राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, December 31, 2024

आरटीओ कार्यालयाकडून वाहन चालक तपासणी व जनजागृती अभियान संपन्न


वाहन चालवताना कोणतेही व्यसन करू नये - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी नववर्षाचे स्वागत करत दुचाकी, चारचाकी वाहनधारक यांची तपासणी करत आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.


प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवत नेवासा रोडवरील सर्व प्रवासी यांना थांबवून मार्गदर्शन करत व्यसनापासून दूर राहावे तसेच दुचाकी चालकांनी हेल्मेट डोक्यावर परिधान करणे यासोबतच वाहन चालवताना लायसन्स, वाहनाचे पेपर सोबत व्यवस्थित ठेवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, जेणेकरून कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आपल्यावर असल्याने वाहन चालवतानी खबरदारी घ्यावी अशा विविध प्रकारच्या सूचनाही श्री. जोशी यांनी दुचाकी चारचाकी वाहनधारक नागरिकांना दिल्या, तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहनधारकांना दूध प्राशन करण्यास दिल्याने प्रवासी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, सदरच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने परिसरामधून उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांचे तसेच समवेत असलेले सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यापूर्वी अशा पद्धतीने कारवाई तसेच व्यसनमुक्तीचा संदेश जनजागृती अभियान राबविले नसल्याचे नागरिकांमधून चर्चा सुरू होती, यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, कुणाल वाघ,अतुल गावडे, रोशन चव्हाण, श्रीमती राणी सोनवणे तसेच वाहन चालक गणेश गांगोडे,रवींद्र बनकर, बद्रीनाथ कोकाटे,अनिल दुर्ग, सतीश भांबरकर,संदीप पाळंदे समवेत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण टेकाळे, पो. कॉं. प्रवीण कांबळे, गृह रक्षक दलाचे चंद्रकांत मोरकर, राजेंद्र देसाई, रेवन्नाथ पेठे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, December 30, 2024

उन्नती वर्पे हिस नेमबाजीतीलरेनॉल्ड शूटर पुरस्कार


- अजीजभाई - शेख -/ राहाता -
 प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. उन्नती संजय वर्पे हिस नेमबाजीतील बहुमानाचा रेनॉल्ड शूटर पुरस्कार प्राप्त झाला आहे. तिची नेमबाजीमध्ये स्कीम इंडियाच्या पात्रता फेरीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी दिली. 
६७ एनसीसी राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप भोपाळ (मध्य प्रदेश) या ठिकाणी झालेल्या नेमबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन नियमानुसार आय.एस. एस.एफ. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथील राष्ट्रीय खेळाडू कु.उन्नती संजय वर्पे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ६० शॉटमध्ये ६११.६ स्कोर करून रेनॉल्ड शूटर हा बहुमान पटकावला आहे. यामुळे ह्या विद्यार्थिनीची इंडिया नेमबाजी संघाच्या पात्रता फेरीसाठी निवड झाली आहे. तिला प्राचार्य डॉ. अंबाडे, उपप्राचार्य के. टी. अडसूळ, पर्यवेक्षिका एम. एस. जगधने, शुभांगी रत्नपारखी व सर्व क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट- श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, December 29, 2024

देश-धर्म के लिए श्री गुरु गोबिन्द सिंह जी का महान बलिदान...

- भगवंत सिंग प्रितम सिंग बत्रा  जी -/ लेख वार्ता -

इतिहास पुरूष कभी भी राजसत्ता प्राप्ति, जमीन-जायदाद, धन सम्पदा या यश प्राप्ति के लिए लड़ाईयां नहीं लड़ते। श्री गुरु गोबिन्द सिंह जी ऐसे इतिहास पुरूष थे, जिन्होनें ताउम्र अन्याय, अधर्म, अत्याचार और दमन के खिलाफ तलवार उठाई और लड़ाईयां लड़ी। गुरू जी की तीन पीढ़ियों ने देश धर्म की रक्षा के लिए महान बलिदान दिया। आज देश अपनी स्वतंत्रता की 75वी वर्षगांठ ’’आजादी के अमृत महोत्सव’’ के रूप में मना रहा है, ऐसे में पूरे देश में स्वतंत्रता सेनानियों, शहीदों, बलिदानियों को याद किया जा रहा है। सिखों के दसवें गुरु श्री गुरु गोबिंद सिंह जी को उनकी जयंती पर नमन कर प्रत्येक भारतवासी गर्व महसूस कर रहा है।
गुरु गोबिन्द सिंह सिक्खों के दसवें गुरु थे। वे एक महान दार्शनिक, प्रख्यात कवि, निडर एवं निर्भीक योद्धा, युद्ध कौशल, महान लेखक और संगीत के पारखी भी थे। उनका जन्म 1666 में पटना में हुआ । वे नौवें सिख गुरु, श्री गुरु तेग बहादुर और माता गुजरी के इकलौते बेटे थे, जिनका बचपन का नाम गोबिंद राय था।
सन् 1699 ई0 में बैसाखी के दिन गुरु गोबिंद सिंह ने खालसा पंथ की स्थापना कर पांच व्यक्तियों को अमृत चखा का ’पांच प्यारे’ बना दिए। इन पांच प्यारों में सभी वर्गो के व्यक्ति थे। इस प्रकार से उन्होंने जात-पात मिटाने के उद्देश्य से अमृत चखाया । बाद में उन्होंने स्वयं भी अमृत चखा और गोबिंद राय से गोबिंद सिंह बन गए।
गुरु गोबिंद सिंह ने एक खालसा वाणी “वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह” स्थापित की। साथ ही उन्होंने आदर्शात्मक जीवन जीने और स्वयं पर नियंत्रण के लिए खालसा के पांच मूल सिद्धांतों की भी स्थापना की। जिनमें केस, कंघा, कड़ा, कछ, किरपाण शामिल है। ये सिद्धान्त चरित्रनिर्माण के मार्ग थे। उनका मानना था कि व्यक्ति चरित्रवान होकर ही विपरित परिस्थितियों व अत्याचारों के खिलाफ लड़ सकता है।
गुरू गोबिन्द सिंह जी की वीरता और लोकप्रियता से आस पास के पहाड़ी राजा द्वेष करने लगे यहां तक बिलासपुर के राजा भीमचन्द सहित गढ़वाल, कांगड़ा के राजाओं ने मुगलशासक औरंगजेब के पास जाकर गुरु गोबिंद सिंह के खिलाफ लड़ने के लिए सैनिक सहायता मांगी और कहा कि इसके बदले में वे वार्षिक लगान देंगें। भीम चंद की माता चम्पादेवी ने गुरु गोबिंद सिंह के खिलाफ युद्ध का विरोध किया और कहा कि गुरु गोबिंद सिंह एक महान संत है, उनके साथ युद्ध नहीं बल्कि उनको घर बुला कर सम्मान देना चाहिए।

इसी प्रकार जब औरंगजेब की सेना का जनरल सैयद खान युद्ध के लिए आनंदपुर साहिब जाने लगा तो रास्ते में साधुरा नामक स्थान पर उनकी बहन नसरीना से मिले। उनकी बहन ने सैयद खान को गुरू गोबिन्द सिंह के खिलाफ युद्व करने से रोका और कहा कि वे पहले से ही गुरु जी की अनुयायी हैं और गुरु गोबिंद सिंह एक धार्मिक व आध्यात्मिक संत हैं। यहां तक कि उन्होंने पहले से ही सैयद खान की हार की भविष्यवाणी कर दी थी। नसरीना खान ने अपने पति व बेटों को गुरू गोबिन्द सिंह की सेना में भर्ती करवा दिया था। सैयद खान युद्ध के लिए निकल पड़ा। युद्ध के मैदान में नीले घोड़े पर सवार श्री गुरू गोबिन्द सिंह जब मुगल सैनिकों को मौत के घाट उतार रहे थे तो सैयद खान गुरू जी के सामने आया तब गुरू जी स्वयं घोड़े से उतरे और वे सैयद खान को मारने के लिए तैयार नहीं हुए। सैयद खान गुरू जी की आभा और तेज से प्रभावित हुआ और युद्ध मैदान छोड़कर योग, ध्यान व शान्ति प्राप्ति के लिए पर्वतों में चला गया।
गुरु गोबिंद सिंह जी के चार पूत्र थे, जिनका नाम साहिबजादे अजीत सिंह, साहिबजादे जुझार सिंह, साहिबजादे फतेह सिंह, साहिबजादे जोरावर सिंह था। उन्होंने अपने चारों पुत्र धर्म की रक्षा के लिए कुर्बान किए। मुगल शासक द्वारा दो पुत्र जोरावर सिंह और फतेह सिंह को सरहिंद में दीवार में चुनवा दिया गया । दो पुत्र अजीत सिंह और जुझार सिंह युद्ध में वीरगति को प्राप्त हुए । गुरु गोबिंद सिंह ने अपने पुत्रों की शहादत में कहा था-
सब पुत्रन के कारन वार दिए पुत चार ।
चार मुुए तो क्या हुआ, जीवित कई हजार ।।
गुरु गोबिंद सिंह जी ने अपने जीवन में आनंदपुर, भंगानी, नंदौन, गुलेर, निर्मोहगढ, बसोली, चमकोर, सरसा व मुक्तसर सहित 14 युद्ध किए। इन जंगों में पहाड़ी राजाओं एवं मुगल सूबेदारों ने हर बार मुंह की खाई। गुरू गोबिन्द सिंह ने कभी स्वार्थ व निजहित के लिए लड़ाई नहीं लड़ी बल्कि उन्होंने उत्पीड़न व अन्याय के खिलाफ लड़ाई लड़ी। इस कारण से हिन्दु व मुस्लिम धर्मों के लोग उनके अनुयायी थे।
सितम्बर 1708 में गुरू जी दक्षिण में नांदेड़ चले गए और बैरागी लक्ष्मण दास को अमृत छका और युद्व कौशल से पारंगत कर बंदा सिंह बहादुर बनाया और उन्हें खालसा सेना का कमाण्डर बनाकर संघर्ष के लिए पंजाब भेज दिया। पंजाब पहुंच कर बन्दा सिंह बहादुर ने चप्पा चीड़ी की जंग जीती।
अक्तूबर 1708 में महाराष्ट्र के नांदेड़ साहिब में गुरु गोबिंद सिंह जी ने अपनी आखिरी सांस ली। इस प्रकार से पहले पिता गुरु तेग बहादुर सिंह, फिर चारों पुत्रों ने और बाद में श्री गुरु गोबिन्द सिंह जी ने स्वयं बलिदान देकर धर्म की रक्षा की।
स्वामी विवेकानंद जी ने गुरू गोबिंद सिंह जी को एक महान दार्शनिक, संत, आत्मबलिदानी, तपस्वी और स्वानुशासित बताकर उनकी बहादुरी की प्रशंसा की थी। स्वामी विवेकानंद जी ने कहा था मुगल काल में जब हिन्दु और मुस्लिम दोनों ही धर्मों के लोगों का उत्पीड़न हो रहा था तब श्री गुरू गोबिंद जी ने अन्याय, अधर्म और अत्याचारों के खिलाफ और उत्पीड़ित जनता की भलाई के लिए बलिदान दिया था जो एक महान बलिदान है। इस प्रकार से गुरू गोबिंद सिंह जी महानों में महान थे।
गीता में कहा है कि ’’कर्म करो, फल की चिन्ता न करो’’। ठीक इसी प्रकार गुरु गोबिंद सिंह जी ने कहा है ’देह शिवा बर मोहे इहै, शुभ करमन ते कबहूं न टरूं’ यानि हम अच्छे कर्मो से कभी पीछे न हटें, परिणाम भले चाहे जो हो। उनके इन विचारों व वाणियों से पता चलता है कि गुरु गोबिंद सिंह जी ने कर्म, सिद्धान्त, समभाव, समानता, निडरता, स्वतंत्रता का संदेश देकर समाज को एक सूत्र में पिरोने का काम किया। उन्होंने कभी भी मानवीय व नैतिक मूल्यों से समझौता नहीं किया। आज फिर जरूरत है कि उनके बताए मार्ग पर चल हम सभी धर्म, समाज व भाईचारे को मजबूत कर एक भारत-श्रेष्ठ भारत के लिए कार्य करें।
जय हिन्द!


=================================
-----------------------------------------------
सौजन्य लेख अनुमती...
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

विद्यानिकेतन स्टेट बोर्डचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन टाईमलेस ओडिसी- कालचक्रचा प्रवास या मार्मिक, वैचारिक विषयावर आधारित नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मिस इंटरनॅशनल इंडिया- सौंदर्यवती रश्मी शिंदे, अमेरिकास्थित रोहित शिंदे, विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, खजिनदार राजीव शिंदे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे होत्या.
       प्रसंगी इ.नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी काळाला गवसणी घालत, आपल्या बहारदार नृत्याविष्कारांतून कालचक्रच्या नाट्यमय प्रवासाचा वेध घेतला. तसेच या संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांनी आपला भूतकाळ, भविष्यकाळ जाणून घेतला. व बदलत्या कालचक्रावर प्रकाशझोत टाकला. दरम्यान चि.पार्थ मुळे,गौरव गोसावी, साईराज गायकवाड या विद्यार्थ्यांनी टाईम मशीनच्या प्रतिकृतीद्वारे आपल्या वैचारिक संभाषणातून कालचक्राचा अवघा नाट्यमय प्रवास विद्यार्थी, श्रोत्यांसमोर उलगडला. 
यावेळी बदलत्या कालचक्र प्रवासानुसार वार्षिक स्नेहसंमेलनात प्रायमरी डान्स,अर्ली ह्युमन्स, मोहेंजोदडो, कार्टून वर्ल्ड, एलियन,घोष्ट स्टोरी, चाईल्डहुड,बॉलीवूड, फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र, कारगिल,मुंबई परफॉर्मन्स, वारी, बुद्धा, डॉक्टर्स चाईल्डहुड, जालियनवाला बाग, वैदिक पिरेड,चाणक्य अँड चंद्रगुप्ता, छत्रपती शिवाजी महाराज, फ्युचर २५०, फ्युचर २५००, फायनल मिक्स सॉंग या ओघवत्या जीवन शैलीतील नृत्य-गीतांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या मनोवेधक नृत्यांनी रसिक- प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.
         प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कु. संजीवनी गाडेकर, चि.रुद्र ढमाले या विद्यार्थ्यांना या वर्षीचा स्टुडन्ट ऑफ द ईयर हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रातील राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कु.तनिष्का राऊत, चि.सार्थक सोलंकी, राज बारहाते यांनाही सन्मानित करण्यात आले. दरम्यान मागील वर्षी माध्यमिक शालांत परीक्षा इ. दहावीमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांमधून कु.आदिती तांबे,दिशा राऊत,साक्षी सिनारे,मयुरी उंडे या विद्यार्थिनींचा गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित शिक्षक-पालक प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला. शेवटी मान्यवरांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी कठोर परिश्रम घेतले.
         प्रसंगी कार्यक्रमास विद्यालयाचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधीज्ञ भागचंद चुडीवाल,प्रकाश निकम पाटील,सुखदेव सुकळे, संजय शहा, मंगलाताई आढाव,शुभांगी देवकर, डॉ.अर्चना शेळके, विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे,योगेश गायकवाड, वर्षा धामोरे,चित्रा सुरडकर, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे,अमित त्रिभुवन कार्यालयीन अधीक्षक सतीश थोरात,रावसाहेब रशिनकर, सुनील ठाणगे, शिक्षक- पालक प्रतिनिधी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षिका प्रीती नानेकर,सूत्रसंचालन कु.अनन्या राकेचा हिने केले, तर आभार कु.अक्षदा दळे हिने मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहुले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अन्यायग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी* *भारतीय लहुजी सेना धावून येते


*अन्यायग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी* 
*भारतीय लहुजी सेना धावून येते !*

*म्हणूनच ही संघटना जिल्हाभरात* 
*अग्रगण्य अशी मानली जाते !!*

*भारतीय लहुजी सेनेची जिल्हास्तरीय*
*बैठक संपन्न; पदाधिकारी नियुक्त्या*

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
सामाजातील रांजले - गांजले, उपेक्षित आणी दुर्लक्षीतांबरोबरच कुठे अन्याय अत्याचार होत असल्यास भारतीय लहूजी सेना क्षणात धावून येते आणी अन्यायाचा प्रतिकार करणेकामी पुढाकार घेते करीता जिल्हाभरात ही संघटना अग्रगण्य मानली जाते, म्हणून या संघटनेत प्रत्येक गांव/ शहरातून नेहमीच कार्यकर्त्यांचे इनकमिंग हे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.
              नुकताच भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली शहरात भारतीय लहुजी सेनेची अहमदनगर जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली असून या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांना पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी प्रामुख्याने सुनिल सकट यांची भारतीय लहुजी सेनेच्या युवा जिल्हाध्यक्षपदी तर मिराताई राम सरोदे यांची महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.तसेच कमलताई जगधने शहर अध्यक्ष,प्रिता विजय ससाणे शहर कार्याध्याक्ष, ज्योति परदेशी ‌शहर उपाध्यक्ष, लता सुनिल बरेलीया शहर संघटक यांना पदाची जबाबदारी देवून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी भारतीय लहुजी सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय महासचिव हानिफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रज्जाकभाई शेख, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख, जिल्हा संघटक राजेन्द्र त्रिभुवन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार स्नेहलता कुलथे यांन जाहीर

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिला जाणारा विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार श्रीरामपूर येथील वर्ल्ड सामना दिवाळी अंकाच्या संपादिका सौ. स्नेहलता प्रकाश कुलथे यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी दिली. 
राज्यातील नामवंत पत्रकारांना पत्रकार भुषण आणि अन्यही विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. सदरचा पुरस्कार सोहळा ६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, डॉ. सुरेंद्र गावसकर सभागृह (शारदा सिनेमाच्या शेजारी), दादर, मुबंई या ठिकाणी होणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. राज्यपाल पद्मभूषण रामभाऊ नाईक हे भूषविणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, भाऊ तोरसेकर सुकृत खांडेकर आदि उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनिल रोकडे व कैलासवासी यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार पत्रकार तुळशीदास भोईटे यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यिक,पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकनाथ बिरवटकर, संतोष धोत्रे, शंकर शिंदे, शंकरराव राहणे आदींनी केले आहे.
यापूर्वी वर्ल्ड सामना दिवाळी अंकास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सन्मानित केले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल संपादिका सौ.स्नेहलता कुलथे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


=================================
-----------------------------------------------
 *वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रास बदनाम करण्याचा कूटील डाव, प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत पैसे खाण्यात कसे नाही तोतया पत्रकारांचे नाव,,,


- संगमनेर - लियाकत पठाण - / वार्ता -
साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्रास बदनाम करण्याचा कूटील डाव, प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत पैसे खाण्यात कसे नाही तोतया पत्रकारांचे नाव,, संगमनेर महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अधिपत्याखाली अनेक चेक पोस्ट नाका आहे या सर्वच चेक पोस्ट वर दिवस भरात हजारो वाहने येतात आणि जातात या वाहनांची तपासणी या चेक पोस्ट वर केली जाते या चेक पोस्ट वर खासगी नोकर भरती करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहेत अनेक वेळा या चेक पोस्ट वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळे लावले मोठ्या प्रमाणावर लाचखोरी करणार्या अनेक प्रादेशिक परिवहन अधिकारी खासगी् नोकर यांच्या वर कारवाई करण्यात आली सर्वांना वाटत असेल की आता तरी या प्रकरणी आळा बसेल परंतू आळा घालण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांना वेळ तर मिळाला पाहिजे कारण या मिळणाऱ्या उत्पन्नातून अनेक अधिकारी याचे भागिदार असल्याचे देखील समजते केवळ आर टी ओ अधिकारी यांच्या शिपा बदलत असतात परंतु वाहन धारकांची लूट सुरू असतेच यात शंकाच नाही याचच फायदा उचलण्यासाठी काही तोतया पत्रकार कोणताही अधिकूरत परवाना नसताना केवळ शे पाचशे रुपये खर्च करून बनावट व्हिजीटिग कार्ड तयार करून सर्रास वापरले जाते असाच काहीसा प्रकार साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र कमी कालावधीत सर्वत्र लोकप्रिय झाली असताना या वर्तमान पत्राच्या नावे काही महाभाग भिक मागण्याचा धंदा करत असल्या कारणाने तक्रारी आहेत तरी साप्ताहिक खरे सव्वाशेर संपादक लियाकत खान पठाण यांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना विनंती आहे की या नावाने कोणी व्यक्ती आपल्या चेक पोस्ट वर लाच मागण्यांसाठी येत असेल तर त्या व्यक्तीला तात्काळ जवळपास असणाऱ्या पोलिस प्रशासन यांच्या ताब्यात देण्यात यावे सदर तोतया पत्रकार आर टी ओ चेक पोस्ट आर टी ओ कार्यालयात केव्हापासून बोगसगिरी करतं फिरत होता हे उघडकीस येण्यासाठी वेळ लागणार नाही असे आवाहन संपादक खरे सव्वाशेर लियाकत खान पठाण यांनी केले आहे वेळ पडल्यास संपादक खरे सव्वाशेर मोबाईल नंबर 9665282010,या क्रमांकावर संपर्क साधावा साप्ताहिक खरे सव्वाशेर च्या नावाने कोणी व्यक्ती आपल्या चेक पोस्ट वर कार्यालयात आल्यास त्याचे ओळखपत्र कार्ड मागणी करण्यात यावी साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र पत्राचा असा कोणी व्यक्ती अधिकूरत नेमलेला नाही सर्व महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नोंद घ्यावी सविस्तर माहिती पुढील अंकात प्रकाशित करण्यात येईल


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Thursday, December 26, 2024

पालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरुद्धउबाठा शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन


नेवासा - संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन - संजय छल्लारे 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील नेवासा - संगमनेर रोड दुरवस्था व इतर रस्त्यांच्या अत्यंत दुरावस्थेबाबत शिवसेना (उबाठा) च्या वतीने श्रीरामपूर नगरपलिकेसमोर ढोल बजवो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते संजय छल्लारे यांनी केले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी प्रशासनाला सुनावले की, "नेवासा-संगमनेर रस्त्याची तातडीने दुरुस्ती झाली नाही, तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारून नागरिकांसाठी न्याय मिळवेल. 
यावेळी आंदोलनकर्त्यांनी नगर पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "रस्ते दुरुस्त करा" आणि "प्रशासन हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली.
रस्त्यावरील दुरवस्थेमुळे प्रवाशांचे होत असलेले हाल ची दखल घेऊन प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा शिवसेनेला अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी दिला गेला.
या आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन, रस्त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली. "शिवसेना नेहमीच जनतेसाठी लढत राहील," असे नेते संजय छल्लारे यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, व्यापारी असोसिएशनचे सुनील गुप्ता, गौतम उपाध्ये, बाळासाहेब खाबिया, योगेश ओझा, संदीप आगरकर,नंदूशेठ कोठारी, संजय कासलीवाल, राहुल कोठारी, प्रेमचंद कुंकुलोळ, मुकेश कोठारी, माजी नगरसेवक राजू अदिक, पत्रकार सलीम पठाण सर, नगरसेवक भरत कुंकूलोळ, शरद कोठारी, माजी नगरसेवक आण्णासाहेब डावकर, माजी नगरसेवक आशिष धनवटे, भरत जगदाळे,अशोक बागुल, संजय रूपटक्के, अशोक शिवरकर, नवनाथ जेजुरकर, संजय लाड, चंद्रकांत कर्नावट, सुभाष जंगले, नवनाथ शेळके, श्री नामदे साहेब, कैलास शिंदे, राजेंद्र भोंगळे,राजेंद्र भांबरे, सुरेश कांगुने, संजय आगाशे, बापूसाहेब तुपे, जगन्नाथ हरार, विजय गांधी, चिरायु नगरकर, नजीरभाई शेख, माजी नगरसेवक सुनील बोलके, सुनील गलांडे,निलेश गोराणे, अमरप्रीतसिंग सेठी, माजी नगरसेवक श्याम अडांगळे, निलेश धुस्सा, सुरेश कोळेकर, किरण कर्नावट, पत्रकार दीपक कदम, हरीकृष्ण निर्माळ, नितीन हारदे,धीरज तलवार, संतोष मोरगे,अजय भागवत, मयूर पाटणी,विनीत कुंकूलोळ, निलेश बोरावके, विलास बोरवके,
शिवसेनेचे शहरप्रमुख माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक मामा थोरे, तालुकाप्रमुख लखन भगत, सुधीर वायखिंडे, भगवान उपाध्य, शरद गवारे, तेजस बोरावके, युवासेना तालुका प्रमुख सुरेश थोरे, युवासेना शहर प्रमुख सिद्धांतभैय्या छल्लारे, रोहित नाईक, विशाल पापडीवाल, विक्रम नाईक, अकील पठाण, प्रमोद गायकवाड, रोहित भोसले, अजय छल्लारे, प्रकाश परदेशी, योगेश ढसाळ, शुभम छल्लारे, राजू डुकरे, मुस्ताक शेख, विशाल दुपाती, महेश जगताप, गोरख गुळवे, निलेश मटाले, मोती व्यवहारे, देवेन पीडियार, ज्ञानेश्वर सारंधर, विकी गंगवाल, लोकेश नागर, सुहस परदेशी, बापू बुधेकर, दत्ता करडे, प्रवीण शिंदे,व इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत, "प्रशासन हाय हाय" आणि "रस्ते दुरुस्ती करा" अशा घोषणा दिल्या. आंदोलनात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने शामील झाले होते. शिवसेना नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर येत्या काळात आणखी उग्र आंदोलन केले जाईल, अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली. नागरिकांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी असून रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असे आंदोलकांनी ठामपणे सांगितले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳..
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


विधार्थींनींनी दिले देशभक्ती, संविधान जागर,शैक्षणिक, साहित्यिक व समाज प्रबोधनाचे अनेक संदेश


सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची आवड निवडचा अंदाज येतो - डॉ. प्रा.सलाम सर 

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विद्यालयातील विद्यार्थी वर्षभर मोठ्या आतुरतेने शाळेचे स्नेह संमेलनाची वाट पाहत असते. त्यांना याद्वारे आपल्या आवडीच्या गोष्टी स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करता येते. यामुळे पालकांना व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या आवड निवडचा अंदाज येतो. व मुलांवर संस्कार करुन त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयात मुलांच्या पाया रचला जातो. आजची मुले उद्याचे भविष्य आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास सक्षम समाज घडणार आहे.असे प्रतिपादन मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील मौलाना आझाद उर्दु गर्लस हायस्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन माऊली संकुल येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाहक डॉ. प्रा. अब्दुस सलाम सर, शेख लाला, उपसचिव अजीज जनाब, विश्वस्त नसीर शेख, शरफुद्दीन शेख, सलीम शेख ,रशिद शेख,हसीब शेख, मतीन शेख,फरीदा भाभी,शबाना आपा, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद,महेनाज बाजी, असलम पटेल, फरीदा जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थ्यांनी संविधानामध्ये समाजाच्या हक्कासाठी असणाऱ्या बाबींचा उल्लेख संविधान जागर नाटकातून सांगितले. मंगल पांडे यांच्या फाशीची संपूर्ण माहिती ही नाटक द्वारे देण्यात आली. तसेच भारताच्या प्राचीन इतिहास ही नाटकातून सांगण्यात आला. या व्यतिरिक्त मुशायरा, कव्वाली, कोळी डान्स, पाण्याचे महत्व, झाडांचे महत्त्व व अशा अनेक शैक्षणिक साहित्यिक व सामाजिक विषयांची नाटके सादर करून पालक व विद्यार्थांया मध्ये जनजागृती करण्यात आली. आपल्या मुलांमधील कलागुणांना पाहून पालकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहार अंजूम यांनी केले. तर आभार अंजुम खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाजेमा जुल्फेकार, नाहीद, रफत,नाजेमा इकबाल, अफशा, मिनाज शेख, खुतेजा बाजी, सदफ, मलेका बाजी, सिदरा, यास्मिन शेख आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरपूर परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, December 24, 2024

डॉ.शिवाजीराव कदम यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार जाहीर


दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण

- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांची ५१ वी पुण्यतिथी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वा. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात आयोजित केली आहे. 
या समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार यावर्षी भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन मा. ॲड.भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, संस्थेचे कायदा सल्लागार मा. ॲड. दिलावरसाहेब मुल्ला, मुल्ला कुटुंबीय,संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सातारा शहरातील शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे. 
भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय असे योगदान दिले आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास ग्रामीण समाज जीवनातून झाला. 
आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक स्वरूपाचे कार्य केले असून कृतिशील शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासूसंशोधक, वंचितांच्या शिक्षणाबद्दलची नितांत आस्था प्रत्येक ठिकाणी अधोरेखित होत आली आहे. ध्येयनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, उत्साही संशोधक आणि नि:स्वार्थी समाजसेवक म्हणून ते परिचित आहेत. रसायनशास्त्रासारख्या विषयामध्ये डॉक्टरेट मिळविल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड आणि फ्रान्स यासारख्या विविध देशांमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात १७५ हुन अधिक शोधनिबंध सादर केले. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये २५ वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपद त्यांनी भूषवले असून प्रकुलगुरू, कुलगुरू आणि आता सध्या भारती विद्यापीठाचे कुलपतीपदी त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा नोंदविला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, आधिसभा सदस्य असे त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्याच पुढाकाराने विद्यापीठामध्ये ‘औषध निर्माण शास्त्र’ या विद्याशाखेची निर्मिती झाली आणि या विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी १५ वर्ष काम केले. विद्यापीठ अनुदान आयोग व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थांवर दोन वेळा त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. त्यांच्या दृष्टेपणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि आधी संस्कृती समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी आपले योगदान दिले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून त्यांनी संस्थेसाठी सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी असणाऱ्या अनेक संस्थांमध्ये त्यांचे सदस्यत्व आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भारताचे राष्ट्रपती सरन्यायाधीश यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार’ व इतर अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन आणि मानवी उदात्त मूल्यांचा प्रसार त्यांनी आपल्या कृतीतून केला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वास रयत शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा ‘इस्माईलसाहेब मुला जीवन गौरव पुरस्कार’ यावर्षी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तरी या समारंभास शिक्षण क्षेत्रातील मान्यवराने मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी विभाग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित


रेड क्रॉसने केला सन्मान

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिर्डी लोकसभा मतदारसंघ व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुका अतिशय शांततेत, निर्भयपणे, व नियोजनबध्द ,कुशलतेने पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
       प्रास्तविक व स्वागत पाटणी विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकुलोल यांनी केले.
            यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
        सचिव सुनील साळवे यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ हे रेड क्रॉस सोसायटीला मिळालेले अष्टपैलू पदाधिकारी असून किरण सावंत - पाटील यांचे नेतृत्वाखाली सर्व टीम जिल्ह्यात कार्य करत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा मोठा फायदा प्रशासनात होतो.कर्तृत्ववान पदाधिकारीमुळे रेड क्रॉसचे काम प्रगतीपथावर चालू आहे. रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे कामाची प्रशंसा वरिष्ठांकडून झाली याचा रेड क्रॉस सोसायटीला अभिमान असल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले
          सत्काराला उत्तर देताना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ म्हणाले की, प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास मिळाल्याने खूप शिकण्यास मिळाले. रेड क्रॉसचे सेवाकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. या पुरस्काराने काम करण्याची दुप्पट प्रेरणा मिळेल असे सांगत मिलिंदकुमार वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.
             अध्यक्षीय मनोगत व सत्काराला उत्तर देताना किरण सावंत - पाटील म्हणाले रेड क्रॉस चे अविरत सेवाकार्य प्रेरक आदर्श आहे. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही निवडणुका शांततेत नियोजनपूर्वक पार पाडणेसाठी महसूल स्टाफ, निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असतो.
रेड क्रॉसचे कामाविषयी किरण सावंत - पाटील यांनी समाधान व्यक्त करत विविध कार्यक्रमचे वार्षिक नियोजन बनवण्याचे सूचित केले. भविष्यात गरजू नागरिकांपर्यंत विविध सुविधा रेड क्रॉस उपक्रमांद्वारे पोहोचविण्याचे कार्य सदस्यांनी करावे असे आवाहनही सावंत यांनी केले. आमचा केलेला सन्मान हा नवसंजीवनी देणाराच असेल त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे किरण सावंत - पाटील यांनी सांगितले
         प्रवीणकुमार साळवे यांनी आभार मानले.
         कार्यक्रमासाठी भरत कुंकुळोल ,श्रावण भोसले, सुरेश वाघुले, पोपटराव शेळके, सचिन चंदन,संदीप छाजेड, गणेश थोरात,अरुण कटारे,केशव धायगुडे,बन्सी फेरवानी,विनोद हिंग्निकर, प्रवीण साळवे,श्रीकांत दहिमिवाल,डॉ.स्वप्नील पूर्णाले, बदर शेख,ज्ञानदेव माळी, शिवाजी गोरे, अवधूत कुलकर्णी,साहेबराव रक्टे, मायाताई चाबुकस्वार, पुष्पाताई शिंदे,सुभाष बोधक, मधुकर वेडे,सोमनाथ जगताप आदी आजीव सभासद उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, December 23, 2024

बाळ येशू जन्म देखाव्यातून ख्रिस्ती समाजाने दिला शांती व प्रितीचा संदेश


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
दरवर्षी प्रमाणे नाताळ निमित्त शहरातून सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने बाळ येशूच्या जन्म देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली.
 मंगल दुशिंग यांनी केलेल्या प्रार्थनेनंतर या मिरवणुकीस संत लोयोला चर्चपासून सुरूवात कऱण्यात आली. सदर कॅण्डल सर्विस मिरवणूक पुढे सिद्धार्थनगर, भुयारीपूल मार्गे बस स्टॅन्ड, मेन रोड , छत्रपती शिवाजी महाराज रोड , दशमेश नगर, कर्मवीर पुतळा मार्गे पुन्हा चर्चकडे आली. दरम्यान लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश भालेराव, फा.जेकब गायकवाड, ईम्यानुएल चर्चचे पा.अण्णासाहेब अमोलिक, पा.अलिशा आमोलिक, बेथेल चर्चचे पा. सतीश आल्हाट, सिस्टर नलिनी आल्हाट, न्यू होप चर्चचे पा. रावसाहेब त्रिभुवन, पा. सातदिवे , पा.दिपक शेळके, तसेच झेवियर्सचे शिक्षक रविन्द्र त्रिभुवन यांनी ख्रिस्त जन्माबाबत शहरवासियांना सुवार्ता संदेश देऊन नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
 मिरवणूक शहरात पोहचताच अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनी उपस्थित धर्मगुरूंचा सत्कार केला.
याप्रसंगी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार बी.के.मुरकुटे, साई संस्थानचे मा.विश्वस्त सचिन गुजर, अ.नगर जिल्हा बॅकेचे संचालक करण ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लकी सेठी, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक थोरे, संजय आगाशे,
माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, सनी सानप, भाजपा सरचिटणीस रुपेश हरकल, माजी नगरसेवक राजेश अलग आदींनी ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
तसेच रितेश एडके, महेंद्र जावळे, किशोर कंत्रोड, संतोष आढागळे, निलेश ओझा, मनोज भोसले व अनेकांनी शाल ,बुके व गुलाबपुष्प देवुन धर्मगुंरूचे स्वागत केले. यावेळी कमलाकर पंडित व मंगल दुशिंग यांनी सुत्रसंचलन केले. मिरवणूक यशस्वी होणेकामी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश भालेराव, फा.विक्रम शिणगारे ,फा. अनिल चक्रनारायण, पा. अण्णासाहेब अमोलिक, पा.सतीश आल्हाट, पा. दिपक शेळके, पा.सातदिवे, कमलाकर पंडित,विजय त्रिभुवन, लाजरस गायकवाड, जॉन धीवर, डॅनियल साळवे, लुकस दिवे, ललित गायकवाड, संदीप साळवे, प्रवीण सात्राळकर, रविन्द्र त्रिभुवन तसेच महिला प्रतिनिधी लता बनसोडे, बेनिग्ना पवार, सुवर्णा बोधक, मंगल दुशिंग, विजया दळवी, संगीता पंडित, युथ ग्रुप, नाताळ उत्सव समिती, महिला मंडळ, कनोसा सिस्टर्स व सेंट लुक हॉस्पिटलच्या सिस्टर्स आदींनी परीश्रम घेतले या सर्वांचे कमलाकर पंडित यांनी आभार मानले व फा. प्रकाश भालेराव यांनी केलेल्या शेवटच्या प्रार्थनेने सदर मिरवणुकीची सांगता केली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
रवि त्रिभुवन (सर) श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, December 22, 2024

श्रीरामपूर - मोफत नाडी परीक्षण शिबीरात अनेकांनी घेतला नाडी परीक्षणाचा लाभ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक व त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नाडी परीक्षण व अष्टविद परीक्षेसह या शिबिरात मध्ये आज शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला, यामध्ये आयुर्वेदाचार्य डॉक्टर सोनाली खर्डे व डॉक्टर प्रीतम गोरडे यांनी पेशंटची नाडी परीक्षण करून मार्गदर्शन व आहार विषयक सल्ला मार्गदर्शन व उपचार दिले,
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री आयुर्वेद हर्बल कॉस्मेटिक च्या संचालिका सौ.सोनल संदीप त्र्यंबके व श्री. संदीप त्र्यंबके त्याचबरोबर त्यांचे सहकारी महादेव ओहोळ, सुभाष कुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोलताना श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिकच्या संचालिका सौ. सोनल संदीप त्र्यंबके यांनी सांगितले की, वेळोवेळी आमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकहित उपयोगी असेच अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येईल त्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना नक्कीच फायदा होईल आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणे व येणाऱ्या काळामध्ये संस्कार शम्यं व निरोगी सुदृढ पिढी घडवणे हेच आमचे ध्येय असेल त्यासाठी श्री आयुर्वेद व हरबल कॉस्मेटिक असे अनेक उपक्रम आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी राबवत राहील असेही त्या म्हणाल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

नाताळ या सणानिमित्त श्रीरामपूर शहरात स्कॅटल मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
नाताळ सणानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात स्कॅटल मिरवणूक काढण्यात आली होती,या मिरवणुकीत श्रीरामपूर धर्मग्रामाचे लोयोला सदन येथील प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव, रे.फा.विक्रांत शिनगारे, रे.फा.जेकब 
गायकवाड, लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख रे.फा.अनिल चक्रनारायण तसेच संत लुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स, कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर्स, पास्टर आण्णा अमोलिक,पा.सतिश आल्हाट, पा.रावसाहेब ञिभुवन, पा.सचिन चक्रनारायण , पा.दिपक शेळके,पा.बन्टी सातदिवे, पा.अलिशा अमोलिक, पा.निलीमा आल्हाट कलाकार पंडीत त्याचबरोबर सर्व ख्रिस्ती भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
नाताळ सणाची मिरवणूक चालू असताना श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार हेंमत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बैंकेचे संचालक करणदादा ससाणे,सचिन गुजर, संजय छल्लारे, सिध्दार्थ मुरकूटे, प्रकाश ढोकणे, लकी शेट्टी, अशोक थोरे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये,रूपेश हरकल, राजेश अलघ तसेच नाताळ उत्सव समिती, क्रॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट),उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी समस्त ख्रिस्ती बंधू- भगीनींना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, December 21, 2024

शब्दगंध ची नगरमध्ये बुधवारी**वार्षिक सर्वसाधारण सभा


अ,नगर - प्रतिनिधी - वार्ता -
शब्दगंध साहित्यिक परिषद, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२५/१२/२०२४ रोजी स.११.०० वा.कोहिनूर मंगल कार्यालय,पाईपलाईन रोड,सावेडी,अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माहिती संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.                                                                                          
    सभेत जमा खर्चास मंजुरी, शाखा विस्तार,नवीन सभासदांना मान्यता,सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन, साहित्य पुरस्कार, राज्य कार्यकारी मंडळ सदस्य निवड या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राज्यस्तरीय प्रेम काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
     तरी सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, प्रा. डॉ. अशोक कानडे, सुभाष सोनवणे,भगवान राऊत, भारत गाडेकर, राजेंद्र पवार, डॉ.तुकाराम गोंदकर, सुनील धस, राजेंद्र फंड,स्वाती ठुबे, अजयकुमार पवार, राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - संपुर्णा सावंत


*सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी - संपुर्णा सावंत*
 
नगर / प्रतिनिधी:
मस्साजोग केज बिड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली.या घटनेचा जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर कडून जाहीर निषेध करण्यात आला,तथा संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे. करण्यात आली आहे.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत, उपाध्यक्ष शोभा भालसिंग, तालुका अध्यक्ष सुरेखाताई कडूस, सचिव वंदना नीगुट, शिलाताई शिंदे,अंमल सासे, सुरेखा सांगळे, स्वाती शेटे पाटील, राजेश्री वणी आदी उपस्थित होते. 
सदरील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या हत्येमागे एक मोठी बलाढ्य शक्ती आहे. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे.या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल असे जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष शीवमती संपूर्णा सावंत यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने तहसीलदारां मार्फत निवेदना द्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================



Wednesday, December 18, 2024

पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यासाठी अधिस्वीकृती - डॉ. किरण मोघे


मन्सूरभाई शेख यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांचा सत्कार

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पत्रकारांना लेखनीमुळे सन्मान मिळतो. पत्रकारांना सकस पत्रकारिता करता यावी यासाठी शासन पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देते, असे प्रतिपादन शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागाचे प्रभारी उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी केले.
नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती, जिल्हा माहिती कार्यालय आणि सीएसआरडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सीएसआरडी संस्थेच्या सभागृहात विकास पत्रकारिता व पत्रकारांसाठीच्या विविध शासकीय योजना या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली,ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेला राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, नाशिक विभाग अधिस्वीकृती समितीचे सदस्य विजयसिंह होलम, सीएसआरडीचे प्रा. विजय संसारे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार, मुक्त पत्रकार, विविध दैनिकांचे संपादक,पत्रकार, वृत्तछायाचित्रकार, पत्रकारिता महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. मोघे म्हणाले, पत्रकारांसाठी पत्रकार सन्मान निधी योजना आहे. तसेच शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून पत्रकारांना आजारपणात मदत केली जाते. विकासात्मक पत्रकारितेसाठी शासनाचे विविध पुरस्कार आहेत. केंद्र सरकारचीही पत्रकारांना मदत करणारी योजना आहे. याबाबत पत्रकारांनी सतर्क राहून योजनांचा फायदा घेणे आवश्‍यक आहे. पत्रकारांच्या एका बातमीने समाजात मोठे परिवर्तन घडते. त्यामुळे विकास पत्रकारिता आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी श्री.लंके म्हणाले की, अधिस्वीकृती व इतर योजनांची माहिती सर्व पत्रकारांना मिळावी यासाठी समिती जिल्हानिहाय कार्यशाळा घेत आहे. पत्रकारितेचा दर्जा उंचावणे व पत्रकारांच्या पाठिशी मदत उभी करणे हा समितीचा हेतू असल्याचेही श्री.ढमाले म्हणाले,
तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे म्हणाले की,
अधिस्वीकृती प्राप्त होण्यासाठी सध्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.
अधिस्वीकृती समिती ही पत्रकारांच्या नेहमीच पाठीशी आहे. विजयसिंह होलम यांनी प्रास्ताविक करत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. अनेक पत्रकारांना योजनाच माहित नसतात. त्यामुळे योजना पत्रकारांपर्यंत पोहोचविणे हा कार्यशाळेचा उद्देश असल्याचेही ते म्हणाले. 
 प्रा. विजय संसारे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सॅम्युअल वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. पत्रकार भैरवनाथ वाकळे यांनी आभार मानले.

*विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. मोघे यांचा सत्कार*

जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी विधानसभा निवडणूक काळात पुस्तिका निर्माण करुन पत्रकारांपर्यंत जुनी राजकीय माहिती पोहोचवली याबाबत मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मन्सूर शेख, विठ्ठल लांडगे, भूषण देशमुख, महेश देशपांडे, मिलिंद देखणे, सूर्यकांत नेटके, बंडू पवार, निशांत दातीर, कुणाल जायकर, रोहित वाळके, विठ्ठल शिंदे आदींच्या हस्ते जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने मोघे यांचा सत्कार करण्यात आला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार जी.एम‌.शेख - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

स्नेहालय संचलित स्नेहजोत युनिट - २ आणि महिला रणरागिणी यांच्या संयुक्त विद्यमाने


श्रीरामपूर शहरात जागतिक
एड्स नियंत्रण सप्ताह संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
जागतिक एड्स नियंत्रण सप्ताह निमित्ताने स्नेहालय संचलित स्नेहजत युनिट - २ तसेच येथील महिला रणरागिणी यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती सप्ताह निमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये एड्स जनजागृती यासोबतच आरोग्य आणी कायदेविषयक मार्गदर्शन देखील करण्यात आले.
सदर कार्यक्रमास उद्घाटक व अध्यक्ष म्हणून डॉ. सीमा जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते व त्यांच्या हस्ते आरोग्य शिबिरात एचआयव्ही लोगो /लाल फीत लावून उद्घाटन करण्यात आले व कायदेविषयक जनजागृती व्याख्यानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रकल्प व्यवस्थापक श्री. यशवंत कुरापटी यांनी संस्थेच्या कामकाजाची उजळणी करून संस्थेची माहिती दिली. त्यानंतर डॉ.सीमा जाधव यांनी एचआयव्ही ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गुप्त रोग होण्यामागची कारणे, लक्षणे, महिलांनी असे आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले व महिलांनी वर्षातून किमान एक वेळेस वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे याबाबत सांगितले,तसेच ॲड.शिल्पा चिंतेवार यांनी महिलांच्या संरक्षणासाठी, सबलीकरणासाठी, महिलांचे अधिकार कायदे व त्यातील तरतुदी विषयी मार्गदर्शन केले तसेच महिलांनी स्वतः कायद्याविषयी जागृत राहून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सांगितले.
 समुपदेशक राहुल भोसले यांनी आभार मानले , क्षेत्र अधिकारी आकाश जावळकर , वामन सूर्यवंशी , हर्षल हगवणे, लता बेंद्रे, वैशाली घाटे, आरती जावळकर, योगिता शिंदे, माधुरी वाघ ,इंदुबाई जावळे, लिलाबाई खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक प्रसन्न धुमाळ व लॅब टेक्निशियन लक्ष्मीकांत करपे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी सहभाग नोंदविला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



विद्यानिकेतन अकॅडमीच्या जपनीतकौर ठकराल हीने मिळवले आंतरराष्ट्रीय मानांकन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन ॲकेडमीतील इयत्ता आठवी नंबी नारायण मधील विद्यार्थिनी, जपनीत कौर सरबदीपकौर रणजीत सिंग ठकराल हिने वर्ल्ड हँडरायटिंग कॉन्टेस्ट - २०२४ मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे ! तिच्या अथक परिश्रम, समर्पण, आणि अपवादात्मक कौशल्याचे हे अद्वितीय यश आहे. या अलौकीक विजेतेपदामुळे, जपनीतकौर च्या सुंदर अक्षराचे नमुने गूगल आणि वर्ल्ड हँडरायटिंग कॉन्टेस्टच्या गूगल मुखपृष्ठावर वर्षभर प्रदर्शित केले जातील, ज्यामुळे जगभरातील लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.  
हे यश फक्त जपनीत आणि तिच्या कुटुंबासाठीच अभिमानाचे क्षण नाहीत, तर विद्यानिकेतन अकॅडमी, श्रीरामपूरसाठीही एक गौरवशाली टप्पा आहे. एका छोट्या शहरातील शाळा असूनही, आमच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर यशस्वी होण्याची क्षमता सिद्ध केली आहे. आणि सर्वांत आनंदाची बाब ही आहे की जपनीतचे यश आता लक्सर कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या आणि दिल्ली मेट्रोच्या २५ होर्डिंग्सवर देखील झळकते आहे.
    जपनीतला तिच्या या अप्रतिम यशाबद्दल विद्यानिकेतन संकुलाचे चेअरमन श्री. टी. ई . शेळके सर , व्हा. चेअरपर्सन डॉ प्रेरणा शिंदे मॅडम, खजिनदार डॉ.राजीव शिंदे सर, प्राचार्या वर्षा धामोरे मॅडम, समन्वयक श्री. अमित त्रिभुवन सर ,व सर्व शिक्षक यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या देवून तीच्या भावी यशस्वी वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बांधकाम कामगारांची प्रकरणे तात्काळ मंजूर करा; कामगार संघटनेची मागणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांची नव्याने नाव नोंदणी, नोंदीत कामगारांचे नूतनीकरण, शिष्यवृत्ती, प्रसूती, भांडे संच आदी प्रकरणे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून सदरची प्रकरणे तात्काळ मंजूर करावी, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, अहिल्यानगरचे कामगार उप-आयुक्त रेवणनाथ धीसले यांचेकडे श्रीराम संघटीत बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
               याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदार संघातील बांधकाम कामगारांचे नूतनीकरण करणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने रेशनकार्ड, शिष्यवृत्ती, महिलांचे प्रसूती अनुदान, भांड्यांचा संच वितरण आदी कामे रखडलेली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच नवीन नोंदणी बंद असल्याने अनेक कामगार या योजनेपासून वंचित राहत आहे. सदर प्रकरणे तात्काळ चालू करावी, अशी मागणी युवानेते नीरज मुरकुटे, श्रीराम संघटीत बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक गणेश छल्लारे, अध्यक्ष संदीप शेरमाळे, सागर अमोलिक, संदीप कांबळे यांनी केली आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
*समता मिडिया सर्व्हिसेस* 
*श्रीरामपूर - 9561174111*
-----------------------------------------------
=================================

Tuesday, December 17, 2024

श्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर तालुक्यातील मौजे कोन्ची येथील स्व. दादाभाऊ भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीधर भोसले यांनी सामाजिक उपक्रमार्गत संपुर्ण महाराष्ट्रात ख्रिस्ती व इतर अल्पसंख्यांक समाजाचे १५१ वधू-वर मेळावे आयोजित करून असंख्य विवाह जुळवून विक्रम केल्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची विशेष दखल घेवुन श्रीरामपूरच्या ब्रदरहुड सोशल सेंटरने श्रीधर भोसले यांना बाभळेश्वरच्या बाळ येशू चर्च मधे ख्रिस्ती समाज भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सेक्रेटरी पी. एस. निकमसर, फादर मायकल वाघमारे, फादर संजय पंडीत, वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. शैलजा ब्राम्हणे/साबळे, पिटर बारगळसर, साकुरी चे उपसरपंच सचिन बनसोडे, बाळासाहेब ब्राम्हणे, मायकल जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. निमीत्त होते,
 १५५ व्या ख्रिस्ती वधू-वर मेळाव्याचे फादर मायकल यांच्या शुभहस्ते उद्गघाटन झाल्यानंतर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, औरंगाबाद इथुन आलेल्यांची १५० हून अधिक उपस्थिती दिसून आली. बाळासाहेब ब्राम्हणे यानी प्रास्ताविक केले तर संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, December 15, 2024

अंशकालीन निदेशकांचे प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडणार - आ.ओगले


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 तालुक्यातील कला, क्रीडा व कार्यानुभव या अंशकालीन शिक्षकांनी मान.आमदार हेमंत ओगले यांना निवेदन दिले. यावेळी श्रीरामपूर तालुका कला, क्रीडा, कार्यानुभव समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी २०११-१२ पासून आज पर्यंत अंशकालीन निदेशकांना तटपुंज्या मानधनावर कार्य करत असल्याचे सांगितले. तसेच नगरपालिका ,महानगरपालिका, जिल्हा परिषद या शाळांवर या अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती असते व त्यांना सहावी सातवी आठवी शंभर पेक्षा जास्त पट असेल तरच नियुक्ती मिळते. तर अशी अट न राहता दोन किंवा तीन शाळा एकत्रित करून ज्या शिक्षकांचा पट कमी झाला आहे. त्यांना देखील नियुक्ती देण्यात यावी. सध्याच्या मानधनात जास्त वाढ करून लवरकच कायम संवर्ग तयार करावा. आदि मागण्या मांडल्या. यावर आमदार श्री. ओगले म्हणाले की, निश्चितच या मागण्या रास्त असून सरकार याची दखल निश्चित घेईल आणि आम्ही देखील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडू आणि राज्यातील अंशकालीनिदेशकांना न्याय मिळवून देऊ असे सांगितले. याप्रसंगी अंशकालीन शिक्षक सुयोग सस्कर यांनी देखील निदेशकांच्या व्यथा मांडल्या.
यावेळी महिला तालुकाध्यक्ष पवार मॅडम, तरकासे मॅडम, यास्मिन पठाण ,राजगुरू सर, मोहसीन सर आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
सुयोग सस्कर,श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

होमगार्ड सप्ताह निमित्त माऊली वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम व फराळाचे वाटप


होमगार्ड सप्ताह निमित्त माऊली वृद्धाश्रमात स्वच्छता मोहीम व फराळाचे वाटप 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर शहरा लगत असलेले शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी राहाता तालुका होमगार्ड पथकाच्या वतीने येथील आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांच्यासाठी फराळाचे वाटप व स्वच्छता अभियान राबविण्यात आले,
 सदरचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अहिल्यानगर श्री. प्रशांत खैरे साहेब तसेच मा. संजय शिवदे केंद्रनायक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम,वृक्षारोपण आदी सामाजाभिमूख उपक्रमे राबविण्यात आली.
 परंतु केंद्रनायक संजय शिवदे यांच्या विशेष सूचनेवरून अनाथ गरजू निराधार अशा व्यक्तीसाठी मोहीम राबवून सेवा करण्याची संधी प्राप्त करावी यामुळे राहता होमगार्ड पथक यांच्या वतीने श्रीरामपूर परिसरातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच वयोवृद्ध आजी आजोबा यांचे आशीर्वाद घेऊन मोहिम राबविण्यात आली, प्रसंगी राहाता तालुका समादेशक अधिकारी सर्वश्री संदीप शिंदे बाबासाहेब शेलार,प्रशांत भालेराव,अरुण पवार, शुभम अंभोरे ,गुंड पत्रकार राजेंद्र देसाई आदींनी यामध्ये सहभाग नोंदवला. आश्रमाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
आजी आजोबा तसेच शालेय विद्यार्थी यांना फराळाचे वाटप करण्यात आले,
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पना वाघुंडे, दत्तात्रय खिलारी, शुभम नामेकर, संतोष भालेराव,श्री.जोशी आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन राजेंद्र देसाई यांनी केले तर आभार दत्तात्रेय खिलारी यांनी मानले.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
 वडाळा महादेव 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

प्राचार्य शंकरराव उनउने राष्ट्रीय मराठी, कोकणी बोलीभाषा काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर





झाडी बोली कवी उपेंद्र रोहनकर प्रथम, बेळगावी बोलीतील कवयित्री विजया देवगोजे द्वितीय, कोकणी बोलीतील अनिता बर्गे तृतीय


- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने ऐतिहासिक ठरेल अशा राष्ट्रीय मराठी ,कोकणी भाषेतील बोलीभाषेतील काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर , नोव्हेंबर २०२४ मध्ये केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निष्ठावंत अनुयायी, रयत शिक्षण संस्थेचे आजन्म सेवक, मराठीचे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक व छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ज्यांनी ११ वर्षे प्राचार्यपद भूषविले असे प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब उनउने यांच्या नावे ही स्पर्धा सुरु करण्यात आली. मराठी बोली व भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी बोली भाषा कविता लेखन स्पर्धेचे आयोजन असलेली ही देशातील पहिली स्पर्धा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून कवी कवयित्री मिळून १२३ जण सहभागी झाले असून १८६ कविता या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी जाहीर केला. या स्पर्धेत गडचिरोली येथील उपेंद्र रोहनकर यांच्या झाडी बोलीतील ‘ डोरे राऊन आंद्रा’ या कवितेने प्रथम क्रमांक मिळविला असून रुपये ५००० चे पारितोषिक व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक लांजा येथील कवयित्री मराठीचे अभ्यासक विजयालक्ष्मी देवगोजे यांच्या बेळगावी बोलीतील कविता ‘सासूरवाशीन’ या कवितेस जाहीर झाले आहे. रुपये चार हजार व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे. अनिता नंदू बर्गे यांनी लिहिलेल्या ‘जीनेचे एक पुस्तक ‘ या कोकणी बोलीतील कवितेने तिसरा क्रमांक मिळविला असून तीन हजार रुपयांचे पारितोषिक रक्कम , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेत बोलीभाषेतील कवितेला उत्तेजन देण्यासाठी आणखी रुपये ५०० ची १० विशेष पारितोषिके ठेवण्यात आलेली होती, या उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवणाऱ्या कवींनी विविध बोलीतून सुंदर कविता लिहिल्या . यामध्ये 
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक : सावंतवाडीचे कवी किशोर वालावलकर यांच्या कोकणी बोलीतीतील ‘ इस्माईल ठाकूर कुरले गरयता’ कवितेने मिळवला आहे.
उत्तेजनार्थ दुसरा क्रमांक जळगाव येथील धरणगांव मधील कवी बी.एन.चौधरी यांच्या अहिराणी बोलीतील ‘अहिराणी म्हणी गोड ‘या कवितेस जाहीर झाला आहे. चंद्रपूर येथील आमडी येथील कवी ‘प्रशांत भंडारे’ यांच्या झाडी बोलीतील कविता ‘रोवणा’ हिस उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील झाडी बोलीत कविता लिहिणारे कवी ‘ सुनील बावणे ‘यांच्या लाव बेकनी या कवितेने उत्तेजनार्थ चौथा क्रमांक मिळविला आहे. 
तर प्रा.भाऊसाहेब गोसावी यांच्या ‘निमो ‘या मालवणी बोलीतील कवितेने उत्तेजनार्थ पाचवा क्रमांक संपादन केला आहे. गोवा परिसरातील काणकोण परिसरातील कोकणी बोलीतील जयेश पाय्कर यांच्या ‘पोल्ली आणि चूल’ या कवितेने उत्तेनार्थ सहावा क्रमांक मिळविला आहे. तर साताऱ्याच्या ग्रामीण बोलीत लेखन करणारे लेखक ,कवी निलेश महिगावकर यांच्या ‘ पतंग्या’ या कवितेस उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक जाहीर झाले आहे. मालवण येथील कवयित्री वैशाली पंडित यांच्या ‘ वाडा वो माय’ या घाटी बोलीतील कवितेने आठवे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे. देवगड हिंदले येथील मालवणी कवी अविनाश बापट यांनी लिहिलेल्या ‘नामो कुळकार’ या मालवणी बोलीतील कवितेने उत्तेजनार्थ नववे पारितोषिक संपादन केले असून अंतिम दहावे उत्तेजनार्थ पारितोषिक लोकगीत बोलीत लिहिलेल्या ‘विलास चौगुले’ यांच्या ‘गोजरी भावज’ या कवितेस जाहीर झाले आहे. स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी कवींचे अभिनंदन केले. सदर काव्यस्पर्धेचे परीक्षक म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख व बोलीभाषेचे अभ्यासक प्राध्यापक डॉ.नंदकुमार मोरे व डी.पी.भोसले कॉलेज कोरेगांव येथील मराठी विभागातील प्राध्यापक, काव्य समीक्षक प्रा.डॉ. देवानंद सोनटक्के यांनी काम केले. या स्पर्धेसाठी होणारा सर्व प्रकारचा खर्च भागवण्यासाठी प्राचार्य शंकरराव उर्फ बापूसाहेब यांचे नातू अमोल अशोक उनउने व अमोल यांच्या पत्नी मीनल उनउने यांनी देणगी रूपाने देऊन सहकार्य केलेले आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रत्येक कवीच्या एका कवितेस सहभागी करून व बोलीचा योग्य अभ्यास होण्याच्या दृष्टीने एकापेक्षा जास्त निवडलेल्या कवितांचा मिळून ‘ बोलीगंध’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह संपादक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व सौ .मीनल अशोक उनउने हे संपादित करणार आहेत. जानेवारी २०२५ चे पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पारितोषिक वितरण समारंभ घेण्याचे नियोजन असून या विशेष समारंभात प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येतील असे स्पर्धेचे समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सांगितले असून या कार्यक्रमास स्पर्धेतील व स्थानिक कवींनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================



श्रीरामपूर - विद्यानिकेतनमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक क्रिडा महोत्सवाचे बक्षीस वितरण नुकतेच पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी विद्यालयाचे शिक्षक-पालक प्रतिनिधी बेलापूर दूरक्षेत्रचे उपनिरीक्षक सुधीर हापसे, संजय काळे, विशाल उपाध्ये, प्रतीक प्रधान, रुपाली पाटील, रोहिणी कुऱ्हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून स्व. रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रसंगी तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल असे सांघिक खेळ घेण्यात आले. तर १०० (शंभर) व २०० (दोनशे) मी. धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक अशा वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी ब्ल्यू हाऊस उत्कृष्ट हाऊस म्हणून घोषित करण्यात आला. तर मोठ्या गटात उत्कृष्ट खेळाडू म्हणून संजिवनी गाडेकर व प्रतिक खंडागळे तसेच छोट्या गटात जान्हवी क्षीरसागर व गौरव ब्राम्हने या विद्यार्थ्यांना घोषित करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक (एनआयएस) कोच अजय आव्हाड, मयूर जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांचे विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनीषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल पारखे, सूत्रसंचालन प्रीती नाणेकर, कोमल पारखे यांनी केले, तर आभार प्रीती नाणेकर यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलाचीआवश्यकता - अनंत पाटील

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मानवी विकासासाठी शिक्षण हे एक मुख्य साधन असून, त्यामुळेच आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत दै. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांनी डिपॉल इंग्लीश मिडीयम हायस्कूलच्या २७ व्या वार्षीक स्नेह संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
 ते पुढे म्हणाले की, डिजिटल व इंटरनेट तंत्रज्ञान व माहिती भांडार यासाठी फार उपयुक्त आहे. अर्थात, ते केवळ तंत्र म्हणून न स्वीकारता, त्याचा योग्य पद्धतीने वापर करायला हवा ज्या गोष्ट्री आपण फक्त सिनेमे किंवा गोष्टींमध्ये ऐकल्या आणि बघीतल्या त्या आता प्रत्यक्षात घडत आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडीयाचे दुष्परीनाम ही समजावत कार्यक्रमासाठी सदिच्छा व्यक्त करत उपस्थितांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 
दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिस्टर डॉक्टर बेनिंजा एस. सी. एस. ए .या उपस्थित होत्या त्या सेंट् लुक हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यरत आहेत. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ आसिफ जीवनी (मेडिकल ऑफिसर ग्रामीण रुग्णालय पुणतांबा ) व कुमारी नेहा ओझा (एअर होस्टेस एअर इंडिया) त्याचप्रमाणे रेव्ह. फादर जीमिल व्ही. सी.( प्रेसिडेंट ऑफ व्ही एम एस एस अहिल्यानगर) यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर सीजो व रेव्ह फादर फ्रॅंको आणि विद्यालयाच्या प्राचार्य रेव्ह सिस्टर सेलीन ,रवींद्र लोंढे यांची कार्यक्रमाला अनमोल असे मार्गदर्शन लाभले. मुलांनी विविध कला गुणांचे प्रदर्शन केले. देशाचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. 
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले. श्रीरामपूर येथील डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल गॅदरिंग या कार्यक्रमांमध्ये रतन टाटा यांची एक थीम घेऊ श्रद्धांजली देण्यात आली (छायाचित्रकार अमोल कदम)


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================