सर्व तालुक्यांमध्ये ' शासन आपल्या दारी'
( नगर ) लोणी ANI News नेटवर्क. शासकीय कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरिकांना सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावेत म्हणून सर्व तालुक्यांमध्ये 'शासन आपल्या दारी' उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सूचना महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना च्या वर्गाला दिल्याची माहिती महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी दिली.
महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास मनांश वेळा निलंग
होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रुटी असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरीताही विद्याथ्र्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी प्रवेशापूर्वी दूर व्हाव्या, शिधा पत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरिकांना सहज उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे मंत्री विखेपाटील म्हणाले.१५ दिवसांत नियोजनकरण्याच्यासूचना
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या वतीने गावपातळीवर 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचे नियोजन करावे. त्या त्या गावांमध्ये या उपक्रमाचे कॅम्प लागण्यापूर्वी नागरिकांना माहिती कळवावी, महसूलच्या सर्व योजनांचे स्वतंत्र विभाग करून, नागरिकांचे अर्ज दाखल करून
त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या. अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट करून, या महिन्यातच सर्व ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमाचे नियोजन करून, पुढील १५ दिवसांत सर्व दाखले नागरीकांना कसे मिळतील, याचे प्रयत्न
अधिकाऱ्यांनी करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. तालुकास्तरावर उपक्रमात भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभाग घेणार असल्याचे ते म्हणाले. सरकारच्या या अभियानाचे व अभियानामागील संकल्पनेचे गावागावातील शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे छोटी संमेलने आयोजित करता येतील असे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, मुंबई बाहेरून येणाऱ्या साहित्यिकांसाठी राहण्याची सोयही केली जाणार आहे.