखल त्यावेळी घेतली जात नव्हती आणि आजही फार घेतली जात नाही ठराविक दोन-तीन कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना आपल्या ताब्यात घेतल्याने ते सांगतील तसेच घडू लागले आणी इना मीना डिका हे त्रिकूट खूपच चर्चेत आले तोंडी आदेशावर कामे होऊ लागली धडाधड बिले निघू लागली सामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र जागेवरच राहिले . आरोग्य, बांधकाम, शिक्षण आदी विभागात अनागोंदीचा कारभार सुरू झाला. शहरांमध्ये अनेक रस्ते खड्डेमय झाले असताना त्यावर साधे मुरूम टाकण्याचे कामही कर्मचारी करीत नव्हते नागरिकांची हाडे मात्र त्यामुळे खिळखळी झाली आरोग्य विभागाचे कामकाज तर संशोधनाचा विषय झाला आहे विविध भागातील गटारी सफाई अभावी तुंबल्या आहेत मिल्लतनगर भागामध्ये दोन महिन्यापासून अंडरग्राउंड गटारीचे पाणी रस्त्यावरून लोकांच्या घरात जात आहे. तर गटारीकडेने पिण्याच्या पाण्याची जुणी पाईपलाईन गेली असल्याने नेहरुनगर मधील काही नळांना चक्क गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे.याबाबत नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असल्याने याविषयी नागरिकांनी तक्रारी करून देखील फारशी दखल घेतली जात नाही,कायमस्वरूपी हा प्रश्न सुटत नसल्याने आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ही भुयारी गटारच बुजून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
पालिकेत कर्मचाऱ्यांचे दोन गट आहेत आणि हे सातत्याने एकमेकांवर कुरघोड्या करीत असतात एकमेकाला त्रास देण्याची एकही संधी दोन्ही गट सोडत नाही त्यातून कर्मचाऱ्यांबद्दल खोट्या तक्रारी करणे, कामे न करणे असे प्रकार सुरू झाले आहे. लेखा विभागातील काही कर्मचारी आपल्याच कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्तीची किंवा इतर बिल्ले काढण्यासाठी पैसे मागत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत हे सर्व तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना माहीत असूनही त्यांनी सोयीस्कररित्या याकडे दुर्लक्ष केले .त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे.याबाबत काही कर्मचाऱ्यांनी पालिकेचे प्रशासक प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यांनी कर्मऱ्यांना लेखी अर्ज दिल्यावर मला ते रेकॉर्डवर घेता येईल असे सांगून कर्मचाऱ्यांना तक्रार देण्याचे आवाहन केले. त्यानंतर आता तक्रारी लेखी सुरू झाल्या आहेत.शहरात कोणती विकास कामे होत आहेत याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार लहू कानडे यांनी देखील नगरपालिकेचे कामकाजामध्ये मला विश्वासात घेतले जात नाही अशी तक्रार मागे पालिकेत घेतलेल्या मीटिंगमध्ये केली होती. त्याबाबतही मोठी चर्चाही झाली होती.
जाधव बदलून गेले आणि त्यांच्या जागी आता मुख्याधिकारी घोलप आले आहेत. आल्या आल्या त्यांना या सर्व परिस्थितीची कल्पना आली आहे. त्यामुळे ते आता कोणत्या पद्धतीने काम करतात.अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या विभागात चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या बदल्या दुरुस्त झाल्या पाहिजे. विशेष म्हणजे पालिकेच्या प्रशासकांच्या केबिनमध्ये मुख्याधिकारी बसतात आणि मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये उपमुख्य अधिकारी बसतात. म्हणजे कोणाच्या खुर्च्यावर कोण बसलय याचे सुद्धा भान या कर्मचाऱ्यांना राहिलेले नाही. 
प्रशासक म्हणून प्रांत अधिकारी किरण सावंत पाटील हे पालिकेत फारसे लक्ष घालत नसल्याचे चित्र आहे. प्रांत अधिकारी पदाचा कारभाराचा वाढता व्याप तसेच विधानसभेची निवडणुकीची तयारी त्यामुळे त्यांना पालिकेत लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.परिणामी सर्व कारभार मुख्याधिकाऱ्यांच्या भरोशावर चालू आहे. माजी मुख्याधिकारी जाधव यांच्या काळातील झालेल्या सर्व प्रकारच्या खर्चाची आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी शहरातील काही जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरामध्ये अतिक्रमणे प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमण अधिकारी म्हणून पालिकेमध्ये एक रोजंदारीवरील कर्मचारी काम पाहतो आणि तो सर्रासपणे अतिक्रमण धारकांकडून हप्ते उकळत असल्याची उघड चर्चा शहरात असताना या अतिक्रमणांकडे पालिका फारसे लक्ष देत नाही.उलट एखाद्या अतिक्रमणाबद्दल कोणी तक्रार केल्यास संबंधित तक्रारदाराचे नाव त्या अतिक्रमण धारकांना कळविण्यात येते आणि त्याच्याकडून चिरीमिरी घेऊन प्रकरण मार्गी लावले जाते अशाही चर्चा शहरात आहे.
आरोग्य विभागाचा अतिशय मनमानी पद्धतीने कारभार सुरू आहे. रोजंदारीचे कामगार किती ? त्यांचा रोजचा पगार किती निघतो ? प्रत्यक्षात किती जण काम करतात ? हे सर्व प्रश्न आता संशोधनाचे विषय झाले आहेत. त्यामुळे नुतन मुख्य अधिकारी मच्छिंद्र घोलप हे आता नगरपालिकेची घडी  कशा पद्धतीने बसवतात व नागरिकांना दिलासा कसा देतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================







No comments:

Post a Comment